विषय «उवाच»

बुद्धि आणि भावना

मला केवळ नकारात्मक भावनिक वृत्तीचा उपदेश करायचा नाही. सर्व बलेवान भावनांचा उच्छेद करावा असे मी सुचवीत नाही. ही भूमिका मी फक्त ज्या भावनांवर सामूहिक उन्माद आधारलेले असतात त्यांच्याच बाबतीत घेतो, कारण सामूहिक उन्माद युद्ध आणि हुकूमशाही यांना पोषक असतो. शहाणपणा केवळ बौद्धिक असण्यात नाही. बुद्धी वाट दाखविते आणि मार्गदर्शन करते; पण ज्यातून कृति निर्माण होते ते बळ तिच्यात नाही. हे बळ केवळ भावनांमधूनच मिळवावे लागते. ज्यांतून इष्ट सामाजिक परिणाम घडून येतात त्या भावना द्वेष, क्रोध आणि भय यांच्या इतक्या सहज निर्माण होत नाहीत.

पुढे वाचा

निंद्य आणि हीन कृत्य

मी कोणत्याही प्रकारच्या युद्धात कोणत्याही परिस्थितीत आणि कधीही सामील होणार नाही. मग त्या युद्धामागची कारणं मला कितीही पटणारी असोत.

लढाई ही एक अतिशय नीच आणि घृणास्पद कृती आहे असं मी मानतो. मानवजातीला लांच्छनास्पद अशा या कृतीवर लवकरात लवकर बंदी घातली पाहिजे. बँडच्या तालावर रांगेने चालण्यात धन्यता मानणाच्या माणसांविषयी माझ्या मनात चीड आहे. अशा माणसाला मेंदू अनवधानानं देण्यात आलेला असावा. नुसत्या पाठीच्या कण्यावरही त्याचं उत्तम भागू शकलं असतं. रणांगणावर हुकुमाची तामिली म्हणून देशभक्तीच्या नावाखाली जे काही शौर्य गाजवलं जातं, अमानुष हत्याकांड चालतं आणि एकूणच जो काही मूर्खपणा चाललेला असतो, त्याची मला अतिशय किळस येते!

पुढे वाचा

लोक काय म्हणतील?

वास्तविक पाहिले तर ज्यांना आपण लोक म्हणतो, व ज्यांच्या अपवादाला आपण भीत असतो, त्यांवर आपले फारच थोडे अवलंबून असते. लोकांना संतुष्ट राखण्याकरिता स्ववंचन करणे हे महापातक आहे असे समजले पाहिजे. सामान्य लोक अंधासारखे गतानुगतिक असतात. विचारी पुरुष अशांच्या छंदाने नेहमी वागतील तर सत्पक्षाचा प्रसार कधीच व्हावयाचा नाही. तेव्हा अज्ञानमग्न, अविचारी आणि ज्यांच्याशी आपला अर्थाअर्थी संबंध नाही अशा लोकसमुदायाच्या निंदेकडे आणि स्तुतीकडे दुर्लक्ष्य करून ज्याच्या मनाला जी मते प्रशस्त वाटत असतील त्यांचे त्याने निर्भयपणे प्रतिपादन करावे. असे केल्याने उलट पक्षांचे ऐकून घेण्याची व विचारपूर्वक सत्यासत्याचा निर्णय करण्याची संवय सर्वास लागेल,

प्लेटोचे आदर्श राज्य

प्लेटोच्या Republicच्या राज्यशास्त्रीय मतांची भल्या लोकांनी प्रशंसा करावी हे वाङ्मयीन भद्रमानी वृत्तीचे (snobbery) चे अत्यंत आश्चर्यकारक उदाहरण आहे. या एकतंत्री हुकूमशाही प्रबंधाविषयीच्या काही गोष्टी पाहा. शिक्षणाचे मुख्य प्रयोजन युद्धात धैर्य निर्माण करणे हे असून अन्य सर्व गोष्टी त्याला साधनीभूत मानल्या पाहिजेत. याकरिता माता आणि आया यांच्याकडून बालकांना सांगितल्या जाणार्यास गोष्टींची कडक तपासणी केली पाहिजे. होमरचे वाचन बंद केले पाहिजे, कारण तो भ्रष्ट लेखक वीरांना रडवतो आणि देवांना हसवतो. नाटकाला मनाई केली पाहिजे, कारण त्यात खलपुरुष आणि स्त्रिया असतात. संगीत काही विशिष्ट प्रकारचेच असले पाहिजे, म्हणजे आजच्या परिभाषेत Rule Britannia सारखे.

पुढे वाचा

इतरांच्या मताबद्दल आदर

मला जे तत्त्व शिकवायचे आहे, ते स्वैर स्वेच्छाचाराचे नाही. पारंपरिक मतात अभिप्रेत असतो, जवळपास तितकाच आत्मसंयम त्यात अवश्य आहे. परंतु त्यात संयम इतरांच्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ न करण्याकरिता वापरावा लागेल, आपले स्वातंत्र्य कमी करण्याकरिता नव्हे. आरंभापासून योग्य शिक्षण मिळाल्यास इतरांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वातंत्र्य याबद्दल आदर बाळगणे बरेच सोपे होईल अशी आशा करायला हरकत नाही असे मला वाटते. परंतु आपल्याला इतरांच्या कृतीवर नीतीच्या नावाने नकाराधिकार वापरण्याचा अधिकार आहे असा विश्वास निर्माण करणाच्या आजच्या परिस्थितीत वाढलेले जे लोक आहेत त्यांना त्या आवडत्या छळापासून अलिप्त राहणे जड जाईल.

पुढे वाचा

असे जग निर्मिणे शक्य आहे

जे जग आपल्याला निर्मायचे आहे त्यात सर्जक वृत्ती जिवंत असतील. त्यात जीवन हे आनंद आणि आशा यांनी परिपूर्ण असे साहस असेल. आपल्या जे मालकीचे आहे ते राखण्याच्या किंवा दुसन्याच्या मालकीच्या वस्तू लुबाडण्याच्या नव्हे, तर विधायक प्रवृत्तींवर आधारलेले ते जीवन असेल. त्या जगात स्नेहाला अनिबंध वाव असेल. त्यातील प्रेमातील अधिकारवृत्ती नाहीशी झालेली असेल. त्यातील क्रौर्य आणि असूया सुखानुभवाने नाहीशी झालेली असतील, आणि जीवनाला समृद्ध करणाच्या सर्व सहजप्रवृत्तींना वाव मिळून ते आनंदमय झालेले असेल, असे जग निर्मिणे शक्य आहे. ते फक्त ते इच्छिणाच्या मानवांची वाट पाहात आहे.

पुढे वाचा

शूद्रांविषयी मनुस्मृति

दुसऱ्या अध्यायात शिशूचे दहाव्या किंवा बाराव्या दिवशी नामकरण करावे असे सांगितल्यावर चतुर्वणची नावे कशी असावीत याविषयी :
मंगल्यं ब्राह्मणस्य स्यात् क्षत्रियस्य लान्वितम्।।
वैश्यस्य धनसंयुक्तं शूद्रस्य तु जुगुप्सितम् ॥ ३२ ॥

म्हणजे ब्राह्मणाचे नाव मंगलवाचक, क्षत्रियाचे बलवाचक, वैश्याचे धनवाचक आणि शूद्राचे घृणावाचक ठेवावे.

उपपदांविषयीही असाच दंडक आहे. उपपद म्हणजे आडनाव.
शर्मवत् ब्राह्मणस्य स्यात् राज्ञो रक्षासमन्वितम्।।
वैश्यस्य पुष्टिसंयुक्तं शूद्रस्य प्रेष्यसंयुतम्।। ३३ ॥

ब्राह्मणाच्या नावाला शर्म(म्हणजे सुख, कल्याण)वाचक, क्षत्रियांच्या नावाला रक्षणवाचक, वैश्याच्या नावाला पोषणवाचक, आणि शूद्राच्या नावाला दासवाचक उपपद द्यावे. कुल्लूकभट्टाने दिलेली उदाहरणे अशी आहेत : शुभशर्मा (ब्राह्मण), बलवर्मा (क्षत्रिय), वसुभूतिः (वैश्य), आणि दीनदासः (शूद्र)
(वस्वसुसंपत्ति मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ३२, ३३

दीडशे वर्षांपूर्वीच्या रामजन्मभूमीचे वर्णन

“ …रामनवमीचे दिवसी असे तेथे माहात्म्य आहे की, दोन प्रहरी शरयू गंगेत स्नान करून रामजन्म ज्या जाग्यावर जाहालेला आहे तेथे जाऊन जन्मभूमीचे दर्शन त्या समई ज्यास घडेल त्यास पुनः जन्म नाही, असे श्रुतिस्मृति पुराणप्रसिद्ध आहे. म्हणोन सर्व लोक जन्म दिवसी मध्यान्ही स्नाने करून हातात तुलसी, पैसा-सुपारी घेऊन सर्व लोक जन्मभूमीचे दर्शन घेऊन तुलसी तेथे वाहातात. तेथे जागा असी आहे की, मोठे मैदान झाडीचे आहे. बहुत प्राचीन भिताडे दूर दूर आहेत. कौसल्येची खोलीची जागा पन्नास हात लांबी व चालीस हात रुंदीची असोन पक्का चुना सिसे ओतून चौथरा कंबरभर उंचीचा बांधून व दोन हात उंच फक्त कठडा मारिला आहे.

पुढे वाचा

आमचा धर्म

आमचा धर्म इतरांहून श्रेष्ठ आमचा धर्म इतरांच्या धर्माहून श्रेष्ठ आहे, व त्यांचे रहस्य स्पष्टपणे कोणास कधींही कळावयाचे नाही असे म्हणणे म्हणजे कित्येक अशक्य गोष्टी कबूल करण्यासारखे आहे.
सर्व दृश्य विश्वाचे आदिकारण; काल आणि स्थल यांनी मर्यादित होत नाही म्हणून ज्याला अनादि आणि अनंत असे म्हणतात; आपली प्रचंड सूर्यमालासुद्धा ज्याच्या अचिंत्य सामर्थ्याचे अत्यंत सूक्ष्म निदर्शन आहे असे म्हटले तरी चालेल – अशा सर्वव्यापी परब्रह्माने मत्स्य-कूर्म-वराह-नारसिंहादि दशावताराच्या फेर्‍यात सांपडून युगेंच्या युगें भ्रमण करतां करतां एकदां आमच्या कल्याणासाठी गोकुळांतील एका गवळणीच्या पोटीं यावें; शुद्ध शैशवावस्थेत पूतनेसारख्या प्रचंड राक्षसिणीचे, स्तनपानाच्या मिषानें, चैतन्यशोषण करावे, चालता बोलतां येऊ लागलें नाहीं तों लोकांच्या दुभत्यावर दरोडे घालण्यास आरंभ करून आपल्या सहकार्यांस यथेच्छ गोरस चारावे, आणि त्यांसह रानांत गुरे घेऊन जाऊन तेथे पोरकटपणास शोभणारे असे खेळ खेळावे; पुढे तारुण्याचा प्रादुर्भाव झाला नाहीं तों कामवासना प्रज्वलित होऊन कधीं मुरलीच्या मधुर स्वराने वृंदावनांतील तरुणांगनांना वेड्या करून आपापल्या घरांतून काढून आणाव्या आणि त्यांबरोबर रासादि क्रीडा कराव्या, किंवा यमुनेत त्या स्नानास उतरल्या असतांना त्यांचीं वसने कळंबाच्या झाडावर पळवून नेऊन तेथून त्यांशीं बीभत्स विनोद करावा; नंतर सोळा सहस्र गोपींचें पतित्व पत्करून फक्त दोघींसच पट्टराणीत्व द्यावे, पण त्यांतल्या त्यांतही पक्षपात केल्याशिवाय राहूं नये; पराक्रमाचे दिवस आले असतां स्वतः शस्र हातीं न धरतां दुसर्‍याचे सारथ्य स्वीकारून प्रसंगविशेष सल्लामसलत मात्र द्यावी; व घरच्या घरी यादवी माजून राहून कुलक्षय होण्याचा प्रसंग आला असतांही, ब्रह्मज्ञानाचा उपदेश देण्याच्या मिषाने युद्ध करण्यास उत्तेजन द्यावे – हे सारे शक्य, संभवनीय, व विश्वसनीय आहे असे मानिले पाहिजे.

पुढे वाचा

विश्वाचा हेतू

आपली पृथ्वी विश्वाचा एक लहानसा कोपरा आहे. आणि बाकीचे विश्व इथल्यासारखेच कदाचित् नसेल असे मानायला जागा आहे. अन्यत्र कुठे जीवन असेल हे सर जेम्स जीन्स शंकास्पद मानतात. ईश्वराच्या योजना विशेषतः पृथ्वीशी संबद्ध आहेत असे मानणे कोपर्निकन क्रांतीपूर्वी स्वाभाविक होते, पण आता ती कल्पना अयुक्तिक झाली आहे. जर विश्वाचा हेतू मनाची उत्पत्ती हा आहे असे मानले तर एवढ्या दीर्घ काळात इतके थोडे निर्मिल्यामुळे त्याला काहीसा अकुशल समजावे लागेल. अन्यत्र कुठेतरी केव्हातरी उन्नत मने निर्माण होतील याचा काहीही वैज्ञानिक पुरावा नाही. जीवन अपघाताने निर्माण झाले असे मानणे चमत्कारिक वाटेल, पण एवढ्या विशाल जगात अपघात होणे अपरिहार्य आहे.

पुढे वाचा