विषय «जात-धर्म»

हे छोटे सरदार की खोटे सरदार

गुजरात राज्यातील हिंदूराष्ट्राच्या प्रयोगशाळेचे मुख्य संचालक नरेंद्र मोदी यांनी रा.स्व.संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद वगैरे परिवाराच्या सहकार्याने आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा वेठीस धरून 27 फेब्रुवारी 2002 च्या गोध्रा हत्याकांडानंतर जो बहात्तर तासांचा अभूतपूर्व नरसंहार त्या राज्यात घडवून आणला त्याबद्दल प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया प्रभृती श्रेष्ठींनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. या देशाने गेल्या पन्नास वर्षांत जेवढे म्हणून मुख्यमंत्री पाहिले त्यांत सर्वोत्तम मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच असल्याचे शिफारसपत्र अडवाणींनी दिले. मोदींनी गुजरातेत यशस्वी केलेला प्रयोग भारतभरच्या गावोगावी आणि खेडोपाडी करू असा दृढसंकल्प तोगडियांनी व्यक्त केला.

पुढे वाचा

मला मी पाकिस्तानी असल्याची शरम वाटतेय

भारत, पाकिस्तान, जीना, मूलतत्त्ववाद


मोठ्यांच्या राजकारणात बळी जातो, तो लहानांचा…. आपल्याला आणि आपल्या मुलांना एका भीषण भविष्याला तोंड द्यावे लागणार ह्या कल्पनेने शोकाकूल झालेल्या एका पाकिस्तानी महिलेचे मनोगत


जो कुणी परदेशात प्रवास करून आलेला आहे अशी कुणीही व्यक्ती हे सांगेल की तुम्ही कुठल्याही देशात जा, तुम्ही गेलेला देश कितीही विकसित असो.. जर तुम्ही ब्रिटिश असाल किंवा गोरे अमेरिकन असाल, देशाची दारं तुमच्याकरता सहज उघडी होतात. सुरक्षा काहीशी कमी जाचक होते, व्हिसा क्यूज् लहान होतात आणि नियम आणि पद्धती साध्या सरळ होतात.

पुढे वाचा

रा.स्व.संघात हिंदूंना प्रवेश मिळेल का?

रा स्व संघ, हिंदुधर्म, धर्मविचारभेद,
—————————————————————————–

जुन्या धर्मामधून त्यातील एखादा पंथ फुटून बाहेर पडतो तेव्हा तो कालांतराने व काही निकष पूर्ण केल्यावर स्वतंत्र ‘धर्म’ झाला आहे. परंतु सहिष्णुता आणि समावेशकत्व ह्या हिंदुधर्मातील दोन मोठ्या दोन गुणांची तेथे काय स्थिती आहे?
—————————————————————————–

हिंदुधर्म सहिष्णु असल्याचे वारंवार सांगितले जाते. हे पूर्ण सत्य नसले, तरी हिंदू धर्मामध्ये जी काही थोडीबहुत सहिष्णुता होती, तीही रा.स्व.संघ इ. संघटनांमध्ये आता उरलेली नाही. आमच्या विचारसरणीशी सहमत नसलेल्या हिंदूंचीही टवाळी व हेटाळणी करून त्यांना तुच्छ लेखण्याची वृत्ती या संघटनांमधून मोठ्या प्रमाणात आढळते.

पुढे वाचा

जातिअंत : विचार आणि व्यवहार

जातिअंत, वर्ग-जाति-पुरुषसत्ता
—————————————————————————–
जात्यन्ताचा प्रश्न आज कोणत्याही पक्ष-संघटनेच्या अजेंड्यावर प्राधान्याने व ठोसपणे असल्याचे दिसत नाही, ह्या वास्तवाची मीमांसा करून तत्त्वज्ञान व व्यवहार ह्या दोन्ही पातळींवर काही उपाय सुचविणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध
—————————————————————————–
सद्यःकालीन राजकारणाच्या पटलावर जातजमातवादी फॅसिझमच्या विरोधात अनेक डावे, फुले-आंबेडकरवादी आदी समाजपरिवर्तक पक्षसंघटना एकत्रित येऊन महाराष्ट्रभर जात्यन्ताच्या परिषदा-मेळावे घेत आहेत. रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या प्रश्नावर आणि जेएनयूतील प्रकरणानंतर मार्क्सवाद्यांमध्येही जातिविरोधी लढ्याविषयीची भाषा सुरू झाली आहे. परंतु जातिव्यवस्था व तिच्याशी संलग्न असलेली पितृसत्ता आणि भांडवलशाही यांच्या गुंतागुंतीच्या अविभाज्य अन्योन्यसंबंधाबद्दल वास्तवदर्शी क्रांतिकारी भान अद्यापही डाव्यांकडे आलेले दिसत नाही.

पुढे वाचा

काश्मीरचे वर्तमान (भाग २)

काश्मीर, हिंसा, काश्मिरी पंडित, मुस्लिमप्रश्न
—————————————————————————–
भारत-पाक फाळणीला आता 70 वर्षे होतील. पण काश्मीरमधील पेचप्रसंगानेही जखम अजूनही भळभळतीठेवली आहे. गेले सहा महिने तर तेथे कर्फ्यूच लागलेला होता. लष्करी बळावर आपण काश्मीर भारतात भौगोलिक दृष्ट्या राखू शकू. पण त्यातून उद्भवणारे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न आपली पाठ सोडणार नाहीत. थेट काश्मीरला जाऊन तेथील विविध जनसमुहांशी थेट संवाद करून तेथील परिस्थितीचा एका पुरोगामी कार्यकर्त्याच्या दृष्टीने धांडोळा घेणाऱ्या रिपोर्ताजचा हा उत्तरार्ध.
—————————————————————————–
4 ऑक्टोबर, श्रीनगर
तीन तारखेसच याकूबकडून कळले की, एस.एन.सुब्बारावजी 1 ऑक्टोबरपासून श्रीनगरला आलेले असून ते 4 ऑक्टोबरला परतणार पण त्याआधी ते मला भेटायला लग्नघरी येणार.

पुढे वाचा

काश्मीरचे वर्तमान (भाग १)

काश्मीर, हिंसा, काश्मिरी पंडित, मुस्लिमप्रश्न

—————————————————————————–

       भारत-पाक फाळणीला आता 70 वर्षे होतील. पण काश्मीरमधील पेचप्रसंगाने ही जखम अजूनही भळभळती ठेवली आहे. गेले सहा महिने तर तेथे कर्फ्युच लागलेला होता. लष्करी बळावर आपण काश्मीर भारतात भौगोलिक दृष्ट्या राखू शकू. पण त्यातून उद्भवणारे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न आपली पाठ सोडणार नाहीत. थेट काश्मीरला जाऊन तेथील विविध जनसमुहांशी थेट संवाद करून तेथील परिस्थितीचा एका पुरोगामी कार्यकर्त्याच्या दृष्टीने धांडोळा घेणाऱ्या रिपोर्ताजचा हा पूर्वार्ध.

—————————————————————————–

1 ऑक्टोबर 2016

         राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टीमंडळाने गुजरातमधील उना व काश्मिरमधील सध्याच्या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी मला पाठविण्याचा निर्णय घेतला म्हणून मी 1 ऑक्टोबर रोजी नागपूर-दिल्ली-जम्मू विमानाने सकाळी 11 वाजेपर्यंत जम्मूला पोहोचलो.

पुढे वाचा

मराठा मोर्चे : एक आकलन

मराठा, अस्मिता, सामाजिक लढा, सत्याग्रह
—————————————————————————–
महाराष्ट्रात अलीकडच्या काळात निघालेल्या विराट् मराठा मोर्च्यांनी अनेक नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामागील समूहमानस समजून घेण्याचा हा एक प्रयत्न. ह्या विषयावर व्यापक चर्चा घडावी ह्या अपेक्षेने तोप्रकाशित करीत आहोत.
—————————————————————————–

कोपर्डी, जिल्हा – अहमदनगर येथे मराठा समाजातील एका गरीब आणि अल्पवयीन मुलीवर चार दलित तरुणांनी बलात्कार करून तिचा खून केला. या घटनेने महाराष्ट्रातील समस्त मराठा समाज अतिशय क्षुब्ध झाला. आपण राज्यकर्ता समाज असल्याचे भान असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढून त्याने अत्यंत संयत प्रतिक्रिया देत, त्या घटनेचा निषेध करायला सुरुवात केली आहे.

पुढे वाचा

भक्ति – सूफीसमन्वय

भक्ति, सूफी, हिंदू-मुस्लीम समन्वय
—————————————————————————–
इस्लाममधील वाहिबी (मूलतत्त्ववादी) वि. अन्य विचारधारा हा संघर्ष जगभरात पेटून उठला आहे. त्याच बरोबर इस्लामचे एकसाची आक्रमक स्वरूप जनमानसावर ठसविण्याचे कामही जोरात सुरू आहे. ह्या पार्श्वभूमीवर हिंदूंमधील अद्वैत दर्शनाशी नाते सांगणाऱ्या,गेली अनेक शतके हिंदू-मुस्लीम समन्वय साधणाऱ्या सूफी पंथाचा परिचय करून देणारा हा लेख.
—————————————————————————–

सूफी संत हे इस्लामचे शांतिदूत म्हणून ओळखले जातात. अकराव्या शतकात अरबस्थानात सूफी संप्रदायाचा विकास घडून आला. अल गझाली या प्रसिद्ध सूफीच्या काळात सूफी संप्रदायात नवीन बदल झाला. येथूनच भारतातसुद्धा सूफींचे आगमन होऊन बाराव्या-तेराव्या शतकात सूफी संप्रदायाचा विस्तार भारतभर झाला.

पुढे वाचा

अनुभव : मी मराठा ?

मराठा, जातीय अस्मिता
—————————————————————————–
मराठा मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाने नव्हे, तर शिक्षण व स्वतंत्र व्यवसाय उभारण्यातून मराठा युवकांचे प्रश्न सुटू शकतील असे मांडणारा हा स्वानुभव
—————————————————————————–
मराठा जातीत जन्माला आल्याचा मला जराही अभिमान नाही, असण्याची आवश्यकता अजिबात नाही, यात माझं काहीही कर्तृत्व नाही. याउलट याची लाज वाटावी अशाच काही घटना घडल्या आहेत. आरक्षणाचा मला वैयक्तिक काहीच तोटा झाला नाही. मला दहावीला ८४% मार्क्स मिळाले, बारावीला ७८%. देशातल्या सर्वोत्तम कॉलेजेसपैकी एक असणाऱ्या रुईया कॉलेजमध्ये मला अॅडमिशन मिळाली, कोणत्याही अडचणीशिवाय. गावाकडे अगदीच थोडीशी कोरडवाहू शेती असल्याने त्याचा तसा कधीच काही फायदा झाला नाही.

पुढे वाचा

चौफुलीवर उभे राष्ट्र

हिंदुत्ववादी विचारसरणी आणि हिंदूराष्ट्रवाद या कायम चर्चेत राहिलेल्या विषयावर हा नव्याने टाकलेला प्रकाशझोत.
——————————————————————————–
‘हिंदू सांप्रदायिकता ही इतरांपेक्षा अधिक हानिकारक आहे कारण हिंदू सांप्रदायिकता सोयीस्करपणे भारतीय राष्ट्रवादाचे सोंग आणून सर्व विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरवून त्यांचा धिक्कार करू शकते.’(जयप्रकाश नारायण –अध्यक्षीय भापण, दुसरी सांप्रदायिकताविरोधी राष्ट्रीय परिषद, डिसेंबर 1968)

वैचारिक अभिसरण हे कोणत्याही समाज किवा राष्ट्रासाठी प्राणवायूसारखे असते. आजबर्‍याच वर्षांनंतर राष्ट्राच्या मूलतत्त्वांसंदर्भात वैचारिक अभिसरण होताना दिसते. पहिल्यांदा काँग्रेसपेक्षा भिन्न विचारसरणीचा पक्ष स्वबळावर संपूर्ण बहूमतासह केंद्रात सत्तेवर आहे. आज चौदा राज्यांमध्येभाजप स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या साहाय्याने सत्तेत आहे.

पुढे वाचा