विषय «देव-धर्म»

भक्ति – सूफीसमन्वय

भक्ति, सूफी, हिंदू-मुस्लीम समन्वय
—————————————————————————–
इस्लाममधील वाहिबी (मूलतत्त्ववादी) वि. अन्य विचारधारा हा संघर्ष जगभरात पेटून उठला आहे. त्याच बरोबर इस्लामचे एकसाची आक्रमक स्वरूप जनमानसावर ठसविण्याचे कामही जोरात सुरू आहे. ह्या पार्श्वभूमीवर हिंदूंमधील अद्वैत दर्शनाशी नाते सांगणाऱ्या,गेली अनेक शतके हिंदू-मुस्लीम समन्वय साधणाऱ्या सूफी पंथाचा परिचय करून देणारा हा लेख.
—————————————————————————–

सूफी संत हे इस्लामचे शांतिदूत म्हणून ओळखले जातात. अकराव्या शतकात अरबस्थानात सूफी संप्रदायाचा विकास घडून आला. अल गझाली या प्रसिद्ध सूफीच्या काळात सूफी संप्रदायात नवीन बदल झाला. येथूनच भारतातसुद्धा सूफींचे आगमन होऊन बाराव्या-तेराव्या शतकात सूफी संप्रदायाचा विस्तार भारतभर झाला.

पुढे वाचा

धर्म-विचार

मनुष्य रोज खातो-पितो, भोग भोगतो, हें सगळें तो करत असतो. पण एक दिवस एकादशीचा उपवास करतो आणि त्याच्या चित्ताचें समाधान होतें. मुसलमान लोक रमजानच्या दिवसांत उपवास करतात. एकादशीच्या किंवा रमजानच्या नांवाने खाणें सोडणारा मनुष्य हाच एक प्राणी आहे. याचा अर्थअसा की मनुष्याला केवळ खाण्या-पिण्यात किंवा भोग भोगण्यात जीवनाचीं सार्थकता वाटत नाही. तो जेव्हा आपल्या इंद्रियांवर अंकुश ठेवतो, देवाचें नांव घेतो तेव्हा त्याला बरें वाटतें. म्हणून तो एकादशीच्या दिवशीं देवाच्या नांवाने उपवास करतो. तसें पाहिलें तर एकादशीच्या उपवासानेहि त्याला पूर्ण समाधान मिळत नसतें.

पुढे वाचा

भारतीय चर्चापद्धती (भाग १)

स्वरूप

वादविवादातील सहभागी घटक, वादाचे पद्धतिशास्त्र आणि खंडन-मंडनाचीप्रक्रिया यांचा निर्देश भारतीय परंपरेत मूलतः आहे. तिचे यथार्थ स्वरूपसमजावून घेणे ही विद्यमान लोकशाही स्वरूपाच्या भारतासारख्या बहुधार्मिक, संस्कृतिबहुल देशाची बौद्धिक गरज आहे. येथील विविध तऱ्हांच्या समस्यासार्वजनिकरित्या सोडविण्याच्या हेतूने अनेक विचारसरणीच्या अराजकीय, राजकीयआणि सामाजिक गटांमध्ये सुसंवाद होण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरणारी आहे.या पद्धतीचे अभ्यासपूर्ण विवेचन करणाऱ्या लेखाचा हा पहिला भाग. पुढील भागआगामी अंकांतून प्रकाशित होतील.
—————————————————————————–

‘वाद’ हा मराठी शब्द विविध अर्थांनी वापरला जातो.एक:इंग्लिशमधील’ism’ म्हणजेतत्त्वज्ञान, व्यवस्था किंवा विशेषतः राजकीयविचारसरणी हा अर्थ; जसे की मार्क्सवाद. दोन:भांडण आणि तीन: वैदिक परिभाषेत विधी-अर्थवाद.

पुढे वाचा

साक्षात्कारांमागील वैज्ञानिक सत्य (भाग २)

देवाची उपासना, आध्यात्मिक साधना व ती करत असताना होणारी अनुभूती ह्यांमागील वैज्ञानिक सत्य उलगडून सांगणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध
—————————————————————–
अनादि अनंत काळापासून जगातील लाखो-करोडो लोक देवाची भक्ती करतात. देवळांत, मशिदींत किंवा चर्चमध्ये किंवा निरनिराळ्या आध्यात्मिक पंथांत नित्यनेमाने हजेरी लावतात. तासन् तास मंत्रपठण करतात, नमाज पढतात; बाबा, बुवा, महाराजांच्या प्रवचनास जातात; पंढरीच्या वारीस जातात, भागवत कथा ऐकतात. महामानव आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करण्यास लाखोंनी येतात. त्याचबरोबर विपश्यना, आर्ट ऑफ लिव्हिंग, राजयोग सेंटर, योगातील ध्यानधारणा; कपालभाती, भस्रिका ह्यांच्यासारखे प्राणायाम करतात. ओशो रजनीशांच्या आश्रमात (नंगा) नाच करतात.

पुढे वाचा

‘योगा’वर दावा कुणाचा?

 भारतासाठी जसे ‘मॅक्डोनाल्ड’ तसे उत्तर अमेरिकेसाठी ‘योगा’. दोन्हीही मूळ स्थानापासून दूर परदेशात पक्के रुजलेले. अमेरिकेतील शहरी आणि ग्रामीण परिसरातील व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, चर्चेस अगदी सिनेगॉग्समध्येही योगाचे शिकवणी वर्ग चालू असतात. अमेरिकेतील जवळपास सोळा लाख लोकांच्या दररोजच्या व्यायाम प्रकारात योगाच्या कोणत्या ना कोणता प्रकाराचा समावेश असतोच. त्यामुळे दररोजच अमेरिकेतील लोक योगाबद्दल काही ना काही बोलत असतात, अर्थात व्यायामाच्या अंगाने. त्यांच्या व्यायामात शरीराला ताण देणारे, श्वासोच्छ्वासाचे किंवा आसनाचे हठयोगी व्यायाम प्रकार मुख्यत: असतात. ही आसने शिकविण्यासाठी बी.के.एस. अय्यंगार अथवा शिवानंद यांच्या पद्धतीने शिकविणारे, पट्टाभी जोईस यांचा ‘अष्टांग विन्यासा’ किंवा ‘पॉवर योगा’ शिकविणारे किंवा नुकताच ‘हॉट योगा’चा कॉपीराईट मिळविणारे बिक्रम चौधरी यांच्या पद्धतीने शिकविणारे भारतीय मूळ असलेले शिक्षक असतात.

पुढे वाचा

निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)

भारतीय धर्मनिरपेक्षतेचा राजकीय आशय
Secularism – धर्मनिरपेक्षता याला भारतात वेगळा अर्थ व त्याचे वेगळे परिणाम आहेत. पाश्चात्याप्रमाणे हा शब्द येथे कार्यान्वित होत नाही. कारण भारत हा एक बहुधार्मिक देश असून याला उपनिषदांचे, सर्वधर्मसमभावाचे जबरदस्त अधिष्ठान आहे. याचबरोबर येथील संरंजामशाही राज्यव्यवस्थेमध्ये सर्व धर्मांमध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामूळे धर्मनिरपेक्षतेचा प्रश्नच कधी आला नाही.

पण १९व्या शतकात ब्रिटिश राजवटीत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पट बदलून गेला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ‘फोडा व झोडा’ची राजनीती स्वीकारली. यामुळे मध्ययुगीन संस्कृतीच्या इतिहासावर परिणाम होऊन नवीनच विस्कळीत इतिहास निर्माण झाला.

पुढे वाचा

निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)

आजकाल सेक्युलॅरिझम व सेक्युलर ह्यांबद्दल बरेच बोलले जाते. ज्येष्ठांच्या बैठकीत यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्यांना जशी माहिती तशी त्यांनी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा.
• सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैलीबरोबरच राज्यशासनव्यवस्थेशी जोडला गेला आहे.
• या शब्दाला बरेच अर्थ आहेत. जसे, इहवाद येथपासून ते कांही सामाजिक तुष्टीकरणाबरोबर याचा संबंध जोडला जातो.
• पाश्चात्य व भारतीय विचारसरणी सेक्युलरबाबत भिन्न आहे. पण आपल्याला भारतीय संविधानाने यासाठी मान्य केलेला सर्वधर्मसमभाव हा शब्दच मान्य करावा लागतो.

पुढे वाचा

‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’

सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बौद्धधर्म हिंदुस्थानांतून परांगदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडीवाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठे होते? विद्वान संशोधकांच्या मते, आर्याच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्ष धरली, तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव, देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे? आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरडय़ा भाकरीची पंचाईत!

पुढे वाचा

सांस्कृतिक राष्ट्रवादाची दुधारी तलवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर आहेत. इतक्या उंच, की त्यांच्या जवळपासदेखील आज कोणताही भारतीय नेता नाही आणि यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कमालीचा आत्मविश्वास, जनतेशी थेट संवाद साधण्याचे कौशल्य आणि लोकांमध्ये आश्वासकता जागवण्याचे सामथ्र्य या गोष्टी लोकप्रियतेचा पाया आहेत. या अफाट लोकप्रियतेमध्ये प्रचंड आशादायी घडण्याची क्षमता अर्थातच आहे; पण या लोकप्रियतेचा एक तोटादेखील आहे. तो असा की, माध्यमे पंतप्रधानांकडून घडणाऱ्या चुकांबाबत अतिउदार वागू शकतात. विशेषत: या चुका उघड उघड राजकीय स्वरूपाच्या नसतील, तर ही शक्यता जास्तच असते. अलीकडेच असे एक उदाहरण महाराष्ट्रात घडले.

पुढे वाचा

भारतातलं राजकारण पाकिस्तानच्या दिशेनं?

गणपती गेले. आता देव्या येतील.
गणपती आले होते तेव्हां प्रत्येक गणपती मंडळाच्या बाहेर राजकीय पक्षांचे फलक होते. गणेश भक्तांचं स्वागत करणारे. बहुतेक फलकांवर त्या त्या पक्षाच्या गल्लीनिहाय पुढाऱ्यांचे फोटो होते. गणपतीचं विसर्जन झालं तेव्हां गणपतींना निरोप देणारे फलक लागले.
नवरात्रात असे किती फलक लागतात ते पहावं लागेल. कारण नवरात्र असेल तेव्हां महाराष्ट्रात निवडणुका असल्यानं आचार संहिता असेल. फलकांवर झालेला खर्च उमेदवाराच्या खर्चात सामिल होईल.
गणपती उत्सव सुरू झाला तोच मुळी राजकीय कारणांसाठी. टिळकाना जनजागृती करायची होती. स्वातंत्र्यासाठी. टिळकांच्या काळात उत्सवाचा खर्च कमी असे.

पुढे वाचा