विषय «विवेकवाद»

भारतीय चर्चापद्धती (भाग ३)

आन्वीक्षिकी

चर्चापद्धती, वाद, आन्वीक्षिकी
—————————————————————————–
‘भारतीय चर्चा पद्धती’ च्या पहिल्या भागात आपण ‘वाद’ या संकल्पनेचे आणि पद्धतीचे स्वरूप पहिले. दुसऱ्या भागात ‘वाद’शी समांतर इतरही काही संकल्पनांचा थोडक्यात परिचय करून घेतला. भारतीय वादपद्धतीचा संबंध ‘आन्वीक्षिकी’ या विद्येशी जोडला जातो. या विद्येच्या स्वरूपात प्राचीन इहवाद आढळतो. आजच्या इहवादाशी हा इहवाद जुळणारा आहे. वादाचे प्रमेय व विषय अध्यात्मवादी न ठेवता इहवादी असले तर सामाजिक जीवनाचे प्रश्न अधिक काटेकोरपणे सुटू शकतात. त्या विद्येचा हा अल्पपरिचय.
—————————————————————————–
प्रचलित ‘आन्वीक्षिकी’चा शाब्दिकअर्थ ‘अन्वेषण-विद्या’ असा आहे.अन्वेषण म्हणजे शोध घेणे.

पुढे वाचा

सहमती, असहमती आणि वादविवाद

वादविवादांचा उद्देश काय असावा? प्रतिस्पर्ध्याला ‘पराजित’ करणे की आपल्या व त्याच्या आकलनात भर घालणे? वाद-विवादाच्या प्रचलित स्वरूपावर प्रश्नचिन्ह उभे करणारा हा लेख.
—————————————————————————–

अमर्त्य सेन यांचे Argumentative Indian हेपुस्तकवाचून मी विचारात पडलो की, हे पुस्तक का लिहिले गेले असावे ? मग मला जाणवले की, भारतातील सार्वजनिक वादविवाद आणि बौद्धिक विविधतेचा वारसा दाखविण्याच्या उद्देशाने ते लिहिले गेले. तसेच, अनेकांना काहीसाआत्मकेंद्री, संकुचित आणि बुद्धिप्रामाण्यविरोधी वाटणार्‍या हिंदुत्वाविरुद्ध तो एक युक्तिवाद होता. अचानक मला उजव्या हिंदुगटांचा अमर्त्य सेनांविरुद्धच्या क्रोधाचा अर्थ समजला.
मला आणखी एका चित्तवेधक गोष्टीची जाणीव झाली की, अमर्त्य सेनहिंदुत्ववाद्यांच्या भारतासंदर्भातीलदृष्टिकोनाशी असहमत आहेत आणि हिंदुत्ववादी अमर्त्यांच्या भारतासंदर्भातील दृष्टिकोनाशी असहमत आहेत.

पुढे वाचा

देवाचे मन जाणताना

विश्वनिर्मिती, ईश्वर संकल्पना, विवेकवाद

विज्ञानाच्या मदतीने मानवाने अतिशय थोड्या कालावधीत विश्वनिर्मितीचा कूटप्रश्न सोडविण्याच्या दिशेने दमदार वाटचाल केली आहे.जागतिक तापमानवाढ व वाढती शस्त्रास्त्रस्पर्धा यांतून मानवजात अजून 500 वर्षे तग धरून राहिली तर ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या खूप जवळ आपण पोहचू शकू. पण हे कोडे त्याला पूर्णपणे उलगडले तरी ईश्वर ह्या संकल्पनेला फारसा धक्का बसणार नाही. ती संकल्पना व विवेकवाद ह्यांत अंतर्विरोध निर्माण होऊ न देणे हे विवेकवादी व्यक्तींसमोरील महत्त्वाचे आह्वान आहे.

“जर आपल्याला सृष्टीचा स्वयंपूर्ण सिद्धान्त शोधता आला तर, कालांतराने तो फक्त काही निवडक शास्त्रज्ञच नव्हे तर तत्त्वज्ञ आणि सर्वसामान्य माणसांनाही विश्वाच्या व मनुष्यप्राण्याच्या उत्पत्तीबद्दल मार्गदर्शक ठरेल.

पुढे वाचा

इहवादः मानवी प्रतिष्ठेचा महाप्रकल्प

पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक माणसाचं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन म्हणजे इहजीवन. एकेका माणसाचं जीवन इथं संपतं, पण अशा संपण्यानं मानवी जीवनाचा प्रवाह संपत नाही. जीवनाची शृंखला कोणत्याच कडीला शेवटची कडी मानत नाही. सतत नवनव्या कड्या उगवत राहतात. त्यामुळं ऐहिक मानवी जीवन कधी विझून जात नाही. जीवनाची वाहिनी कधी आटूनही जात नाही.
माणसाचं इहजीवन हाच इहवादाचा एकमेव विषय आहे. इहजीवनाची उज्ज्वलता हाच त्याचा ध्यास आहे. माणूस हाच जीवनाचा नायक आहे. भोवतीचं मानवी जीवन त्यानंच निर्माण केलं आणि ही अधिकाधिक उज्ज्वल मानवी जीवन निर्माण करण्याची प्रक्रियाही खंडित होणं त्यानं मान्य केलं नाही.

पुढे वाचा

विवेकवाद हीच खरी नैतिकता!

अलीकडच्या काही वर्षांत वर्तमानपत्रांच्या खपाचे आकडे वाढत असले, तरी साप्ताहिकं, मासिकं, पाक्षिकं, त्रैमासिकं यांची संख्या मात्र दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. महाराष्ट्रातल्या नियतकालिकांची अवस्था तर अजूनच बिकट झाली आहे. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या पोस्ट खात्याचा सर्वाधिक फटका या नियतकालिकांना बसत आहे. केवळ वेळेवर अंक न पोहोचण्यामुळे अनेक नियतकालिकं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा दुर्धर परिस्थितीत ‘आजचा सुधारक’ या नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या आणि ‘विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी मासिक’ असा लौकिक असलेल्या मासिकानं रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करावं, ही खचितच कौतुकास्पद गोष्ट आहे; पण याची फारशी दखल महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांकडून घेतली जाण्याची शक्यता नाही.

पुढे वाचा

इहवादः मानवी प्रतिष्ठेचा महाप्रकल्प

पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक माणसाचं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन म्हणजे इहजीवन. एकेका माणसाचं जीवन इथं संपतं, पण अशा संपण्यानं मानवी जीवनाचा प्रवाह संपत नाही. जीवनाची शृंखला कोणत्याच कडीला शेवटची कडी मानत नाही. सतत नवनव्या कड्या उगवत राहतात. त्यामुळं ऐहिक मानवी जीवन कधी विझून जात नाही. जीवनाची वाहिनी कधी आटूनही जात नाही.
माणसाचं इहजीवन हाच इहवादाचा एकमेव विषय आहे. इहजीवनाची उज्ज्वलता हाच त्याचा ध्यास आहे. माणूस हाच जीवनाचा नायक आहे. भोवतीचं मानवी जीवन त्यानंच निर्माण केलं आणि ही अधिकाधिक उज्ज्वल मानवी जीवन निर्माण करण्याची प्रक्रियाही खंडित होणं त्यानं मान्य केलं नाही.

पुढे वाचा

प्रबोधन परंपरेची पीछेहाट

काही दिवसापूर्वी गोविंद पानसरे मारले गेले. दीड वर्षापूर्वी नरेंद्र दाभोलकर मारले गेले. हे दोघंही महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे महत्त्वाचे चेहरे होते, प्रबोधनकार होते. त्यांचे विचार न पटणाऱ्यांनी त्यांची हत्या केली आहे. पण ही अर्थातच सिद्ध न झालेली गोष्ट आहे. परंतु ही दोन्ही माणसं सार्वजनिक जीवनात असल्याने त्यांच्या हत्यांना सार्वजनिक संदर्भ असणार, याबद्दल सरकारलाही शंका नाही. त्यामुळेच ‘या हत्या या व्यवस्थेला दिलं गेलेलं आव्हान आहे,’ असं विधान खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलेलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा राजकीय अर्थ काय, वगैरेंवर लगेचच चर्चा झाल्या. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काहीही असो, हे व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहेच.

पुढे वाचा

“विचारां”चा विचार

(प्रा. दि.य.देशपांडे यांच्या विवेकवादास…)

कधी आला आहे का तुझ्या मनात असा विचार,
विचार…की करू यात आता विचारांचा संचार, विचारांचा विचार!

जेव्हा वास्तवतेचा आधार देतोस तू डावलून, तेव्हा उरतात ते फक्त अनिर्बंध, निराधार तर्क
अन मग त्यातून येतात जन्माला पूर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर, स्वर्ग आणि नरक!

का ठेवतोस तू अशा संकल्पनांवर विश्वास ज्याला नाही काही पाया,
अन दुर्देवाला कोणत्या आधारावर म्हणतोस तू “भूत का साया”?

जर करत बसलास तू मागचा-पुढचा जन्म, पाप अन पुण्य,
तर या निराधार विचारात करून घेशील हे मिळालेले जीवनही नगण्य!

पुढे वाचा

भारतातील रॅशनॅलिस्ट चळवळ

एका अभ्यासू रॅशनॅलिस्टच्या मते भारत देश हा फक्त धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचाच देश नसून  नीरिश्वरवाद, विवेकवाद, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती, अज्ञेयवाद यांचेही अंश कुठे ना कुठे तरी या देशात प्राचीन काळापासून सापडतात. जेव्हा हे मत आपण धसास लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील खरेपणाविषयी संशय वाटू लागतो. कारण आपल्या आवती भोवती धर्माच्या अतिरेकामुळे विवेक, मानवता यांना पायदळी तुडवलेली उदाहरणं मोठ्या प्रमाणात सापडतात. परंतु डॉ. जॉन (जोहान्नेस) क्वॅक या एडिनबरो विद्यापीठातील प्राध्यापकाला मात्र आपल्या देशातील हा वेगळेपणा चटकन लक्षात येतो. त्यानी यासंबंधी एक प्रबंधच सादर केला असून त्याच प्रबंधाची पुस्तकी आवृत्ती Disenchanting India या नावाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केली आहे.

पुढे वाचा

भोंदू ‘भगवान’, भोळे भक्त!

‘त्यांच्या’ चेहऱ्यावर एक निरागस बाल्य विलसत असते. डोळ्यांत मायेचा अपार सागर दडलेला दिसतो. त्यांनी हात उचलताच तेजस्वी प्रकाशकिरणांनी आसमंत उजळून निघाल्याचा भास होतो आणि त्यांच्या हास्यातून प्रेमाचे झरे ओसंडू लागतात. तोच विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे असे भासू लागते. त्याच्या चमत्कारांनी असंख्य आजार बरे होतात, त्याच्या कृपाप्रसादाने निपुत्रिकांना संतानप्राप्ती होते, निर्धनांना धनलाभ होतो. भौतिक समस्यांचे सारे डोंगर भुईसपाट होतात. त्याच्या दैवी शक्तीचा सर्वत्र बोलबाला सुरू होतो आणि संसारतापाने पोळलेल्यांची त्यांच्या दारी मुक्तीसाठी रीघ लागते. त्यांचा एक कृपाकटाक्ष व्हावा, यासाठी ताटकळण्याचीही त्यांची तयारी असते.

पुढे वाचा