प्रत्येक समाज वा संस्कृती कित्येक पिढ्यांपासून आलेल्या रूढी परंपरांचे शक्य तितके पालन करण्याच्या प्रयत्नात असतो. अशा रूढी परंपरामध्ये श्रद्धा – अंधश्रद्धांचा वाटा फार मोठ्या प्रमाणात असतो. काही वेळा त्यांच्यातील फोलपणा स्पष्टपणे दिसत असूनसुद्धा, ‘त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना’ असे म्हणत त्या पाळल्या जातात. मांजर आडवे गेल्यास एक क्षण थांबून पुढे गेल्यामुळे अपशकुनाचा परिणाम होणार नाही याची खात्री असते. मानसिकता तशीच ठेवून सामान्यपणे त्या त्या काळातील जीवनशैलीप्रमाणे शकुन-अपशकुनांचे आयकॉन्स बदलतात. बैलगाड्यांची पूजा करणारे आता मोटार गाड्यांची पूजा करतात. परंतु पूजा करण्याची मानसिकता नष्ट झाली नाही.
विषय «श्रद्धा-अंधश्रद्धा»
देवा-धर्माचे व्यापारीकरण आणि अंधश्रद्धा
आपल्या देशातील बुवा-बाबा-अम्मा यांच्या संख्येत गेल्या काही दशकात वेगाने वाढ झाली आहे. पुटपाथीच्या सत्यसाईबाबांचा तर विशेषच बोलबाला होता. त्या बाबाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीची आतापर्यंत झालेली मोजदाद त्यांच्या नजीकच्या कोंडाळ्यातल्या लोकांनी त्यांच्या मृत्यू दरम्यान व मृत्यू पश्चात केलेल्या लुटा-लुटीनंतर देखील कित्येक लाख कोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अलीकडेच बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेल्या आसाराम नावाच्या बापूची संपत्ती देखील अशीच कित्येक लाख कोटी असल्याचे बोलले जाते. अलिकडच्या काळात आस्था, साधना, संस्कार इत्यादी टीव्ही चॅनल्स वरून जे नवे-नवे बाबा-अम्मा प्रकट होत आहेत त्या सगळ्यांची संपत्ती अशीच कित्येक कोटी असल्याचे बोलले जाते.
अंधश्रद्धेचे मानसशास्त्र
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निघृण हत्येनंतर त्यांनी पुढाकाराने चालविलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य पुढे कसे चालू राहील हा प्रश्न अनेक पुरोगामी सुधारक हितचिंतकाना थोडा चिंताग्रस्त करतो आहे, हे त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणातून दिसून येत आहे. अपार दु:खात बुडालेले असतानाही आम्हा कार्यकर्त्यांना हा मोठा दिलासा तर आहेच. त्याचबरोबर अंनिसचे कार्य जनमानसात किती आत्मीयता पाऊन आहे तेही आम्हाला पुन्हा एकदा जाणवत आहे. प्रथम या समयोचित पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे उचित ठरेल. महाराष्ट्रासोबत इतर राज्यातून देखील असा प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. केंद्र व राज्य शासनही या प्रसंगी सुधारक पुरोगामी पावले उचलेल अशी आशा आहे.
ग्रामीण जीवनातील अंधश्रद्धा
मागील सोळा वर्षांपासून या चळवळीत काम करत असताना अंधश्रद्धा निर्माण होण्यामागे भीतीची भूमिका सातत्याने जाणवत राहिली आहे. थोडीशी भीती, शिकलेल्या व अज्ञानी माणसांना सारख्याच वेगाने अंधश्रद्धेच्या गर्तेत नेते. लहानपणापासून एक गोष्ट मनावर बिंबविली जाते की, ज्या ज्या गोष्टींची भीती समाजाने, कुटुंबाने दाखविली त्या गोष्टींची तपासणी करू नये. भीतिदायक आठवण कधीच नाहीशी होत नाही. ह्या लेखात भीतीच्या दुष्परिणामांची चर्चा करूया.
१) भांडणातील भूमिकाः जादूटोण्याच्या नावावर गोंदिया जिल्ह्यात मागील साडेतीन वर्षांच्या काळात १९ खून झालेले आहेत. त्या खून करणाऱ्या १९ केसेसपैकी १५ केसेसमधील आरोपींशी मी प्रत्यक्ष भेट घेतली, मुलाखत घेतली, चर्चा केली.
वैद्यकीय क्षेत्रांतील कॉम्प्युटराईज्ड बुवाबाजी
सध्या अनेक छोट्या-मोठ्या गावांत खालील प्रकारची पत्रके वाटली जात आहेत. ‘न्यू संजीवनी हेल्थ केअर’ द्वारा संपूर्ण शारीरिक तपासणी… ‘निरोगी निरामय सफलतेचे रहस्य’… १०० टक्के उपचार होऊ शकतो. आपण निराश आहात का? दीर्घकालीन आजाराने? आपण हरले आहात का? आपल्या स्वास्थ्यामुळे ? आपण हैराण आहात का? दवाखान्यामुळे ? आपणास चांगले आरोग्य पाहिजे का? तर या!
आपल्या आजाराला रशियन इव्हीए मशीन (किंवा दुसऱ्या नावाच्या मशीन)द्वारा तपासून घ्या. ही तपासणी शरीराच्या ३० विविध अंगाची होते. त्यांत मेंदूच्या रक्तपुरवठ्यापासून तर हृदय, किडनी, हाडे, सांधे इत्यादी सर्व आजारांचे आणि पूर्ण शरीरांत असलेल्या कोणत्याही आजाराची माहिती दिली जाते.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा
धर्माचा पाया श्रद्धा आहे हे खुद्द धार्मिकच मान्य करतात. फक्त त्याचे म्हणे असे असते की ती श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे, डोळस श्रद्धा असते. पण हे म्हणणे अनाकलनीय आहे. श्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीच्या सत्यत्वाचा कसलाही पुरावा नाही तिच्या सत्यत्वावरील अढळ विशास.
धर्मावरील श्रद्धा याच जातीची आहे. ईशर, पापपुण्य, स्वर्गनरक, परलोक, पुनर्जन्म, इत्यादि कोणत्याही गोष्टीचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींची साधक प्रमाणे देण्याचे असंख्य प्रयत्न मी-मी म्हणणाऱ्यांकडून आजवर केले गेले आहेत. परंतु त्यांपैकी एकही अंशतः देखील निर्णायक नाही हे असंख्य वेळा दाखवून झाले आहे.
माझे आध्यात्मिक आकलन
दोन महिन्यापूर्वी मी पुणे येथे माझे विज्ञान : माझे अध्यात्म या विषयावर भाषण दिले. कार्यकर्त्यांना व नागरिकांना ते आवडले. नवीन वाटले. यापूर्वी मी महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘आम्हीच खरे धार्मिक’ या विषयावरही बोललो होतो. विषयाचे शीर्षक थोडे चकवा देणारे होते हे खरेच. धर्म न मानणाऱ्या व्यक्तीने मी खरा धार्मिक आहे असे उच्चारवाने सांगणे यात अंतर्विरोध वाटतोच. असे असतानाही हा विषय घेतला होता याचे कारण होते. एकतर धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण व राजकारण करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न चालू होता. महाराष्ट्रात व दिल्लीतही त्याच मंडळींच्या हातात सत्ता होती.
अंधश्रद्धा निर्मूलन हा वारकऱ्यांचा धर्मच!
(अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयक आणि वारकरी या मुद्द्यावरून काही जण वाद निर्माण करायचा प्रयत्न करत असले तरी वारकरी ज्याला अनुसरतात त्या भागवत धर्मात कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा नाही. उलट समाजातल्या अशा अपप्रवृत्तीवर घाला घालण्याचे कामच या धर्माने शतकानुशतके केले आहे. त्या संदर्भातले विवेचन. )
राज्यातील अंधश्रद्धेचा मुद्दा कायद्याच्या कक्षेत यावा, या चांगल्या उद्देशाने अंधश्रद्धा-निर्मूलन समितीने कायद्याचा मुद्दा लावून धरला. सुरुवातीस त्याचे नाव अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयक असेच होते. मात्र नंतर ते महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम या नावे आणण्यात आले.
शहाणपण
हिंदु धर्मात बरीच व्यंगें आहेत म्हणून यहुदी, महंमदी, क्रिस्ती किंवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या धर्माचा अंगीकार करणाऱ्या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देता येणार नाही. तसेंच, आमचे कांहीं रीतीरिवाज मूर्खपणाचे आहेत, म्हणून प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणे हेही कोणत्याही दृष्टीने त्याचे त्याला किंवा इतरांला परिणामी विशेष सुखावह होण्याचा संभव नाही, असे आम्हांस वाटते.
उदाहरणार्थ, कित्येक प्रसंगी धोतरें नेसणे सोईस्कर नाही म्हणून युरोपियन लोकांप्रमाणे दिवसभर पाटलोण घालून बसणे, किंवा ते लोक विशेष कामाकडे कागदांचा उपयोग करतात म्हणून आपणही तसे करणें हें केवढे मूर्खपण आहे बरें?
आरोग्य आणि अंधश्रद्धा
आपण प्रत्येक घटनेचे कारण शोधतो. नको असलेल्या घटना टाळून हव्या असलेल्या घटना वारंवार घडविण्यासाठी ती पहिली पायरी आहे. घटनेच्या कारणशृंखलेतील आपल्या कुवतीचे दुवे शोधून त्यांवर नियंत्रण करण्याची आपली इच्छा असते. हे वर्णन विज्ञानाचे असले तरी उत्क्रांतीमुळे ते आपल्या स्वभावातच मुरले आहे.
अर्थात, उत्क्रांतीने मिळालेल्या इतर गुणांप्रमाणेच, कारण शोधण्याची कलासुद्धा अगदी प्राथमिक आहे. कुत्र्यांना अन्न देण्याच्या वेळेआधी इवान पावलॉव यांनी एक घंटानाद करण्याची सवय केली. रोज असा घंटानाद ऐकल्यानंतर निव्वळ घंटानाद ऐकूनच कुत्र्यांना लाळ सुटे. याचा अर्थ असा की सत्य सापडले नसले तरी वारंवार घडणाऱ्या काकतालीय न्यायावर (post hoc, ergo propter hoc) ठाम विश्वास ठेवण्याची सजीवांना सवय आहे.