‘गीता प्रवचने’ यातील ‘अध्याय पहिला’ या प्रवचनात विनोबा म्हणतात, “तर्काला छाटून श्रद्धा व प्रयोग या दोन पंखांनीच गीतेच्या गगनात मी यथाशक्ति भराऱ्या मारीत असतो.” (गीता प्रवचने, आ. १३, पान १) तर्काला छाटल्यामुळे सत्यशोधन टाळता येते. तर्काला फाटा दिल्यामुळे गीतेतील सर्व प्रतिपादन खरे म्हणून स्वीकारावे लागते, आणि विनोबांनी ते तसे स्वीकारले आहे.
गीता प्रवचनांतील अध्याय २ वरील प्रवचनात विनोबा म्हणतात, “पूर्ण स्थितप्रज्ञ या जगात कोण होऊन गेला ते हरीलाच माहीत”. (गीता प्रवचने, आवृत्ती १३, पान २४) परंतु स्थितप्रज्ञदर्शनामध्ये विनोबा म्हणतात, “बुद्धी कोणाच्या ठिकाणी कमी असो, कोणाच्या ठिकाणी अधिक असो, त्याचे महत्त्व नाही.