नैसर्गिक आणि रसायनमुक्त (chemical-free) म्हणजे चांगले असा एक सर्वसाधारण समज आहे. या शब्दांचा अर्थ काय याचा विचार मात्र क्वचितच केला जातो. साधारणतः कारखान्यात बनलेली उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिकपणे अस्तित्वात असलेले साहित्य वापरून बनवलेले खाद्यपदार्थ/ जिन्नस म्हणजे नैसर्गिक किंवा रसायनमुक्त आणि म्हणून हेच चांगले असे मानले जाते. खरे तर दहावीपर्यंत शाळा शिकलेल्या कोणालाही हे लक्षात यावे की रसायनमुक्त असे काहीच असू शकत नाही, कारण सर्वच सजीव (प्राणी/ वनस्पती/ सूक्ष्मजीव) आणि निर्जीव वस्तू ह्या मुळात वेगवेगळ्या रसायनांपासूनच बनलेल्या असतात. या सर्वांमध्येच वेगवेगळी मूलतत्त्वे (chemical elements) म्हणजे ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, सिलिकॉन, सोडियम इत्यादी असतात.
विषय «विज्ञान»
मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस
मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस हे वाचल्यावर ‘श्वा, युवा, मघवा’ची आठवण होते ना? यातल्या दुसऱ्या त्रिकूटाला व्याकरणाच्या नियमांनी एकत्र आणले, तर पहिल्या त्रिकूटाला खोट्या माहितीने (disinformation) एकत्र आणले.
मेकॉलेने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय शिक्षणधोरणाविषयी केलेल्या एका भाषणाचा व्हायरस कोणीतरी मराठीलिखित माध्यमामध्ये सोडून दिला. ह्या तथाकथित भाषणाचा सारांश असा : ब्रिटिश राज्य येण्यापूर्वीची भारतीय शिक्षणपद्धती उत्तम आहे. त्यामुळे भारतीय माणूस नीतिमान, स्वाभिमानी, लाच-लुचपतीस बळी न पडणारा झाला आहे. कोणीही भीक मागत नाही. त्यामुळे ब्रिटिशांच्या राजवटीला भारतात स्थिरावण्यासाठी भारतातील मूळ शिक्षणव्यवस्था मोडून काढून, कारकून बनवणारी, गुलाम वृत्ती जोपासणारी नवी शिक्षणव्यवस्था बनवावी लागेल.
अध्यात्म आणि विज्ञान
लेखाचे शीर्षक पाहिल्याबरोबर अनेक वाचक बुचकळ्यात पडतील. ‘अध्यात्म आणि तत्त्वज्ञान?’ ते उद्गारतील. ‘म्हणजे ती दोन आहेत की काय? आमची तर अशी माहिती आहे की त्या दोन गोष्टी नाहीतच; एकाच गोष्टींची दोन नावे आहेत.’ आणि अशी समजूत आपल्या समाजात प्रसृत झालेली आहे हे मान्य केले पाहिजे. एखादा ग्रंथ तत्त्वज्ञानाचा आहे असे ऐकल्याबरोबर त्यात अध्यात्माविषयी, आत्म्याविषयी, त्याचा बंध आणि मोक्ष यांविषयी विवेचन असणार हे गृहीत धरले जाते. पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर तत्त्वज्ञानाची पुस्तके हवीत अशी मागणी केल्याबरोबर विक्रेता आपल्यापुढे अध्यात्माची पुस्तके टाकील हे खरे आहे.
लॉन्सचा छोटासा इतिहास
ज्ञानाचा विरोधाभास
—————————————————————————–
काही व्यवस्था किंवा रचना गुंतागुंतीच्या असतात. त्या व्यवस्थांच्या भविष्यातील स्थितीबद्दल आपण काही अंदाज (predictions) बांधतो. काही व्यवस्थांवरती आपण करत असलेल्या अंदाजांचा किंवा भाकितांचा अजिबात परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, हवामान ही व्यवस्था. उद्याच्या हवामानाचे भाकीत केल्याने हवामान बदलते असे होत नाही. मानवी व्यवस्था मात्र गुंतागुंतीच्या असतात आणि त्या व्यवस्थेसंबंधी केलेल्या भाकितांचा त्या व्यवस्थेवरती परिणाम होतो. जेवढी भाकिते जास्त चांगली, तेवढी ती व्यवस्था भाकितांना जास्त प्रतिसाद देते. त्यामुळे मानवी व्यवस्था समजून घेण्यासाठी आपण जसजशी जास्त माहिती गोळा करत आहोत, ती माहिती ‘प्रोसेस’ करण्यासाठी आपली संगणन-क्षमता वाढवत आहोत, तसतशा व्यवस्थेतील घटना अधिकाधिक अकल्पनीय आणि अनाकलनीय होत जात आहेत असा विरोधाभास दिसतो.
ध्यान-मीमांसा
विपश्यना, साक्षात्कार, वैज्ञानिक आकलन, मेंदूविज्ञान
——————————————————————————
‘आजचा सुधारक’च्या जून व जुलै 2016च्या भागामध्ये ‘साक्षात्कारामागील वैज्ञानिक सत्य’ व ‘साक्षात्कार : वैज्ञानिक स्पष्टीकरण’ ह्या दोन लेखांमधून डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी ‘साक्षात्कार’ची ह्या संकल्पनेचे वैज्ञानिक विश्लेषण केले होते. त्याच विषयाची दुसरी बाजू मांडणारा व त्याचबरोबर ध्यान, ईश्वर, भक्ती ह्या संकल्पनांचा गांधी-विनोबा परंपरेतला अर्थ विशद करून सांगणारा आणखी एका डॉक्टरांचा हा लेख, आजचा सुधारकची संवादाची परंपरा नक्कीच पुढे नेईल.
——————————————————————————
आपल्यालेखनात डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी साक्षात्काराची वैज्ञानिक विश्लेषणात्मक बाजू मांडताना खालील विधाने केली आहेत: ‘‘ध्यानावस्थेत देवांच्या विचाराचा कैफ चढल्यामुळे किंवा त्या विचारांनी आलेली उन्मादावस्था, झिंग (God Intoxication) या अवस्थेत स्वतःच्या अंतर्मनातून आलेले जे विचार असतात, त्यांनाच अंतिमसत्य मानून, त्यावर भाबडा विश्वास ठेवून, त्यांना साक्षात्कार किंवा दैवी संदेश म्हटले जाते.’’
साक्षात्कारांमागील वैज्ञानिक सत्य (भाग २)
देवाची उपासना, आध्यात्मिक साधना व ती करत असताना होणारी अनुभूती ह्यांमागील वैज्ञानिक सत्य उलगडून सांगणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध
—————————————————————–
अनादि अनंत काळापासून जगातील लाखो-करोडो लोक देवाची भक्ती करतात. देवळांत, मशिदींत किंवा चर्चमध्ये किंवा निरनिराळ्या आध्यात्मिक पंथांत नित्यनेमाने हजेरी लावतात. तासन् तास मंत्रपठण करतात, नमाज पढतात; बाबा, बुवा, महाराजांच्या प्रवचनास जातात; पंढरीच्या वारीस जातात, भागवत कथा ऐकतात. महामानव आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करण्यास लाखोंनी येतात. त्याचबरोबर विपश्यना, आर्ट ऑफ लिव्हिंग, राजयोग सेंटर, योगातील ध्यानधारणा; कपालभाती, भस्रिका यांच्यासारखे प्राणायाम करतात. ओशो रजनीशांच्या आश्रमात (नंगा) नाच करतात.
साक्षात्कारांमागील वैज्ञानिक सत्य (भाग १)
कोट्यावधी माणसे शेकडो वर्षांपासून देवाची उपासना, तसेच विविध प्रकारची आध्यात्मिक साधना करीत आले आहेत व त्यातून त्यांना ‘बरे वाटते’ असा दावा करीत आली आहेत. ही अनुभूती, तसेच साक्षात्कार ह्या संकल्पनेमागील वैज्ञानिक सत्य प्रतिपादन करणारा हा लेख तुमच्या विचारांना चालना देईल.
——————————————————————————–
मी स्वतःवर केलेल्या प्रयोगातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे, एखाद्या कल्पनेवर, किंवा विचारावर आपण सातत्याने, मनापासून, गंभीरपणे दिवसेंदिवस लक्ष केंद्रित केले, त्याचेच ध्यान केले, तर ज्याला आध्यात्मिक भाषेत साक्षात्कार म्हणतात तसा अनुभव काही व्यक्तींना येऊ शकतो. हा साक्षात्कार कोणता आणि कसा असावा हे त्या व्यक्तीची जडणघडण, तिच्यावर झालेले संस्कार, संगोपन, अध्यापन आणि प्रामुख्याने त्यावेळची सामाजिक परिस्थिती, अशा अनेक बाबींवर अवलंबून असते.
मिल्ग्रम प्रयोग – विघातक आज्ञाधारकपणा
आपण सर्वजण विघातक आज्ञाधारकतेचे बळी ठरण्याची शक्यता आहे. व आपल्याला त्याबद्दल खूपच कमी जाण आहे हे भान जागविणारा सामाजिक मानसशास्त्रातील एका महत्त्वाच्या पैलूची ओळख करून देणारा लेख
—————————————————————————-
जाहीर सूचना
एका तासासाठी ४ डॉलर कमावण्याची संधी – स्मरणशक्तीच्या अभ्यासासाठी लोक हवे आहेत.
* आम्हाला स्मरणशक्ती आणि शिक्षणासंदर्भातील वैज्ञानिक अभ्यासासाठी न्यु हॅवन येथील पाचशे पुरुषांची मदत हवी आहे. हा अभ्यास येल विद्यापीठात करण्यात येणार आहे.
* सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस साधारण एका तासासाठी ४ डॉलर (अधिक कारभत्त्यापोटी ५० सेंटस) दिले जातील.
गोष्ट विचारांच्या प्रवासाची
माहिती जनुके, सेल्फिश जीन , रिचर्ड डॉकिन्स, इन्टरनेट
—————————————————————————–
सामाजिक माध्यमांद्वारे कसलाही आधार नसलेले समाजविघातक विचार कसे वेगाने पसरविले जात आहेत, हे आपण अनुभवीत आहोत. त्यामागील शास्त्रीय कारणपरंपरा उलगडून दाखविणारा हा उद्बोधक लेख
—————————————————————————–
अलिकडच्या काळात लोक इंटरनेटचा वापर प्रामुख्याने आपले राजकीय अथवा धार्मिक विचार पसरविण्यासाठी करतात असे दिसून येते आहे. अशा विचारांची बीजे memes या नावाने ओळखली जातात. त्याला मराठीत माहिती जनुके असे म्हणूया. हे विचार कसे पसरतात ती प्रक्रिया समजावून देण्याचा प्रयत्न मी ह्या लेखातून केला आहे.
माहिती जनुकांची संकल्पना ही सर्वप्रथम प्रसिद्ध उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स ह्यांनी त्यांच्या सेल्फिश जीन ह्या प्रसिद्ध पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात मांडलीविज्ञानविश्वात प्रभावी ठरलेल्या पुस्तकांच्या यादीत त्याचा अनेकदा उल्लेख होतो.
‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’
आपल्या भोवतालची संपूर्ण सजीवसृष्टी “आहार, निद्रा, भय मैथुनं च” या चार प्राथमिक प्रेरणांच्या चौकटीत वावरत असते. मानवही त्याला अपवाद नाही. परंतु त्या चौकटीबाहेर पाऊल टाकून आजूबाजूच्या सृष्टीची ओळख करून घेणे विकसनशील बुद्धी असलेल्या मानवालाच जमले आहे. सर्व सृष्टीची माहिती करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने अनेक ज्ञानशाखा विकसित केल्या. प्रत्येक शाखा वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्न करीत असते. अशाच एका ज्ञानशाखेने विषय निवडला, “सजीवांची निर्मिती आणि विकास.” सजीवांच्या उत्पत्तीविषयींचे कुतूहल माणसाला फार प्राचीन काळापासून वाटत आले आहे. अनेक संस्कृतींनी , तत्त्ववेत्त्यांनी, धर्मग्रंथांनी ह्या विषयाचा वेध घेणाचा प्रयत्न केला आहे.