मैँ बहुत आभारी हूं कि आप लोगों ने मुझे यहां, इस जलसे में बुलाया. यहां आकर मुझे बहुत खुशी है कि इतने अंधेरे में भी लोग दीये जलाये हुए हैं. और गम इस बात का है कि २१वीं सदी में नास्तिकता पर चर्चा हो रही है. एक ऐसा विषय जिसका फैसला १८वीं सदी में ही हो जाना चाहिए था. सच्ची बात तो यह है कि नास्तिकता तो ऐसी होनी चाहिए थी, जैसे ऑक्सीजन. हम सांस लेते हैं, तो सोचते थोड़े हैं कि हम सांस में ऑक्सीजन ले रहे हैं.
विषय «विवेकवाद»
परिसंवाद – नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा
डॉ. प्रदीप पाटील : नास्तिकतेची मर्यादा आणि सामर्थ्य या विषयाचा परिसंवाद आपण इथे घेतला. प्रसारमाध्यमं, समाज आणि राजकारण या अंगांनी आपण मर्यादा काय आहेत आणि ताकद काय आहे ते जाणून घेतलं. हा परिसंवाद घेण्यामागचं कारण हे होतं की नास्तिकता ही नकारात्मक आहे असं नेहमी म्हटलं जातं. न आणि अस्तित्व – अस्तित्व न मानणारा – असं ते नास्तिकत्व असतं. तुम्ही जर सगळ्या गोष्टींना नकारच देणार असाल तर तुमच्याकडे काय आहे? प्रश्न आहे हा, परत एकदा ऐका. जर तुम्ही नकारच देणार असाल तर तुमच्याकडे फक्त नकारच आहे का?
एकांकिका – सत्य असत्याशी मन केले ग्वाही…
[या एकांकिकेचे कथाबीज, संकल्पना ही लेखकाची आहे. सदर एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याकरिताच लेखकाचा मोबाईल नंबर, पत्ता व ईमेल आयडी सोबत दिलेला आहे. परवानगीशिवाय सदर एकांकिका, एकांकिकेतील कोणताही भाग कोणत्याही माध्यमांमध्ये किंवा माध्यमांद्वारे सादर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व वादासाठी न्यायालयीन क्षेत्र सांगली राहील.]
‘जेव्हा एखाद्या माणसाला भ्रम होतो, तेव्हा त्याला मनोविकार म्हणतात आणि जेव्हा बऱ्याच माणसांना भ्रम होतो, तेव्हा त्याला धर्म म्हणतात’
– रॉबर्ट पिर्सिग ( ‘झेन अँड आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स’ चे लेखक)
प्रसंग १
(तालुक्यामधील एक सधन घर.
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास
आपला नास्तिकवाद आपण तपासून पाहिला पाहिजे
नमस्कार.
मला खूप अवघडल्यासारखं झालंय. कारण, एक तर सभेत बोलायची माझी सवय मोडली आहे. आणि आज तुमच्यासमोर बोलताना तर मला आणखीन भीती वाटतेय. कारण, मी गेली ५० वर्षे जरी चळवळीत काम करत असले तरी, ज्या असोशीने तुम्ही नास्तिकतावादाचा पुरस्कार करताय, त्याचा प्रचार करताय, त्या प्रकारे मी नास्तिकतावादाचा पुरस्कार किंवा प्रचारही केलेला नाहीये. एकतर मी ज्यावेळेला चळवळीमध्ये पडले त्यावेळेला मुंबईमध्ये गिरणी कामगारांची चळवळ फोफावलेली होती. चळवळीमध्ये भाग घेणारे कार्यकर्ते घरी गेल्यानंतर काय करतात त्यापेक्षा गिरणीच्या दरवाज्यावर ते काय करतात, काय बोलतात यावरच सगळं लक्ष केंद्रित झालेलं असायचं.
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास
विचाराने जगायचे तर किंमत चुकवावी लागते
सर्वांना सस्नेह नमस्कार.
‘माझा नास्तिकतेचा प्रवास’ या परिसंवादाच्या निमित्ताने आज आपण जमलेलो आहोत. मी नास्तिक कसा झालो? इकडे माझा प्रवास कसा झाला? हे मी विषद करतो. मी लहान असताना आमच्याकडे ‘घोड्यावरचा देव’ नावाचा एक प्रकार असायचा. तर त्यासाठी आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावरती जायचो. ‘सासनकाठी’ नावाचा एक प्रकार इकडे असतो. म्हणजे काय? तर काहीतरी एक उत्सव असतो. त्यात गुलालामध्ये बुडवलेलं खोबरं असतं. ते खोबरं मंदिरावरती टाकायचं आणि तिथून ते खाली पडलं की उचलून खायचं, असा तो प्रकार असतो.
नास्तिकता समाजात अजून रुजलेली नाही
नास्तिकतेचा विचार भारतामध्ये शेकडो वर्षांपासून आहे; पण आपल्याकडे नास्तिकता अद्याप रुजलेली नाही. नास्तिकतेचा विचार करणाऱ्यांना आजही एकटेपणाची भीती वाटते. समाजात तुटल्यासारखं वाटतं. जी माणसे ह्या प्रवाहाच्या विरोधात पोहूनसुद्धा ठामपणे आपला विचार मांडतात, त्यांचा लढा खरेतर आस्तिकांच्या विरोधात नसतो, तर तो आस्तिक विचारांच्या विरोधात असतो. आगरकर नेहमी म्हणायचे की विचारकलहाला कशाला घाबरायचं?
नास्तिक आपले विचार ठामपणे मांडून देवा-धर्माची चिकित्सा करतात आणि आस्तिकांनाही विचार करायला प्रवृत्त करतात. पण याचा अर्थ आस्तिकांशी त्यांचा लढा असतो असा होत नाही. आस्तिक असणाऱ्यांनी विचार करावा, आपल्या काही चुकीच्या समजुती आहेत, रूढी आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या टाळाव्यात ह्यासाठी नास्तिक पुढाकार घेऊन त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करत असतात.
देव नाकारणे हे विवेकवादाचे बाय-प्रॉडक्ट
ब्राईट्स सोसायटीच्या दशकपूर्तीला नास्तिक परिषदेच्या निमित्ताने जमलेले आपले माननीय प्रमुख पाहुणे जावेद अख्तरजी, मंचावरील आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व नास्तिक मुक्तचिंतक मित्र-मैत्रिणींनो.
सर्वप्रथम, या पुरस्कारासाठी माझी निवड केली यासाठी ब्राईट्स सोसायटीच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. अतिशय प्रांजळपणे सांगायचं तर हा पुरस्कार प्राप्त करण्याची पात्रता माझी आहे की नाही हे मला अजिबात माहीत नाही. पण तरीही अतिशय विनम्रपणे याचा स्वीकार करते. मंचावर उपस्थित जावेद अख्तर सर एक शायर किंवा स्क्रीन-प्ले-रायटर म्हणून आपणा सर्वांना अवगत आहेत. मी नास्तिक झाल्यापासून रॅशनॅलिटीसाठी त्यांना फॉलो करते आणि रॅशनॅलिटीसाठी भारतातले म्हणावे असे एक आयडॉल कदाचित तेच असतील.
संविधानाचा संकोच आणि अडथळे
कार्यक्रमाचे आयोजक आणि उजेडाकडे जाण्याची इच्छा असणाऱ्या आणि उजेडाच्या दिशेने बघत असणाऱ्या सगळ्या बंधुभगिनींनो,
कायदा, कायद्याचे क्षेत्र किंवा एकूणच कायद्याच्या संदर्भात बोलायचे झाले तर, सध्या काही खूप चांगले वातावरण नाही हे नक्की. आपण कायद्याकडे जसे बघतो, तसे अर्थ आपल्याला त्यात दिसतात. परंतु कायदा किंवा न्याय मिळणे प्रक्रियावादी होणे हे अत्यंत विदारक सत्य आहे. महाराष्ट्रातल्या अनेक न्यायालयांनाच नाही तर, भारतातल्या अनेक न्यायालयांना न्यायमंदिर असे नाव दिलेले आहे. आता काही मुसलमान लोकांनी म्हटले की न्यायमंदिरच्या ऐवजी न्यायमस्जिद म्हटलेले चालेल का? हा प्रश्न उभा केलेलाच चालणार नाही अनेकांना.
नास्तिक तितुका मेळवावा, सर्वत्र विवेक वाढवावा
गेली दहा वर्षे मी ज्या दोन मुद्यांवरती बोलतो आहे. तेच दोन मुद्दे मला आणखी सविस्तर, वेगळ्या शैलीमध्ये मांडावे लागतील. एक, परिषदेसारखे हे सगळे उपद्व्याप कशासाठी? आणि दोन, परिषद सांगलीतंच का? तर हे जे दोन बेसिक मुद्दे आहेत त्याच्यावरती मी बोलणार आहे.
आपण गेली दहा वर्षे वेगवेगळे उपक्रम करत आहोत. यावेळी आपला दशकपूर्ती समारंभ आहे. सामाजिक जीवनामध्ये दहा वर्षे हा कालावधी फार मोठा नाही, पण तेवढा छोटापण नाही. काही गणती करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या जमेच्या आहेत, त्या मी नमूद करेन.
नास्तिकवाद आणि स्त्रिया
सत्यासत्यता, अज्ञान व अपसमज यांच्या पलीकडे जाणारी नास्तिकता हवी आहे