आपण दररोजच्या व्यवहारात नास्तिकता आणि विवेक यांचा सर्रास वापर करतो. कोणत्याही गोष्टीबाबत सारासार विचार करण्याच्या वृत्तीला लोकभाषेत विवेक करणे असे म्हटल्या जाते. थोडक्यात, कोणत्याही गोष्टीची योग्यायोग्यता ठरविताना किंवा विशिष्ट कृती करताना विवेक बाळगला पाहिजे, असे नेहमी आपल्या कानावर येते. नास्तिकता या संज्ञेबाबत ईश्वराचे अस्तित्व अमान्य करणाऱ्याला लोक नास्तिक म्हणतात आणि ते बरेचसे बरोबरही आहे. परंतु या शब्दांचे नेमके अर्थ आणि त्यांचा इतिहास काय आहे, याचा सामान्य माणूस फारसा विचार करीत नाही. किंवा तसा विचार करून या शब्दांचा वापर करीत नाही. तसेच या दोन संकल्पनांचा परस्परात काय सबंध आहे, याचाही बारकाईने विचार करण्याचे कारण कोणाला वाटत नाही.
विषय «विवेकवाद»
श्रद्धा आणि श्रद्धा
आदरांजली : मेघश्याम पुंडलिक रेगे
(२४-१-१९२४ ते २८-१२-२०००)
महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानात्मक व वैचारिक क्षेत्रात गतशतकाच्या उत्तरार्धात ज्यांनी आपल्या वैचारिक व्यक्तिमत्वाने ठसा उमटविला, त्यांपैकी प्रा. मे.पुं. रेगे हे एक महत्त्वाचे विचारवंत होते. त्यांच्या जीवनाचे वर्णन करतांना प्रा. रा.भा. पाटणकरांनी लिहिले आहे, “प्रा. रेगे एक तत्त्वज्ञ, प्रबोधनकार आणि सॉक्रेटिक शिक्षक होते. त्यांचे जीवन म्हणजे समाजातील सर्व थरांवर काम करीत करीत मुक्त होण्याचा एक मूर्तिमंत प्रवास होय.”
तर, तत्त्वज्ञ दि.य.देशपांडे यांनी रेग्यांविषयी लिहिले आहे, “या व्यक्तीपुढे आपण सर्व खुजे आहोत हे सतत जाणवते.”
स्वत: ‘आजचा सुधारक’ परिवाराने त्यांच्याविषयी म्हटले आहे, “प्रा.
स्फुट
वैयक्तिक आयुष्यात देवावर, नियतीवर श्रद्धा असण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही. पण सार्वजनिक, सामाजिक जीवनात तिची लुडबूड होते तेव्हा चिंता वाटते, वाढते. संघटित धर्मसंस्था सत्तापिपासू लोकांना हमखास आपल्याकडे खेचून घेते आणि मग त्यात राजकारणातील अनिष्ट गोष्टी शिरतात. पाश्चिमात्य राष्ट्रात चर्चचा इतिहास पाहा. आपल्याकडील रथयात्रेपासून सुरुवात झालेल्या घटना पाहून हेच दिसते की जास्त संख्येने लोक आकृष्ट होतात तेव्हा राजकारण्यांचे लक्ष तिकडे जाते आणि राममंदिर हा भक्तीचा नव्हे तर राजकारणाचा विषय होतो. राम हा दर्शनी किंवा ‘फ्रंट’ म्हणतात तसा दाखवायचा भाग बनतो आणि त्याच्या आडून राजकारणाची सूत्रे हलू लागतात.
नास्तिकवादः एक अल्प परिचय
अगदी लहानपणापासूनच आपल्यावर संस्काराच्या नावाखाली देव-धर्म यांची शिकवण दिली जाते. पालकांना जरी देव-धर्माचे अवडंबर पसंद नसले तरी समाजात वावरताना त्यांच्या मुलां/मुलींची कळत-नकळत देव-धर्माची, पुसटशी का होईना ओळख होते. सण-उत्सव साजरा करत असताना देव-धर्माच्या उदात्तीकरणाला पर्याय नसतो. कुठल्याही गावातील वा शहरातील गल्लीबोळात एक फेरी मारली तरी कुठे ना कुठे देऊळ दिसते. या देवळाच्या गाभाऱ्यातील देवाच्या/देवीच्या मूर्तींची मनोभावे पूजा-अर्चा करणाऱ्यांची कधीच कमतरता नसते.
परंतु एकविसाव्या शतकात वावरताना आजच्या पिढीतील विचार करू शकणाऱ्या तरुण/तरुणींच्या मनात देव-धर्म, पूजा-अर्चा, सण-उत्सव, जत्रा-यात्रा इत्यादींच्याबद्दल नक्कीच प्रश्न पडत असतील.
बुद्धिप्रामाण्यवादाचे स्वरूप
प्रा. मे.पुं रेगे ह्यांचे बुद्धिप्रामाण्यवादाचे विवेचन :
आज एकविसाव्या शतकातही ‘बुद्धिप्रामाण्यवादाचा’ उत्स्फूर्तपणे प्रचार करण्याची, त्याचे महत्त्व पटवून सांगण्याची आवश्यकता अनेकांना वाटते, त्यामागचे कारण काय? बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करणे हे आपले जीवितकार्य आहे आणि ते आपण केले तरच भारतीय समाजात काही ‘सुधारणा’ होऊ शकेल, अशी समजूत बहुधा त्यामागे असते. बुद्धिप्रामाण्यवाद ही केवळ एक विचारसरणी नसून, ती एक जीवनपद्धती आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन बुद्धिप्रामाण्याने जगावे, त्याच्या जीवनाची सर्व अंगोपांगे ही बुद्धिप्रामाण्यानेच नियंत्रित व्हावीत, असे हे प्रतिपादन असते.
बुद्धिप्रामाण्यवादाचा जीवनमार्ग म्हणून स्वीकार आणि प्रचार करण्याआधी एक प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे : बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे नेमके काय?
विवेक
आस्तिक विरूद्ध नास्तिक हा वाद अनेक वर्षांपासूनचा आहे. पूर्वी आपण नास्तिक आहोत हे सांगायला माणूस घाबरायचा, पण आता तो एवढा धीट झालाय की नास्तिकांचे मेळावे भरवून, व्यासपिठावर उभा राहून “मी नास्तिक आहे” असे तो निर्भीडपणे सांगू शकतोय. एवढेच नाही तर शंतनू अभ्यंकरांसारखा डॅाक्टर ‘असला कुणी नास्तिक तर बिघडलं कुठे?’ असा लेखही लिहू शकतोय (संदर्भ : लोकसत्ता, १८ डिसेंबर २०२२ चा अंक)
देवाला मानले, कर्मकांडे केली, उपवास धरले (साग्रसंगीत उपासाचे पदार्थ खाऊन) तर तो आस्तिक व ह्यातले काहीसुद्धा केले नाही तर तो नास्तिक ठरतो का?
आपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का?
आपल्या देशाची घटना सेक्युलर आहे असे सर्व पुरोगामी विचारवंत सांगतात; पण ती खरोखरच शंभर टक्के सेक्युलर आहे का?
सेक्युलर शब्दाचा अर्थ निधर्मी, धर्म न मानणारा किंवा ईहवादी असा आहे. आपल्या देशाला केवळ अधिकृत धर्म नाही म्हणून आपला देश/घटना सेक्युलर आहे असा याचा अर्थ होत नाही. तेव्हा नेमकी परिस्थिती काय आहे ते पाहू या.
ईहवादी (सेक्युलर) राज्याच्या संकल्पनेचा उगम
मध्ययुगात युरोपमध्ये राज्य आणि चर्च यांच्यामध्ये जो सत्तासंघर्ष झाला त्यात ईहवादी राज्याच्या संकल्पनेचे मूळ सापडते. ‘द मोनार्किया’ या पुस्तकात डान्टे याने आधुनिक काळातील ईहवादी राज्याची कल्पना प्रथमच मांडली.
विक्रम आणि वेताळ – भाग ९
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“राजन्, आता एकदा आपण सिंहावलोकन करूया.”
“तुला रे कशाला हवं सिंहावलोकन? तसाही फांदीवर उलटा लटकत करतोसच की मागच्या वाटेचं अवलोकन. वेताळावलोकन म्हण हवं तर त्याला.”
“बरं,बाबा, तसं म्हण. खूश?
तर, सर्वप्रथम फलज्योतिषाच्या लोकप्रियतेची कारणे कोणती ह्या प्रश्नावर तू ह्या सर्व कारणांच्या मुळाशी माणसाच्या दोन स्वाभाविक इच्छा आहेत असे म्हटले होतेस. पहिली आपल्या आयुष्यातील दुःख निवारण करण्याची आणि दुसरी भविष्याच्या अनिश्चिततेतून येणारी असुरक्षितता घालवण्याची.
विक्रम आणि वेताळ – भाग ८
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“राजन्, गेल्या खेपेत तू सर्वसमावेशक सुखाची व्याख्या ‘प्रत्येकाला आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात, जे हवेहवेसे, आनंददायक वाटते आणि जे त्याच्यासाठी कल्याणकारक, समाधानकारक असते ते सुख आणि अर्थातच ह्याच्याच विरुद्धार्थी दुःख’ अशी केलीस. तसेच व्यक्तिगत सुखाची व्याख्या; ‘प्रत्येक व्यक्तीने जो अग्रक्रम ‘स्वतः’ निवडून एखाद्या गोष्टीस प्राधान्य दिले असेल त्यात त्या व्यक्तीला सुख वाटत असते, अशी केली होतीस.
त्या व्याख्या करतांना सुखदुःख कसं तुलनात्मक असतं ह्याविषयी तू बोलला होतास. परन्तु अशी तुलना करण्यासाठी सुखदुःख मोजण्याचा मापदंड तू कसा तयार करशील असा प्रश्न मी तुला होमवर्क म्हणून दिला होता.”
विक्रम आणि वेताळ – भाग ७
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“हां, तर कुठे होतो आपण राजन्?”
“तू त्या झाडाच्या फांदीवर उलटा लोम्बकळत होतास; मी तिकडून, काट्याकुटयांनी भरलेल्या पायवाटेने येऊन तुला फांदीवरून कसंबसं उतरवून खांद्यावर घेतलं आणि आता स्मशानाच्या दिशेने निघालो आहे.”
“तसं नाही रे बाबा, मी म्हणत होतो की गेल्या खेपेस, दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आपण कुठवर आलो होतो?”
“ओह्ह…. विसरला असशील तर बरंच आहे.”