विषय «इतर»

आगरकर-चरित्राच्या निमित्ताने

राष्ट्रीय चरित्रमालेसाठी गोपाळ गणेश आगरकर यांचे एक संक्षिप्त चरित्र प्रख्यात विचारवंत, लेखक आणि समाजविज्ञान-कोशकार श्री स. मा. गर्गे यांनी लिहिले आहे. आजचा सुधारक गेली दोन अडीच वर्षे आगरकरांनी पुरस्कारलेल्या विवेकवादाचा प्रसार आपल्या मगदुराप्रमाणे करीत आहे. तेव्हा त्याने या अल्पचरित्राची ओळख आपल्या वाचकांना करून द्यावी म्हणून श्री गर्गे यांनी ते आमच्याकडे धाडले. त्या चरित्राच्या निमित्ताने आगरकरांना आदरांजली वाहण्याची ही संधी आम्ही घेत आहोत.
टिळक आणि आगरकर या दोघांचाही जन्म १८५६ चा. धाकट्या शास्त्रीबुवांनी निबंधमालेतून आधुनिक शिक्षितांस केलेल्या विज्ञापनेने भारावून गेलेले हे दोघेही तरुण या हतभाग्य भारतभूच्या चरणावर आपली जीवनकुसुमे वाहण्यासाठी शास्त्रीबुवांच्या उद्योगात सामील झाले.

पुढे वाचा

पुस्तक परिचय

गोपाळ गणेश आगरकर, ले.- स.मा. गर्गे, प्रकाशक – नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, ए-5 ग्रीन पार्क नवी दिल्ली ११० ०१६, किमत रु. २३.००, पृष्ठंख्या १५० + १०
आपल्या देशात जे अनेक थोर लोक होऊन गेले त्यांचा परिचय करून देण्यासाठी पुस्तके प्रकाशित करणे ही आपली जबाबदारी आहे असे चांगले प्रकाशक समजतात. त्यासाठी ते अशी पुस्तके अभ्यासू लेखकांकडून लिहवून घेतात, आणि सुबक अशी पुस्तके वाचकांच्या हाती देतात. गोपाळ गणेश आगरकर हे छोटेखानी पुस्तक अशाच पुस्तकांपैकी एक आहे. चरित्रनायकाच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी, त्याच्या कार्याचा वा व्यक्तिमत्त्वाचा एखादा उपेक्षित पैलू वाचकांच्या नजरेस आणून देण्यासाठी लिहिलेला हा ग्रंथ नाही.

पुढे वाचा

विवेकवादाच्या एका व्यासपीठाची ओळख

गोष्ट पासष्टीची, ले. शांता किर्लोस्कर, वितरक – मौज प्रकाशन गृह, गिरगांव, मुंबई -४, किंमत रु. १५०/
किर्लोस्कर खबर १९२० च्या जानेवारीत निघाले तेव्हा ते अक्षरशः चारपानी चोपडे होते. त्याच्या ३०० प्रती काढल्या आणि ‘आप्तमित्र, ग्राहकबंधूंना वाटल्या. जगप्रसिद्ध फोर्ड या मोटार कारखान्याचे फोर्ड टाइम्स हे मासिकपत्र पाहून शंकररावांना स्फूर्ती झाली आणि ही खबर निघाली. पुढे हे मासिक वाढतच गेले. दहा वर्षांनी स्त्री आणि आणखी चार वर्षांनी चौतीस साली मनोहर असा परिवार वाढला. मासिकांच्या विकासाची ही कहाणी मोठी आहे. चांगली पासष्ट वर्षांची. १९८४ साली सामाजिक परिवर्तनाचे एवढे काम केलेली ही संस्था एखाद्या मालमत्तेसारखी विकली गेली.

पुढे वाचा

आम्हांलाही पूर्वाचार्यांएवढेच अधिकार

पूर्वेतिहास आणि पूर्वाचार हे पुनःपुन्हा पुढे आणून त्यांचे फिरून अवलंबन करा, असे सांगत न बसतां, अलीकडील न्यायाच्या भात्यांतून तीव्र बाण काढून त्यांचा त्यांवर संपात केला पाहिजे. कोणतेहि आचार घालण्यास पूर्वीच्या ऋषींस जितका अधिकार होता तितकाच आम्हांसहि आहे. पूर्वकालीन आचार्यांवर ईश्वराची जितकी कृपा होती, तितकीच आम्हांवरहि आहे, व त्यांच्याशी त्यांचा जितका संबंध होता तितकाच आम्हांसहि आहे. बर्‍या-वाईटाची निवड करण्याची जितकी बुद्धि त्यांना होती तितकी, तीहून अधिक आम्हांसहि आहे. सृष्टिविषयक ज्ञान जितकें त्यांना होते, तितकें, किंबहुना त्याहून अधिक ज्ञान आम्हांस आहे. सबब त्यांनी घालून दिलेल्या नियमांपैकी जेवढे हितकारक असतील तेवढ्यांचंच आम्ही पालन करणार आणि जे अपायकारक असतील ते टाकून देऊन त्यांचे जागी आम्हांस निर्दोष वाटतील असे नवीन घालणार.

पुढे वाचा

धारणात् धर्म इत्याहुः

गेली काही वर्षे धर्म या विषयावर बरेच विचारमंथन चालू आहे. त्यात एक नवा विचार प्रामुख्याने पुढे येत आहे. तो विचार म्हणजे असा की ‘धर्म म्हणजे religion नव्हे. हिंदुराष्ट्रवादी विचारवंतांकडून यासंबंधात असा युक्तिवाद केला जातो की ‘धर्म म्हणजे religion मानल्याने सेक्युलरिझम (secularism) या विषयासंबंधी मोठा गोंधळ माजून राहिला आहे. ‘Secular’ विरुद्ध ‘ religious’ असल्यामुळे, आणि ‘religious’ म्हणजे धार्मिक असे मानले गेल्यामुळे, ‘सेक्युलर’ म्हणजे ‘निधर्मी, धर्मनिरपेक्ष’ असे अर्थ निष्पन्न झाले आहेत. पण हे चूक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. मा. गो.

पुढे वाचा

श्रद्धेपुढे शहाणपण चालत नाही- सावरकर ते भाजप ह्या पुस्तकाच्या निमित्ताने

डॉ. स. ह. देशपांडे ह्यांनी अत्यन्त अभ्यासपूर्वक लिहिलेला सावरकर ते भा. ज. प. हिन्दुत्वविचाराचा चिकित्सक आलेख हा ग्रन्थ माझ्या नुकताच वाचनात आला. ग्रन्थ वाचल्यानंतर माझ्या मनात पुष्कळ विचार आले. त्यांपैकी काही येथे संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न करतो.

मुस्लिम विरोधात हिन्दुत्व
हिन्दुत्वविचाराचा आलेख मांडताना डॉ. देशपांडे (सहदे) ह्यांनी फक्त मुस्लिमविरोधात हिन्दुत्व अशी त्याची मांडणी केली असल्यामुळे ग्रंथ वाचून माझे तरी समाधान झाले नाही. लेखकाने मनाशी काही एक निष्कर्ष आधीच काढून ठेवला असून त्या निष्कर्षाला पूरक अशीच अवतरणे (उद्धरणे) त्यांनी प्रचुर मात्रेमध्ये जमविली आहेत असे मनात आल्यावाचून राहिले नाही.

पुढे वाचा

लोकहिताचे विवेकी भाष्यकार : लोकहितवादी

उणीपुरी दोन वर्षे आपण महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी उत्सवाने काढीत आहोत. आपला समाज ज्यावेळी गलितगात्र, स्तंभित आणि संवेदनाहीन होऊन पडला होता त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्याच्या कशा मशाली पेटवल्या आणि त्याला चेतवले याचे संस्मरण करणे आपले कर्तव्यच आहे. याच भावनेने आपण आणखीही एका पणतीची आठवण ठेवली पाहिजे. ही आठवण करणे हे जेवढे सौजन्याचे तेवढेच औचित्याचे आणि कृतज्ञपणाचेही होणार आहे. त्या मिणमिणत्या पणतीने पुढे मोठमोठ्या दीपस्तंभांना ज्योत पुरविली आहे. आणि आज तिची गरज आपल्याला मुळीच उरली नाही असेही नाही.

पुढे वाचा

महाराष्ट्रीयांस अनावृत पत्र

अशा मनुष्याच्या लेखात कितीही प्रमाद होत असले व केवढीही कटुता असली तरी ते समंजस मनुष्याच्या स्वल्प आदरास, निदान थोड्याशा अनुकंपेस तरी पात्र झाले पाहिजे. हा वेडा पीर इतके हाल, संकटे व लोकापवाद सोसून ज्या अर्थी इतकी धडपड करीत आहे त्या अर्थी ती लोकांस अंती हितावह होईल अशी निदान याच्या मनाची तरी खात्री असावी असा विचार लोकांच्या मनात येऊन त्यांनी त्याच्या दोषाबद्दल त्यास क्षमा केली पाहिजे. लोकांनी तसे केले तर ठीकच आहे. पण नाही केले तरी त्यास (या लेखकास) विशेषसे वाईट वाटण्याचा संभव नाही; कारण सारे जग त्यावर उलटले तरी प्रसिद्ध संस्कृत कवीच्या विचाराप्रमाणे तो म्हणेल, की खरोखरीच जे या गोष्टीत आमची निर्भर्त्सना करतात त्यांना काहीच समजत नाही व त्यांच्याकरिता हा आमचा प्रयत्नही नाही.

पुढे वाचा

विवाह आणि नीती- आमची भूमिका

Morals या जगप्रसिद्ध ग्रंथाचा अनुवाद सादर केला. त्याचा हेतू विवाह, कुटुंबसंस्था आणि नीती या अतिशय महत्त्वाच्या विषयावरील एका थोर विचारवंताचे विचार वाचकांना कळावे व त्यांच्या विचारांना चालना मिळावी. रसेल यांची सर्वच मते सर्वांना पटतील अशी अर्थातच आमची अपेक्षा नव्हती. परंतु मनुष्यसमाजाविषयी ज्यांनी खोल विचार केला आहे आणि तो विचार सुबोध आणि स्वच्छ शैलीत वाचकांपुढे मांडला आहे. अशा समाजचिंतकाच्या विचारापासून आमचे वाचक वंचित राहू नयेत एवढाच हेतू त्यामागे होता. तो अनुवाद आता संपला आहे. त्या ग्रंथातील विचारांविषयी आमचे मत काय आहे हा प्रश्न वाचकांच्या मनात अनेकदा उद्भवला असणार, आणि खरे म्हणजे तो अनेकवार विचारलाही गेला आहे.

पुढे वाचा

चर्चा- डॉ. प्रदीप पाटील यांना उत्तर (उत्तरार्ध)

धर्मसुधारणा कशास म्हणावयाचे याची स्पष्टता करावी लागेल. तसेच हिंदुधर्माभिमानी’ या शब्दाची. एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रात सनातनी ब्राम्हणांचा एक पक्ष अस्तित्वात होता. यांच्यासाठीच हा शब्द वापरावयाचा का? तसेच हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादी हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, चळवळी यातील व्यक्तींसाठी हाशब्द राखून ठेवायचा का? अशी व्याख्या केली तर न्यायमूर्ति रानडे, संत गाडगे महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, इत्यादि कोणीच हिंदुधर्माभिमानी ठरत नाही.
मी माझ्या लेखनात या शब्दांचा प्रयोग केलेला नव्हता. ‘हिंदू असल्याबद्दल रास्त अभिमान बाळगणार्या व धर्माविषयी, परंपरा व इतिहास यांविषयी आस्था बाळगणाच्या अशा अर्थाचे वाक्य मुळात आहे’.

पुढे वाचा