पृथ्वीवरील इतर देशांबद्दल मला फारशी माहिती नसल्याने त्यांच्या बाबतीत काही विधान करीत नाही. पण भारत या माझ्या देशाची मला जी माहिती आहे तीवरुन माझी अशी समजूत झाली आहे की या देशाच्या प्राचीन रहिवाशांवर एक मोठी भूल पडली. प्रारंभी यांची संख्या थोडी होती. पण कालांतराने ती वाढत गेली. लेखनकला भारतीयांना अवगत झाल्यापासून या भूलग्रस्तांची संख्या वेगाने वाढत गेली आणि मुद्रणकला अवगत झाल्यानंतर तो वेगही वेगाने वाढत गेला असावा. १९ व्या व २० व्या शतकात त्या वेगावर थोडी मर्यादा पडली पण एकूण भारतीयांची संख्याच वेगाने वाढू लागल्याने त्या सनातन भुलीच्या प्रभावाखालील जनलोक वाढतच राहिले.
विषय «इतर»
अमेरिकेत आ.सु. वाचकांशी हृदयसंवाद
आधी अमेरिकेत येणे झाले तेव्हा आजचा सुधारकचे चार वर्गणीदार होते. त्यातली एक माझी मुलगी आणि इतर तीन पद्मजा फाटकांनी मिळवून दिलेले. त्यांपैकी दिलीप फडणीस म्हणाले, चार आहेत त्यांचे चाळीस करू. त्यांना एकत्र आणू. एकत्र यावे हा विचार मनात होताच. Summit ला राजेन्द्र मराठे असतो. त्याच्याजवळ बोललो. (इथे एकेरी संबोधायला वेळ जावा लागत नाही. फारशी जवळीक लागत नाही, आपलीच जीभ रेटत नाही. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत.) आजचा सुधारक च्या वाचक-हितचिंतकांची पहिली सामूहिक गाठभेट झाली ती Summit लाच राजनकडे, सप्टेंबर १२, १९९८ ला. त्यावेळी आणि नंतरच्या पाठपुराव्यामधून वर्गणीदारांची संख्या ऐंशीवर गेली.
आय प्रेडिक्ट : डॉ. गोवारीकरांचे भारतीय लोकसंख्येबद्दलचे भाकित
डॉ. वसंत गोवारीकरांच्या ‘एक्स्प्लोअरिंग इंडियाज पॉप्युलेशन सिनॅरिओ’ ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती जानेवारी ९२ मध्ये प्रकाशित झाली. सुधारित दुसरी आवृत्ती जुलै ९३ मध्ये प्रकाशित झाली. डॉ. गोवारीकर महाराष्ट्राच्या चांगल्या परिचयाचे आहेत. भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे प्रमुख, भारत सरकारचे विज्ञान-तंत्रज्ञान सचिव (१९८६-९१), पुणे विद्यापीठाचे कुलगुरू अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. मौसमी पावसाची प्रक्रिया आणि हवामानाचे दूरदृष्टीचे भाकित वर्तवण्याबाबत त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे.
विज्ञान, लोकसंख्या आणि विकास याबद्दलच्या त्यांच्या पुस्तकावर लोक-संख्यातज्ञांची प्रतिक्रिया मिश्र स्वरूपाची होती. राष्ट्रसंघाने त्यांना त्यांची मते तपशिलात मांडायला सांगितली, ज्यातून ‘द इनेव्हिटेबल बिलियन प्लस’ हा ग्रंथ घडला.
मला आस्तिक व्हायचे आहे
परमेश्वर आहे की नाही हा वाद बहुधा हजारो वर्षांपासून सुरू असावा आणि पुढे किती वर्षे चालू राहील हे त्या परमेश्वरालाच ठाऊक! किंवा, तो नसला तर, कुणास ठाऊक हे कुणास ठाऊक! त्यामुळे ज्या वादांतून काहीही निष्पत्ती होणे शक्य नाही, अशा वादांत हा वाद अग्रणी धरला जावा. ईश्वर नसल्याबाबतचे लाखो पुरावे, कारणे आणि शास्त्रीय मीमांसा नास्तिकांतर्फे दिल्या जातात. परंतु तितकेच अनुत्तरित प्रश्नही आस्तिकांकडूनही उपस्थित केले जातात. प्रथमतः दोनही पक्ष आपापली बाजू हिरिरीने मांडायला सुरुवात करतात, पुढे या वादाचे स्पांतर ‘श्रद्धा विरुद्ध चिकित्सा’ अशा वादात होते .
माणसांचे रूपांतर भराभर पाळीव प्राण्यांत होत आहे .
[साहित्य संमेलनातील सरकारी हस्तक्षेपाच्या निषेधार्थ १९८१ मध्ये मुंबईत स्वतंत्र साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना मालतीबाई बेडेकर यांनी मांडलेले विचार आज दोन दशकांनंतरही तितकेच लागू आहेत.]
“हे संमेलन पर्यायी आहे की समांतर आहे, या वादात मी गुंतत नाही. जन्माला येणाऱ्या मुलालासुद्धा आपले खरे नाव लाभायला बारा दिवस लागतात. हे संमेलन मोकळेपणाने पहिले पाऊल टाकू पाहत आहे, एवढे खरे. हे एकच पाऊल असेल, ते लहानसेही असेल, पण एक चिनी म्हण आहे: प्रवास एक मैलाचा असो, नाही तर हजार मैलांचा असो, प्रवासाची सुरवात ही अशी पहिल्या पावलानेच होते.
विवेकवादावरील आव्हानांस उत्तर
प्राध्यापक रेगे यांचे तत्त्वज्ञान या ग्रथांतील डॉ. सुनीति देव यांच्या ‘विवेकवाद आणि त्याच्यापुढील आव्हाने’ या लेखाला प्रा. रेग्यांनी दीर्घ उत्तर दिले आहे. त्यांच्या सर्वच लिखाणाप्रमाणे हे उत्तरही गंभीर विचाराने परिप्लुत आणि अतिशय व्यवस्थित झाले आहे. त्यातील काही युक्तिवादांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
१. आरंभी प्रा. रेगे यांनी देवांच्या लेखातील ढोबळ चुका म्हणून दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे विज्ञानाच्या औपन्यासिक-निगामी रीतीत (hypothetico-deduction method) एक अवैध अंश आहे ही. विज्ञानाची रीत औपन्यासिक-निगामी आहे हे खरेच आहे; पण तिच्यातील अवैध अंशामुळे तिचे निष्कर्ष सिद्ध होत नाहीत असे रेगे म्हणतात.
गृहिणी —- प्रवास चालू (दांपत्यजीवन)
“कुटुंबकेंद्रित समाज आणि स्त्रीकेंद्रितकुटुंब’ या विषयाचा मी मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय. मी काही तात्त्विक चर्चा करायला बसलेलो नाही तर या विषयात निरनिराळ्या ठिकाणाहून आत शिरण्याचा प्रयत्न करतो आहे. एक गृहिणी म्हणून तिच्या विविध प्रकारच्या कामांचा अगदी थोडक्यात मी आढावा मांडला होता. तेथे गृहिणी ही ‘कर्ती’ होती. विचार आला की या कर्तीचे पुढे होते काय?
खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. माझे दोन मित्र गप्पा मारत होते. एक म्हणाला —-अरे, वैजू म्हणते आहे, आठपंधरा दिवस माहेरी जाते. तिच्या आईला जरा बरं नाहीयं वाटतं.
स्त्री-सुधारणेच्या वारशाचे–विस्मरण झालेला महाराष्ट्र
देशातील सर्वांत प्रगत आणि कायदा व सुव्यवस्थेबाबतीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात गेल्या सहस्रकाच्या अखेरच्या वर्षात राज्यातील स्त्रियांची अवस्था फार शोचनीय असल्याचे आढळते. मुंबई महानगराला मागे टाकून नागपूर व अमरावती जिल्हे स्त्रियांवरील अत्याचारांबाबतीत पुढे आहेत. पुणे, नांदेड, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातही या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सी. आय. डी.) नुकतीच ही आकडे-वारी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत महिलांसंबंधी गुन्ह्यांची संख्या सुमारे तीन हजारांनी घटली. परंतु मुळातच हे प्रमाण भयावह आहे. यावर्षी दाखल झालेल्या १३,५८२ प्रकरणात प्रमुख गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे —-
दर आठवड्याला सुमारे २५ बलात्कार म्हणजे वर्षात १३०८ बलात्कारांना स्त्रियांना सामोरे जावे लागले.
“शास्त्र” म्हणे!
[“वैज्ञानिकांनी संस्कृत शिकायलाच हवे : जोशी’ ह्या मथळ्याने दिलीप पाडगावकरांनी घेतलेली मुरली मनोहर जोशींची मुलाखत टाईम्स ऑफ इंडियाच्या १५ एप्रिल २००१ च्या पहिल्या पानावर प्रकाशित झाली. तिचे हे भाषांतर.]
इतर कोणत्याही भाजप नेत्यापेक्षा मुरली मनोहर जोशींवर सेक्युलर विचारवंत खार खाऊन असतात. धोतर, उपरणे, गंध, शेंडी, सगळेच त्यांना चिरडीस आणते. जोशींचा देशाच्या शिक्षणव्यवस्थेवर आणि संशोधनसंस्थांवर भगवा कार्यक्रम लादण्यातला निर्धार तर त्यांना सर्वांत जास्त खुपतो. मुमजो प्रचारक किंवा पोथीचे भाष्यकार म्हणून बोलत नाहीत, तर विचारवंत आणि त्यातही वैज्ञानिक या नात्याने बोलतात. डावे आणि उदारमतवादी विचारवंत जे संकल्पनांचे क्षेत्र आपली मिरास असल्याचे मानतात, त्यातच मुमजोंना स्वतःचे कुरुक्षेत्र दिसते.
किडनी मिळेल का हो बाजारी?
एखाद्या व्यक्तीने पैशासाठी किडनीची विक्री केली अन्य एका व्यक्तीने स्वतःसाठी किंवा मुलीसाठी किडनी खरेदी केली, किंवा अन्य एका व्यक्तीने या व्यवहारात दलाल म्हणून काम केले, किंवा एका सर्जनने विकलेली किडनी काढण्याचे व विकत घेतलेली किडनी बसवण्याचे काम केले, असे ऐकल्यावर सर्व साधारण नागरिकाला सात्विक/नैतिक संताप येतो. हा संताप नुसताच अनाठायी नाही तर अन्यायकारक ही आहे असे मला म्हणावयाचे आहे.
श्रीमंत व्यक्ती आपला जीव वाचण्यासाठी आपल्या संपत्तीचा वापर करून किडनी विकत घेत असते. हा संपत्तीचा गैर किंवा अनावश्यक, दिखाऊ वापर म्हणता येणार नाही.