सीने में जलन, आँख में तुफान सा क्यों है?
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है? आजकाल आजूबाजूला पाहिले तर आपल्या संपर्कात येणारे नातेवाईक जवळचे दूरचे, मित्रमैत्रिणी, सहकारी, कामाला येणारी बाई, दुकानदार, बँका ऑफिसेसमधील कर्मचारी, विद्यार्थी, इतकेच काय पण प्रवासात होणारी घडीभराची संगत, अशा सर्व व्यक्ती ‘सीने में जलन’ व ‘आँखों में तूफान’ घेऊन वावरताना दिसतात. आपापल्या ‘परेशानी’ त बुडून गेलेली व त्याचा आविष्कार त्यांच्या बोली व शारीर भाषेतून (body larguage) प्रकट करताना दिसतात. जीवन धकाधकीचे झाले आहे. सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते.
विषय «इतर»
मानवी जीनोम (जैनिक संचित)
२६ जून २०० हा दिवस जीवशास्त्राच्या प्रगतीतील सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्याजोगा ऐतिहासिक दिवस ठरला. त्या दिवशी वॉशिंग्टन (डी. सी.) येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सायन्स’ या जागतिक प्रतिष्ठेच्या वैज्ञानिक साप्ताहिकात ‘मानवी जीनोम’ निचित करण्याचे कार्य जवळपास ९७% पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा प्रसिद्ध झाली व सर्व जगातील प्रसार माध्यमांच्या उत्साहाला उधाण आले. वृत्तपत्रे, नियतकालिके, टेलेव्हिजन, इंटरनेट, रेडियो या सर्वांनी या वैज्ञानिक उपलब्धीचा जयजयकार केला. त्याचसोबत या वैज्ञानिक ज्ञानामुळे जणू मानवाने निसर्गच जिंकला अशा थाटात लेखक व प्रवक्ते यांच्या लेखण्या व जिव्हा झिजू लागल्या! परंतु सामान्य-जनांना नेमके काय घडले व कशाबद्दल एवढा जल्लोष चालला आहे याचे नीटसे आकलन झालेच आहे असे म्हणता येत नाही.
सुधारक कुसुम शर्मा
१९४९ चा तो काळ होता. स्वातंत्र्य मिळून जेमतेम दोन वर्षे झाली होती. आता स्वराज्याचे सुराज्यात स्पान्तर करावयाचे म्हणून पुष्कळसे देशभक्त धडपड करीत होते. कुसुमताई शर्मा त्यांच्यांतल्याच एक होत्या. विचाराने त्या साम्यवादी होत्या; आणि जाज्वल्य देशाभिमान त्यांच्या प्रत्येक कृतीत सळसळत होता. त्या दिवशी नागपूरच्या भंगीपुयाच्या सर्व घरांतील लोक बाहेर येऊन निचितपणे बसले होते. त्यांना कुसुमताईंच्या अटकेची कुणकुण लागली होती. तेवढ्यात अटक वॉरंट घेऊन आलेले पोलीस कुसुमताईंचा बारकाईने शोध घेत तेथे येऊन पोचले. त्यांनी घराघरांतून पुष्कळ तपास केला. पण व्यर्थ. खूप वेळ घालवूनही त्यांना काही त्या गवसल्या नाहीत.
धोरण देशभक्तीचे, की परधार्जिणे?
स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांतील सर्वांत गंभीर अरिष्टाला भारतीय शेतीव्यवस्थेला सामोरे जावे लागत आहे. हे अरिष्ट निसर्गाच्या अवकृपेमुळे उद्भवलेले नसून, भारत सरकारच्या शेतीविषयक धोरणातून उद्भवलेले आहे. सरकारने जागतिक व्यापारी संघटनेत एप्रिल १९९४ मध्ये शेतीविषयक जो करार केला त्या कराराच्या शर्तीमुळे भारत सरकारला हे धोरण राबवावे लागत आहे. भाजप-नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जुलैमध्ये आपले शेतीविषयक धोरण जाहीर केले आहे. ‘जागतिक व्यापारी संघटनेत शेतीविषयक कराराच्या अंमल-बजावणीसाठी हे धोरण स्वीकारावे लागत आहे,’ हे सरकारने धोरण जाहीर करतानाच सांगितले आहे. या कराराची अंमलबजावणी ज्या रीतीने केंद्र सरकार करीत आहे त्यामुळे अरिष्टांत भर पडून हे अरिष्ट अधिक गंभीर बनत आहे.
आवाहन
आजकाल सामाजिक कामे करणारे, आपल्या समाजाचे जीवन सुधारायला धडपडणारे अनेक लोक एक सूत्र मांडतात—- “विचार विश्वाचा करा, आणि क्रिया स्थानिक करा.” ह्या मागची भूमिका बहुधा अशी आहे—- विश्वभरात बदल करणे अवघड असते. तसे करायला खूपच व्यापक जनाधार लागतो, जो उभारणे कठीण असते. पण आपली सुधारणेची कल्पना मात्र जगभरच ‘हवीशी’ वाटणारी असायला हवी, म्हणून विचार विश्वाचा करा. पण तो करताना स्वस्थ बसू नका, तर आपल्या नजीकच्या परिसरातली सुचणारी कामे करायला लागा.
आजचा सुधारक मधील लेखांचेही वैश्विक आणि स्थानिक असे भाग पाडता येतील.
आदम आणि बाळाची आई
अमेरिकन निसर्गशास्त्र संग्रहालयातले डायनोसॉर्जचे प्रदर्शन पाहून आलेला आदम न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये एका बाकावर बसला आहे, संध्याकाळच्या वेळी, आपल्या जीवजातीच्या हलचाली पाहात.
“आणि ही एवढी सारी माणसं म्हणजे पृथ्वीच्या साऱ्या लोकसंख्येचा एक छोटासा भाग! सारे माझ्या नात्यातले! सारे, सारे! हौवा हवी होती बरोबर. तिला मनापासून आनंद झाला असता. नातलग भेटला की तिचा स्वतःवर ताबा नाही राहात. सगळ्यांच्या पाप्या घ्यायचा प्रयत्न करेल ती. गोरे, काळे, सगळेच्या सगळे”. एक बाबागाडी ढकलत नव्याने आई झालेली बाई बाकावर आदमजवळ येऊन बसते. बाबागाडीला संथ झोका देते.
“किती कमी बदल झालाय—-काहीच नाही, खरं तर—मला पहिलं बाळ आठवतं —- केव्हा बरं?
श्री. ह. चं. घोंगे ह्यांच्या लेखाला (ऑ. २०००) हे माझे उत्तर
स्त्रियांच्या योनिशुचितेला दिल्या गेलेल्या अवास्तव महत्त्वाची स्त्रियांनी जबरदस्त किंमत मोजली आहे. माझ्या मते स्त्रियांना योनिशुचितेच्या कल्पनेच्या बेडीतून मुक्त करण्याची अत्यंत जरुरी आहे. त्यामागचे हेतू श्री. घोंगे लिहितात त्या लेखापेक्षा पूर्ण वेगळे आहेत.
१. विवाहपूर्व, विवाहित अथवा वैधव्यात कामेच्छा पूर्ण करण्यास संधी स्त्रीला मिळावी हा माझा हेतू नाही.
२. “अनोळखी स्त्रीपुरुषांनी जवळीक साधायची कशी?” “साठी उलट-लेल्या स्त्रीपुरुषांना परस्परांबद्दल आकर्षण निर्माण झाले तर रतिक्रीडेत गुर-फटण्याचे क्षण शोधायचे कसे?’ हे प्रश्न श्री. घोंगे विचारतात. हे प्रश्नही मला अप्रस्तुत (irrelevant) वाटतात. लैंगिक मुक्तीचा हेतू मुक्त कामजीवन (माझ्या मते) आज तरी नाही.
तर्क अप्रतिष्ठित कसा?
“तर्क अप्रतिष्ठित आहे म्हणून दुसऱ्या रीतीने म्हणजे वचनप्रामाण्याने अनुमान करावे असे तुमचे (म्हणजे पूर्वपक्षाचे) म्हणणे असेल तर ते चूक आहे. कारण ह्याप्रमाणे देखील तुमची (म्हणजे पूर्वपक्षाची) ह्या अप्रतिष्ठितत्वाच्या आक्षेपा-तून सुटका होत नाही. शब्दप्रामाण्य मानल्यास शब्द अनेकांचे आहेत व त्यांचे अर्थही अनेक करता येतात. म्हणून शब्दप्रामाण्यच अप्रतिष्ठित आहे. म्हणून तर्क अप्रतिष्ठित मानू नये आणि तर्काने सिद्ध होईल तेच ब्रह्माचे ज्ञान ग्रहण करावे”. “दृश्यते त्वग्र्यया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः” (ब्रह्म सूक्ष्मबुद्धि मनुष्यांच्या श्रेष्ठ बुद्धीने पाहिले जाते) असे उपनिषदाने कंठरवाने सांगितलेही आहेत. “श्रुतेस्तु शब्दमूलत्वात्’ २।१।२७ ह्या सूत्राचा अर्थ श्रीशंकराचार्य करतात तसा नाही.
प्रिय वाचक,
ऑक्टोबर ‘९९ मध्ये आ. सु. च्या संपादकीय नेतृत्वात खांदेपालट होऊन ती जबाबदारी आमच्याकडे आली. येत्या ऑक्टोबर २००० पासून आम्ही ती सूत्रे खाली ठेवत आहोत. गेल्या एका वर्षात आम्ही काय करू शकलो, जे काही केले त्याच्या मागे कोणते विचारसूत्र होते त्याचा हा धावता आढावा.
आ.सु.तले लिखाण एकसुरी असते. तेच ते लेखक, तेच ते विषय, अनु-क्रमणिका पाहिली तरी पुरते, पुढचे न वाचता आतील मजकूर कळतो; इतकी कडक आलोचना ऐकून मन खिन्न होई. ती टीका मनावर घेऊन थोडी विविधता आणायचे ठरवले. विचारणीयतेबरोबर वाचनीयता काहीशी वाढवण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थी सहायक संस्था – एका कृतिशील विचारवंताचे कार्य
पुण्यामध्ये जवळपासच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी असते. अशा विद्यार्थ्यांना मदत करणारी ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’ नावाची एक संस्था गेली चव्वेचाळीस वर्षे पुण्यात कार्यरत आहे. ह्या समितीची स्थापना ज्या कार्यकर्त्यांच्या धडपडीमुळे झाली त्यांतील प्रमुख होते डॉ. अच्युत शंकर आपटे. ७ जानेवारी २००० रोजी डॉ. आपटे यांचे पुण्यात वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले. बी. ए. व एम्. ए. ला गणित हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम आलेल्या अच्युतरावांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, तुरुंगवास भोगला व परिस्थिती निवळल्यावर पुन्हा अभ्यासाला सुरुवात करून न्युक्लीअर फिजिक्समध्ये आचार्य ही पदवी मिळवली.