श्री. प्रकाश अकोलकर यांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. एस. एस. गिल यांच्या पुस्तकाचे भाषांतर छान केले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. “ख्रिश्चन न्यायशास्त्राच्या गाभ्यात पाप ही संकल्पना एखाद्या अग्निज्वालेप्रमाणे सदैव जळत राहिलेली असते’ हे पटण्यासारखे आहे. हिंदू किंवा मुस्लिम धर्मसंस्थापक निष्कलंक चारित्र्याची संकल्पना मांडत नाहीत हे सुद्धा खरे आहे. ख्रिस्ताच्या चारित्र्यात कपटनीती नाही. राजीव गांधींना बोफोर्स प्रकरणात गुंतविले गेले. जे. आर. डी. टाटा म्हणाले होते की “राजीव गांधी पोरकट आहेत” (टाईम्स १४/४/९१). ते श्री. गिलच्या पुस्तकाचे भाषांतर करीत असल्यामुळे त्यांना त्यात काही भर घालण्याचा प्रश्नच नव्हता तरी सर्वसाधारपणे जनमानसात “काँग्रेसवालेच भ्रष्ट आहेत’ असा समज असतो आणि वृद्ध लोक तर याबाबतीत ब्रिटिशांचे राज्य चांगले होते असे समजतात.
विषय «इतर»
मनुष्यनिर्मित दुःखे आणि मी
. . . . ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो. त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपला गेलो असतो तर? किंवा कामाठीपुऱ्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो तर? या समूहांमध्ये जन्मणाऱ्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! … .
एखाद्या भीषण खुनाची बातमी वाचल्यावर आपण किती हादरतो! पण असे या परिस्थितीच्या दडपणाखाली चिरडून होणारे माणूसपणाचे खून किती सहजपणे आपण पाहू शकतो, किंवा पाहायचे नाकारू शकतो.
प्रिय वाचक,
गेल्या महिन्यात वॉटर चित्रपट निर्मितीला विरोध करणारी निदर्शने झाली. चित्रिकरण जबरदस्तीने बंद पाडण्यात आले. व्हॅलेंटाइन डे निमित्त प्रेमिकांनी एकमेकांना छुपे संदेश देऊन प्रेम व्यक्त करण्याची पाश्चात्त्यांची पद्धत आहे. आपल्या तरुण- तरुणींनी तिचे नकळत अनुकरण सुरू केले आहे. हळूहळू छापील संदेश-पत्रे, त्यांच्या जाहिराती यांनी भव्य रूप घेतले आणि तो प्रकार डोळ्यात भरण्याइतका मोठा झाला. ज्यांना ह्या प्रघाताचा प्रसार व्हायला नको आहे त्यांनी त्याला विरोध करायला हरकत नाही. ज्या पद्धतींनी प्रसार झाला त्याच पद्धतींनी विरोध होऊ शकतो. प्रसारमाध्यमांचाही वापर केला जाऊ शकतो. पण दुकानांची तोडफोड केली गेली.
लोकशाहीची तीन पथ्ये
लोकशाहीला शाबूत ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज केले पाहिजे. सनदशीर मार्गांचा अवलंब करणे आपल्या स्वाधीन नव्हते तेव्हा असनदशीर मार्गांचा अवलंब करणे योग्य होते. म्हणजे बेबंदशाहीची उगमस्थाने होत.. असनदशीर मार्ग
दुसरी गोष्ट ही की, जॉन स्टुअर्ट मिल याने दिलेला जो भयसूचक संदेश आहे तो पाळणे. ज्यांनी आयुष्यभर मायभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालासुद्धा मर्यादा आहेत.
प्रवाही कुटुंब (१) ई. आर्मी यांच्या फ्रेंच लेखावरून
“धर्म फेकून देतां येईल, नीति नेहमीच बदलत असते आणि कायदेहि बदलतां येतात. मनुष्यजातीच्या सुखाकरता हें सर्व बदलण्यास काय हरकत आहे?” आपल्या नीतिकल्पनांना धक्के देणारी ही विचार- सरणी. (व्यक्ति) ‘स्वातंत्र्या’ चा अर्थ इतका त्याच्या तर्कपूत मर्यादे पर्यंत ताणणे आपल्याला झेपेल ?
वाचकांनी प्रतिक्रिया दयाव्या. नाव गुप्त ठेवता येईल. मात्र कायदेशीर गरज म्हणून आमच्या दफ्तरी नाव-पत्ता आवश्यक आहे.
सवानऊ वाजेपर्यंत तुमची पत्नी तुम्हाला स्वर्गीय देवता भासत होती. जणू काय तुमचें पृथ्वीवरील आयुष्य सह्य व्हावें म्हणून ईश्वराने तिला मुद्दाम स्वर्गांतून तुमच्याकडे पाठवली होती. सर्वांगसुंदर अशी ही सगुणखनि तेथपर्यंत तुम्हाला अवर्णनीय आनंद देत होती.
एक लक्षवेधी संपादकीय
मार्च २००० चा आजचा सुधारक वाचला. प्र. ब. कुळकर्णी यांच्या चिंतनातून उतरलेले संपादकीय मननीय आणि विचारप्रवर्तक आहे. आतापर्यंत आ. सु. तील विवेकवादी विचारांचा मार्ग धुक्यात हरविल्यासारखा मला अस्पष्ट होता. प्र. व. ह्यांच्या संपादकीयातून विवेकवादी विचारसरणीला जे अपेक्षित आहे ते सुस्पष्ट झाले आहे. आजच्या सुधारकाने जी वैचारिक भूमिका घेतली आहे ती कर्मठांना आणि परंपरावाद्यांना मस्तकशूळ उत्पन्न करणारी आहे. आमचा स्वतःचा कर्मठपणाला आणि परंपरावादी विचारांना मुळीच विरोध नाही. त्यांच्या विचारातील हिंसेला आमचा विरोध आहे. शंकराचार्यांना आकल्प जगविण्यासाठी घुटी पाजणाऱ्या सनातनी विचारांचा आम्हाला संताप येत नाही.
साडेचार दिवसांचा स्वर्गनिवास ( १ )
पाश्चात्त्य समाजात वृद्धाना कोणी विचारत नाही हे खरे आहे का? आमच्याकडील वृद्धांचे जे समाधान आहे ते अज्ञान आणि जाणीवेचा अभाव यामुळे की आमच्या तत्त्वज्ञानामुळे? देह जर्जर अन् व्याधिग्रस्त झाला की, गंगाजल हेच औषध आणि नारायणहरि हाच वैद्य – ही विचारधारा पुरेशी आहे?
माझी एक वृद्ध मैत्रीण अमेरिकेत असते. वय ७९; वजन २१५ पौंड; उंची ५ फूट १ इंच. दोनही पायांनी अधू झाल्याने पांगुळगाडा घेऊन चालत असे. आता तीही विजेवर चालणारी चारचाकी गाडी घेऊन कोठेही फेरफटका करीत असल्याने आनंदात असते. पण त्यामुळे वजन व अधूपण दोनही वाढून आणखी गोत्यात येते आहे व त्याची जाणीव ती सुखाने विसरते आहे.
पौगंडावस्थेतील दुर्लक्षित मुली
युनोतर्फे उद्घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यास १९९८ सालीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. जगातील सर्व व्यक्तींना समान मानवी हक्क असावेत व स्त्री-पुरुष किंवा मुलगा-मुलगी असा भेद नसावा हे त्याचे मुख्य सूत्र आहे. जग आता एकविसाव्या शतकात पदार्पण करणार आहे. अजूनसुद्धा समाजाचा निम्मा भाग- स्त्रीवर्ग कनिष्ठ व हीन समजला जाऊन त्याच्याविरुद्ध पक्षपात व अन्याय केला जातो. १९७५ ते १९८५ हे आंतरराष्ट्रीय महिला दशक साजरे झाले. भावी काळात मुलींच्याकडून भरीव कार्य व्हावे यासाठी त्यांच्या विरुद्ध होणारा पक्षपात थांबवून त्यांना सवल, सक्षम कसे बनवावे याबाबत जगातील शासनव्यवस्था व समाज यांनी निश्चित धोरण व उपाययोजना आखून अंमलात आणल्या पाहिजेत.
राज्यघटनेचा फेरआढावा कशासाठी?
भारताला भारतीय राज्यघटना हवी, अशी गेली ५० वर्षे मागणी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघाने व आताच्या भारतीय जनता पक्षाने संधी मिळताच संविधानाची समीक्षा करण्यासाठी आयोग नेमला. सत्तारूढ पक्षाला संविधानाची समीक्षा का करावीशी वाटते; कोणत्या सुधारणा/दुरुस्त्या संविधानात कराव्यात असे वाटते; संपूर्ण संविधानाचीच समीक्षा करण्याची आवश्यकता काय यावद्दल कोणतीही सैद्धान्तिक मांडणी करण्यात आलेली नाही. वारंवार निवडणुका घ्याव्या लागू नयेत म्हणून संविधानात दुरुस्ती केली पाहिजे; समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द अनावश्यक आहेत; देशाच्या ५० वर्षांच्या इतिहासातील यशापयशास संविधान किती प्रमाणात जबाबदार आहे याचा शोध घ्यायचा आहे; ५० वर्षांत ७० हून अधिक दुरुस्त्या संविधानात झाल्या आहेत म्हणून आता संपूर्ण संविधानाचा आढावा घेऊन समीक्षा केली पाहिजे अशी वेगवेगळी कारणे भाजपाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी वेळोवेळी दिली.
भारतीय शिक्षणपद्धती आणि माहिती-तंत्रज्ञान
आपले जग वेगाने बदलत आहे. विज्ञानाने आपल्याला माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आणून सोडले आहे. मोठ्या प्रमाणात संगणकांचे उत्पादन झाल्याने ते स्वस्त होणार आहेत. आणि माहिती-महाजालावरील स्थानांसाठी होणाऱ्या स्पर्धेमुळे हे सारेच तंत्रज्ञान सामान्यांनाही ‘परवडणारे’ होणार आहे. इंटरनेट, माहिती- महामार्ग (किंवा महाजाल) आमच्या संकल्पना स्पष्ट करायला मदत करणार आहेत. इंटरनेटमुळे वर्गात वसून शिकवणे येत्या पाच वर्षांत कालबाह्य होणार आहे. अशा रीतीने ज्ञान सर्वांनाच सहज उपलब्ध होणार आहे.
हा ज्ञानाचा स्फोट झेपण्यासाठी उपलब्ध ज्ञानाचा योग्य वापर करता यायला हवा. आपली शिक्षणपद्धती बहुतांशी पाठांतरावर आधारित आहे. यात विद्यार्थ्यांवर फार भार पडतो आणि त्यांची शक्ती व त्यांच्या क्षमता ह्यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.