कुटुंबनियोजन, बालसंगोपन ह्यांविषयीच्या धारणा, त्याच्याशी निगडित तंत्रविज्ञान व सामाजिक संस्था ह्यांच्यामुळे स्त्रियाही सड्या राहू शकतात. म्हणून आता सत्ता, मत्ता व प्रतिष्ठा ह्यांच्यासाठी पुरुषसत्ताक समाजव्यवस्था असण्या-स्वीकारण्याची अपरिहार्यता फारशी उरली नाही. ही तशी चांगलीच घडामोड असली तरी एक प्रकारची दिशाभूल ह्या कारणाने झाली आहे.
पुरुषसत्ताक व्यवस्था व संस्कृती एवढी दृढमूल झालेली आहे की, त्या चौकटीत समानता, स्वतंत्रता व मुक्तता साधण्यामध्ये स्त्रिया समाधान मानीत आहेत, पण ह्याची एक अलिखित शर्त अशी आहे की ज्यांना समान, स्वतंत्र व मुक्त व्हावयाचे असेल त्या स्त्रियांनी जवळपास पुरुषाचाच अवतार धारण केला पाहिजे.
विषय «इतर»
चळवळी का यशस्वी होतात? का फसतात?
[2011 सालाच्या सुरुवातीला आनंद करंदीकरांनी ‘निर्माण’ चळवळीच्या मुलामुलींपुढे एक भाषण दिले. त्या भाषणावरून खालील लेख घडवला आहे. भाषणातील तळमळ आणि जोम कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. (जरी त्यामुळे कुठेकुठे प्रमाण भाषेबाबतच्या संकेतांचे उल्लंघन होते!) – संपा. ]
भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा गावागावांत दोन-तीन महत्त्वाचे सामाजिक बदल घडले, त्यांचा माझ्या परीने मी एक धावता आढावा घेणार आहे. हा काही त्यांचा पूर्ण इतिहास नाही. पण मला जे पुढे मांडायचे आहे ते मांडण्यासाठी एक सामाजिक भूमिका निर्माण व्हावी म्हणून मी त्यांचा धावता आढावा घेणार आहे.
मानवी अस्तित्व (४)
गितामा हे विश्व फक्त आपल्यासाठीच आहे का?
या प्रश्नाचे उत्तर कदाचित गोल्डिलॉक पॅराडॉक्समधून मिळू शकेल. अणूमधील परमाणूंना घट्ट धरून ठेवणारे सशक्त आण्विक बल जरूरीपेक्षा जास्त असते तर सूर्यासारख्या तळपत्या ताऱ्यातील हायड्रोजन वायू क्षणार्धात भस्मीभूत झाले असते. आपल्या माथ्यावर तळपणाऱ्या सूर्याचा स्फोट होऊन तुकडे तुकडे होत तो तारा नष्ट झाला असता व या पृथ्वीवर एकही जीव अस्तित्वात आला नसता. तद्विरुद्ध सशक्त आण्विक बल काही टक्क्यांनी जरी कमी असते तर आपल्या या जगाला आकार देणारे जड मूलद्रव्य अस्तित्वात आले नसते व त्याप्रमाणे मनुष्य प्राणीसुद्धा……
गुरुत्व बल आहे त्यापेक्षा कमी असते तर सूर्याचा गाभा फोडू शकणारी आण्विक , प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत सूर्य किरण पोचले नसते.
साहित्यातून विवेकवाद (४) – जॉन बर्जर
निसर्ग माणसांना धार्जिणा नाही. तो (खरे तर ती व्यवस्था) कोणत्याच सजीवाला धार्जिणा नाही. तो त्याच्या नियमांप्रमाणे चालतो, आणि वेगवेगळ्या जीवजाती त्यात आपापली कोंदणे घडवून जगतात. माणसेही बहुतांश काळ अशी निसर्गाच्या सांदीकोपऱ्यांत जगत आलेली आहेत. आपल्याला जे हवे असेल ते घ्यायचे, नको ते टाळायचे, हेच केवळ करता येते; असे मानत माणसे जगत आलेली आहेत. आजची माणसे सुमारे एक
लक्ष वर्षे पृथ्वीवर जगत आहेत, आणि या आयुष्याचा जवळपास नव्वद टक्के भाग माणसे अन्नसंकलक म्हणून जगत आहेत.
कधीतरी दहाबारा हजार वर्षांपूर्वी माणसे जाणीवपूर्वक अन्न पाळू लागली.
पत्रसंवाद
गंगाधर रघुनाथ जोशी, 7, सहजीवन हौसिंग सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाईन्स्, दर्यापूर, जिल्हा अमरावती -444803.
आजचा सुधारक चा जून-जुलै 12 चा मेंदू विज्ञानावरचा जोडअंक वैचारिक मेजवानीच ठरावा. सर्व लेख वाचून झाल्यावर अतृप्तीच शिल्लक राहाते; व त्या अतृप्तीचेही समाधान वाटावे अशी त्या अंकाची मांडणी दिसते. अनेक शास्त्रज्ञांचे संदर्भ त्यात आहेत. पण ठोस निर्णयापर्यंत कोणीही येऊ शकले नाही..
प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे मातीचे मडके तयार होते. त्या मडक्यात पोकळी असते. म्हणजे काहीच नसते. काहीच नसण्याचा अस्तित्वाचा घटक त्या मडक्याच्या उपयोगितेला कारण ठरतो!
माणसाच्या कवटीच्या आत मेंदू असतो.
शोध जाणिवेचा : मानसप्रत्ययशास्त्र आणि मेंदू
मानसप्रत्ययशास्त्राची उभारणी त्याचा प्रणेता जर्मन तत्त्वज्ञ एडमंड हुसर्ल (1859 ते 1938) यांच्या तात्त्विक भूमिकेमधून आणि विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून झालेली आहे.
ज्ञानाच्या शक्यतेबद्दलच शंका बाळगणारा संशयवाद, ज्ञान स्थलकालानुरूप बदलते असे मानणारा सापेक्षतावाद यांना हुसर्लचा तीव्र विरोध होता. ज्ञान वस्तुनिष्ठ (objective), निश्चित (certain) आणि शंका घेणे शक्यच होणार नाही (indubitible) असेच असले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. आधुनिक विज्ञानच काय, पण गणित आणि भूमिती या अत्यंत प्रतिष्ठा असलेल्या ज्ञानशाखाही ज्ञानाच्या या कसोटीला उतरत नाहीत कारण या प्रत्येक ज्ञानशाखेची आपापली गृहीते असतात, आणि त्या गृहीतांना त्या-त्या ज्ञानशाखेत आह्वान दिले जात नाही.
मनाची संकल्पना आणि गिल्बर्ट राईल
गिल्बर्ट राईल (1900-76) हे एक ब्रिटिश विश्लेषणवादी तत्त्वचिंतक. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञानाच्या अध्यापनाचे कार्य केले. ‘Mind’ या जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानाशी निगडित जर्नलचे संपादक जी.ई.मूर या विश्लेषणवादी तत्त्वचिंतकानंतर त्यांनी भूषविले. तत्त्वज्ञानावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. विशेषतः 1949 साली त्यांनी लिहिलेल्या ‘Concept of Mind’ या पुस्तकामुळे त्यांचे नाव आणि विचार चर्चेत आले. साधारणपणे 1950-60 या दशकात ब्रिटिश तत्त्वज्ञानावर त्यांचा प्रभाव राहिला. विश्लेषणवादी तत्त्वज्ञान हे 20 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात रसेल आणि मूर या दोन तत्त्वचिंतकांच्या प्रभावातून चळवळीच्या स्वरूपात उदयास आले. या तत्त्वचिंतकांवर मुख्यतः वैज्ञानिक ज्ञान व पद्धती याचे स्वरूप आणि त्यामुळे वैज्ञानिक ज्ञानाला प्राप्त होणारी नि:संदिग्धता, ही अचूकता, नेमकेपणा या गुणांचा प्रभाव होता आणि तत्त्वज्ञानालाही असे स्वरूप प्राप्त कसे करता येईल या दृष्टीने हा विचारप्रवाह प्रयत्नशील होता.
आरामखुर्ची आणि प्रयोगशाळा
श्रद्धा, मूल्ये, कर्मकांडे, परंपरा यांचे मूळ व कूळ शोधणे त्यातून ज्ञानाची निर्मिती करणे ही विश्लेषणात्मक फिलॉसॉफीची पद्धती आहे. (पाश्चात्त्य तत्त्वज्ञान या अर्थाने फिलॉसॉफी हाच शब्द सोयीसाठी लेखभर वापरला आहे). फिलॉसॉफीच्या विश्लेषणाच्या पद्धती विकसित होऊ लागल्यामुळे फिलॉसॉफी मानव्यविद्यांपासून दूर जाऊ लागली. संस्कृती व इतिहास यांतून फिलॉसॉफीचा उगम झालेला आहे. या उगमाचा फिलॉसॉफीला विसर पडला की काय असे बऱ्याच जणांना वाटते. फिलॉसॉफीने विज्ञानाच्या पद्धतीला पसंती दर्शविली आहे. वस्तुनिष्ठ सत्याच्या शोधात विज्ञानाकडे जो आत्मविश्वारस आहे त्यात फिलॉसॉफी सहभागी होऊ इच्छिते. खरे पाहता विज्ञान व फिलॉसॉफी यांचे संबंध काही नवीन नाहीत.
मेंदू-विज्ञान लिहीत आहे उद्याचे नीतिशतक
मेंदूनीतिशास्त्र (Neuroethics) ही अगदी अलिकडे, म्हणजे एकविसाव्या शतकात उदयाला आलेली नवीन ज्ञानशाखा. ही इतकी नवीन आहे की ‘मेंदूनीतिशास्त्र’ या शब्दाची सर्वमान्य अशी औपचारिक व्याख्यासुद्धा अजून तयार झालेली नाही. नीतीनियमांशी निगडित असलेले मेंदू-विज्ञानातले प्रश्न, मेंदूवरील संशोधनातून उद्भवणाऱ्या समस्यांची कायदेशीर अंगे आणि त्यांचा समाजावर होऊ शकणारा परिणाम या सर्वांचा विचार मेंदूनीतिशास्त्रात केला जातो. मेंदूच्या रोगांवर उपचार करताना आणि मेंदूसंबंधात संशोधन करत असताना काय पथ्ये पाळायची, कुठल्या थराला जायचे, भलेबुरे कसे ठरवायचे, काय उचित आणि काय अनुचित याचा निवाडा कसा करायचा, या सगळ्याचा उहापोह या शास्त्रशाखेत केला जातो.
मेंदू-विज्ञानाचा तत्त्वज्ञानावर परिणाम
[पॅट्रिशिया स्मिथ चर्चलंड कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो, ला होया येथील तत्त्वज्ञान विभागात कार्यरत आहे. तिच्या The Impact of Neuroscience on Philosophy या न्यूरॉन (Neuron 60, Nov 6, 2008) या नियतकालिकातील लेखाचे हे सुलभीकृत रूपांतर.]
व्होल-उंदरांची सामाजिकता….
व्होल (vole) नावाचे काही उंदरांसारखे जीव असतात. त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये नरमादींमधल्या युगुल-बंधनाचे (pair-bonding) वेगवेगळे प्रकार दिसतात. सपाट प्रदेशातल्या कुरणांवरच्या व्होल्समध्ये एक नर-एक मादी अश्या जोड्या जुळतात, आणि त्या आयुष्यभर टिकतात. पिल्ले वाढवण्यात आई आणि बाप अशा दोघांचाही सहभाग असतो. एकूणच सपाटीवरचे व्होल्स सामाजिक जाणीव ठेवून वागतात.