मी ह्या विषयातला तज्ज्ञ नाही; फक्त माझ्या मनात विचार, त्यावर चर्चा सुरू व्हावी ह्यासाठी, पुढे मांडत आहे.
महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील कोरडवाहू शेतकरी आज मरणासन्न स्थितीत आहे. त्याच्या करुण अवस्थेची वर्णने सर्वत्र वाचायला मिळतात. त्यातल्या त्यात कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या हालांना तर सीमाच नाही, त्यांचे हाल कुत्रादेखील खात नाही.
त्यांच्या परिस्थितीचे सविस्तर वर्णन करण्याची गरज नाही.
पन्नास वर्षांपूर्वी त्यांची स्थिती इतकी वाईट नव्हती. ते कर्जबाजारी होते; पण त्यांच्यावर आत्महत्या करण्याचा प्रसंग क्वचित् येत होता. मग आताच स्थितीत असा कोणता फरक पडला की ज्यामुळे त्यांची स्थिती मरणासन्न झाली?
विषय «इतर»
विज्ञान, तंत्रज्ञान व गांधीजी
“यंत्रसामुग्री हे आधुनिक समाजाचे मुख्य प्रतीक आहे. ते खूप मोठे पाप आहे.”
“नई तालीम ह्या माझ्या योजनेमध्ये अधिक चांगली ग्रंथालये, प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था असतील. रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि इतर तज्ज्ञ ह्यांची फौज असेल. हे लोक राष्ट्राचे खरे सेवक असतील आणि आपले हक्क व गरजा ह्यांच्याबाबत सजग झालेल्या जनतेच्या विविध आणि वाढत्या गरजांना ते पुरे पडतील. हे तज्ज्ञ जेव्हा परकीय भाषा न बोलता लोकांची भाषा बोलतील, त्यांनी संपादन केलेले ज्ञान ही जनतेची सामाईक मालमत्ता मानली जाईल, तेव्हाच निव्वळ नक्कल न होता खरे मूलभूत स्वरूपाचे काम होईल आणि त्याचे मूल्य समान व न्यायी पद्धतीने सर्वांमध्ये विभागले जाईल.”
सुखाकडे जाणारी वाट
गेल्या दोन हजार वर्षांपासून प्रामाणिक नीतिवाद्यांमध्ये सुखाला, आनंदाला तुच्छ लेखण्याची, दूर ठेवण्याची (त्यापासून दूर पळण्याची म्हणाना!) चाल आहे. ‘सहनं परमो धर्मः’ मानणाऱ्या तितिक्षावादी (स्टोईक) लोकांनी सुखाचा उपदेश करणाऱ्या एपिक्युरसवर ‘हल्लाबोल’ केला. त्याच्या उपदेशाला ‘फालतू तत्त्वज्ञान’ म्हणून हिणवले आणि त्याच्याबद्दल नाही नाही त्या वंदता पसरवून आपला ‘वरचढपणा’ सिद्ध केला. ही तर प्राचीन गोष्ट म्हणून सोडून देऊ. त्याच्या २००० वर्षांनंतर काय झाले? जर्मन प्राध्यापकांनी असे काही सिद्धान्त शोधून काढले, की ज्यामुळे जर्मनीचे तर अधःपतन झालेच, परंतु संपूर्ण जगावरच ही आजची अवकळा आली. ह्या सर्व लोकांना सुखाचा तिटकारा होता.
‘दोन टिपणे
दुष्काळाशी दोन हात
दुष्काळाची चर्चा सुरू झाली की विरोधी पक्षांचे नेते म्हणतात, सरकारने रोजगार हमीची कामे काढावीत, गुरांच्या छावण्या उघडाव्यात, पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत. फार फार तर कर्जाची वसुली थांबवावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. सरकार म्हणते, दुष्काळ निवारणासाठी आम्ही इतकी रक्कम मंजूर केली, अमुक इतकी कामे सुरू केली, एवढ्या छावण्यांना एवढी मदत केली, इतके टँकर सुरू केले, फी माफ, कर्ज वसुली स्थगित.. झाले. बघता बघता दिवस निघून जातात. पुन्हा दुष्काळाची परिस्थिती येते. विरोधी पक्षवाले पुन्हा मोर्चे काढतात. सत्ताधारी बैठका घेतात.
पत्रसंवाद
प्रमोद सहस्रबुद्धे, बी 4/1101 विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल कम्पाउंड, ठाणे (पश्चिम) 400 607
मेंदू-विज्ञान विशेषांक : एक प्रतिक्रिया
मेंदू-विज्ञान विशेषांक (खरे तर मेंदू-विज्ञान-तत्त्वज्ञान विशेषांक म्हणायला हवे.) हा अंक वाचताना एक उत्सुकता होती. मेंदूविज्ञानातील प्रगती अजूनही तत्त्वज्ञानातील प्रश्न सोडवण्या इतपत झालेली नाही असे माझे एक मत होते. त्यामुळे हे दोन विषय संलग्न नाहीत असे मला वाटत असे. हा अंक वाचताना माझ्या मताविषयी काही मजकूर येऊन माझे मतपरिवर्तन होईल अशी एक शक्यता वाटत होती आणि म्हणून त्याबद्दल उत्सुकता होती.
अंक वाचताना आणि तयार होताना असे जाणवले की संपादकांनी बरीच मेहनत घेऊन अंक तयार केला आहे.
माणूस, ईश्वर, अक्षर
मानवी मनाला स्मृतिशक्तीची देणगी लाभलेली असल्यामुळे, आपल्या जन्माच्या आधी हे जग चालत आलेले असणार असा विश्वास ठेवणे आपल्याला भाग पडते; आणि जर जगाला सुरुवात असेलच तर ती सुरुवात करणारी शक्ती आहे असे गृहीत धरण्याच्या भूमिकेची सुरुवात होते…ह्यामुळे, जम्म जो वास्तविक केवळ अत्यंत शारीरिक असा अनुभव आहे त्याला पारलौकिक स्वरूप प्राप्त होत जाते. मुलगा आणि वडील, मुलगी आणि आई ह्यांच्यात असलेल्या द्वंद्वात्मक संबंधांमुळे प्रत्येक व्यक्तीला तिचा जन्मदाता अथवा जन्मदात्री ह्यांच्यात विलीन होऊन नाहीसे होण्याची एक अनिवार्य, सुप्त इच्छा असते. ह्या प्रेरणेचे स्वरूप कित्येकदा त्यांची नक्कल करणे असेही दिसू शकते पण ही प्रेरणा बऱ्याच वेळा रचनात्मक स्वरूपातही पुढे येते आणि प्रत्यक्ष जन्मदात्याऐवजी, जो कधीच मृत्यू पावणार नाही अशा एका जन्मदात्याची कल्पना केली जाते.
चिं.मो.पंडित
एंजिनीयरिंग कॉलेजात आम्हाला एक अभ्यासक्रम असायचा तंत्रज्ञानाचा इतिहास’ नावाचा. केमिकल एंजिनीयरिंगच्या क्षेत्रात ऋषितुल्य मानले जाणारे प्रा. एन.आर.कामत आम्हाला 1962-63 साली हा विषय शिकवायचे. एंजिनीयरिंग-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या पातळ्या पिंजत वेगवेगळ्या पातळ्यांवर अपेक्षित कौशल्ये सांगणे प्रा.कामतांना आवडायचे.
आज पन्नासेक वर्षांनंतर जसा आठवतो तसा कामतसरांचा क्रम नोंदतो —
(1) एखादे काम कसे करायचे ते जाणणारे, ते कारागीर; गवंडी. मशिनिस्ट, सुतार, लोहार, इत्यादी. असे म्हणूया, की आज ज्यांना (ITI) संस्थांमध्ये प्रशिक्षण मिळते, ते लोक म्हणजे कारागीर. (2) एखादी योजना समजणारे, त्या योजनेनुसार घेगवेगळ्या कारागिरांचे एकत्रित काम करवून घेऊ शकणारे, ते तांत्रिक पर्यवेक्षक किंवा फोरमेन.
हिंदू : भारताचा ऐतिहासिक भौतिकवाद रेखाटणारी कादंबरी
हरितक्रांतीनंतर भांडवलाचा शिरकाव शेतीमध्ये झाला आणि शेती हळूहळू बाजारपेठेशी जोडली गेली. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांची मुले शिकायला लागली. ती खेड्यांकडून शहराकडे आली आणि शहरांमध्ये आल्यानंतर शहरात ती ‘अनफिट’ ठरली. ही ‘अनफिट’ ठरलेली सगळी मंडळी नेमाडे यांच्या आधीच्या ‘कोसला’ व ‘चांगदेव चतुष्टय’ कादंबऱ्यांचे नायक आहेत.
ही ‘अनफिट’ मंडळी समाजवाद्यांकडे, कम्युनिस्टांकडे गेली मात्र कुठेही ती फिट झाली नाहीत. मग ती अगतिकपणे (त्यांची इच्छा नसताना) खेड्यांमध्ये परत गेली. पण शेतकरी म्हणून नव्हे तर एक अॅलियन क्लास म्हणून – एक नवीन वर्ग म्हणून.
शरद पवारांपासून सदानंद मोऱ्यांपर्यंत आणि अगदी माझ्यापर्यंत म्हणता येईल.
आदिवासी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य
[जनजीवन आणि संस्कृती हे आ.सु. चे जिव्हाळ्याचे विषय आहेत. आपल्या अनेक समस्या आणि त्यांची उकल ह्यांची पाळेमुळे त्यातच रुजलेली असतात. आज जगभरातल्या विविध भौगोलिक प्रदेशांतल्या संस्कृतीचे झपाट्याने एकजिनसीकरण व सपाटीकरण होत आहे. निसर्गापासून दूर दूर जाणे हेही त्याचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. त्यामधून आणखी वेगळ्या समस्या उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत बिगर-शहरी संस्कृतीची वाटचाल कशी चालली आहे हे पाहणे उद्बोधक ठरेल. ह्याच उद्देशाने अनिल पाटील सुर्डीकर ह्यांची ग्रामीण जीवनावरची लेखमाला आ.सु. ने दिली होती. आदिवासींच्या जीवनावरील सुनंदा पाटील ह्यांचा हा लेखही असाच.
सर्वांसाठी सहजीवन
काही महिन्यांपूर्वी नागपूरला ज्येष्ठ नागरिकांचा लिव्ह इन रिलेशनशिप ह्या विषयावर एक कार्यक्रम झाला. नागपूरच्या मानाने हा विषय तसा स्फोटकच होता. तरुणांची लिव्ह इन रिलेशनशिपदेखील ह्या शहराने अजून मान्य केलेली नाही, तर मग ज्येष्ठ नागरिकांची कथा ती काय? ताळतंत्र सोडून वागण्याचे स्वातंत्र्य एकवेळ तरुणांना असते असे मानता येईल, पण ज्येष्ठ नागरिक? तेच जर असे काही वागू लागले तर तरुणांना कोण अडवणार? सगळ्यांनाच जर ह्याची मुभा मिळाली तर विवाहसंस्थेची प्रस्तुतताच राहणार नाही. समाज स्वास्थ्य धोक्यात येईल. एकूण काय, तर हा सारा अमेरिकेच्या अंधानुकरणाचा भाग आहे.