ग्रामोद्योग व चंगळवाद
अंदाजे गेल्या 200 वर्षांपासून उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाच्या पद्धतीत विलक्षण फरक पडला आहे. आणि तो फरक यूरोपातून इकडे आला आहे. आपल्या भारतीय पद्धतीत, गरज पडल्यानंतर ती निर्मिती करायची अशी पद्धत होती आणि अजून आहे. शेतीला लागणारी अवजारे, गावातले सुतार व लोहार लोकांच्या मागणीवरून तयार करीत. घरे बांधण्याचे कामसुद्धा गरजेपुरती होत असे. वस्तू आधी तयार करायची व नंतर तिच्यासाठी ग्राहक शोधायचा हे आपल्याकडे कपड्याच्या बाबतीतसुद्धा कधी घडलेले नाही, कापडाच्या गिरण्या भारतात सुरू होऊन 50-60 वर्षे झाल्यानंतरही भारतात माणशी सरासरी 20 वार इतका कपडा तयार होत होता.
विषय «इतर»
थोडीसी जमी, थोडा आसमाँ, तिनकों का बस इक आशियाँ
कोलंबसाने अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर युरोपमधून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊन तेथे स्थलांतरित झाल्या. त्यांनी तेथील आदिवासी रक्तवर्णीय लोकांकडून जमीन घेतली व आपल्या वसाहती उभारल्या. अशा रीतीने संयुक्त संस्थानांची स्थापना झाली. संपूर्ण भूप्रदेशाचा कायापालट झाला. आधुनिक युगातील अतिविकसित भांडवलवादी साम्राज्य आज तेथे उभे आहे. ह्या सगळ्या स्थित्यंतरामधून जाताना तिथल्या मूळच्या जमीन, हवा पाण्याला काय वाटले असेल? तिथल्या किडामुंग्यांना, पशुपक्ष्यांना आणि माणसांना काय क्लेश झाले असतील? या कामात
ह्या संबंधात वाचनात आलेल्या एका इंग्रजी स्फुटलेखाचा अनुवाद करून पुढे देत आहोत. लेखकाचे नाव मिळाले नाही, पण त्याने काही फरक पडू नये.
मोरपीस (पुस्तक-परिचय) न्यायान्यायाच्या पलीकडले…..
एक पत्रकार म्हणून मध्यवर्ती कारागृहात जाण्याची वेळ माझ्यावर अनेकदा आली आहे. तुरुंगाभोवतीच्या अजस्र भिंती, लोखंडी दरवाजा, भोवतालची बाग, तिथे वावरणारे जुने कैदी, पोट सुटलेले पोलिस, आतबाहेर करणाऱ्या, लाँड्रीच्या किंवा भाजीपाल्याच्या गाड्या, दर तासाला होणारा घड्याळाचा टोल वगैरे वातावरण माझ्या परिचयाचे आहे. बाहेरच्या जगासाठी गूढ असलेल्या आतल्या जगाबद्दलची उत्सुकताही मी पाहिली व अनुभवली आहे. मात्र मला विशेष कुतूहल आहे, ते तेथे भेटायला येणाऱ्या कैद्यांच्या कुटुंबीयांविषयी. त्यांच्यामध्ये बहुतांश बायकाच असतात. बायको, बहीण, आई वगैरे. आपल्या माणसाला फक्त वीस मिनिटे भेटण्यासाठी कुठून कुठून दूरवरच्या खेड्यापाड्यांतून आलेले ते लोक.
हम
हल की तरह
कुदाल की तरह
या खुरपी की तरह
पकड भी लूँ कलम को
तो भी फसल काटने को
मिलेगी नहीं हमको।
हम तो जमीन ही तैयार कर पायेंगे
क्रान्तिबीज बोने कुछ बिरले ही आयेंगे।
हरा-भरा वही करेंगे मेरे श्रम को
सिलसिला मिलेगा आगे मेरे क्रम को।
कल जब फसल उगेगी लहलहायेगी
मेरे न रहने पर भी हवा से इठलायेगी
तब मेरी आत्मा सुनहरी धूप बन बरसेगी
जिन्होंने बीज बोया था उन्हीं के चरन परसेगी।
काटेंगे उसे जो, फिर वही उसे बोयेंगे
हम तो धरती के नीचे दबे सोयेंगे
(क्रांती, प्रगती, उन्नती, प्रबोधन ह्या सर्वांमधील कवीची भूमिका काय असते वा असावी ते फार स्पष्ट शब्दांत सांगणारी सर्वेश्वरदयाल सक्सेना ह्यांची ही कविता त्यांच्या प्रतिनिधि कविताएँ ह्या संग्रहालून घेतली आहे.)
एक डॉक्टर असलेला इंजिनीअर!
डॉक्टर चिंतामणी मोरेश्वर पंडित किंवा सी.एम. पंडित यांच्याशी झालेली माझी पहिली ओळख लोकविज्ञान संघटनेच्या माध्यमातून, लोकविज्ञानच्या सुरुवातीच्या काळात सर्व बैठका श्री.म.ना.गोगटे यांच्या ‘ताडदेव एअर-कंडीशन्ड मार्केट’मधील कार्यालयात व्हायच्या. मी अधून मधून त्यात सहभागी व्हायचो. पंडितांचे कार्यालयही तिथेच होते. गोगटे आणि पंडित दोघेही स्थापत्यतज्ज्ञ आणि दोघेही मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक सदस्य त्यामुळे लोकविज्ञानच्या काही बैठकांत दोघांचाही सहभाग असायचा. मला वाटते 1976-77 चा सुमार होता तो. मी वास्तुरचनेचा व्यवसाय नुकताच सुरू केला होता. त्यामुळे या दोघांच्याही कार्यालयात थोडाफार वेळ घालवायला मला आवडायचे. पंडितांच्या कार्यालयाबाहेरील ‘डॉ.सी.एम.पंडित,
चंपारणचा नीळविरोधी सत्याग्रह: स्वातंत्र्यलढ्याचा अहिंसात्मक शुभारंभ
चंपारणचा नीळविरोधी सत्याग्रह इ.स.1917 चा आहे. दक्षिण आफ्रिकेतन गांधीजी 1915 साली भारतात परतले. त्यावेळी ते महात्मा झाले नव्हते. दक्षिण आफ्रिकेतील बावीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी बौद्धिक आदांना व्यावहारिक रूप दिले होते. रस्किनची Unto this Last पुस्तिका वाचून स्वतःची जीवनशैली बदलली होती. फिनिक येथे आश्रम स्थापून त्यांनी शेतकऱ्याची जीवनशैली अंगीकारली होती. द. आफ्रिकेतील लढ्यांमुळे कच्चे लोखंड पोलादात बदलले होते. व्यक्तिगत जीवन व मानवसंबंध यांबाबतचे व्यापक जीवनदर्शन त्यांच्यात विकसित झाले होते. तसेच समाजाची अर्थव्यवस्था व सरकारचे कर्तव्य यांबाबतही त्यांचे विचार स्पष्ट झाले होते.
गांधीजी भारतात परतले तेव्हा गुरुवर्य गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवात भाग न घेता केवळ भारत पाहण्याचे ठरविले होते.
भगवद्गीतेचे भारतात पुनरुज्जीवन
भगवद्गीता शाळेमध्ये मुलांना शिकवली जावी ह्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राज्य असलेल्या कर्नाटक व मध्य प्रदेश ह्या राज्यांनी तशी विधेयके आणून ती सम्मत करून घेतली आहेत. कर्नाटकचे मंत्री कागेरी ह्यांनी तर अल्पसंख्यक धर्मांना – बुद्ध, ख्रिश्चन, मुसलमान यांना अशी समज दिली की गीता शाळेत शिकवणे मान्य करा अथवा भारतातून निघून जा(1) मध्यप्रदेशातील कथोलिक बिशप कौंसिल यांनी नुसतीच गीता न शिकवता साऱ्या धर्मांचा सारांश शिकवावा असा अर्ज केला. पण त्यावर म. प्र. उच्च न्यायालयाने, गीता हा काही धार्मिक ग्रंथ नाही, त्यामुळे गीता शिकवण्यास आपत्ती नसावी असा निकाल दिला.
पुस्तकपरिचय गेम्स इंडियन्स प्ले (व्हाय वी आर द वे वी आर) – लेखक – वी. रघुनाथन
एखाद्या पुस्तकाचे नावच आपल्याला इतके वेधक वाटते की वाचावेसेच वाटते, आणि एकदा वाचू लागलो की सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखे ते आपल्याला सोडत नाही. गेम्स इंडियन्स प्ले हे पुस्तक या प्रकारचे आहे.
आपण भारतीय माणसे असे का वागतो? असे म्हणजे कसे, तर भर रस्त्यावर कुणाला मारले जाते, कुणावर बलात्कार केला जातो, पण एकही माणूस अडवायला तर जात नाहीच, पण नंतर साक्षही द्यायला तयार नसतो. आपण एखाद्या रांगेत उभे असतो; अचानकपणे कुणी स्थानिक पुढारी त्याच्या चार-पाच कार्यकत्यांसह तिथे येतो. रांगेची शिस्त, न्याय वगैरे गोष्टी त्याच्या खिजगणतीतही नसतात.
पैशाने श्रीमंती येत नाही (पुढे चालू)
वैयक्तिक श्रीमंती आणि सार्वजनिक श्रीमंती यांतील फरक आतार्पत समजला असेलच. सार्वजनिक श्रीमंती कशी निर्माण करायची व वाढवत न्यायची, हे आम्हा भारतीयांना अजूनपर्यंत कळलेले नाही. त्यामुळे आमच्या देशात इतक्या समस्या (सामाजिक, आर्थिक) निर्माण झाल्या आहेत. सध्या भ्रष्टाचाराच्या अनेक घटना एकामागे एक उघडकीस येत आहेत आणि त्यांच्या खमंग चर्चा करण्यातच देशवासीयांच्या बहुमोल वेळाचा अपव्यय होत आहे.
आपल्या देशातल्या भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा ह्याचा भावी उपाय अजून सापडलेला नाही. मी एक सुचवून पाहतो. त्यासाठी आपण पुन्हा वैयक्तिक व सार्वजनिक संपत्तीकडे वळू.
एखादा माणूस भ्रष्टाचार करतो, तेव्हा त्या भ्रष्टाचाराचे स्वरूप काय असते?
कुंटणकबिला
कुटुंबाची आपली कल्पनाच पतिपत्नी आणि त्याच्या आगमागच्या नातेसंबंधांशी जोडली गेलेली आहे. या नातेसंबंधांत आईवडील, सासूसासरे, भाऊबहीण, नणंदामेव्हण्या, दीरमेव्हणे, भाचेपुतण्ये, जावा, मामामावश्या, काकाआत्या, चुलत-मामे-आते-मावस भावंडे आणि अर्थातच संबंधित पतिपत्नींची मुलेबाळे, नातवंडे, सुनाजावई असा सारा गोतावळा येतो. किंवा यावा अशी अपेक्षा असते. या गोतावळ्यातले कुणी अविवाहित किंवा लग्न मोडलेले असू शकते. कुणाचा जोडीदार किंवा जोडीदारीण मयत झालेले असू शकतात. पण असे डावे माणूसही त्या कुटुंबाचाच एक हिस्सा असते. त्याला किंवा तिला स्वतःचे नाव, बापाचे किंवा नवऱ्याचे नाव आणि आडनाव असतेच असते.
बहुतांश कुटुंबातली माणसे बोलताना ‘आमच्या घरात, आमच्या घराण्यात, आमच्यात’ असे शब्दप्रयोग वारंवार आणि सहज करत असतात.