विषय «इतर»

पत्रसंवाद

संजीव चांदोरकर, 206, मेहता पार्क, भागोजी कीर मार्ग, लेडी जमशेटजी रोड, माहीम (पश्चिम), मुंबई 400016. —
गेल्या काही अंकांपासून मासिकाच्या वर्गणीवरून जो काही पत्रव्यवहार अंकात छापला जात आहे त्यातून भावना बाजूला काढल्या तर समाज सुधारणेला वाहून घेतलेले आसूसारखे व्यासपीठ (जे 22 वर्षे सातत्याने चालवणे हीच मोठी गोष्ट आहे) आजच्या जमान्यात कसे सुरू ठेवायचे या बद्दल अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. दुसऱ्या शब्दांत यामध्ये गुंतलेले मुद्दे या वादात गुंतलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या पलीकडचे आहेत.
सर्वसाधारणतः पुरोगामी, परिवर्तनवादी लोकांमध्ये अशा उपक्रमांच्या ज्या मॅनेजमेंटच्या बाजू आहेत (दैनंदिन व्यवस्थपान, कॉस्टिंग, दीर्घ पल्ल्याची वित्तीय स्वयंपूर्णता इत्यादी) याकडे बघण्याचा आपोआपवादी दृष्टिकोण प्रचलित आहे.

पुढे वाचा

मर्यादित स्त्रीमुक्ती

कुटुंबनियोजन, बालसंगोपन ह्यांविषयीच्या धारणा, त्याच्याशी निगडित तंत्रविज्ञान व सामाजिक संस्था ह्यांच्यामुळे स्त्रियाही सड्या राहू शकतात. म्हणून आता सत्ता, मत्ता व प्रतिष्ठा ह्यांच्यासाठी पुरुषसत्ताक समाजव्यवस्था असण्या-स्वीकारण्याची अपरिहार्यता फारशी उरली नाही. ही तशी चांगलीच घडामोड असली तरी एक प्रकारची दिशाभूल ह्या कारणाने झाली आहे.
पुरुषसत्ताक व्यवस्था व संस्कृती एवढी दृढमूल झालेली आहे की, त्या चौकटीत समानता, स्वतंत्रता व मुक्तता साधण्यामध्ये स्त्रिया समाधान मानीत आहेत, पण ह्याची एक अलिखित शर्त अशी आहे की ज्यांना समान, स्वतंत्र व मुक्त व्हावयाचे असेल त्या स्त्रियांनी जवळपास पुरुषाचाच अवतार धारण केला पाहिजे.

पुढे वाचा

चळवळी का यशस्वी होतात? का फसतात?

[2011 सालाच्या सुरुवातीला आनंद करंदीकरांनी ‘निर्माण’ चळवळीच्या मुलामुलींपुढे एक भाषण दिले. त्या भाषणावरून खालील लेख घडवला आहे. भाषणातील तळमळ आणि जोम कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. (जरी त्यामुळे कुठेकुठे प्रमाण भाषेबाबतच्या संकेतांचे उल्लंघन होते!) – संपा. ]
भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा गावागावांत दोन-तीन महत्त्वाचे सामाजिक बदल घडले, त्यांचा माझ्या परीने मी एक धावता आढावा घेणार आहे. हा काही त्यांचा पूर्ण इतिहास नाही. पण मला जे पुढे मांडायचे आहे ते मांडण्यासाठी एक सामाजिक भूमिका निर्माण व्हावी म्हणून मी त्यांचा धावता आढावा घेणार आहे.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (४)

गितामा हे विश्व फक्त आपल्यासाठीच आहे का?

या प्रश्नाचे उत्तर कदाचित गोल्डिलॉक पॅराडॉक्समधून मिळू शकेल. अणूमधील परमाणूंना घट्ट धरून ठेवणारे सशक्त आण्विक बल जरूरीपेक्षा जास्त असते तर सूर्यासारख्या तळपत्या ताऱ्यातील हायड्रोजन वायू क्षणार्धात भस्मीभूत झाले असते. आपल्या माथ्यावर तळपणाऱ्या सूर्याचा स्फोट होऊन तुकडे तुकडे होत तो तारा नष्ट झाला असता व या पृथ्वीवर एकही जीव अस्तित्वात आला नसता. तद्विरुद्ध सशक्त आण्विक बल काही टक्क्यांनी जरी कमी असते तर आपल्या या जगाला आकार देणारे जड मूलद्रव्य अस्तित्वात आले नसते व त्याप्रमाणे मनुष्य प्राणीसुद्धा……
गुरुत्व बल आहे त्यापेक्षा कमी असते तर सूर्याचा गाभा फोडू शकणारी आण्विक , प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत सूर्य किरण पोचले नसते.

पुढे वाचा

साहित्यातून विवेकवाद (४) – जॉन बर्जर

निसर्ग माणसांना धार्जिणा नाही. तो (खरे तर ती व्यवस्था) कोणत्याच सजीवाला धार्जिणा नाही. तो त्याच्या नियमांप्रमाणे चालतो, आणि वेगवेगळ्या जीवजाती त्यात आपापली कोंदणे घडवून जगतात. माणसेही बहुतांश काळ अशी निसर्गाच्या सांदीकोपऱ्यांत जगत आलेली आहेत. आपल्याला जे हवे असेल ते घ्यायचे, नको ते टाळायचे, हेच केवळ करता येते; असे मानत माणसे जगत आलेली आहेत. आजची माणसे सुमारे एक
लक्ष वर्षे पृथ्वीवर जगत आहेत, आणि या आयुष्याचा जवळपास नव्वद टक्के भाग माणसे अन्नसंकलक म्हणून जगत आहेत.
कधीतरी दहाबारा हजार वर्षांपूर्वी माणसे जाणीवपूर्वक अन्न पाळू लागली.

पुढे वाचा

पत्रसंवाद

गंगाधर रघुनाथ जोशी, 7, सहजीवन हौसिंग सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाईन्स्, दर्यापूर, जिल्हा अमरावती -444803.
आजचा सुधारक चा जून-जुलै 12 चा मेंदू विज्ञानावरचा जोडअंक वैचारिक मेजवानीच ठरावा. सर्व लेख वाचून झाल्यावर अतृप्तीच शिल्लक राहाते; व त्या अतृप्तीचेही समाधान वाटावे अशी त्या अंकाची मांडणी दिसते. अनेक शास्त्रज्ञांचे संदर्भ त्यात आहेत. पण ठोस निर्णयापर्यंत कोणीही येऊ शकले नाही..
प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे मातीचे मडके तयार होते. त्या मडक्यात पोकळी असते. म्हणजे काहीच नसते. काहीच नसण्याचा अस्तित्वाचा घटक त्या मडक्याच्या उपयोगितेला कारण ठरतो!
माणसाच्या कवटीच्या आत मेंदू असतो.

पुढे वाचा

मेंदू-विज्ञान लिहीत आहे उद्याचे नीतिशतक

मेंदूनीतिशास्त्र (Neuroethics) ही अगदी अलिकडे, म्हणजे एकविसाव्या शतकात उदयाला आलेली नवीन ज्ञानशाखा. ही इतकी नवीन आहे की ‘मेंदूनीतिशास्त्र’ या शब्दाची सर्वमान्य अशी औपचारिक व्याख्यासुद्धा अजून तयार झालेली नाही. नीतीनियमांशी निगडित असलेले मेंदू-विज्ञानातले प्रश्न, मेंदूवरील संशोधनातून उद्भवणाऱ्या समस्यांची कायदेशीर अंगे आणि त्यांचा समाजावर होऊ शकणारा परिणाम या सर्वांचा विचार मेंदूनीतिशास्त्रात केला जातो. मेंदूच्या रोगांवर उपचार करताना आणि मेंदूसंबंधात संशोधन करत असताना काय पथ्ये पाळायची, कुठल्या थराला जायचे, भलेबुरे कसे ठरवायचे, काय उचित आणि काय अनुचित याचा निवाडा कसा करायचा, या सगळ्याचा उहापोह या शास्त्रशाखेत केला जातो.

पुढे वाचा

मेंदू-विज्ञानाचा तत्त्वज्ञानावर परिणाम

[पॅट्रिशिया स्मिथ चर्चलंड कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो, ला होया येथील तत्त्वज्ञान विभागात कार्यरत आहे. तिच्या The Impact of Neuroscience on Philosophy या न्यूरॉन (Neuron 60, Nov 6, 2008) या नियतकालिकातील लेखाचे हे सुलभीकृत रूपांतर.]
व्होल-उंदरांची सामाजिकता….
व्होल (vole) नावाचे काही उंदरांसारखे जीव असतात. त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये नरमादींमधल्या युगुल-बंधनाचे (pair-bonding) वेगवेगळे प्रकार दिसतात. सपाट प्रदेशातल्या कुरणांवरच्या व्होल्समध्ये एक नर-एक मादी अश्या जोड्या जुळतात, आणि त्या आयुष्यभर टिकतात. पिल्ले वाढवण्यात आई आणि बाप अशा दोघांचाही सहभाग असतो. एकूणच सपाटीवरचे व्होल्स सामाजिक जाणीव ठेवून वागतात.

पुढे वाचा

हे सर्व येते कोठून ? (विज्डम : स्टीफन हॉल यांच्या पुस्तकाचा परिचय)

अलौकिक कलागुण अंगी असणाऱ्यांच्या बाबतीत आपल्याला नेहमी प्रश्न पडतो – ही मंडळी हे कोठून घेऊन येते? अलौकिक बौद्धिक प्रतिभा असलेल्या लोकांच्या बाबतीतही हा प्रश्न आपल्याला पडतो, खरेच हे सर्व कोठून येते?
थोर तत्त्वज्ञ वैचारिक पातळीवरून विश्वाच्या अवघ्या पसाऱ्याचा अन्वय शोधू पाहतात, विश्वात मानवाची भूमिका काय, त्याच्या जीवनाचे प्रयोजन काय आहे, हे तपासून पाहतात. व्यवहारात कसे वागावे हे आपल्याला सांगू, शिकवू पाहतात. पण शहाण्या विचारांचा उगम कुन होतो याचा वेध घेताना आढळत नाहीत. त्याचा शोध घेणे हे विज्ञानाचे काम आहे, तो तत्त्वज्ञानाचा प्रांत नाही असे त्यांना वाटत असावे.

पुढे वाचा

मी नाही केले, माझ्या मेंदूने करायला लावले ! (माय ब्रेन मेड मि डू इट : एलाजर स्टर्नबर्गच्या पुस्तकाचा परिचय)

मानवी इतिहास म्हणजे माणूस व निसर्गातील चढाओढीची कथाच. माणसाने निसर्ग आजमावण्याचा आणि त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. निसर्गाच्या चमत्कारांनी तो स्तिमित झाला आणि प्रश्न विचारू लागला. यांतल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळविताना आपण कितीतरी पुढे आलो आहोत, पण तरीही या प्रश्नांची लांबीरुंदी मात्र फारशी कमी झालेली नाही. काही बाबतीत तर आपण अश्या पायरीवर आलो आहोत, जिथे या प्रश्नांच्या उत्तरांनी आपला गोंधळ अधिकच वाढतो आहे. गोंधळात टाकायला सुरुवात केली आहे.
‘माय ब्रेन मेड मी डू इट : द राइज ऑफ न्यूरोसायन्स एण्ड द थ्रेट टू मॉरल रिस्पॉसिबिलिटी’ हे बडिस युनिव्हर्सिटीत न्यूरोसायन्स आणि तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी असलेल्या एलायजर स्टर्नबर्ग या बावीस वर्षीय तरुणाने लिहिलेले पुस्तक.

पुढे वाचा