[विवेक चिंतनाच्या वाटेवर संगीताचा विचार कुठे आला असा प्रश्न काही वाचकांना पडेल, आणि ते साहजिकही आहे. सुंदरता हे बघणाऱ्या/ऐकणाऱ्या इ. च्या ज्ञानेंद्रियांच्या समजुतीचेच केवळ फलित असते की एखादी गोष्ट वा परिस्थिती आस्वादकनिरपेक्षही सुंदर असू शकते, हा प्रश्न सौंदर्यशास्त्राने निश्चितच हाताळलेला असला तरी आस्वादकासाठी त्याची जाणीव समजुतीने येतेच असे नाही. शब्दांच्या वाटेने येणाऱ्या लेखन, नाट्य यांसारख्या कलांबाबत आपल्याला अमुकतमुक का आवडले, किंवा का सुंदर वाटले नाही याबद्दलचे प्रश्न विचारता येतात आणि त्यावर उत्तर मागता, येते, पण संगीतासारख्या गोष्टीत सूर-सौंदर्याचा आस्वाद देणाऱ्यांपैकी, त्यातील शार फारसे वा न शिकलेल्या बहुतांशी श्रोत्यांना, हे सूर आपल्या कानांना सुंदर भासले में जाणवते, पण असे का झाले याचा उलगडा होत नाही.
विषय «इतर»
मानवी अस्तित्व (१)
आपण कुठून आलो?
आफ्रिकेच्या दंतकथेनुसार माणसे मध्य आफ्रिकेतून आली. मानवी अस्तित्वापूर्वी येथे फक्त अंधार होता व सर्व पृथ्वी जलमय होती. बुबा नावाचा देव होता. एके दिवशी बुंबाचे पोट अचानकपणे दुखू लागले. वेदना थांबेनात. शेवटी त्याला उलट्या होऊ लागल्या. वांतीतून सूर्य बाहेर पडला. सूर्याच्या तापमानामुळे पाण्याचे वाफेत रूपांतर झाले. त्यामुळे जमिनीचा काही भाग दिसू लागला. तरीसुद्धा बुंबाची पोटदुखी थांबली नाही. पुन्हा एकदा उलटी झाली. त्यातून चंद्र, नक्षत्र, तारे बाहेर पडले. त्यानंतरच्या उलटीतून वाघ, सिंह, मगर, कासव व शेवटी माणूस असे बाहेर पडले आणि सर्व भूभागावर व जलमय प्रदेशात विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती, झाडे दिसू लागली.
साहित्यातून विवेकवाद (१) – स्टाईनबेक
[साहित्यातून विवेकवाद नावाने काही लेखांमधून काही साहित्यकारांचे लिखाण तपासणारी ही लेखमाला आहे. काही थोडे अपवाद वगळता मराठी साहित्य व्यक्तिगत व कौटुंबिक भावभावनांमध्येच गुंतलेले असते. अपवादापैकी वा.म.जोशींवर आजचा सुधारकने विशेषांक काढला होता (डिसें. 1990-जाने. 1991, अंक (1 : 9-10).
जरी लेखमाला मी सुरू करत आहे, तरी इतरांनाही या मालेतून साहित्य व साहित्यिक तपासण्यास आम्ही आवाहन करत आहोत. – नंदा खरे ]
मुंबईला शिकत असताना महिन्याकाठी एकदा तरी फोर्टात जात असे. स्वस्ताई होती. तीन रुपयांत जिवाची मंबई करता येत असे. तर त्या काळात, 65-66 साली आयुष्यात पहिल्यानेच इंपल्स बाईंग म्हणतात तसे मन की खुषी कारणाने साडेसात रुपयांचे एक पुस्तक घेतले.
पुस्तक परिचय – बिहारमधील पूर समजून घेताना
[भारतात पाण्याच्या समस्या बहुतकरून तुटवड्याशी संबंधित असतात. एकच क्षेत्र असे आहे, जिथे नद्यांचे पर महत्त्वाचे असतात, आणि तेही दरवर्षी. हे क्षेत्र म्हणजे हिमालयाच्या पायथ्यापासून गंगा नदीपर्यंतचे.
या क्षेत्रातील नद्यांचा प्रेमाने अभ्यास करणारा महाभाग म्हणजे डॉ. दिनेश कुमार मिश्रा. सुमारे अर्धशतकाच्या काळात या टाटानगरस्थित अभियंत्याने उत्तर बिहारमधील नद्यांचा अत्यंत तपशीलवार अभ्यास करून साठेक.पुस्तके व शोधनिबंध लिहिले आहेत. यांपैकी जागतिक दर्जाचा पूर-तज्ज्ञ ही कीर्ती मिळवून देणारी प्रकाशने इंग्रजी आहेत पण मिश्रा आवर्जून सुघड, सुलभ हिंदीतून आम आदमी साठीही लिहितात.
बाया पेड बबूल का हे पूरनियंत्रणावरील पुस्तक म्हणजे मिश्रांच्या बाढमुक्ति अभियाना चा जाहीरनामा आहे.
सर्वांसाठी आरोग्यसेवा
डॉ. अनंत फडके यांचा आ.सु.डिसेंबर 2011 मधील सर्वांसाठी आरोग्यसेवा हा लेख वाचल्यावर त्याविषयीच्या प्रतिक्रिया मांडाव्या वाटतात.
1) उपचारपद्धती ज्याप्रमाणे ‘एव्हिडन्स बेस्ड’ हवी. म्हणजे अनभवांवर आधारित हवी, त्याप्रमाणेच आरोग्यव्यवस्थेबद्दलची धोरणेदेखील पूर्वानुभवांवर आधारित हवी. आजपर्यंतचा अनुभव असा आहे –
अ) शास्त्रीय वैद्यक महाविद्यालयांशी (अॅलोपॅथिक मेडिकल कॉलेज) संलग्न असलेली, रुम्णालये चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवू शकतात. उदा. मुंबईची के.ई.एम., नायर, जी.टी., आणि पुण्याचे ससून ही रुग्णालये. यांचे कारण पदवीनंतरचे शिक्षण घेणारे डॉक्टर तेथे प्रत्यक्ष रूग्णसेवा पुरवत असतात. त्यांचा सेवाकाळ 2 ते 6 वर्षेच साधारणपणे असल्यामुळे ते कधीच बनचुके सरकारी नोकर बनत नाहीत.
इतिहासकार
भांड्यात दूध उकळत ठेवले तर ते उतू जाते. असे का घडते हे मला माहीत नाही, आणि माहीत करून घ्यावेसे वाटलेही नाही. या प्रश्नावर मला कोणी छेडले तर मी बहुधा त्याचे कारण हे देईन की दुधाच्या ठिकाणी उतू जाण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. ते तसे खरेही आहे, पण त्याने काहीच स्पष्ट होत नाही. पण मग मी काही भौतिक शास्त्रज्ञ नाही. त्याचप्रमाणे भूतकालीन घटनांविषयी, त्या तश्या का घडल्या हे जाणून घेण्याची इच्छा न बाळगता एखादा त्याच्यासंबंधी वाचन किंवा लेखनही करू शकेल. किंवा एखाद्याला इतके म्हणणे पुरेसे वाटेल, की दुसरे जागतिक महायुद्ध घडून आले.
एक क्षण स्तब्धता
या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी
या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी
मी तम्हाला एक क्षण स्तब्ध राहण्याची विनंती करेन;
… त्यांच्या स्मरणार्थ जे अकरा सप्टेंबरला
वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये मारले गेले….
… आणि त्यांच्यासुद्धा, जे त्या हल्ल्याच्या सूडापोटी
छळले गेले, तुरुंगात टाकले गेले, दिसेनासे झाले,
अत्याचारित आणि बलात्कारित झाले, आणि मारले गेले..
…अमेरिका आणि अफगाणिस्तान, दोन्ही देशातल्या पीडितांसाठी
आणि मी अजून एक विनंती करू शकत असेन तर…
… स्तब्धतेची – एक पूर्ण दिवस,
त्या हजारो पॅलेस्तीनींसाठी जे अमेरिकेच्या हातांनी
आणि पाठोपाठ दशकानुदशके इस्रायली फौजांच्या
अतिक्रमणाने मारले गेले.
विकासनीतीची प्रतीकचिह्न (भाग-२)
1966 मध्ये भारतात हरितक्रांतीची सुरुवात झाली. ही सुरुवात तशी दणकेबाज होती. 1965-66 मध्ये भारतात अन्नधान्याचे एकूण उत्पादन 72.35 दशलक्ष टन होते. त्यानंतर फक्त 5 वर्षांत, म्हणजे 1970-71 मध्ये या उत्पादनाने 108.42 दशलक्ष टनाचा उच्चांक गाठला. ही घटना इतकी क्रांतिकारी होती की त्यातून कुठे तरी हरितक्रांती या शब्दाची निर्मिती झाली असावी. खरे तर या क्रांतीच्या मुळात असलेली नवी विकसित बियाणे देशात इतर ठिकाणीही वापरात आणण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण इतर राज्यांच्या तुलनेत हरितक्रांती सर्वाधिक वेगाने पसरली ती पंजाब आणि हरयाणामध्येच.
पंजाबमधले अन्नधान्य उत्पादन 1965-66 मध्ये 3.39 दशलक्ष टन होते, ते वाढत वाढत 1985-86 मध्ये 17.22 दशलक्ष टनापर्यंत पोचले.
समता (भाग 2) पुस्तकपरिचय : द स्पिरिट लेव्हल
[गेल्या अंकात विषमता आणि चिंता, विषमतेचे माप, आसास निर्देशांक हे भाग पूर्ण आले. आलेख आणि सांख्यिकी याची सुरुवात येथे पुन्हा देत आहोत.]
TSL मधील सर्व आलेख खालच्या डाव्या कोपऱ्यात सुरू होतात. आडव्या अक्षावरील मापे उजवीकडे वाढत जातात, तर उभ्या अक्षावरील मापे वरच्या दिशेने वाढत जातात. अशा आलेखांत डावीकडे खाली सुरू होऊन उजवीकडे वर जाणारी रेषा दोन मापांचा थेट संबंध दाखवते; म्हणजे आडवे माप जास्त तर उभेही माप जास्त. याउलट डावीकडे वरून सुरू होऊन उजवीकडे खाली जाणारी रेषा व्यस्त संबंध दाखवते, की आडवे माप जास्त तर उभे माप कमी.
भविष्य काबीज करा
[ऑक्युपाय वॉल स्ट्रीट ह्या चळवळीने अमेरिकेत अल्पावधीतच वेग घेतला आहे. वॉल स्ट्रीट हा, अमेरिकेची आर्थिक सत्ता ज्या मूठभरांच्या हातात आहे, त्यांचा भाग आहे. अमेरिकेच्या बाबतीत, आर्थिक सत्ता म्हणजे सर्वकष सत्ता. ती मूठभरांच्या हातात न राहता सर्वसामान्यांच्या हातात यावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले यामध्ये तरुणांचा सहभाग सर्वाधिक होता आणि आम्ही 99 टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करतो असा त्यांचा दावा होता. हे ह्या आंदोलनाचे अनन्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल, कारण भारतात वा अन्यत्रही, पुरोगामी चळवळींनी अशी भूमिका पूर्वी घेतली नव्हती. आम्ही आंदोलनकर्ते अल्पसंख्य असून इतरांचे (99 टक्क्यांचे) मार्गदर्शक आहोत, अशीच ती होती.