विषय «इतर»

भाषेच्या रचनेस यत्किंचितही अपाय नको

इंग्लिश भाषेचा आम्ही द्वेष करीत नाहीं. हे तर काय पण आपल्या मराठीच्या उत्कर्षास ती मोठेच साधन होईल अशी आमची खात्री आहे. सर्व जगांतील ज्ञानभांडार तींत साठवले असल्यामुळे तिचे साहाय्य मराठीसारख्या परिपक्व होऊ पहाणा-या भाषेस जितकें होईल तितकें थोडे आहे! इतकेच मात्र कीं, ते ज्ञानभांडार खुद्द आपलेसे करून घेण्यास आपल्या भाषेचें सत्त्व म्हणजे निराळेपण कायम राखलें पाहिजे. ज्याप्रमाणे तेच रस शरीरास हितावह होत, की जे शरीर प्रकृतीस मानवून जीवतत्त्वास ढका लावणार नाहींत; त्याचप्रमाणे जे भाषांतरादि ग्रंथ भाषेच्या सरणीस अगदी बरोबर उतरून तिच्या रचनेस यत्किंचितही अपाय न करतील तेच मात्र तीस वर्धक होतील.

पुढे वाचा

समस्त मराठीभाषाप्रेमींना अनावृत पत्र

सप्रेम नमस्कार,
मुद्रित मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंताग्रस्त होऊन मी हे प्रकट पत्र आपणास लिहीत आहे. आयुष्यभर मुद्रणाचा व्यवसाय केल्यामुळे मराठीची जी अवनती आज झालेली आहे तिचा मी साक्षी आहे; किंवा असे म्हणा की ती अवनती पाहण्याचे दुर्भाग्य मला लाभले आहे. आपल्या लिखित वो मुद्रित मराठी भाषेविषयी आपण नेटाने काही प्रयत्न आताच केले नाहीत तर आपल्या भाषेचे हाल कुत्रा खाणार नाही किंवा ती मरेल अशी भीती मला सध्या वाटत आहे. मराठी मरेल म्हणजे ती पूर्णपणे. नष्ट होईल असे नाही; पण तिचे विदग्ध, अभिजात, परिष्कृत स्वरूप मात्र नष्ट होईल.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ : गर्वाच्या खुट्या

राजाच्या खांद्यावरून वेताळ बोलू लागला. त्याचा स्वर नेहमीपेक्षा खिन्न होता. “राजा, आज अकरा में एकोणीसशे नव्याण्णऊ”. आपण गेल्या वर्षी याच दिवशी पोखरण – २ अणुचाचण्या केल्या, हे तुला आठवतच असेल.” राजाने मान डोलावून होकार भरला.
“काही लोकांना ह्या चाचण्यांमुळे बुद्ध हसला असे वाटले, आणि एकूणच या घटनेमुळे जगातील इतर देशांमध्ये आपली पत वाढली असे वाटले”. हा हर्षोन्मादाचा काळ तुला आठवत असेल, होय ना?” राजाच्याने राहवेना, तो भडाभडा बोलू लागला. “लोक फार विघ्नसंतोषी असतात, वेताळा. आपण आपल्या तंत्रशक्तीचे प्रदर्शन केले रे केले, आणि त्या बाकी लोकांनीही दोनचार बाँवस्फोट करून सारा मजा किरकिरा केला.

पुढे वाचा

भारतीयांची परदेशाकडे ओढ

….कोणाच्या अमेरिकेस जाण्याला आक्षेप घ्यायचे काहीच कारण नाही. योगक्षेमासाठी माणसे कोठेही जातात. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत सगळीकडे कोकण झाले आहे, ते आपल्याला अभिमान वाटावा असेच आहे. देशांच्या सीमा निरर्थक होत जाण्याच्या ह्या काळात आपल्या बौद्धिक बळाच्या जोरावर ही मराठी माणसे तेथे पराक्रमच गाजवत आहेत. पण मग विदेशी लोकांच्या सुरांत सूर मिसळून हिंदुस्थानाविषयी गैर बोलणे समजावून घेणे अवघड आहे. आपल्या सगळ्या भांडणा-तंटणासकट, वादविवादासकट, भ्रष्टाचार, झुंडीसकट आपला देश मला सुंदर वाटतो. पृथ्वीतलावर माणसाने वस्ती करण्यासाठी सगळ्यांत आदर्श असाच तो आहे. विदेशांत गेलेली आपली माणसे ह्या ना त्या प्रकारे ह्या देशाविषयी, लोकांविषयी प्रेमभावनाच प्रकट करीत असतात.

पुढे वाचा

अध्यात्म : एक प्रचंड गोंधळ

‘अध्यात्म’ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आहे ‘आत्मानं अधिकृत्य’, म्हणजे आत्म्याविषयी. अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयी विचार.
‘आत्मा’ म्हणजे काय हा प्रश्न लगेच उद्भवतो.
पण ‘आत्मा’ या शब्दाची स्थिती मोठी चमत्कारिक आहे. तो सामान्य, दैनंदिन व्यवहारातील शब्द नाही. तो तत्त्वज्ञानातील शब्द आहे. सामान्य माणसे, विशेषतः खेड्यातील अशिक्षित माणसे आत्म्याविषयी कधी आपसात बोलत असतील असे म्हणता येत नाही. ‘आत्मा’ या शब्दाचा जवळजवळ संपूर्ण अर्थ त्याला अतिभौतिकीने (metaphysics) दिलेला आहे असे दिसते. एका अर्थी आत्मा म्हणजे ज्याला आपण ‘मी’ किंवा ‘अहं म्हणतो तो पदार्थ हे खरे आहे.

पुढे वाचा

अमेरिकेत आजचा सुधारक – (२)

बारा सप्टेंबरच्या त्या वाचकमेळ्यात सुधारक कसा वाढवता येईल याच्या अनेक सूचना पुढे आल्या. त्यांतली एक अशी की येथून आपण भारतातले वर्गणीदार प्रायोजित (स्पॉन्सर) करावे. फडणिसांच्या या सूचनेला डॉ. नरेन् तांबे (नॉर्थ कॅरोलिना) यांनी पुस्ती जोडली की व्यक्तीपेक्षा वाचनालयांना आजचा सुधारक प्रायोजित करा. सुनील देशमुखांनी कॉलेजची ग्रंथालये घ्या म्हटले – एक वर्षभर अंक प्रायोजित करून तेथे जावा. त्यातून संस्था, महाविद्यालये, व्यक्तिगत वाचक-ग्राहक मिळतील. मुळात प्रायोजित करण्याची योजना आजीव सदस्यतेची वर्गणी भरून करायची पण लाभार्थी संस्था दरवर्षी बदलत जायच्या अशी कल्पना.
ही कल्पना इतकी अफलातून ठरली की एकूण मिळालेल्या एक्याऐंशीपैकी तीस अमेरिकेतले आणि एक्कावन्न भारतातले प्रायोजित अशी विभागणी आज झाली आहे.

पुढे वाचा

अर्थ-व्यवस्था व राज्य-व्यवस्था

समाजवाद, बाजारपेठा व लोकशाही’ या अमर्त्य सेन यांच्या निबंधाचा विद्यागौरी खरे यांनी केलेला अनुवाद मार्च ९९ च्या आ.सु. मध्ये वाचला. तो वाचून काही स्पष्टीकरण करणे व काही विचार मांडणे आवश्यक वाटले म्हणून हा लेख.

अर्थव्यवस्थेच्या दोन प्रमुख पद्धती आहेत –
(१) भांडवलशाहीः – खाजगी उत्पादन, खाजगी व्यापार, मुक्त बाजारपेठेमध्ये मागणी व पुरवठा यांवर आधारित विनिमयाचा दर, खाजगी सेवा, उत्पादनक्षमतेचा विकास करून, कमी कमी किमतीत जास्तीत जास्त चांगली वस्तू किंवा सेवा पुरवण्याचा प्रयत्न करून, जास्तीत जास्त नफा किंवा पगार मिळवण्याची स्पर्धा करणे ही भांडवलशाहीची प्रमुख लक्षणे म्हणता येतील.

पुढे वाचा

स्वदेशीची चळवळ

अलीकडे विदेशी आणि स्वदेशी यांमधील द्वंद्व फार प्रकर्षाने खेळले जाऊ लागले आहे. आन्तर्राष्ट्रीय दबावामुळे जागतिकीकरणाचा १९९० च्या दशकात सर्वत्र बोलबाला होऊ लागला त्यामुळे भारतात काहीशा सुस्त पडलेल्या स्वदेशीच्या चळवळ्यांना चेव आला. स्वदेशीची चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामधील एक महत्त्वाचा घटक होती आणि स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय विकास धोरणाच्या पायातील एक वीट (plank in the platform) म्हणून काँग्रेस सरकारने या ना त्या प्रकारे स्वदेशीचे तत्त्व मान्य केले. भारतीयांना खरोखरच स्वातंत्र्य मिळाल्याची जाणीव व्हावी म्हणून जवाहरलाल नेहरूंनी स्वदेशीला महत्त्वाचे स्थान दिले. म्हणूनच पोलादाचे, खतांचे, अवजड यंत्रसामुग्रीचे व अणुऊर्जेचे प्रचंड प्रकल्प सरकारने राबविले.

पुढे वाचा

वाचक मेळाव्याचा वृत्तान्त

आजचा सुधारक या मासिकाच्या वाचकांचा मेळावा रविवारी दिनांक २४ एप्रिलला भरला. निमित्त होते, मासिकाचे दहाव्या वर्षात पाऊल टाकण्याचे. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेने आपले दालन या मेळाव्यासाठी उपलब्ध करून दिले, ज्याबद्दल आजचा सुधारक परिवार त्यांचा अपार आभारी आहे.
हा या मासिकाच्या वाचकांचा तिसरा मेळावा. आधीच्या दोन मेळाव्यांपेक्षा हा काही बाबतींत वेगळा होता. मुख्य म्हणजे मासिकाचे संस्थापक संपादक श्री. दि. य. देशपांडे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाहीत त्यांच्या अनुपस्थितीतले हे मासिकाचे पहिलेच ‘कार्य’! दुसरे म्हणजे हा वाचक-मेळावा पूर्णपणे अनौपचारिक होता – ना अध्यक्ष, ना प्रमुख पाहुणे.

पुढे वाचा

चर्चा – धर्मान्तर आणि राष्ट्रान्तर

धर्मान्तर आणि राष्ट्रान्तर त्या विषयावरचा वाद फलदायी व्हायला हवा असेल तर त्यातला मुळातला मुद्दा काय आहे हे पाहिले पाहिजे.
‘धर्मान्तर म्हणजे राष्ट्रान्तर’ हे विधान मला वाटते प्रथम सावरकरांनी केले. त्याचा नेमका अर्थ काय?
हे विधान करताना सावरकर एक त्रिकालाबाधित समाजशास्त्रीय नियम सांगत नव्हते. म्हणजे कोणत्याही काळी, कोणत्याही राष्ट्रातील लोकांनी आपला धर्म बदलला तर त्यांची राष्ट्रनिष्ठा ढळते असे त्यांना सांगायचे नव्हते. असे विधान कुणी केले तर ते असिद्ध ठरवणे
अगदीच सोपे आहे. पण प्रचलित प्रश्नांवर प्रकाश पाडण्याच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग नाही.

पुढे वाचा