संपादक, आजचा सुधारक, यांस
स. न. वि. वि. मी मूळचा पुण्याचा आहे. त्या काळात अनेक विद्वानांची भाषणे सहजगत्या ऐकावयास मिळाली. त्या वेळेचे विद्वान अटीतटीने वाद करीत.
आपल्याला कोणी मारील” अशी भीती त्यांना वाटत नसे. माझा पिंड अशा वातावरणांत तयार झाला.
आज विद्वान एकमेकांना खूप संभाळून घेतात. त्यामुळे सामान्य वाचकांना संभ्रम पडतो नक्की काय? निर्जीव वस्तूला नमस्कार करणे कितपत योग्यं आहे? आगरकर व टिळक ह्यांत कोणाची भूमिका जास्त योग्य? गोडसेवद्दलचे नाटक दाखवावे का? अरुण गवळी व वाळ ठाकरे ह्यांत फरक कोणता?
पूर्वीचे विद्वान खाजगी प्रश्नांना उत्तरे देत.
विषय «इतर»
सुखाचा दर्जा केवळ मानीव (?)
‘कांही विशिष्ट प्रकारच्या शरीरसुखांना लोक उच्च कां मानतात आणि इतर प्रकारांना नीच कां मानतात . . . . संगीताने होणारा आनंद उच्च प्रकारचा मानण्याची पद्धत आहे, पण एखादा आवडीचा पदार्थ खातांना होणारा आनंद कमी दर्जाचा मानतात. असे कां? सुख शरीराच्या एका विशिष्ट भागाला होते असे मानले, किंवा सर्व प्रकारच्या संवेदनांचे स्थान मेंदूतच आहे असे मानले, तरी या दोन प्रकारांत किंवा इतर प्रकारांत उच्चनीच भाव कां असावा? शरीरसुखासंबंधी आणखी विचार केला तर त्यांत पुष्कळच गंमती दिसतात. वेळीं अवेळीं उपास करणे हा धर्मबाजीत एक विशेष सद्गुण समजतात आणि गांधींनी तर जरा कोठे खुट झाले की उपास करायची फॅशनच पाडली आहे.
हिंदू-मुस्लिम सहजीवन
‘इतिहासाच्या एका क्षणी हिंदुस्थानची फाळणी झाली. फाळणीची चिकित्सा होऊ शकेल, फाळणीचे गुन्हेगारही ठरवता येतील. पण ते चक्र आता उलट फिरविण्याचे स्वप्न पाहू नका. कित्येक प्रांतातल्या लोकांनी या देशातून फुटायचा निर्णय त्यावेळी घेतला होता हे विसरू नका. आता भारतातल्या आठ कोटी मुसलमानांना पाकिस्तान आश्रय देणार नाही. ही आठ कोटी माणसे आपण काही समुद्रात बुडवू शकत नाही. तेव्हा यांच्याशी जुळवून घेण्याचाच विचार केला पाहिजे. त्यांना बरोबरीचे स्थान देऊन सर्वसामान्य मुस्लिम समाजाची मुल्लामौलवींच्या संधीसाधू पकडीतून कशी सुटका करता येईल ते पाहा. त्यासाठी त्यांचा द्वेष करणे सोडून त्यांच्यातल्या सामाजिक सुधारणांना हात घातला पाहिजे.
मुस्लिम समाज-सुधारकांची परिषद
नोव्हेंबरच्या २० आणि २१ या तारखांना पुणे येथे एस. एन. डी. टी. कॉलेज, कर्वे रोड, पौड फाटा या ठिकाणी एक मुस्लिम महिला परिषद होणार आहे. देशभरातून महिलांना या परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण आहे. पुण्याबाहेरच्या व्यक्तींची राहण्याखाण्याची व्यवस्था परिषदेच्या जागी होईल. ज्यांना प्रवासाचा खर्चही झेपणे अवघड आहे त्यांना दुस-या वर्गाचे रेल्वेचे भाडे मिळेल. ही परिषद ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स’ या संस्थेच्या वतीने होत आहे. तिचे जनरल सेक्रेटरी श्री. सय्यदभाई, पुणे ह्यांनी आगामी परिषदेचे माहितीपत्रक आमच्याकडे धाडले आहे. या परिषदेत मुस्लिम महिलांच्यासाठी पुढील मागण्या केल्या आहेत.
सर्वधर्मसमभाव म्हणजे घाबरगुंडी!
सर्वसाधारणपणे “धर्मनिरपेक्षता” म्हणजे राज्यसत्ता व धर्मसत्ता यांचा काडी-मोड. तसेच वैयक्तिक पातळीवर धर्मनिरपेक्षता म्हणजे नोकरी, धंदा, शैक्षणिक प्रवेश, प्रवास, इ. ‘न-धार्मिक’ क्रियांत धर्म विचारात न घेता वागणूक देणे वा घेणे.
“सर्वधर्मसमभाव” हे मात्र मोठेच गौडबंगाल आहे. धार्मिक बाबतींत सर्व धर्म समानच असतात, त्यामुळे एकाने दुस-याला शिकवण्याचा शहाणपणा करू नये, असे काहीसे त्याचे रूप आहे. “आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्”, हे हिंदूंना तसे नवीन नाही. त्यामुळे विविध देवदेवतांची पूजा करण्यातील विरोधाभास दूर होतो. मात्र इतर धर्मांत नमस्कारच नसल्याने तो केशवास कसा पोचतो, किंवा पोचतो का, हे अस्पष्टच राहते.
स्त्री-पुरुष (१९९९ मॉडेल)
आधी ताज्या वैद्यकीय संशोधनाचा आढावा घेऊ –
(क) स्त्रियांची प्रतिरक्षा-व्यवस्था (Immune System) पुरुषांच्या तशाच व्यवस्थेपेक्षा बरीच जास्त प्रमाणात नियंत्रित असते. शरीरात ‘घुसणाच्या बाहेरच्या जीवाणूंशी स्त्रियांची शरीरे जास्त जोमाने लढतात, तर पुरुषांच्या बाबतीत हा प्रतिसाद (तुलनेने) सौम्य असतो. गर्भारपणात मात्र स्त्रियांची प्रतिरक्षा-व्यवस्था बरीच मंदावते, पण बाळंतपण होताच ती पुन्हा पूर्ववत होते. प्रतिरक्षेच्या कार्यक्षमतेतील या चढउतारांचा संबंध स्त्रियांना जास्त प्रमाणात सतावणा-या ल्यूपस (Lupus), संधिवात ‘व मल्टिपल स्क्लेरॉसिस वगैरे आजारांशी लावला गेला आहे. या सर्व आजारांमध्ये शरीरांची प्रतिरक्षा-यंत्रणा शरीराच्याच उपांगांशी झगडू लागते!
(ख) सरासरीने पाहता पुरुषांना ज्या वयात हृदयविकाराचा पहिला झटका येतो, त्यापेक्षा स्त्रियांना असे झटके दहा वर्षे उशीराने येतात – पण झटक्याच्या वेळी वयस्क असल्याने स्त्रिया अशा झटक्यांमुळे दगावण्याचे प्रमाण पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त असते.
कामशास्त्री कर्वे (नव्या चरित्राच्या निमित्ताने)
माणूस मृत्यूनंतर मोठा होतो. कर्त्यांच्या बाबतीत हे विशेषच खरे आहे. येत्या १४ ऑक्टोबरला त्यांच्या मृत्यूला ४६ वर्षे होतील. या काळात त्यांची दोन चरित्रे प्रसिद्ध झाली. ‘उपेक्षित द्रष्टा’ हे दिवाकर बापटांचे १९७१ साली आणि य. दि. फडक्यांचे ‘र. धों. कर्वे’ १९८१ साली. सध्या उपेक्षित योगी या नावाचे त्यांचे एक नवे चरित्र आमच्याकडे अभिप्रायार्थ आले आहे, ‘पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने हा नवा ग्रंथप्रपंच’ (पृ १८)’ असा दावा प्रस्तुत लेखकाने केला आहे. लेखक बेळगावचे श्री मधुसूदन गोखले यांनी आपण ४० वर्षे कुटुंबनियोजन क्षेत्रात काम केले आणि १२ वर्षे एका पदव्युत्तर संस्थेत प्राध्यापकी केली, असे सांगितल्यामुळे पुस्तकाबद्दल अपेक्षा उंचावतात.
सर्वांना शुद्धलेखनाचे प्रशिक्षण हवे
संपादक, आजचा सुधारक यांस,
आपल्या अनावृत पत्रात आपण उपस्थित केलेले सर्वच मुद्दे महत्त्वाचे व विचारांना चालना देणारे आहेत. त्या सर्वांचा समग्र विचार करून ऐकमत्य साधणे नितांत आवश्यक झाले आहे. ही प्रक्रिया लवकर व्हावयास हवी. उशीर झाल्यास मराठीची अवस्था आणखी दयनीय होईल आणि मग तिच्यात चैतन्य आणणे आणखी कठीण होईल, असे आपल्याप्रमाणे मलाही वाटत आले आहे. आपल्या अनेक वर्षांच्या व्यावसायिक अनुभवामुळे आपण लिखित मराठीचे दुखणे बरोबर हेरले आहे. समग्र महाराष्ट्रात आणि अन्यत्र प्रमाण मराठीची जाण वाढणे याची आज नितान्त
आवश्यकता आहे.
मराठीच्या अनेक प्रादेशिक बोलीही महाराप्ट्रात विखुरल्या आहेत.
मनाचा जो व्यापार चालतो तो सारा इंग्रजी भाषेत
इंग्लिश भाषेचे सामान्य ज्ञान तर आतांशा बहुधा प्रत्येक मनुष्यास जरूर झालें आहे. दिवसेंदिवस तर तींत निपुण होणे हा जीवनाचाच एक उपाय होऊ पहात आहे. चोहोंकडे प्रतिष्ठा मिरविण्याचे तर यासारखे सध्यां दुसरें साधनच नाहीं. तेव्हा तिचा जो हल्ली फैलावा झाला आहे, व होत चालला आहे, त्यापुढे वर सांगितलेल्या भाषांची गोष्ट काय बोलावी? इंग्लिश लोक आपल्या उत्कृष्ट भाषेचा साया भूमंडळावर प्रसार होत चालला आहे याचा अतिशयित गर्व वहातात, व तो त्यांचा गर्व यथार्थ आहे. आमच्या नुसत्या हिंदुस्थानांतच पाहिले तर आमच्या तरुण विद्वानांस तिने इतके वेडावून टाकले आहे की, त्यांस आपल्या आईबापांशी, बायकांशीं, बहिणीशीं, चाकरांशीं सुद्धां शुद्ध व सरळ बोलण्याची मारामार पडते!
धर्म आणि श्रद्धा
धर्मचिकित्सा करणा-या विद्वानांचे, ढोबळ मानाने, दोन वर्ग आहेत. एक वर्ग आहे – धर्म मानणा-या आस्तिकांचा, तर दुसरा आहे-धर्म न मानणा-या नास्तिकांचा. आस्तिक धर्मचिकित्सक हे सिद्ध करू पाहतो की धर्म ही अत्यंत कल्याणकर (किंबहुना, एकमेव कल्याणकर) बाब आहे. उलट, नास्तिक धर्मचिकित्सक हे दाखवू पाहतो की धर्म ही अत्यंत घातक आणि मानवाला सर्वस्वी अशोभनीय बाब आहे. धर्मचिकित्सकांच्या या दोन वर्षांनी काढलेले धर्मासंबंधीचे निष्कर्ष भिन्न (किंबहुना, एकमेकांविरुद्ध) असले, तरी त्या दोहोंमध्ये एका बाबतीत मतैक्य असल्याचे आढळते. नास्तिक आणि आस्तिक या दोन्ही प्रकारचे बहुतेक धर्मचिकित्सक असे मानतात की धर्माचा आधार श्रद्धा हा आहे.