माध्यमिक शिक्षणक्षेत्रात शिकवणीवर्गाचे वाढते प्रस्थ याविषयी बरीच उलटसुलट चर्चा प्रसारमाध्यमांतून होत असते. सामान्य पालकवर्गास आपल्या पाल्यास शिकवणी लावणे हे एक अप्रिय परंतु आवश्यक कर्तव्य वाटू लागले आहे. मोठ्या महानगरांपासून तर अगदी तालुक्याच्या गावांपर्यंत सर्वत्रच शाळांबरोबरच लहानमोठे शिकवणी वर्गही उत्तम व्यवसाय करीत आहेत. पूर्वी, म्हणजे ३०-४० वर्षांपूर्वी काही मोजकेच सुखवस्तु पालक आपल्या मुलांना शाळेतील नाणावलेल्या शिक्षकांच्या घरी शिकण्यासाठी पाठवीत असत. त्यामध्ये परीक्षेत अधिक गुण मिळावेत या ऐवजी विद्यार्थ्याचा विषय पक्का व्हावा हीच अपेक्षा महत्त्वाची असे. परंतु हे साधे, सरळ समीकरण गेल्या अर्धशतकात पार बदलून गेले असून, आता केवळ परीक्षेत अधिक गुण मिळावेत याच एकमेव उद्देशाने शिकवणी लावली जाते, कारण बोर्डाच्या
परीक्षेत उत्तम गुण मिळविल्याखेरीज आयुष्यातील उत्कर्ष शक्य होत नाही.
विषय «इतर»
मागे वळून पाहता
आजचा सुधारकचा हा अंक आठव्या वर्षाचा शेवटचा अंक. या अंकाने आजचा सुधारकने आठ वर्षे पुरी केली आहेत. या आठ वर्षांत त्याने काय काय काम केले याकडे नजर टाकणे पुढील प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे होईल असे वाटते. म्हणून हे सिंहावलोकनआणि वाचकांशी हितगूज.
आठ वर्षांपूर्वी जेव्हा एप्रिल १९९० मध्ये आजचा सुधारक चा जन्म झाला तेव्हा त्याच्या अस्तित्वाच्या समर्थनासाठी काही गोष्टी नमूद केल्या होत्या. त्यावेळी आपले सामाजिक जीवन अतिशय असमाधानकारक अवस्थेत आहे असे आमच्या लक्षात आले होते. अनेक दुष्ट रूढी आणि प्रवृत्ती जीवनात अनिबंध्रपणे थैमान घालत होत्या.
इहवादावरील आक्षेप
प्रा. मे.पुं. रेगे यांचे इहवाद आणि सर्वधर्मसमभाव हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी पहिल्या प्रकरणात ‘इहवाद म्हणजे काय?’ या शीर्षकाचा उपोद्घात लिहून पूर्वपक्ष केला आहे. त्यातील इहवादाचे निरूपण सामान्यपणे न्याय्य आणि वाजवी आहे असे म्हणण्यास हरकत नाही. त्यात फक्त एकच दुरुस्ती सुचवावीशी वाटते. पान दोन वर ते म्हणतात: ‘प्रत्यक्ष प्रमाणाने वस्तूंच्या अंगी असलेल्या ज्या गुणधर्माचे आणि शक्तींचे ज्ञान आपल्याला होणे शक्य आहे तेवढेच काय ते गुणधर्म आणि शक्ती वस्तूंच्या ठिकाणी असू शकतात. जे काही आहे त्याचे संपूर्ण स्वरूप अशा गुणधर्माचे आणि शक्तींचे बनलेले असते’ (तिरका ठसा माझा).
डॉ. राममनोहर लोहिया यांचे स्त्रीविषयक विचार
‘जातिप्रथा आणि स्त्रिया हे भारतीय समाजातील दोन मोठे पिंजरे होत. स्त्रिया आणि शूद्र मिळून बनलेल्या ९० टक्के समाजाला अलग आणि बहिष्कृत केल्यानेच भारतीय आत्म्याचे पतन झालेले आहे.वस्तुतः ह्या दोहोंत कमालीची शक्ती आहे. परंतु हे तुरुंग कायम ठेवल्याने समाजातील सारा उल्हास, साहस आणि कर्तृत्व कुजत पडले आहे. हे दोन्ही कैदखाने परस्परसंबंधित असून परस्परांचे पोषण करतात आणि म्हणूनच ते नष्ट करण्याचे बुद्धिपुरस्सर प्रयत्न केल्याशिवाय क्रांतीची भाषा फोल आहे. आर्थिक क्रांती झाली की हे पिंजरे आपोआप तुटतील असे मानणे बरोबर नाही.
‘स्त्रियांची स्थिती तर फारच भयंकर आहे’.
भारतीयांचे सामाजिक चिंतन
प्रस्तुत लघुलेख हा एका वैयक्तिक(?) जिज्ञासेची प्रकट मांडणी करण्यासाठी लिहीत आहे. ‘वैयक्तिक’ पुढे प्रश्नचिन्ह अशासाठी टाकले आहे की आजच्या बर्याचच विचारंवतांच्या मानसांतही कुठेतरी ही जिज्ञासा सुप्त स्वरूपात वास करत असावी अशी लेखकाची समजूत आहे. तसे असल्यास(च) या प्रकटीकरणाला थोडाफार अर्थ येईल.अन्यथा लेखकाने आपला वैयक्तिक शोध वैयक्तिकपणेच चालू ठेवणे इष्ट.
अशाच दुसऱ्या एका गोष्टीचाही खुलासा सुरुवातीलाच करणे आवश्यक आहे. ती म्हणजे प्रस्तुत लेख एका प्रामाणिक (genuine) वैचारिक जिज्ञासेपोटी लिहिला आहे. त्यामागील अज्ञानाचे कुणी वाभाडे काढले किंवा त्याची कीव केली तर त्यात वावगे काहीच ठरणार नाही कारण ती वस्तुस्थिती आहे.
जगावेगळं नातं ‘एकत्वाचं’
दूरवर बिहारमधील राजगीर परिसरातील पहाडांच्या पायथ्याशी पिलखी निवासात मिणमिणत्या दिव्यांनी दिवाळी प्रकाशली होती. सारा परिसर आनंदित होता.
प्रत्येक कुटुंब ही एक संस्था असते. तिच्यातील समाधान, प्रेम, जिव्हाळा, सुख, शांती हीच एक शक्ती बनते. त्याच शक्तीतून स्नेहाचा परिघ विस्तारत जातो. आणि मग व्यक्तिगत कुटुंबाचे विश्वकुटुंब बनते. सहजतेने समाजाशी वेगळेच स्नेहपूर्ण नाते जुळते.
असेच घडत गेले! आजपर्यंत… पण आता?माझी मैत्रीण उषा शरण सांगत होती.
‘आयुष्यात कधी-कधी अचानक अशा काही घटना घडतात की ज्यांचा अर्थ लावणं मानवी शक्तीच्या आवाक्यातलं राहत नाही.’
बिहारचे मेजर शरण व नागपूरची उषा मोहनी एकत्र का आले व आज अचानक का दुरावले, ह्याला उत्तर नाही.
बुद्धिवाद विरुद्ध भावविश्व
आंबेडकरी जीवनमूल्यांचा त्यांच्याच अनुयायांकडून पराभव आणि बुद्धिवाद्यांचा त्यांच्याच प्रकृतीकडून पराजय अशा दोन पराजय-कथा आ. सु. च्या जानेवारी अंकात आल्या आहेत. दोन्ही पराजयांचे कारण एकच आहे. ते म्हणजे बुद्धिवाद या नवीन मूल्यानेजुने सगळे काही एकदम बदलते असा समज.
श्री. भोळे यांनी पहिल्या पराभवाची मीमांसा समर्थपणे आणि विद्वत्तापूर्ण भाषेत केली आहे. त्यांच्या मीमांसेचे सार असे की संस्कृतीचे अनेक पैलू असतात, भाषा त्या सर्व पैलूंची अभिव्यक्ती करत असते, त्या संस्कृतीविरुद्ध बुद्धिवादी बंड पुकारल्याबरोबर ती बहुआयामी भाषा पूर्णपणे बदलेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
लग्न-मुंज या समारंभाचेही असेच आहे.
कौटुंबिक समारंभातील उपस्थिती
माननीय संपादक
आजचा सुधारक,
आ. सु. मध्ये बर्याच महिन्यांपूर्वी एका वाचकाने व्रतबंध समारंभाविषयी; त्याला आस्था नसताना, उपस्थित राहावे काय म्हणून पृच्छा केली होती. त्यानंतर अलीकडे दुसन्या वाचकांनी विवाह समारंभाविषयी त्याच स्वरूपाचा प्रश्न विचारला होता. या दोन्ही वाचकांना आपण ‘‘आ.सु., १९९८, ८:११’ मध्ये वेगवेगळी उत्तरे दिली आहेत व त्यात विश्वास नसेल तर अशा समारंभांमध्ये सहभागी होऊ नये, परंतु आपले मत सौम्य शब्दांत कळवून, समारंभानंतर यथावकाश संबंधितांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस करावी असे उत्तर दिले आहे. या विषयावर मलाही काही सांगावयाचे आहे.
श्रीमती कोठाऱ्यांना उत्तर
श्रीमती कल्पना कोठाऱ्यांचा ‘ब्रेन-ड्रेन’ वरील लेख (आ.सु. डिसें. ९७) वाचून सुचलेले काही मुद्दे नोंदत आहे. मुळात या महत्त्वाच्या विषयावर अशी तुकड्या-तुकड्याने चर्चा होण्याने फारसे साध्य होत नाही याची पूर्ण जाणीव ठेवून हे वाचावे.
(१) कोठाऱ्यांची समजूत दिसते की GREv TOEFL (TOFFEL नव्हे) या परीक्षा गुणवत्ता ठरवण्याच्या फार उच्च प्रतीच्या कसोट्या आहेत. कोठाभ्यांनी IIT चा उल्लेख करून उदाहरण अभियांत्रिकीचे दिले आहे. IIT व इतर अभियांत्रिकी संस्थांच्या पदवीधरांना पुढे शिकायचे झाले तर त्यांना भारतातच ‘गेट’ (Graduate Aptitude Test in Engineering) ही परीक्षा देऊन भारतीय संस्थांमध्ये पुढे शिकता येते.
ग्रंथपरिचय
भाषांतर मीमांसा, सं. कल्याण काळे व अंजली सोमण, प्रतिमा प्रकाशन, पुणे, पृ. ४१५, किं. रु. २६०/-.
वेगवेगळ्या भाषांमध्ये नित्यनव्याने विकसित होणार्याव ज्ञानक्षेत्रांची ओळख करून घ्यावयाची, त्यांचा उपयोग करायचा. त्यांमधील वाङ्मयीन समृद्धतेचा आस्वाद घ्यायचातर भाषांतराला पर्याय नाही. कधी व्यावहारिक गरज म्हणून तर कधी केवळ आंतरिक ऊर्मी म्हणून भाषांतरे केली जातात. भाषांतर म्हणजे काय?भाषांतर कसे करायचे?कुणी करायचे?असे वेगवेगळे प्रश्न या संदर्भात अभ्यासकांच्याच नव्हे तर सामान्य वाचकांच्याही मनात उभे राहात असतात. या सगळ्यांचा परामर्श घेणारे एक चांगले पुस्तक नुकतेच वाचनात आले. डॉ. कल्याण काळे व डॉ.