(१)संगणक माझ्या मेंदूसारखा, बुद्धीसारखा आहे का?
काही बाबतीत तरी असावा. त्याला काही प्रकारची स्मरणशक्ती असते. ज्या गोष्टी तो ‘लक्षात ठेवतो त्यांना काही क्रमाने मांडणेही संगणकाला जमते. अशा क्रमांचे ढोबळ अर्थही तो लावू शकतो. उदाहरणार्थ, जर संगणकात वेगवेगळ्या माणसांची वये आणि वजने नोंदली, तर तोवयानुसार नोंदी करून प्रत्येक वयाच्या माणसांची सरासरी वजने काढू शकतो, ती क्रमाने मांडू शकतो, आणि वयानुसार (सरासरीने) वजन कसे बदलत जाते याचे गणिती समीकरणही शोधू शकतो – हे सारे मीही करू शकतो. मात्र –
मला वय हे मूळ’ व वजन हे त्यावर अवलंबून’ हे सुचते.
विषय «इतर»
झोपडपट्टी संस्कृती : उत्तर प्रदेशची व तामिळनाडूची
दिल्लीमध्ये पावणेदोन लक्ष वस्तीची एक वसाहत स्थापलेली होती. त्यात भारतामधील सर्व राज्यांतील पोटापाण्यासाठी तेथे गेलेले लोक राहत होते. हे लोक मोलमजुरी करणारे, किंवा निश्चित स्वरूपाचे मासिक उत्पन्न असलेले असे नव्हते. त्यांचा एक सर्वसमावेशी गुण म्हणजे गरिबी. त्यातल्या प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून ५ यार्ड x ५ यार्ड असा जमिनीचा तुकडा मिळालेला होता. त्यावर घर बांधण्यासाठी दोन हजार रुपये कर्ज मिळालेले होते. ज्याचे त्याने आपल्या कुवतीने घर उभे करावयाचे होते. ह्या वसाहतीला वैद्यकीय सुविधा देणारे सात दवाखाने होते. अर्थात त्यांच्या कामाच्या वेळा मजूर वर्गाला सोयीच्या नव्हत्या.
मुलींबाबत पालकनीती
जग आता एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. या जगातील मानवी समाजाचे दोन वर्ग पुरुष आणि स्त्री. या दोन्ही वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजात त्यांचे स्थान, प्रतिष्ठा, त्यांना मिळणाच्या संधी यात समानता असावी, हे तत्त्व मान्य होत आहे. या दृष्टीनेच आतापर्यंत जो वर्ग कनिष्ठ, हीन म्हणून शोषित, मागासलेला राहिला त्या स्त्रीवर्गाला, मुलींना योग्य दर्जा मिळावा, माणुसकीची वागणूक मिळावी आणि कुटुंब, समाज, राष्ट्र उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग असावा या दृष्टीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कक्षावर बरीच जागृती करण्याचे प्रयत्न होत आहेत. १९७५ ते १९८५ हे महिला दशक साजरे झाले.
परंपरा, रूढी आणि आधुनिकता
परंपरा, रूढी आणि आधुनिकता या विषयावरील माझ्या भाषणाचा वृत्तांत आणि त्यावरील प्रा.प्र.ब.कुलकर्णी यांचे आक्षेप ‘आजचा सुधारक’च्या एप्रिल महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यापूर्वीच्या म्हणजे मार्च महिन्याच्या अंकात, त्याच परिसंवादातील प्रा.कुलकर्णी यांचे भाषण प्रसिद्ध झाले आहे. प्रा.कुलकर्णी यांच्या अनुग्रहामुळे हे दोन्ही अंक मी वाचू शकलो. मी प्रा.कुलकर्णी यांचा आभारी आहे.
मी हे प्रारंभीच मान्य करतो की, प्रा.कुलकर्णी यांच्यासारख्या विद्वान आणि विचक्षण श्रोत्याला मी माझे म्हणणे नीट समजावून सांगू शकलो नाही, हे माझ्याच प्रतिपादनाचे न्यून आहे. मी भाषण लिहून आणलेले नव्हते. पूर्वी झालेल्या माझ्या भाषणांचा परामर्श, परिपाटीप्रमाणे मी अध्यक्षीय भाषणात घेतला.
आस्तिकता आणि विज्ञान
याच अंकात पत्रव्यवहारात वरील विषयावर तीन पत्रे आली आहेत. पत्रलेखकांपैकी एक तर चक्क वैज्ञानिक आहेत असे ते स्वतःचसांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या मताला विशेष महत्त्व असणार!
डॉ. हेमंत आडारकर हे ते पत्रलेखक. विज्ञानक्षेत्रातील संशोधनाचा दहा वर्षांचा अनुभव . त्यांच्या गाठीशी आहे. टाटा मूलभूत संशोधनसंस्थेत त्यांनी दहा वर्षे भौतिकीत संशोधन केले आहे. तेव्हा बघू या ते काय म्हणतात ते.
ते म्हणतात ‘आस्तिकता आणि विज्ञान परस्परविरोधी गोष्टी आहेत असे गृहीत धरणे बरोबर नाही. उलट ‘वैज्ञानिक आणि आस्तिकता यांचा घनिष्ठ संबंध आहे. या मताच्या पुष्ट्यर्थ ते काय पुरावा देतात?ते
कलमी मानव (Human Clones)
पृथ्वीवरील जीवसृष्टीत तरी प्रजोत्पादनाचे अजून दोनच प्रमुख प्रकार ज्ञात आहेत. काही निम्नस्तरीय जीव वगळता, बहुसंख्य प्राण्यांचे लैंगिक प्रजनन, तसेच वनस्पतींतील लैंगिक आणि अलैंगिक (कलमी) प्रजनन हे ते प्रकार होत. सस्तन प्राण्यांसारख्या सर्वच उत्क्रांत जीवांमध्ये केवळ लैंगिक पद्धतीनेच प्रजोत्पादन शक्य आहे. परंतु अशा लैंगिक प्रजोत्पादनात पुढील पिढी आधीच्यापिढीच्या दोन जीवांच्या मिश्र गुणधर्माचीच असते. त्यामुळे अल्फान्सो (हापूस) आंब्याचे अथवा एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण गुलाबाचे शतप्रतिशत गुण असणारे नवे झाड उत्पन्न करणे जसे सुलभ होते तसे सस्तन प्राण्यांच्या बाबतीत आतापर्यंत अशक्यच होते. परंतु एखाद्या प्राण्याची शतप्रतिशत प्रत (copy) तयार करण्याचे स्वप्न मात्र आधुनिक जीवशास्त्रज्ञ फार पूर्वीपासूनच पाहत होते.
पुदुकोट्टाई – एक अनुभव
पुदुकोट्टाई हा एक तामिळनाडू राज्यातील जिल्हा. हा भारताच्या अगदी आग्नेयेला, बंगालच्या उपसागराला लागून आहे. अत्यंत मागासलेला जिल्हा. गरिबी, निरक्षरता अगदी भारतीय परिमाणानेही भरपूर. सामाजिक व आर्थिक विकासाला पूर्ण पारखा! अशा या जिल्ह्यात १९९० नंतर प्रौढ साक्षरतेसाठी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली.
प्रौढ साक्षरतेचा कार्यक्रम भारताच्या अंदाजे ४७० जिल्ह्यांत १९९० च्या सुमारास सुरू केला गेला. त्या अन्वये वेगवेगळ्या जिल्ह्यांनी प्रौढ म्हणून वेगवेगळे वयोगट कार्यक्रमाखाली घेतले. कोणी ९ ते ३५ वयोगट, कोणी १५ ते ३५ वयोगट, तर पुदुकोट्टाईमध्ये ९ ते ४५ वयोगट साक्षर करण्यासाठी निवडला.
धर्मनिरपेक्षतेला आव्हान!
धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? यासंबंधी स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणाच्या व्यक्ती आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये मतभेद आहेतच. पण स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणारे ज्यांना सांप्रदायिक समजतात त्या सांप्रदायिक जातिवादी शक्तीही स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात. यापुढे जाऊन त्यांचा तर असा दावा आहे की भारतातील स्वतःला पुरोगामी व धर्मनिरपेक्ष समजणारेच ‘स्युडो सेक्युलरिस्ट’ असून आपणच तेवढे खरेखुरे राष्ट्रवादी व धर्मनिरपेक्ष आहोत. यापुढे धर्मनिरपेक्षतेवरील चर्चा आपणाला पुन्हा पुन्हा त्याच आवर्तात अडकलेली दिसते. म्हणून या लेखात पुन्हा एकदा धर्मनिरपेक्षतेची तात्त्विक व व्यावहारिक अशा दोन्ही दृष्टिकोणातून चर्चा करण्याचे ठरविले आहे.
भारतीय राज्यघटनेला धर्मनिरपेक्षतेचा जो अर्थ अभिप्रेत आहे तशा अर्थी आज भारतीय लोकजीवनात धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे काय?धर्मनिरपेक्ष
आमच्या मुलीच्या लग्नाची गोष्ट
काही दिवसापूर्वी आमच्या मुलीचेलग्नझाले. विवाहसमारंभअगदी सुटसुटीत घरगुती पद्धतीने केला. परंतु आप्तेष्टांना मुलामुलीची माहिती, लग्नाची खबर देऊन त्यांच्या शुभेच्छांची, आशीर्वादाची आवर्जून मागणी केली. हे विवाहसूचनेचे पत्र आमच्या एका स्नेहातल्या बाईंना इतके आवडले की त्यांनी त्याचा गोषवारा एका सांजदैनिकात प्रसिद्ध केला. परिणामी पाच-सहा फोन व चार-पाच पत्रे आली, काहींनी छापील पत्राची प्रतही मागितली. माझ्या एका मित्राने ही पत्रिकाच पुढे करून आपल्या मुलाचा विवाहही साधासुटसुटीत व्हावा यासाठी प्रयत्न केला! या सर्वांवरून लक्षात आले की आपल्या समाजात साधा सुटसुटीत विवाह हीसुद्धा समाजसुधारणा गणली जाते! विवाह ठरवितानाही आम्ही काही एक निश्चित विचारधारा डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला.
आठवे वर्ष
हा आठव्या वर्षाचा पहिला अंक. तो वाचकांकडे रवाना करताना आम्हाला बरेच समाधान वाटत आहे. सात वर्षांपूर्वी आम्ही ज्या गोष्टी करण्याचे जाहीर केले त्यांपैकी काही थोड्याबहुत प्रमाणात आम्ही साध्य केल्या आहेत अशी आमची समजूत आहे.
आजचा सुधारक हे महाराष्ट्रातील एकमेव विवेकवादी मासिक तेव्हा होते आणि आजही ते एकटेच पाय रोवून उभे आहे. कोठल्याही प्रकारच्या तडजोडी न करता विवेकवादाचे निशाण फडकत ठेवावयाचे ही आमची प्रतिज्ञा आम्ही बर्या्चप्रमाणात निभावली असे आम्हाला वाटते. वाचकांचीही आम्हाला बर्यानपैकी साथ मिळाली आहे. एकूण वर्गणीदारांची संख्या साडेसहाशेच्या घरात गेली ही गोष्ट फारशी उत्साहवर्धक नाही हे खरे; पण ती संख्या हळूहळू का होईना वाढत आहे, कमी होत नाही.