विषय «इतर»

धर्मसुधारणा – एक वदतोव्याघात : प्रा. स. ह. देशपांडे यांना उत्तर

आजचा सुधारक, जानेवारी ९६ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘धर्म, सुधारणा आणि विवेक या माझ्या लेखावर प्रा. स. ह. देशपांडे यांनी मार्चच्या अंकात बरेच सविस्तर विवेचन करणारा लेख लिहिला आहे. माझ्या लेखाची दखल घेतल्याबद्दल मी प्रा. देशपांड्यांचा ऋणी आहे, आणि स्वतःबरोबरच अन्य सर्व वाचकांचीही माझी प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा असणार असे मधाचे बोट त्यांनी लावले असल्याने त्यांना उत्तर देणे भाग आहे हे ओळखून मी पुढील मजकूर लिहीत आहे.
लेखारंभीच धर्मसुधारणा हा शब्द मला वदतोव्याघात वाटतो या माझ्या विधानाविषयी प्रा. देशपांडे म्हणतात की धर्मसुधारणा ही प्रत्यक्ष अस्तित्वात असणारी गोष्टआहे, त्यामुळे तिच्यात व्याघात आहे असे म्हणणे बरोबर नाही.

पुढे वाचा

पुन्हा एकदा “सततचा पहारा”

नोव्हें. ९५ च्या आजच्या सुधारकात ज्ञान मिळवण्याच्या मार्गाबद्दल “सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे” या नावाचा एक लेख मी लिहिला. “The price of liberty is eternalvigilance” या वचनाचे भापांतर शीर्षक म्हणून वापरले. विवेकवादी भूमिकेतून साक्षात्कार व अंतःस्फूर्ती हे ज्ञान कमवायचे मार्ग कसे दिसतात, ते पहायचा प्रयत्न होता. असे काही मार्ग आहेत, हे एकदा मान्य केले, की त्या मार्गांनी मिळालेले ज्ञान खुद्द ज्ञानार्जन करणारा सोडून इतरांना “बाबावाक्य म्हणून मान्य करावे लागते. हा अखेर विवेकवाद्याच्या स्वातंत्र्यावर घाला ठरतो. म्हणून अशा ज्ञानमार्गाबाबतचे दावे फार काळजीपूर्वक तपासायला हवेत, असा लेखाचा सूर होता.

पुढे वाचा

रहस्य, जीवोत्पत्तीचे

रोम येथील व्हॅटिकनच्या सिस्टीन चॅपेलच्या छतावर Creation of Adam हे चित्र रखाटले आहे. मुळामध्ये शिल्पकार असूनही चित्रकार बनलेल्या मायकेल अँजेलोची ही भव्य कलाकृती आहे. या चित्रात निवृक्ष टेकडीवर पहुडलेल्या अॅडमने आपला डावा बाहू पुढे केलेला आहे. आकाशातून परमेश्वर देवदूतांसह अवतीर्ण होत आहे; त्याने अॅडममध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आपल्या उजव्या हाताची तर्जनी अॅडमच्या पुढे केलेल्या हाताच्या तर्जनीजवळ नेलेली आहे. या प्रख्यात भित्तिचित्रात बायबलप्रणीत संकल्पनेचे उत्कृष्ट भव्य दर्शन घडते. परमेश्वराने सर्व प्राणी आणि अर्थातच मनुष्य निर्माण केला आणि त्यात प्राण ओतला ही कल्पना अनेक धर्मामध्ये आढळते.

पुढे वाचा

न्यायाधीश आणि अंधश्रद्धा

सर्वोच्च न्यायालयाचे आपल्या घटनेत विशेष स्थान आहे. आजकाल ज्या घटना घडत आहेत त्यामुळे तर त्या न्यायालयाबद्दलचा नागरिकांचा आदर अनेकपटींनी वाढला आहे व अपेक्षाही वाढल्या आहेत.
अशा वेळी या न्यायालयाचे पद भूषविणारे एक न्यायाधीश के. रामस्वामी यांनी नुकत्याच दिलेल्या एका निकालातील विधाने आश्चर्यजनक आहेत.
भूमिसंपादनाचे हे प्रकरण शिरडीच्या साईबाबा संस्थानचे. या संस्थानाला शिरडीचे साईबाबा मंदिर व द्वारकामाई मंदिर यांना जोडणार्या. रस्त्याकरिता बाजीराव कोते यांची जमीन व घर पाहिजे होते. खाजगी वाटाघाटी यशस्वी न झाल्यामुळे शासनाकरवी सार्वजनिक उपयोगाकरिता मालमत्ता संपादन करण्याची कारवाई सुरू झाली.

पुढे वाचा

हिंदुत्व -प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे

‘हिंदुत्व एक अन्वेषण’ या लेखासंबंधी आजच्या सुधारकात, प्रश्न करणाच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रा. आचार्यांनी ऐतिहासिक विधानांच्या सत्यासत्यतेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. श्री. रिसबुडांनी या विषयाच्या अनुषंगाने आपली वैचारिक प्रतिक्रिया मांडलेली आहे. या दोन्ही विचारवंतांच्या प्रतिक्रिया मननीय आहेत. हिंदुत्वासंबंधी आमच्या विधानांना या विद्वानांचा फारसा आक्षेप असलेला दिसत नाही. तरीपण या विचारवंतांनी लेखनातील ज्या नेमक्या त्रुटी दाखविल्या आहेत त्या भरून काढण्यापूर्वी या लेखामागे असणारी आमची मनोभूमिका प्रदर्शित करणे आवश्यक वाटते. हिंदुत्व ही संकल्पना विशिष्ट गटापुरती का होईना रूढ झालेली आहे. ती नाकारण्यात अर्थ नाही.

पुढे वाचा

अंताजीची बखर’ : एक ऐतिहासिक कादंबरी,वेगळ्या दृष्टिकोणातून

अंताजीची बखर ही बखरीचा घाट दिलेली कादंबरी अर्थात् ही ऐतिहासिक कादंबरी आहे. तिच्यात खरा इतिहास आहेच, पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोणातून पाहिलेला आहे. ही आगळी दृष्टी हेच या कादंबरीचे मुख्य वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास मराठ्यांचाच पण प्रकाशझोत वेगळ्या क्षेत्रावर टाकला आहे. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेचा उपयोग एखादा पताकास्थानासारखा करून लेखकाने आपल्या दृष्टिकोणाचा परिचय करून दिला आहे.
अर्पण पत्रिका म्हणते :
‘सर्वश्री रणजित देसाई, ना. सं. इनामदार, वासुदेव बेलवलकर, गो. नी. दांडेकर, ब. मो. पुरंदरे, वि. ना. हडप, नाथमाधव….. आणि हो…. जॉर्ज मॅकडॉनल्ड फ्रेञ्जर यांस हे लिखाण सादर, सप्रेम अर्पण’
१.

पुढे वाचा

समाजसुधारणा, पुनर्घटना आणि डॉ. केतकर

अमेरिकेस गेल्यानंतर आपण काय करावे याचे मनापुढे कोणतेच कल्पनाचित्र नव्हते’ असे म्हणणारे केतकर, तेथील विद्यार्जन आटोपताच,
जाई देशी, कार्यलागे स्वजनांच्या कल्याणा
असे कृतनिश्चय होऊन परतले होते. अमेरिका आणि इंग्लंडमधील वास्तव्यातज्ञानकोशाचा उपयोग त्यांनी पाहिला होता. तयार ज्ञान तत्काळ हाताशी असणे याचा फायदा इंग्रजी सुशिक्षितांस सहज मिळत होता. तसा ज्ञानकोश मराठीच असावा असे त्यांना वाटू लागले. एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका वरील अमेरिकन समाजाचे काही आक्षेप त्यांना पटले होते; त्यामुळे ज्ञानकोशात सर्व ज्ञानाचा संग्रह व्हायचा असला तरी तो संग्रह ज्ञानकोश ज्या समाजासाठी असेल त्याच्या गरजांप्रमाणे ठेवला पाहिजे असे त्यांनी ठरविले.

पुढे वाचा

एकविसाव्या शतकात स्त्रियांच्या जगात पुरुषाचे स्थान

जीवशास्त्र व आनुवंशिकताविज्ञानाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा अभ्यास केला तर असे जाणवते की एकविसाव्या शतकाच्या मध्यावर एखाद्या जोडप्याला मूल हवे असेल तर मुलगीच पाहिजे असा आग्रह धरला जाईल. कुठलाही सुज्ञ मनुष्य मुलगा हवा अशी इच्छा करणार नाही. सबल पुरुष व अबला स्त्री ही संकल्पना कालबाह्य होईल. वैद्यकशास्त्राप्रमाणे जन्माला आलेला मुलगा गर्भावस्थेतूनच काही ना काही आनुवंशिक रोगांची शिकार झालेला असतो. ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे मुलींमध्ये मुलांपेक्षा जरूरीपेक्षा जादा आढळणारे एक्स हे गुणसूत्र असावे. मुलामध्ये एखादे बिघडलेले गुणसूत्र असेल तर ती चूक निस्तरण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही.

पुढे वाचा

वास्तवे आणि मूल्ये

निसर्ग किंवा इतिहास कोणीही आपण काय करावे हे शिकवू शकत नाही. नैसर्गिक किंवा ऐतिहासिक वास्तवे (facts) यांपैकी कोणीही आपले निर्णय घेऊ शकत नाही. आपण कोणती साध्ये स्वीकारणार आहोत हे ती सांगू शकत नाहीत. निसर्गात किंवा इतिहासात हेतू आणि अर्थ आपण घालतो. मनुष्ये समान नाहीत; परंतु समान हक्कांकरिता झगडायचे आपण ठरवू शकतो. राज्यासारख्या मानवी संस्था विवेकी नसतात; परंतु आपण त्यांना विवेकी करण्याकरिता लढा करण्याचे ठरवू शकतो. आपण आणि आपली साधारण भाषा सामान्यपणे विवेकी नसून भावनिक असते; पण आपण थोडे अधिक विवेकी होण्याचे ठरवू शकतो, आणि आपली भाषा आपले रोमांचवादी शिक्षणतज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ‘आत्माविष्काराकरिता नव्हे, तर विवेकी संज्ञापनाकरिता (communication) वापरण्याचे स्वतःला शिकवू शकतो.

पुढे वाचा

महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास

महाराष्ट्रातील विद्यापीठांत आणि महाविद्यालयांत तत्त्वज्ञानाचे जे अध्ययनअध्यापन सध्या चालू आहे त्याचे स्वरूप काय आहे? आणि त्याची अवस्था काय आहे?
वाचक विचारतील, काय झालं आहे तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला? आमची तर सर्व काही आलबेल आहे अशी कल्पना आहे. तत्त्वज्ञानाचे उद्बोधनवर्ग (refresher courses) नेमाने होताहेत आणि त्यात सर्व प्राध्यापक न चुकता हजेरी लावताहेत. वर्षातून दहा-पाच तरी पीएच.डी. बाहेर पडत आहेत. सेमिनार्स, वर्कशॉप्स, समरस्कूल्स इ. दरवर्षी होताहेत. एकूण चित्र तर फारच आशादायी दिसतंय.’ काही विचारतील की ‘तत्त्वज्ञानाचीच विशेष दखल घ्यायचे कारण काय? अन्य विषयांची जी स्थिती आहे तिच्याहून तत्त्वज्ञानाची वेगळी असण्याचे कारण काय?’

पुढे वाचा