आजचा सुधारक, जानेवारी ९६ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘धर्म, सुधारणा आणि विवेक या माझ्या लेखावर प्रा. स. ह. देशपांडे यांनी मार्चच्या अंकात बरेच सविस्तर विवेचन करणारा लेख लिहिला आहे. माझ्या लेखाची दखल घेतल्याबद्दल मी प्रा. देशपांड्यांचा ऋणी आहे, आणि स्वतःबरोबरच अन्य सर्व वाचकांचीही माझी प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा असणार असे मधाचे बोट त्यांनी लावले असल्याने त्यांना उत्तर देणे भाग आहे हे ओळखून मी पुढील मजकूर लिहीत आहे.
लेखारंभीच धर्मसुधारणा हा शब्द मला वदतोव्याघात वाटतो या माझ्या विधानाविषयी प्रा. देशपांडे म्हणतात की धर्मसुधारणा ही प्रत्यक्ष अस्तित्वात असणारी गोष्टआहे, त्यामुळे तिच्यात व्याघात आहे असे म्हणणे बरोबर नाही.
विषय «इतर»
पुन्हा एकदा “सततचा पहारा”
नोव्हें. ९५ च्या आजच्या सुधारकात ज्ञान मिळवण्याच्या मार्गाबद्दल “सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे” या नावाचा एक लेख मी लिहिला. “The price of liberty is eternalvigilance” या वचनाचे भापांतर शीर्षक म्हणून वापरले. विवेकवादी भूमिकेतून साक्षात्कार व अंतःस्फूर्ती हे ज्ञान कमवायचे मार्ग कसे दिसतात, ते पहायचा प्रयत्न होता. असे काही मार्ग आहेत, हे एकदा मान्य केले, की त्या मार्गांनी मिळालेले ज्ञान खुद्द ज्ञानार्जन करणारा सोडून इतरांना “बाबावाक्य म्हणून मान्य करावे लागते. हा अखेर विवेकवाद्याच्या स्वातंत्र्यावर घाला ठरतो. म्हणून अशा ज्ञानमार्गाबाबतचे दावे फार काळजीपूर्वक तपासायला हवेत, असा लेखाचा सूर होता.
रहस्य, जीवोत्पत्तीचे
रोम येथील व्हॅटिकनच्या सिस्टीन चॅपेलच्या छतावर Creation of Adam हे चित्र रखाटले आहे. मुळामध्ये शिल्पकार असूनही चित्रकार बनलेल्या मायकेल अँजेलोची ही भव्य कलाकृती आहे. या चित्रात निवृक्ष टेकडीवर पहुडलेल्या अॅडमने आपला डावा बाहू पुढे केलेला आहे. आकाशातून परमेश्वर देवदूतांसह अवतीर्ण होत आहे; त्याने अॅडममध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आपल्या उजव्या हाताची तर्जनी अॅडमच्या पुढे केलेल्या हाताच्या तर्जनीजवळ नेलेली आहे. या प्रख्यात भित्तिचित्रात बायबलप्रणीत संकल्पनेचे उत्कृष्ट भव्य दर्शन घडते. परमेश्वराने सर्व प्राणी आणि अर्थातच मनुष्य निर्माण केला आणि त्यात प्राण ओतला ही कल्पना अनेक धर्मामध्ये आढळते.
न्यायाधीश आणि अंधश्रद्धा
सर्वोच्च न्यायालयाचे आपल्या घटनेत विशेष स्थान आहे. आजकाल ज्या घटना घडत आहेत त्यामुळे तर त्या न्यायालयाबद्दलचा नागरिकांचा आदर अनेकपटींनी वाढला आहे व अपेक्षाही वाढल्या आहेत.
अशा वेळी या न्यायालयाचे पद भूषविणारे एक न्यायाधीश के. रामस्वामी यांनी नुकत्याच दिलेल्या एका निकालातील विधाने आश्चर्यजनक आहेत.
भूमिसंपादनाचे हे प्रकरण शिरडीच्या साईबाबा संस्थानचे. या संस्थानाला शिरडीचे साईबाबा मंदिर व द्वारकामाई मंदिर यांना जोडणार्या. रस्त्याकरिता बाजीराव कोते यांची जमीन व घर पाहिजे होते. खाजगी वाटाघाटी यशस्वी न झाल्यामुळे शासनाकरवी सार्वजनिक उपयोगाकरिता मालमत्ता संपादन करण्याची कारवाई सुरू झाली.
हिंदुत्व -प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे
‘हिंदुत्व एक अन्वेषण’ या लेखासंबंधी आजच्या सुधारकात, प्रश्न करणाच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रा. आचार्यांनी ऐतिहासिक विधानांच्या सत्यासत्यतेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. श्री. रिसबुडांनी या विषयाच्या अनुषंगाने आपली वैचारिक प्रतिक्रिया मांडलेली आहे. या दोन्ही विचारवंतांच्या प्रतिक्रिया मननीय आहेत. हिंदुत्वासंबंधी आमच्या विधानांना या विद्वानांचा फारसा आक्षेप असलेला दिसत नाही. तरीपण या विचारवंतांनी लेखनातील ज्या नेमक्या त्रुटी दाखविल्या आहेत त्या भरून काढण्यापूर्वी या लेखामागे असणारी आमची मनोभूमिका प्रदर्शित करणे आवश्यक वाटते. हिंदुत्व ही संकल्पना विशिष्ट गटापुरती का होईना रूढ झालेली आहे. ती नाकारण्यात अर्थ नाही.
अंताजीची बखर’ : एक ऐतिहासिक कादंबरी,वेगळ्या दृष्टिकोणातून
अंताजीची बखर ही बखरीचा घाट दिलेली कादंबरी अर्थात् ही ऐतिहासिक कादंबरी आहे. तिच्यात खरा इतिहास आहेच, पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोणातून पाहिलेला आहे. ही आगळी दृष्टी हेच या कादंबरीचे मुख्य वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास मराठ्यांचाच पण प्रकाशझोत वेगळ्या क्षेत्रावर टाकला आहे. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेचा उपयोग एखादा पताकास्थानासारखा करून लेखकाने आपल्या दृष्टिकोणाचा परिचय करून दिला आहे.
अर्पण पत्रिका म्हणते :
‘सर्वश्री रणजित देसाई, ना. सं. इनामदार, वासुदेव बेलवलकर, गो. नी. दांडेकर, ब. मो. पुरंदरे, वि. ना. हडप, नाथमाधव….. आणि हो…. जॉर्ज मॅकडॉनल्ड फ्रेञ्जर यांस हे लिखाण सादर, सप्रेम अर्पण’
१.
राष्ट्रवादाच्या उठावाची माहितीपूर्ण चिकित्सा
जगाच्या नव्या रचनेत राष्ट्रवादाचे स्थान काय राहील, हा प्रश्न सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना वारंवार पडतो. विशेषतः दुसऱ्यार महायुद्धानंतर ही चर्चा सुरू झालीआणि इतिहासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यानंतर या चर्चेने जोर धरलेला दिसून येतो. सुरुवातीला दळणवळणक्रांती आणि आर्थिक-सांस्कृतिक सहकार्य यामुळे राष्ट्रीय ।।। अस्मिता पुसट होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ‘बहुराष्ट्रीय भांडवलशाहीमुळे राष्ट्रवादाचा अस्त होईल, असे काहींना वाटत होते, तर दुसऱ्या- बाजूला मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने ही प्रक्रिया लवकर घडून येईल, असे बरेच जण मानत होते. प्रत्यक्षात । काय घडते आहे? विविध देशांमधील परिस्थितीचा अभ्यास करणार्या- तज्ज्ञांचे निबंध संकलित करून डेव्हिड हुसॉन यांनी या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
लैंगिक मुक्ती आणि स्वैराचार
स्त्रियांची लैंगिक मुक्ती व स्वैराचार यातला फरक भारतीय व आशियामधल्या (बहुतेक) स्त्रीपुरुषांना समजणे कठीण जाते याचा प्रत्यय परत श्री गलांडे यांच्या (नोव्हें. ९५) पत्रातून आला. म्हणून परत लैंगिक मुक्ती व स्वैराचार ह्यांच्या (माझ्या) व्याख्या लिहिते.
लैंगिक स्वातंत्र्य अथवा मुक्ती असणे म्हणजे शरीरसंबंधास हो किंवा नाही म्हणण्याची संपूर्ण समाजमान्य मुक्तता.
स्वैराचार म्हणजे असंख्य मित्रमैत्रिणींशी अल्प परिचयात शरीरसंबंध, मजा म्हणून one night stand व वेश्यागमन.
स्त्रियांची अत्यंत हानी त्यांच्या लैंगिक पावित्र्याला अवास्तव दिलेल्या महत्त्वामुळे झालेली आहे. म्हणून मला स्त्रियांची लैंगिक मुक्ती हवी आहे.
समाजसुधारणा, पुनर्घटना आणि डॉ. केतकर
अमेरिकेस गेल्यानंतर आपण काय करावे याचे मनापुढे कोणतेच कल्पनाचित्र नव्हते’ असे म्हणणारे केतकर, तेथील विद्यार्जन आटोपताच,
जाई देशी, कार्यलागे स्वजनांच्या कल्याणा
असे कृतनिश्चय होऊन परतले होते. अमेरिका आणि इंग्लंडमधील वास्तव्यातज्ञानकोशाचा उपयोग त्यांनी पाहिला होता. तयार ज्ञान तत्काळ हाताशी असणे याचा फायदा इंग्रजी सुशिक्षितांस सहज मिळत होता. तसा ज्ञानकोश मराठीच असावा असे त्यांना वाटू लागले. एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका वरील अमेरिकन समाजाचे काही आक्षेप त्यांना पटले होते; त्यामुळे ज्ञानकोशात सर्व ज्ञानाचा संग्रह व्हायचा असला तरी तो संग्रह ज्ञानकोश ज्या समाजासाठी असेल त्याच्या गरजांप्रमाणे ठेवला पाहिजे असे त्यांनी ठरविले.
एकविसाव्या शतकात स्त्रियांच्या जगात पुरुषाचे स्थान
जीवशास्त्र व आनुवंशिकताविज्ञानाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा अभ्यास केला तर असे जाणवते की एकविसाव्या शतकाच्या मध्यावर एखाद्या जोडप्याला मूल हवे असेल तर मुलगीच पाहिजे असा आग्रह धरला जाईल. कुठलाही सुज्ञ मनुष्य मुलगा हवा अशी इच्छा करणार नाही. सबल पुरुष व अबला स्त्री ही संकल्पना कालबाह्य होईल. वैद्यकशास्त्राप्रमाणे जन्माला आलेला मुलगा गर्भावस्थेतूनच काही ना काही आनुवंशिक रोगांची शिकार झालेला असतो. ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे मुलींमध्ये मुलांपेक्षा जरूरीपेक्षा जादा आढळणारे एक्स हे गुणसूत्र असावे. मुलामध्ये एखादे बिघडलेले गुणसूत्र असेल तर ती चूक निस्तरण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही.