आगरकरांनी आपल्या लिखाणातून कौटुंबिक सुधारणांवर अधिक भर दिला असला तरी काही राजकीय-सामाजिक-आर्थिक प्रश्नही हाताळले आहेत. एवढेच नव्हे तर ब्राह्मणी परंपरेतील अन्य सुधारकांपेक्षा अधिक साक्षेपाने त्यांनी त्यांचा ऊहापोह केला आहे. हिंदु समाजातील जातिभेद, उच्चनीचता, अस्पृश्यता यावर आगरकरांनी टीका केली आहे. जातिभेदांची उपयोगिता संपली असून ते सामाजिक प्रगतीच्या आड येत असल्यामुळे क्रमशः ते नष्ट व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जन्माधिष्ठित जातिव्यवस्था व्यक्तिविकासाला कशी मारक ठरते हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. त्यांच्या मते, जन्मतः सारखेच हक्क व योग्यता घेऊनआलेल्या व्यक्तींचे ते हक्क व योग्यता पुढे त्याच्या जातिधर्मावर नव्हे तर कमीअधिक बुद्धिविकासावर व उद्यमशीलतेवर अवलंबून असावी.
विषय «इतर»
तेहतीस कोटी देव आणि एक असहाय अबला
हिंदू कायदा स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती धरत नाही, नवर्या.ची मालकी मानतो. इंग्रजी सरकार सामाजिक रूढीत हात घालायचा नाही म्हणून स्वस्थ बसते. ही तटस्थता जिथे लाभाचा प्रश्न येतो तेव्हा का दाखवत नाही? पारंपारिक हिंदूपेक्षा हे सरकार जास्त जुलमी आहे. कारण एका बाजूला ते स्त्रीला शिक्षण व स्वातंत्र्य घ्यायला सांगते आणि रखमाबाईसारखी एखादी सुशिक्षित स्त्री नकोशा नवर्याषची गुलामगिरी नाकारू लागली तर तिला बंधनात बांधायला साधन होते. माझा हिंदू कायद्याचा अभ्यास आहे, त्यात अशा प्रकारची सरकारची कृती कुठेही बसू शकत नाही. हिंदू कायद्यानुसार नवर्यासकडे न गेल्यास तिला जातिनियमाने काही शिक्षा होऊ शकेल.
धर्म आणि मूलगामी मानवतावाद (Radical Humanism)
Radical Humanism (मूलगामी मानवतावाद) या नावाने सुमारे साठ वर्षे अस्तित्वात असलेल्या तत्त्वज्ञानाचे मुखपत्र ‘The Radical Humanist’ या नावाने श्री. व्ही. एम. तारकुंडे यांच्या संपादकत्वाखाली दिल्लीहून प्रसिद्ध होत असते. मानवेंद्रनाथ रॉय यांनी स्थापन केलेल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक तत्त्वज्ञानाच्या प्रसाराकरिता त्याचे प्रकाशन होत असते. विवेकवाद (rationalism) आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यावर आधारलेल्या आणि स्वातंत्र्य, समता व न्याय या मूल्यांचा पुरस्कार करणाच्या विचारसरणीचा प्रसार करण्याकरिता Radical Humanist Association ही संस्था प्रयत्न करीत असते.
	या संस्थेचे स्मरण आज होण्याचे कारण तिच्या मुखपत्राच्या फेब्रुवारी ९५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला संपादकीय लेख.
बंडखोर पंडिता (भाग ३)
रमाबाईंनी हिंदू धर्म सोडला, पण हिंदुस्थानची नाळ तोडली नाही, बाईंनी हिंदुसंस्कृतीचा त्याग केला नाही याची विपुल उदाहरणे त्यांच्या चरित्रात आहेत.
‘तुमचे आईवडील सद्धर्माने (ख्रिस्ती धर्माने) देऊ केलेल्या तारणाला वंचित झाले’, असे कुणीसे म्हणाले. त्यावर ताड्कन त्या उत्तरल्या : ‘माझे आई-वडील इतके परमेश्वरभक्त, कनवाळू व सच्चरित्र होते की, त्यांच्या बाबतीत असा संशय व्यक्त केला तरी मला सहन होणार नाही. अमेरिकेत अल्पावधीत लोकप्रियता पावलेले त्यांचे पुस्तक The High-Caste Hindu Woman आईला अर्पण करताना त्या लिहितात, ‘जिचा मधुर संस्कार व समर्थ शिकवण माझ्या जीवनाला सतत मार्गदर्शक ठरली व माझ्या जीवनाला प्रकाशित करीत राहिली त्या माझ्या प्रियतम आईस – आदरपूर्वक समर्पण.’
अमेरिकेतील लोकांची लैंगिकता
सैन्य पोटावर चालते अशी जुनी सार्थ म्हण आहे! सैन्यच नव्हे, तर प्राणिमात्र पोटाखातरच चालत असतात असे म्हटले तर वावगे ठरू नये, उदरभरण ही प्रत्येक जीवाची दैनंदिन प्रेरणा असून या प्रेरणेमुळेच सर्व जीवांच्या जीवनातील मोठा काल व यत्न व्यतीतहोतात. उदरभरणानंतर प्रत्येक जीवाची धडपड असते प्रजननासाठी, जगण्याइतकीच महत्त्वाची प्रजोत्पादनाची प्रेरणा जीवसृष्टीत आढळते. मानवी समाजातही प्रजोत्पादनाची प्रेरणा फार महत्त्वाची आहे. सृष्टीतील बहुसंख्य जीव लैंगिक प्रजोत्पादनच करतात. या प्रकारच्या प्रजोत्पादनासाठी प्रत्येक जीवास लिंगपेशी उत्पन्न करून, त्यांचा दुसऱ्या जीवाने उत्पन्न केलेल्या लिंगपेशींबरोबर संयोग घडवून आणावा लागतो.
समतेचे मिथ्य!
गेल्या काही अंकांत सुरू असलेल्या स्त्रीस्वातंत्र्याच्या चर्चेत नी. र. वऱ्हाडपांडे यांचा “समतेचे मिथ्य” हा लेख काही मौलिक भर घालील असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही. उदाहरणार्थ, समता, न्याय या संदर्भात दि. य. देशपांडे म्हणतात तसे वऱ्हाडपांडे वेड घेऊन पेडगावला जातात. पूर्वी दसर्यानला एका ताटात तांदूळ घेऊन, त्यात “रावण” रेखूनत्या रावणाला मारीत असत. वऱ्हाडपांडे असेच करतात.
	जेव्हा आपले विवेचन एखाद्या पूर्वपक्षाला दिलेल्या उत्तराच्या रूपात असते, तेव्हा पूर्वपक्ष निःपक्षपातीपणाने व त्याच्या सर्व बलस्थानांसह मांडून मगच त्याचा समाचार घ्यायला हवा. त्याऐवजी पूर्वपक्षाचे दुर्बल व विकृत रूप मांडण्याने चर्चेची पातळी खालावते.
विक्रम आणि वेताळ
विक्रमादित्याला आता अनेक शतके वेताळाला खांद्यावर घेऊनच हिंडायची सवय झाली होती. त्याचे उत्तर तयार होते. ‘वेताळा, मला संभ्रमात पाडण्याचे तुझे नियत कार्य तू आपल्यापरीने केलेस. तसे करताना तू मूळ प्रश्नावर अनेक रंगांचे थरही दिलेस. तणाव असह्य होऊन कोवळ्या वयात आत्महत्या करणे भाग पडावे ही घटना निःसंशय दुष्ट.’
	‘जगातले सर्व विचारवंत एखादी कृती करणे असेल तेव्हा प्रश्न व्यक्तिगत, फार तर कौटुंबिक पातळीवर सोडवतात. तुझ्या तिरस्काराला पात्र असलेल्या इंग्रजीत याला micro-level असे म्हणतात. जेव्हा क्रिया करणे नसेल तेव्हा तोच प्रश्न व्यापक पातळीवर macro-level वर नेऊन सर्वव्यापी उत्तर शोधतात.
चर्चा : खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ६)
स्त्रियांवर अन्याय करणारी, मुख्यतः त्यांनाच दुःखात लोटणारी विवाहसंस्था व तिच्यासोबत उदय पावलेले अनेक समज- उदा. पातिव्रत्य, प्रत्यक्ष परमेश्वरानेच घालून दिलेल्या पतिपत्नींच्या गाठी, जन्मोजन्मी एकच पती असावा असा फक्त स्त्रियांवर केला जाणारा संस्कार, (जन्मोजन्मी एकच पत्नी असावी असा पुरुषाने विचार करून त्यासाठी काम्य व्रतांचे पालन केल्याचे कोठे ऐकिवात नाही. उलट त्याने आपल्या धर्मपत्नीला टाकून देऊन तिची परोपरीने कुचंबणा केल्याची उदाहरणे अनंत आहेत!) त्याच अनुषंगाने विवाहविधीचेआणि स्त्रीयोनीचे पावित्र्य – हे सारे मानवनिर्मित आहेत; त्यांविषयीच्या कल्पना भिन्नभिन्न काळांत व प्रदेशांत बदललेल्या आहेत; त्यांमध्ये सनातन किंवा शाश्वत असे काही नाही हे एकदा मनामध्ये स्पष्ट झाले की स्त्रियांचे दुःख कमी करण्यासाठी सध्याच्या एतद्विषयक परिस्थितीमध्ये परिवर्तनीय काय आहे हे ठरविण्याची आपल्यावर जबाबदारी येते.
समतेचे मिथ्य?
आमचे मित्र डॉ. नी. र. वर्हा डपांडे यांचा ‘समतेचे मिथ्य या शीर्षकाचा एक लेख याच अंकात इतरत्र छापला आहे. त्यात त्यांनी आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या स्त्रीमुक्तिवादी लिखाणावर जोरदार हल्ला चढविला आहे. आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेले या विषयावरील लिखाण अत्यंत अज्ञतेचे असून ते करणार्याआ लोकांचा या विषयाच्या मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय व ऐतिहासिक संशोधनाचा काडीचाही अभ्यास नसतो, एवढेच नव्हे तर ते त्या लेखकांचे ‘जैविकीचे व मानसशास्त्राचे प्राथमिक अज्ञान दर्शविते असे ते म्हणतात. लेखाच्या शेवटी ते लिहितात की आजच्या सुधारकाने अभ्यासशून्य, बेजबाबदार व पुरोगामी हा छाप आपल्यावर लागावा या एकमात्र उद्देशाने लिहिलेले लिखाण प्रसिद्ध केल्याने तो आपल्या समाजप्रबोधनाच्या कर्तव्यात कसूर करीतआहे असे म्हणण्यास जागा होते.
चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?
फेब्रुवारी १९९५ अंकामध्ये माझ्या लेखमालेचा पाचवा भाग प्रकाशित झाल्यानंतर मला जी पत्रे आली ती पुढे दिली आहेत. बहुतेक सार्या पत्रलेखकांनी सध्याच्या स्त्रीपुरुषसंबंधविषयक संकल्पनांमुळे मुख्यतः स्त्रियांवर गुलामगिरीसदृश अन्याय होतो ह्या माझ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे, त्याबद्दल मौन बाळगले आहे. त्यांनी सद्यःपरिस्थितीमध्ये माझ्या कल्पना कश्या व्यवहार्य नाहीत, रोगापेक्षा उपचार कसा भयंकर आहे, मी कसा स्वप्नात वावरत आहे किंवा माझ्या सूचनांमुळे कसा स्वैराचार माजणार आहे ह्याचाच सविस्तर ऊहापोह केला आहे. मी (दिवाकर पुरुषोत्तम मोहनी) कोणी एक राजा आहे. वा स्मृतिकार आहे व मी फर्मान काढल्याबरोबर स्त्रियांना लैंगिक स्वायत्तता प्राप्त होऊन स्त्रीमुक्ती प्रत्यक्षात येणार आहे अशी कल्पना करून घेऊन माझ्यावर बहुतेकांनी टीका केली आहे.