विषय «इतर»

हिन्दुत्व-अन्वेषण (पूर्वार्ध)

या लेखाचे प्रयोजन आहे काय? जनमानसात ज्या धार्मिक कल्पना रुजल्या आहेत त्यांना छेद देण्याची आवश्यकता काय? वर्तमान काळात हिन्दुत्व आणि राजकीय आकांक्षा याचे अतूट नाते जुळलेले आहे, आणि आजच्या सुधारक या मासिकाचा वाचक-लेखकवर्ग विचक्षण, प्रज्ञावंत, विवेकवादी, आणि सत्यान्वेषी आहे. ईश्वराचे अस्तित्व, ‘भारतीय समाजातील स्त्रीची भूमिका अशा विषयासंबंधी जनमानसात रूढ असणाच्या संकल्पनांना छेद देणारे लेख या मासिकातून वारंवार प्रसिद्ध होतातच. या लेखासंबंधी प्रतिवाद होऊ शकतो, किंवा पूर्वपक्ष म्हणून हा लेख वाचकांतर्फे विचारात घेतला जाऊ शकतो. शाब्दिक चावटीचा आश्रय न घेता हिन्दुत्व आणि हिन्दुधर्म यांच्या पारंपरिक अस्तित्वाची साक्ष देणारे पुरावे कोणी सादर करतील तर प्रस्तुत लेखकाला नकारात्मक आणि आग्रही भूमिका घेण्याचे कारण नाही.

पुढे वाचा

चर्चा -ज्ञानसाधनेचे मार्ग

आ. सु. च्या ऑगस्ट १९९५ च्या अंकात दोन विचारप्रवर्तक लेख ज्ञानसाधनेबद्दल आले आहेत. (१) ‘ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?’ हा श्री. श्री. गो. काशीकर यांचा व (२) अंतर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही’ हा डॉ. पु. वि. खांडेकर यांचा. विवेकवादासाठी ही चर्चा व हा विषय यांना फार महत्त्व आहे.
ज्ञानसाधनेसाठी वैज्ञानिक रीत अतिा सर्वमान्य झाली आहेच. म्हणून या चर्चेत सहभागी व्हावे असा विचार मनांत आला. या क्षेत्रांतील दोन उदाहरणे फार महत्त्वाची आहेत असे मला वाटते व त्यांकडे मी विवेकवाद्यांचे लक्ष्य ओढू इच्छितो.
(१) प्रथम रामानुजम सुप्रसिद्ध भारतीय गणितज्ञ (pure mathematician) यांचे उदाहरण.

पुढे वाचा

विवेकवाद्यांचे ईश्वरविषयक आक्षेप

एकीकडे स्वतःच्या आस्तिकतेचे आणि दुसरीकडे स्वतःच्या नास्तिकतेचे क्रमशः मंडन करणारे प्रा. मे. पु. रेगे आणि प्रा. दि. य. देशपांडे यांचे दोन विशेष लेख आजचा सुधारकच्या जानेवारी १९९५ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. ईश्वर हा जगाचे कारण आहे, हा युक्तिवाद पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात कसा मांडला जातो आणि कसा खंडित केला जातो, याचा हा भारतीय अनुवाद दिसतो. त्यात पुढीलप्रमाणे मुद्दे आलेले आहेत. विवेकवाद्यांचा ईश्वरकारणवाद
(१)‘जी कोणती वस्तू अस्तित्वात असते तिचे तिच्याहून भिन्न असे काही कारण असते आणि ह्या कारणामुळे ती अस्तित्वात आली असते. आता जग अस्तित्वात आहे.

पुढे वाचा

कारणाची संकल्पना आणि परमात्म्याचे अस्तित्व

याच अंकात अन्यत्र डॉ. के. रा. जोशी यांचा ‘विवेकवाद्यांचे ईश्वरविषयक आक्षेप हा लेख प्रसिद्ध झाला आहे. काही महिन्यांपूर्वी आजचा सुधारक मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मी आस्तिक का आहे ह्या प्रा. मे. पुं. रेगे यांच्या आणि मी आस्तिक का नाही’ या माझ्या लेखांतील युक्तिवादांना ‘पाश्चात्त्य असे नाव देऊन त्याबद्दल ते पटणारे नाहीत’ असे मत त्यांनी दिले आहे. पाश्चात्त्यांच्या ईश्वरकारणतावादात त्याची मांडणी बरोबर असल्याचे जाणवत नाही आणि त्याचे खंडनही न पटणारे आहे असे ते म्हणतात. ‘वस्तुतः। ईश्वरविरोधी अर्वाचीन विवेकवाद्यांच्या प्रस्तुत आक्षेपापेक्षाही अत्यंत तर्ककठोर आणि शास्त्रीय आक्षेप चार्वाक, बौद्ध, जैन, सांख्य, मीमांसक यांनी प्राचीन काळी उपस्थित केले होते.

पुढे वाचा

रूढ आचारविचारांचा चिकटपणा

पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही ही गोष्ट कोपर्निकस व गॅलिलिओ यांनी जगाच्या नजरेस आणून दिल्यास पक्की सव्वादोनशे वर्षे होऊन गेली, तरी आमच्या मते सूर्य व चंद्र एका दर्जाचे ग्रह असून ते पृथ्वीभोवती घिरट्या घालीत आहेत, आमच्या पंचांगांत प्रत्येक पानावर चमकणारे, पण अर्वाचीन ज्योतिषज्ञास मोठमोठ्या दूरदर्शक यंत्रांच्या साह्यानेही अद्याप न गवसलेले राहू व केतू द्विजांस विकल करीत आहेत, शनी वगैरे दूरस्थ ग्रहांचे आमच्याशी अर्थाअर्थी संबंध नसून त्यांची साडेसाती आम्हांस अद्यापि छळीत आहे, सारांश सार्याे ग्रहमालेपुढे आमची पृथ्वी बोराएवढी असूनही आम्ही तिला एका दृष्टीने सर्व ग्रंहांची स्वामिनी आणि दुसन्या दृष्टीने सवौची बटीक करून सोडीत आहो!

पुढे वाचा

मानवी मनोव्यापार

जीवसृष्टीत मानवजात सर्वाधिक बुद्धिमान असून त्यामुळे मानवाने पृथ्वीतलावर अतिशय प्रगत अशी संस्कृती निर्माण केली आहे, आणि केवळ पृथ्वीच्या पाठीवरीलच नव्हे तर अनंत अपार विश्वातील सर्व शक्तींवर नियंत्रण ठेवण्याची मानवाची धडपड सातत्याने चालूच आहे. मानवाला हे यश लाभले आहे ते सर्वस्वी त्याच्या बुद्धिमत्तेमुळे, त्याच्या मानसिक कर्तृत्वामुळे.

माणसाचे मन हृदयात असते या ॲरिस्टॉटलच्या कल्पनेप्रमाणेच मनाचे अधिप्ठान डोक्यात आहे यावर प्लेटोचा ठाम विश्वास होता. सतराव्या शतकातील फ्रेंच तत्त्वज्ञ डेस्क। यास माणसाचे मन डोक्यात असते हे पटले होते; परंतु हे मन कोणत्याही भौतिक अवयवाशी संबंधित नसून, मन ही एक अमूर्त शक्ती आहे असे त्याचे मत होते.

पुढे वाचा

वेताळकथाः २ पळा, पळा, कोण पुढे पळे तो!

राजा पुन्हा वेताळाला खांद्यावर घेऊन वाट चालू लागला. वेताळ म्हणाला, “राजा, विद्यार्थ्यांनी आपला शिक्षणक्रम निवडताना स्वत;चा कल, स्वतःची क्षमता, यांच्याकडे लक्ष न देता ‘चलती कशाची आहे, हेच फक्त पाहिले तर त्यातून उद्भवणाच्या प्रश्नांचे एक टोकाचे उदाहरण मी तुला दाखवले. धन्य तुझी, की तू त्या कथेला दलित-ललित न समजता किंवा आयायट्यांवर केलेली टीका न मानता छान ‘सिनिकल दुर्लक्ष केलेस! पण आज मी तुला एक वेगळी कहाणी ऐकवणार आहे. मी तुला एकच प्रश्न विचारणार आहे. पण तो अनेक उत्तरांमधून एक निवडण्याचा, म्हणजे ‘मल्टिपल चॉईस प्रश्न आहे, ऐक.”

पुढे वाचा

गुणवत्ता व आर्थिक मदत/दंड

शिक्षणासाठी आर्थिक मदत करताना शासनाने (किंवा शासनाच्या आदेशाने इतरसंस्थांनी) विद्याथ्र्यांची आर्थिक स्थिती हा निकष मानावा की त्याची गुणवत्ता हा निकष मानावा याची चर्चा या लेखात केली आहे.

सध्या वैद्यकीय किवा अन्य व्यावसायिक शिक्षणासाठी दोन प्रकारच्या शिक्षणसंस्थांत प्रवेश दिला जातो. पैकी अनुदानित शिक्षणसंस्थांना शासनाकडून अनुदान मिळाल्याने तेथील विद्याथ्र्यांना (यापुढील आकडे उदाहरणादाखल वैद्यकीय शिक्षणाचे आहेत) प्रतिवर्षी ४ ते ६ हजार रुपये फीमध्ये शिक्षण मिळते. शासनाकडून मिळणारे अनुदान प्रतिवर्षी अंदाजे रु. ५४,०००/- प्रत्येक विद्याथ्र्यामागे असते. गुणवत्ता व राखीव जागा यानुसार या सर्व जागा भरल्या जातात.

पुढे वाचा

‘स्त्रीमुक्ती चे सुस्पष्ट चित्र हवे!

‘चतुरंग पुरवणीतील मीना देवल यांचा ‘स्त्रीमुक्ती : मिथक आणि वास्तव हा लेख वाचनात आला. ‘स्त्रीमुक्तीसंबंधी कार्य करणार्या’ अनेक संघटना सध्या सक्रिय आहेत. या संकल्पनेवरील लेख, भाषणे, परिसंवाद आदींतून उलटसुलट विचार मांडले जात आहेत. देवल यांच्या लेखात कार्यकर्त्यांना स्त्रीमुक्तीची चळवळ समाजापर्यंत पोहोचवता आली नाही, तसेच स्त्रीवादी भूमिका समाज तसेच स्त्रिया स्वीकारावयास तयार नाहीत, ही खंत दिसून येते. लिंगभेदविरहित समाजव्यवस्था अस्तित्वात आली तरच हे दुष्टचक्र संपेल, असे आशावादी चित्र त्यांनी रेखाटले आहे.
तेव्हा त्याच दृष्टीने हे विचार मांडत आहे. स्त्रीला एक उपभोगाची वस्तू समजले जाऊ नये किंवा तसा तिचा वापर होऊ नये, कोणत्याही क्षेत्रात तिच्या गुणवत्तेवर तिला प्रवेश असावा, स्त्री म्हणून मज्जाव, आडकाठी असू नये, तिला अमानवी वागणूक मिळू नये, समान हक्क, मतस्वातंत्र्य असावे याबद्दल दुमत असायचे काहीच कारण नाही.

पुढे वाचा

एक प्रतिक्रिया- खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (७)

‘सायंटिफिक अमेरिकन’ फेब्रुवारी ९५ च्या अंकामध्ये पार्थ दासगुप्ता ह्यांच्या ‘लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण’ ह्या शोधनिबंधाविषयी माहिती आली आहे. उद्याचे जग जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे सुखी होण्यासाठी लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण ह्या घटकांचा विकासाशी संबंध आहे अशी कल्पना त्यांनी मांडली आहे. ह्या संदर्भात लेखकाने ह्यामध्ये स्त्रियांच्या स्थानाबद्दल चर्चा केली आहे. त्यांच्या मते, स्त्रिया जेव्हा संपूर्ण आर्थिक स्वावलंबन मिळवितात तेव्हाच कौटुंबिक सामाजिक निर्णयप्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात. आपल्याला आकडो न आवडो, समाजामध्ये ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच मानाने व आदराने वागविले जाते. मारून मुटकून कुणी कुणाला मान देऊ शकत नाही किंवाआदराने बघणार नाहीं.

पुढे वाचा