विषय «इतर»

चर्चा- श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार

जून ९४ च्या आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या वरील विषयावरील लेखावर आक्षेप घेणारे श्री. न. ब. पाटील यांचे पत्र संपादकांनी माझ्या अवलोकनास पाठविले आहे. या पत्रातील सर्वच मजकूर अपेक्षित वळणावरच आहे. ज्यांची साक्षात्कारावर श्रद्धा आहे, त्यांच्यावर माझ्या विवेचनाचा काही परिणाम होईल अशी अपेक्षा मी केली नाही. कारण श्रद्धा ही मुळात पुराव्यावर आधारलेली नसते, त्यामुळे विरुद्ध पुराव्याने ती नष्ट होण्याचा संभव नसतो. श्री. पाटील यांच्या सात पानी पत्रात श्रीरामकृष्णांचे साक्षात्कारी समजले गेलेले वर्तन मिर्गीच्या व्याधिताचे होते हे त्यांच्याच आईबापांचे व डॉक्टरांचे निदान चूक होते असे दाखवणारी कोणतीच तथ्ये मांडली नाहीत.

पुढे वाचा

चर्चा- साक्षात्कार आणि विवेकवाद

जून १९९४ च्या अंकातील डॉ. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख वाचला. रामकृष्णांच्या उपलब्ध माहितीवरून साक्षात्काराचे अस्तित्व सिद्ध होते काय, हा या लेखाचा विषय आहे. ते तसे सिद्ध होत नाही या निष्कर्षाप्रत लेखक आलेला आहे. या निष्कर्षाप्रत येण्यासाठी लेखकाने, नाटकातील शिवाची भूमिका करतानाचा रामकृष्णांचा भावावेश, वेषांतर करून एका घरंदाज कुटुंबातील अंतःपुरात त्यांचे जाणे, विवेकानंदांची व त्यांची भेट, रामकृष्णांना होणारी कालीची दर्शने, रामकृष्णांची इस्लामची व येशूची उपासना, मंदिरात प्रापंचिक गोष्टींचा विचार मनात आणल्याबद्दल राणी रासमणीला मारलेली थप्पड ह्या घटनांचा आधार घेतला आहे.

पुढे वाचा

चर्चा- साक्षात्कार आणि विवेकवाद १

जून १९९४ च्या आजचा सुधारकमध्ये श्री. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावर अनेक अंगांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे आवश्यक आहे. एक मनोविकारतज्ज्ञ म्हणून त्यातील वैद्यकीय व मानसशास्त्रीय प्रतिपादनावर मत नमूद करावेसे वाटते. हे मत मांडताना श्रीरामकृष्णांबाबत श्री. व-हाडपांडे यांच्या लेखात दिलेली माहितीच मी विचारात घेत आहे. त्यांचे लिखाण त्यांचेच मुद्दे सिद्ध करण्यास अपुरे आणि सदोष वाटते.
मिर्गीच्या व्याधीमुळे होणारे भास
(१) श्री. वऱ्हा डपांडे यांच्या मते श्रीरामकृष्ण परमहंसाना होणारे देवीचे दर्शन व ‘भावानुभूती’ हा मिर्गीचाच प्रकार होता.

पुढे वाचा

इतर

जून १९९४ च्या आजचा सुधारकमध्ये श्री. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावर अनेक अंगांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे आवश्यक आहे. एक मनोविकारतज्ज्ञ म्हणून त्यातील वैद्यकीय व मानसशास्त्रीय प्रतिपादनावर मत नमूद करावेसे वाटते. हे मत मांडताना श्रीरामकृष्णांबाबत श्री. व-हाडपांडे यांच्या लेखात दिलेली माहितीच मी विचारात घेत आहे. त्यांचे लिखाण त्यांचेच मुद्दे सिद्ध करण्यास अपुरे आणि सदोष वाटते.
मिर्गीच्या व्याधीमुळे होणारे भास
(१) श्री. वऱ्हा डपांडे यांच्या मते श्रीरामकृष्ण परमहंसाना होणारे देवीचे दर्शन व ‘भावानुभूती’ हा मिर्गीचाच प्रकार होता.

पुढे वाचा

मनु घसरला आहेच

मनुस्मृतीवर टीका करणारी मंडळी मनुद्वेषाच्या विकृतीने पछाडलेली असल्यामुळे, मनूवर “सकारण व अकारण मनूला झोडपण्याचे पुरोगामी व्रत आचरीत असतात, असा आरोप श्री. जोशी यांनी केलेला आहे. या टीकाकारांना स्वतःला ग्रंथ समजण्याची क्षमता नसते असेही विधान ते करतात. (त्यांच्या लेखांतील शेवटचा परिच्छेद पाहावा.) मनूला “सकारण झोडपले तर त्याचा राग श्री जोशी यांना का यावा ते समजत नाही.“अकारण” झोडपले तर त्यांना राग यावा हे समजण्यासारखे आहे. मनूला अकारण झोडपण्यात येते असे श्री जोशी यांचे मत त्यांच्यासारख्या परंपराप्रिय लोकांचे आहे. परंपराप्रिय नसलेल्या लोकांना तसे वाटत नाही, आणि हेच वादाचे मूळ आहे.

पुढे वाचा

इतर

मे १९९४ च्या ‘आजचा सुधारक’च्या अंकात श्री. के. रा. जोशी यांचा संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ’ हा किंचित लेख प्रसिद्ध केला आहे. कदाचित जोशी यांनी मनू किंवा भृगू यांचे आडनाव जोशीच होतेअसा संदर्भ लावला तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
‘धारणाद्धर्म इत्याहुः’ या वचनाच्या संदर्भात जोशींना असेच म्हणायचे आहे की जे आचरण समाजधारणेची क्रिया करीत असेल तोच धर्म होय. असा धर्म याचा अर्थ होतो. पुढे जोशी म्हणतात ‘धारणाद्धर्म इत्याहुः’ ही धर्मसंस्थापक श्रीकृष्णांनी दिलेली व्याख्या लक्षात घेतली की धर्मचर्चा–सर्व समाजाला व्यापून असणार्याइ धर्मासंबंधीची चर्चा – ही प्राधान्याने ऐहिक सुस्थितीविषयी विचार करते हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट जाणवते.

पुढे वाचा

समान नागरी कायदा आणि शरीयत

न्यायमूर्ती हरिनाथ तिलहरी यांनी दि. १२ एप्रिल ९४ रोजी तलाकबाबत जो निकाल दिला त्याचे उलट सुलट पडसाद संपूर्ण मुस्लिम समाजात उमटत असून पूर्वीच्या शहाबानो प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरणही गाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. पुरोगामी विचारवंत श्री. असगरअली इंजीनीअर यांनी निकालाचे स्वागत केले असून सय्यद
शहाबुद्दीन व अन्य मुस्लिम विचारवंतांनी टीका केली आहे.
न्यायालयासमोर मूळ प्रश्न तलाकचा नसून जमिनीचा होता. जो प्रश्न मुळातच न्यायालयासमोर नाही त्यावर निकाल देण्याचा न्यायमूर्ती तिलहरी यांना अधिकार नाही; हा निकाल म्हणजे इस्लामी शरीयतला आव्हान आहे; मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात हस्तक्षेपआहे, इत्यादि मते मुस्लिम विचारवंतांनी व्यक्त केली आहेत.

पुढे वाचा

गांधींचे ‘सत्य – एक प्रतिक्रिया

आजचा सुधारक या मासिकाच्या एप्रिल १९९४ च्या अंकात प्रा. दि. य. देशपांडे यांचा गांधीचे ‘सत्य’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या संबंधात मला खालील प्रतिक्रिया नोंदवायची आहे.
सुरवातीलाच प्रा. देशपांडे यांनी सत्य, सत् व साधु या तीन पदांना अनुक्रमे ज्ञानशास्त्रीय, सत्ताशास्त्रीय आणि नीतिशास्त्रीय अर्थ कसा आहे हे स्पष्ट करून म्हटले आहे की व्यवहारात जरी कित्येकदा हे शब्द आपण लवचीकपणे वापरताना आढळत असलो तरी तात्त्विक चर्चेत या शब्दांचे अर्थ काटेकोरपणेच घेतले पाहिजेत.
चर्चेच्या ओघात subsistence आणि existence या पदांचे अर्थ स्पष्ट करताना अनुक्रमे ‘भाववान’ पदार्थ आणि अस्तित्ववान’ पदार्थ असे त्यांचे भाषांतर करण्यात आलेले आहे.

पुढे वाचा

चर्चा : संदर्भ न पाहता लावलेले अर्थ

संपादक आजचा सुधारक यांस,
स.न.वि.वि.
“संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” हे, याच नावाने लिहिलेल्या (आजचा सुधारक, मे १९९४) के. रा. जोशी यांच्या लेखातील मजकुराचेच रास्त वर्णन असावे असे वाटते. ‘मनूची निंदा करण्यासाठी ज्या वचनाचा भरमसाठ आधार घेतला जातो. या प्रस्तावासह ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ चा जोशी यांनी दिलेला अर्थ असा की “स्त्रियेला कुठल्याही अवस्थेत संरक्षणासाठी स्वातंत्र्याची (स्वतःवर निर्भर राहण्याची) पाळी येऊ नये.” श्री. जोशी यांच्या मते मनूने या श्लोकाद्वारे स्त्रियांना सामाजिक सुरक्षेचे कवच दिले असून, आजच्या परिस्थितीत (‘मनूला बुरसट मानणार्याो व स्वतःला प्रगत मानणार्याा समाजाच्या संदर्भात) ‘मनूच्या या उपाययोजनेची दखल घेण्यासारखी नाही काय हे प्रत्येकाने निर्मळ मनाने स्वतःशीच ठरवावे असा त्यांनी वाचकास कळकळीचा सल्ला दिला आहे.

पुढे वाचा

स्वायंभुव मनूची ‘निष्कारण निन्दा?

मनु हा वस्तुतः स्त्रीद्वेष्टा नाही, त्याने स्त्रियांविषयी करू नये ती विधाने केलेली नाहीत, पुरुषाने स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्रीला बंधनात जखडून ठेवले पाहिजे असे मनूचे मत नाही, तरीदेखील त्याच्या वचनांचा विपर्यास करून पुरोगामी अभ्यासक मनूची निंदाकरतात आणि मनुस्मृतीचे सखोल अध्ययन न करताच आपला अभिप्राय वाचकांच्या गळी, वेळोवेळी उतरवितात असे मत डॉ. के. रा. जोशी ह्यांनी ‘संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ ह्याविषयी दोन लेख लिहून प्रतिपादन केले आहे. डॉ. जोशी ह्यांनी ज्या मनुस्मृतीचा कैवार घेतला आहे तिचे वास्तविक स्वरूप आपण आधी पाहू या.

पुढे वाचा