गोरे, पळशीकर, देशपांडे, पुन्हा पळशीकर, पांढरीपांडे, अशी एक विस्तृत आणि महत्त्वाची चर्चा सुरू आहे. या विचारमंथनात आपलाही हात दोरी ओढण्यास लावावा, म्हणून हे पत्र.
मुळात मी वैज्ञानिक नाही, पण विज्ञानक्षेत्रातील व्यवहार कुतूहलाने पाहणारा आहे. रूढ विज्ञानाच्या चौकटीच्या कडेचे व बाहेरचे संशोधन, त्याचे निष्कर्ष, त्यातून मिळणारे तांत्रिक संकेत, वगैरेंची नेमकी समज मला असेलच, याची मला खात्री नाही. गैरसमज व त्यांच्यावर माझे पूर्वग्रह लादले जाणे यातून चुकीचे युक्तिवाद केले जाणे, वगैरे सारे शक्य आहे. त्यामुळे जागोजागी मी वापरलेले संदर्भ दिले आहेत.
(१) विज्ञानाच्या परिभाषेत रेणू (मोलेक्यूल), अणू (ॲटम), परमाणू (सब अॅटॉमिक कण) वगैरे संज्ञांना अत्यंत नेमके अर्थ आहेत.
विषय «इतर»
चर्चा प्रा. शेषराव मोरे यांनी सादर केलेल्या पुराव्यांविषयी
आजचा सुधारक फेब्रुवारी १९९३ च्या अकांत प्रा. शेषराव मोरे यांनी माझ्या संदर्भात काही विधाने केली आहेत (पृ. ३४८-५०).पृ. ३५० वर ते म्हणतात, ‘अवतरणे जेथून घेतली त्या ग्रंथातील पृष्ठांकांचा उल्लेख पळशीकरांनी कुठेही केलेला नाही. मूळ हस्तलिखितात असे पृष्ठांक होते, मात्र प्रकाशित लेखात पळशीकरांनी ते येऊ दिलेले नाहीत, याचा पुरावा आम्ही ग्रंथात सादर केलेला आहे. सावरकरांना अनुवंशवादी व ब्राह्मण्यवादी ठरविण्यासाठी केलेले हे उद्योग आहेत. यालाच आम्ही वस्तुस्थितीचा विपर्यास असे मानतो. अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह बदलाला “जाणीवपूर्वक विपर्यास” वा “खोटेपणा” याशिवाय दुसरे काय नाव द्यावे?’
पत्रव्यवहार धर्माचा स्वीकार व विवेकनिष्ठा
कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व वा नास्तित्व सिद्ध करण्यासाठी आपण पुरावा ग्राह्य (अग्राह्य /पर्याप्त/ अपर्याप्त मानतो तेव्हा आपण एका चौकटीत तो निवाडा करीत असतो. त्या चौकटीत त्या गोष्टीचे त्या चौकटीतील विशिष्ट अर्थाने अस्तित्व नाही, व कधीच सिद्ध होऊ शकणार नाही, असे विधान करता येईल.
ऐंद्रिय अनुभवप्रामाण्यवाद वा बुद्धिप्रामाण्यवाद या चौकटीत ज्यांचे नास्तित्व स्वीकारावे लागते अशा काही गोष्टी सामान्यतः धर्म मानणाऱ्या व्यक्ती सत्य म्हणून स्वीकारत असतात असे विधान करता येईल असे मला दिसते.
व्याघातमय नसलेली, तार्किकीय दृष्ट्या शक्य असलेली अशा स्वरूपाची ईश्वराची संकल्पना केली जाऊ शकते असे आपल्यास मान्य आहे असे दिसते.
स्त्री असुरक्षित आहे
हिंदू समाजात स्त्रीरक्षण – पुरुषाच्या कामवासनेपासून स्वसंरक्षण- हा महत्त्वाचा उद्योग स्त्रीला पुरातन काळापासून असावा, कारण त्या वासनेला संयम शिकविण्याचे प्रयत्न हिंदू संस्कृतीने केलेले नाहीत. ब्रह्मचर्याचा, तपस्येचा बडिवार करीत, वेश्याव्यवसाय हाच कुळधर्म असणाच्या कळवंत, नायक इत्यादी जाती हिंदू धर्माने निर्माण केल्या, इतकेच नव्हे तर कुळवंतांच्या पोरी देवदासींच्या स्वरूपात मंदिरामधून पोचविल्या व देवद्वाराचाही कुंटणखाना बनवून टाकला. घरच्या स्त्रियांवर देवादिकही पापी दृष्टी ठेवीत, असे आपली पुराणे सांगतात. कामसूत्रात कुलीन स्त्रीला वश करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. बहुपत्नीकत्व होतेच, पण त्या स्त्रियांचे भरणपोषणही न करता चैन करण्याचा मार्ग बंगालच्या ‘कुलीन भूदेवांनी शोधून काढला.
तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ३)
विधानांचे समर्थन तत्त्वज्ञानाच्या दोन प्रमुख कार्यापैकी पहिले कार्य म्हणजे विधानांचे समर्थन करण्याच्या प्रक्रियेची चिकित्सा. आपल्यासमोर येणार्याक कोणत्याही विधानाविषयी ते खरे आहे कशावरून?’ हा पहिला प्रश्न आपल्या मनात उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे त्या विधानाचे समर्थन करणे.
एखाद्या विधानाचे समर्थन द्यायचे म्हणजे ते अन्य एका किंवा अनेक विधानांवरून अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे दाखविणे. ती अन्य विधाने जर आपल्याला मान्य असतील आणि त्यावरून पहिले विधान निष्कर्ष म्हणून अपरिहार्यपणे निष्पन्न होते हेही आपल्याला मान्य असेल, तर ते विधान सिद्ध झाले असे आपण म्हणतो.
चर्चा- विवेकवादी नीतीविचाराचे शिथिल समर्थन
प्रा. दि. य. देशपांडे यांनी आजचा सुधारकच्या सप्टेंबर आणि आक्टोबर १९९२ च्या अंकांतून क्रमशः विवेकवादातील नीतिविचाराच्या त्यांच्या मांडणीवर घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे देण्याची बरीच खटपट केली आहे. त्या उत्तरांवरून विवेकवादाच्या नावाने पर चात्त्य विचारांनी भारलेल्या भारतीय विद्वानांनी भारतीय नीतिविचारांना उपहसत जे तर्क कौशल्य दाखविण्याची धडपड चालविली आहे, ते मुळात किती कच्चे, अपुरे आणि भ्रामक आहे याची साक्ष पटते. एक गोष्ट प्रथम नमूद करतो की प्रा. दि. य. देशपांडे यांची त्यांनी केलेल्या नीतिविचारांच्या मांडणीचा प्रस्तुत लेखकाने आपल्या मूळ लेखात जो संक्षेप दिला आहे त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.
भोळे यांचे परीक्षण निराशाजनक
सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास या ग्रंथावरील श्री. भा. ल. भोळे यांचे परीक्षण उत्सुकतेने वाचायला घेतले. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका काहीशा दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकणारा, स्वतंत्र दृष्टीने लिहिलेला हा संशोधनग्रंथ, आणि तोही एका ताज्या दमाच्या व नवोदित अभ्यासकाने लिहिलेला; त्यामुळे ही उत्सुकता वाटत होती. शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे प्रा. भोळे यांनी साधार खंडन केलेले असेल, ग्रंथातील निष्कर्षांचीही साक्षेपी समीक्षा त्यांनी मांडलेली असेल, असे वाटले होते. पण परीक्षण वाचून साफ निराशा झाली, आणि आश्चर्यही वाटले.
मोर्यांलच्या या संशोधनग्रंथाचा गाभा जाणून घेऊन तो वाचकांपुढे ठेवण्याऐवजी, लेखकाच्या आक्रमक भाषाशैलीचीच चर्चा यात अधिक आहे.
चर्चा – निसर्ग आणि मानव
प्रा. दि. य. देशपांडे यांच्या निसर्ग आणि मानव (आजचा सुधारक नोव्हें.डिसें. ९३) या लेखात त्यांना म्हणावयाचे आहे ते असे :
-१.-
चेतन-अचेतन असा फरक करण्याची कसोटी कोणती?माणसाला त्याच्या ठायीच्या चेतनेचा जसा स्वानुभव येतो, तिचे ज्या स्वरूपाचे आत्मभान त्याला असते तसा स्वानुभव येणे व आत्मभान भाषेद्वारा प्रकट करता येणे ही कसोटी मानली तर, प्रा. देशपांडे यांचे म्हणणे मान्य करण्यात कोणतीच अडचण नाही. पण ही कसोटी मानवकेंद्री (anthropocentric) आहे. भौतिक निर्जीव सृष्टीत चेतना कार्य करीत असते की नाही हे केवळ या स्वयंकेद्री कसोटीच्या आधारे ठरविणे सयुक्तिक आहे का?
पुस्तक परिचय
गोपाळ गणेश आगरकर, ले.- स.मा. गर्गे, प्रकाशक – नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, ए-5 ग्रीन पार्क नवी दिल्ली ११० ०१६, किमत रु. २३.००, पृष्ठंख्या १५० + १०
आपल्या देशात जे अनेक थोर लोक होऊन गेले त्यांचा परिचय करून देण्यासाठी पुस्तके प्रकाशित करणे ही आपली जबाबदारी आहे असे चांगले प्रकाशक समजतात. त्यासाठी ते अशी पुस्तके अभ्यासू लेखकांकडून लिहवून घेतात, आणि सुबक अशी पुस्तके वाचकांच्या हाती देतात. गोपाळ गणेश आगरकर हे छोटेखानी पुस्तक अशाच पुस्तकांपैकी एक आहे. चरित्रनायकाच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी, त्याच्या कार्याचा वा व्यक्तिमत्त्वाचा एखादा उपेक्षित पैलू वाचकांच्या नजरेस आणून देण्यासाठी लिहिलेला हा ग्रंथ नाही.
विवेकवादाच्या एका व्यासपीठाची ओळख
गोष्ट पासष्टीची, ले. शांता किर्लोस्कर, वितरक – मौज प्रकाशन गृह, गिरगांव, मुंबई -४, किंमत रु. १५०/
किर्लोस्कर खबर १९२० च्या जानेवारीत निघाले तेव्हा ते अक्षरशः चारपानी चोपडे होते. त्याच्या ३०० प्रती काढल्या आणि ‘आप्तमित्र, ग्राहकबंधूंना वाटल्या. जगप्रसिद्ध फोर्ड या मोटार कारखान्याचे फोर्ड टाइम्स हे मासिकपत्र पाहून शंकररावांना स्फूर्ती झाली आणि ही खबर निघाली. पुढे हे मासिक वाढतच गेले. दहा वर्षांनी स्त्री आणि आणखी चार वर्षांनी चौतीस साली मनोहर असा परिवार वाढला. मासिकांच्या विकासाची ही कहाणी मोठी आहे. चांगली पासष्ट वर्षांची. १९८४ साली सामाजिक परिवर्तनाचे एवढे काम केलेली ही संस्था एखाद्या मालमत्तेसारखी विकली गेली.