मनू हा स्त्रीद्वेष्टा आहे, त्याने स्त्रियांविषयी करू नये ती विधाने केलेली आहेत. पुरुषाने स्वतःच्या स्वार्थासाठी ‘स्त्री’ला बंधनात जखडून ठेवले पाहिजे, असे मनूचे मत आहे, अशी मनुस्मृतीच्या अनेक पुरोगामी अभ्यासकांची समजूत असून याविषयी वेळोवेळी ते सतत लिहून मनूविषयी आपला निंदाव्यंजक अभिप्राय वाचकांच्या गळी उतरविण्याची अविश्रांत खटपट चालू ठेवतात. मनूविषयीचे आपले हे मत मनुस्मृतीच्या सखोल अभ्यासावर आधारलेले आहे असेही ते सुचवितात. या विचारात मनूच्या स्त्रीविषयक विचारावर लिहिताना ‘पिता रक्षति कौमारे’ यानंतर पुढे १०-१५ श्लोक जरी वाचले तरी तेवढ्यावरूनही पुरुषांनी स्त्रियांना बंधनात जखडून ठेवावे, स्त्रिया त्यांच्या स्वभावामुळे केव्हा व्यभिचारिणी होतील, याचा भरवसा नसल्यामुळे त्यांच्यावर जागता पहारा ठेवावा, कोणतीही सवड किंवा सवलत त्यांना देऊ नये, असे मनूचे म्हणणे असल्याचे आपले मत झाल्याचे ते मांडत असतात.
विषय «इतर»
श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार
मानवाला जे ज्ञान प्राप्त होते ते फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी होते. या प्रमाणांच्या पलीकडे साक्षात्कार नावाचे एक प्रमाण आहे, त्याने होणारे ज्ञान प्रत्यक्ष व अनुमान यांनी होणार्या ज्ञानापेक्षा अधिक प्रमाण आहे, म्हणजे प्रत्यक्ष व अनुमान यांनी झालेले ज्ञान साक्षात्काराने झालेल्या ज्ञानाच्या विरुद्ध असेल तर प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी झालेले ज्ञान खोटे मानावे; शिवाय साक्षात्काराने अशा काही विषयांचे ज्ञान होते की जे प्रत्यक्ष व अनुमान यांनी होऊच शकत नाही असे एक मत प्रचलित आहे. ईश्वर, परलोक वगैरेंचे ज्ञान साक्षात्काराने होते व म्हणून साक्षात्काराच्या विरुद्ध प्रत्यक्ष व अनुमान यांची साक्ष अप्रमाण आहे असे साक्षात्कारवाद्यांचे म्हणणे आहे.
बँकॉक परिषदेत जाणवलेले स्त्री-प्रश्नांचे भेदक वास्तव
पुढील लेख लोकसत्ता दैनिकाच्या २७ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे तो आमच्या वाचकांनी आधीच वाचला असेल. तरीसुद्धी आम्ही तो पुनर्मुद्रित करीत आहोत याचे कारण त्या विषयाचे गांभीर्य. स्त्रीपुरुषसमतेच्या आदर्शापासून आपण अजून इतके दूर आहोत कीती जगातील बहुतेक देशात ती औषधालासुद्धा सापडत नाही. या गंभीर विषयाकडे वाचकांचे लक्ष आकृष्ट होऊन त्यांना त्याविषयी काहीतरी करणे अत्यावश्यक आहे याची जाणीव व्हावी हा या पुनर्मुद्रणाचा हेतू. – संपादक
स्थळ : बँकॉक
अफगाणिस्तानमधील दोन स्त्रियांचे मृतदेह समोरच्या व्हिडिओ फिल्मवर दिसत होते. ते पाहून सार्या स्तंभित झाल्या.
प्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा
सातार्याच्या विचारवेध संमेलनात प्रा. रेग्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातील काही भागाचा हा सारांश. रेग्यांच्या अतीतवादी धर्म आणि नीतीमीमांसेचा प्रतिवाद याच अंकात प्रा. दि. य. देशपांड्यांनी केला आहे. तो वाचताना शीघ्र संदर्भ म्हणून हा आढावा उपयोगी पडावा.
विसाव्या शतकातील धर्मचिंतनाकडे वळण्यापूर्वी रेग्यांनी त्याची प्रदीर्घ तत्त्वज्ञानात्मक पार्श्वभूमी कथन केली आहे. तिचा आलेख येथे आहे. पण व्याख्यानाच्या उत्तरार्धातील भारतीय-हिंदू विचाराचा ऊहापोह या सारांशात नाही. तद्वत विसाव्या शतकातील तीन प्रभावी विचारसरणी – मार्क्सवादी, मनोविश्लेषणवादी आणि अस्तित्ववादी – व धर्म यांच्या संबंधाची चर्चाही येथे गाळली आहे.
धार्मिक अनुभव व आचरण यांचा गाभा
इंद्रियांना प्रतीत होणार्या जगापलीकडे अतीत तत्त्व आहे.
अतीत व विवेकवाद
फेब्रुवारी ९४च्या दि. १९ व २० या दोन दिवशी सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीने आयोजित केलेले पहिले विचारवेध संमेलन भरले होते. विषय होता ‘धर्म’ आणि संमेलनाचे अध्यक्ष होते प्रा. मे. पुं. रेगे. आपल्या प्रदीर्घ छापील अध्यक्षीय भाषणात प्रा. रेग्यांनी ज्याला ते ‘अतीत’ हे नाव देतात त्यावर एक अतिशय प्रभावी निबंधसादर केला. प्रा. रेग्यांचा तत्त्वज्ञानाचा व्यासंग आणि त्यावरील अधिकार हे दोन्ही अव्वल दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांनी धर्माच्या वतीने दिलेल्या समर्थनाला मोठी प्रतिष्ठा आहे. त्याविषयी मतभेद नोंदवणे ही धाडसाची गोष्ट आहे.
परंतु तरीही मला वाटते की त्यांनी केलेले अतीताचे समर्थन निर्णायक नाही, आणि हे दाखविण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ – (भाग १, भाग २)
– १ –
‘धारणाद्धर्म इत्याहुः’ हे प्रसिद्ध वचन अनेकवार वापरले जाते. त्याचा संदर्भ पाहिल्यावर ‘धर्म’ शब्द वापरणार्यांच्या मनात काय अर्थ होता; तसेच धर्म वापरणारे भारतीय तो मुख्य कोणत्या अर्थाने वापरतात हे स्पष्ट व्हायला काही आडकाठी नाही. पण हे काहीही न करता या ना त्या रूपाने धर्मकल्पनेवर उठविली जाणारी झोड न्याय्य दिसत नाही. प्रस्तुत वचन हे महाभारतात दोन ठिकाणी आले आहे. शांतिपर्वात भीष्म युधिष्ठिराला धर्माचे स्वरूप समजावून सांगताना म्हणतात
धारणाद्धर्म इत्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः ।।
यः स्याद्धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ।।
(अध्याय १०.११)
दुसरे स्थळ कर्णपर्वात आहे.
सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे
सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे
सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे आणि ते मुख्यतः समाजातील ज्या वर्गात पुरुष बायकांना पोसतात अशा वर्गाने बनविले आहे आणि ते सर्व समाजाच्या माथी मारले आहे. हिंदुस्थानात ज्या स्त्रिया कुटुंबपोषणासाठी बाहेर जाऊन काम करतात अशाच स्त्रिया तीन चतुर्थांश आहेत. असे असता पुरुषांनी पोसलेल्या एक चतुर्थांश स्त्रियांना लागू पडणारे नियम सर्व समाजावर लादणे हा अन्याय आहे…… आणखी असे की राष्ट्र म्हणजे बायका, पुरुष नव्हेत. समाजातले तीन चतुर्थांश पुरुष मरून गेले व बायकाच उरल्या तरी पुढची पिढी अनेकपत्नीपद्धतीचा अवलंब करून भरून काढता येईल; पण बायकाच जर मेल्या आणि पुरुष सपाटून उरले, तर राष्ट्रसंवर्धन होणार नाही.
विज्ञानानंतरचा समाज
[टाइम्स ऑफ इंडियाच्या १२ डिसेंबर १९९३च्या अंकात Brian Appleyard या अमेरिकन लेखकाचा ‘Post-Scientific Society’ या शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात विज्ञानाचे स्वरूप आणि अधिकार यांविषयी अनेक चुकीचे व अनर्थावह पूर्वग्रह व्यक्त झाले असून त्यामुळे वाचकांची दिशाभूल होण्याचा संभव असल्यामुळे त्याला समर्पक उत्तर देणे अवश्य होते. येथे श्री. नंदा खरे यांनी केलेला या लेखाचा अनुवाद आणि त्यांनीच दिलेले उत्तर छापले आहे. ते वाचकांना उद्बोधक वाटेल.]
विज्ञान ही एखाद्या समाजाला पाश्चिमात्य समाजांच्या भौतिक सामर्थ्यात वाटा मिळवून देणारी निरागस (innocent) गोष्ट नाही.
विज्ञानानंतरचा समाज – उत्तर
काही महिन्यांपूर्वी आजच्या सुधारकात निसर्ग आणि मानव या विषयावर एक चर्चा झाली. मथळ्यात स्थान नसूनही विज्ञानाला चर्चेत महत्त्वाचे स्थान होते. त्याच चर्चेचा भाग असावा असा एक नुकताच प्रकाशित झालेला लेख भाषांतररूपात सोबत दिला आहे.
लेखकाला विज्ञानात जाणवलेल्या काही विशिष्ट गुणधर्मांची यादी अशी :- (क) विज्ञान चंचल आहे. त्यात ठाम मते नसतात. (ख) विज्ञानातील प्रत्येक बदल आधीच्या जवळपास सर्व ज्ञानाला खोटे पाडू शकतो. (ग) विज्ञान स्वतःला सर्वज्ञ समजते, आणि म्हणून ते इतर श्रद्धा-प्रणालींबद्दल कमालीचे असहिष्णु असते. (घ) विज्ञानाकडे मानवी जीवनाचा अंतिम अर्थ किंवा अंतिम कारणे समजण्याची क्षमताच नाही.
राष्ट्रवाद की संस्कृतिसंघर्ष ?
शीतयुद्धाची अखेर झाल्यानंतर जगातील राजकीय सत्तासमतोल बदलला त्याचबरोबर अर्थकारणातही स्थित्यंतरास सुरुवात झाली. जागतिक व्यापार खुला करण्याच्या प्रक्रियेने जोर धरला. या पार्श्वभूमीवर आर्थिक सिद्धांतांची पुनर्तपासणी करण्यात येऊ लागली आहे. त्याचप्रमाणे राजकीय तत्त्वज्ञानांचीही फेरमांडणी करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. सोव्हिएत संघराज्याचा अस्त, त्यानंतर येल्त्सिन यांनी पाश्चिमात्यांकडे केलेली आर्थिक मदतीची मागणी, शस्त्रास्त्रकपातीचे करार, ‘गॅट’ करारावर झालेल्या स्वाक्षऱ्या -या घडामोडींनंतर अमेरिकेतील राजकीय पंडित राष्ट्रवादाचा अस्त होत असल्याचा निर्वाळा देऊ लागले आहेत. वाढत्या आर्थिक परस्परावलंबित्वामुळे शुद्ध राष्ट्रीय सार्वभौमत्वही लोप पावत असून, देशांच्या भौगोलिक सीमा पुसट होत आहेत, असे या अभ्यासकांचे मत आहे.