आजचा सुधारक च्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात उपरोक्त विषयावरील माझ्या आधीच्या लेखांवर टीका करणारा श्री वसंत पळशीकर यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी आधीच्या सर्व अंकांतील तत्संबंधीचे सर्व लेख सलगपणे वाचून काढले; परंतु त्यांत त्यांना आक्षेप घेण्यासारखे बहुधा काही न आढळल्यामुळे वेगळ्या दिशेने मुद्दयाला भिडायला हवे असे त्यांनी ठरवून हा लेख लिहिलेला दिसतो.
. त्यांचा लेख वाचल्यानंतर मला असे दिसून आले की धर्मविषयक माझ्या प्रतिपादनाला त्यांची हरकत नाही; परंतु त्याबद्दलच्या तपशिलाचा आग्रह धरून ‘तत्त्व मान्य, तपशील अमान्य’ अशी व्यूहरचना करून माझ्या प्रतिपादनाला उखडून लावावयाचा प्रयत्न करावयाचा, असे हे त्यांचे वेगळ्या दिशेने मुद्दयाला भिडणे होय.
विषय «इतर»
शास्त्रीयतेची प्रतिष्ठा फलज्योतिषाला मिळणे अशक्य आहे
सुधारकच्या वाचकवर्गापैकी कुणीही फलज्योतिपावर विश्वास ठेवणारे असतील असे मला वाटत नाही. माझ्या या लेखाचा हेतू कुणाचा भ्रमनिरास करण्याचा नाही. माझा हेतू असा आहे की फलज्योतिषात ज्या अंगभूत (built-in) अंतर्विसंगती आहेत त्यांची ओळख वाचकांना व्हावी.
फलज्योतिपावर आमचा विश्वास नाही ‘ असे म्हणणाऱ्यांना जर असा प्रश्न विचारला की, तुमचा विश्वास का नाही त्याची कारणे सांगाल का, तर अनेक प्रकारची उत्तरे ऐकायला मिळतील. त्यातली कित्येक उत्तरे गैरलागू असतात, कित्येक उत्तरे उथळ असतात, आणि काही तर अगदी चुकीची असतात. फलज्योतिषावरची लोकांची अंधश्रद्धा दूर व्हावी या हेतूने केलेल्या प्रचारात जर असे सदोप युक्तिवाद केलेले असले तर त्या प्रचाराचा परिणाम उलटाच होतो.
अगोदर मुस्लिम जातीयवाद नष्ट करा
अगोदर मुस्लिम जातीयवाद नष्ट करा
भारतातील मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भात हिंदु जातीयवादाचा विचार करावयाला हवा. पण माझे मत असे आहे की हिंदु जातीयवाद हा मूलतः मुस्लिम जातीयवादाला प्रत्युत्तर देण्याच्या स्वरूपात आपल्या देशात निर्माण झाला आहे. हिंदु जातीयवाद असण्याची कारणे नष्ट करा – थोडक्यात मुस्लिम जातीयवाद नष्ट करा – आपल्याला या देशात मूठभरदेखील प्रभावी हिंदु जातीयवादी आढळणार नाहीत.
‘सय्यदनांचा हस्तक्षेप कोठपर्यंत?
अस्मा ताहेर बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेली औरंगाबादची गुणवान, बुद्धिमान विद्यार्थिनी. तिचा कल वैद्यकीय शाखेकडे; परंतु ‘सय्यदनां’नी – बोहरा धर्मगुरूंनी परवानगी दिल्याशिवाय ती वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. का ?
जुलेखाची कहाणी हृदयद्रावक. जन्मतःच हृदयाला छिद्र असलेली जुलेखा वेळीच उपचार न झाल्याने ‘अल्लाला प्यारी झाली. शस्त्रक्रिया करायची की नाही, याविषयीचे आदेश ‘सय्यदनांकडून मिळविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी मधली तब्बल पस्तीस वर्षे वाया घालविली होती ! असे का घडावे ?
माझ्या पत्नीने-झेनबने १९५१ मध्ये पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. ची पदवी संपादन केली, दिल्ली विद्यापीठात पीएच.डी.
पडद्यातला देश
गावी शेजारच्या देवकरण भटजींना ज्योतिष चांगले समजत असे. एकदा माझा हात पाहून ते म्हणाले, ‘याला विद्या नाही. हे भविष्य ऐकून माझी माय कष्टी झाली. पण ते भविष्य तिच्या अंदाजाबाहेर मी खोटे ठरविले. दुसरे, शेंदुर्णीकरांचे भविष्य : ‘तुम्हाला वाहनयोग (चारचाकी) आहे.’ तेही मी आतापर्यंत तरी खोटे ठरवले आहे. परदेशप्रवास घडेल असे मात्र माझ्या हातावर कोणालाच दिसले नव्हते. तो घडला. आणि मुळातील भविष्यावर माझा अविश्वास अधिक पक्का झाला.
मात्र परदेशप्रवासातही एक प्रकारची वर्णव्यवस्था आहे. युरप-अमेरिका अव्वल दर्जाचे, दुबई-आफ्रिका त्या मानाने दुय्यम, सिंगापूर-हाँगकाँग यांना शूद्र म्हटले तर नेपाळ अतिशूद्रात गणले जाईल.
स्त्रियांचे शिक्षण कसे असावें?
सदाचरणी होण्यास व सदाचरणी राहण्यास त्यांस सदाचरणाची किंमत कळली पाहिजे, ती किंमत कळण्यास त्यांची सापेक्ष बुद्धि जागृत झाली पाहिजे, व तसे होण्यास त्यांस सुशिक्षण दिले पाहिजे. लहान मुलांस खोटे बोलणे वगैरे पापांपासून दूर ठेवण्यास छडीचाच केवळ उपयोग नको आहे. पाप केल्यास शरीरदंड होतो येवढेच ज्ञान ज्यास मिळाले आहे तो सदैव पापपराङ्मुख राहील, असे मुळीच नाही. शिक्षा होण्याचा संभव गेला की, तो पाप करण्यास सोडणार नाही. सदाचरण व असत्प्रतिकार यांविषयीं तात्त्विक ज्ञान मनुष्यमात्रास झाल्यावाचून दोहोंचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम पूर्णपणे कळून येणे शक्य नाही, व जोपर्यंत हे परिणाम कल्लले नाहीत तोपर्यंत मनुष्यास सदा-चरणाची खरी योग्यता, व असत्पथावलंबनाची स्वपरवंचक प्रवृत्ति ही कधीहि कळणार नाहीत.
परिसंवाद निसर्ग आणि मानव – १
श्रीमती मेधा पाटकर गेल्या आठवड्यामध्ये पुण्यास आल्या असता स्नेहसदनात भरलेल्या सभेत त्यांनी जी भूमिका मांडली तिचे माझ्या मते दोन स्थूल विभाग पाडता येतील. पहिला भाग म्हणजे त्यांनी नर्मदा घाटीतील धरणात बुडणार असणाऱ्या ग्रामीण जनतेला जागे करून एक जबरदस्त संघटन उभे केलेले आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या नर्मदा प्रकल्पाच्या अनावश्यकतेचा, त्याच्या सिद्धीसाठी चाललेल्या अमानुष सरकारी दडपशाहीचा आणि त्या प्रकल्पामुळे अपरिहार्यपणे होणाऱ्या निसर्गविध्वंसाचा प्रश्न.
नर्मदा प्रकल्पाची योजना आखताना शासनाने (गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ही राज्य शासने व केंद्रशासन या सर्वांनी) जी हरत-हेची माहिती जमा करावयास हवी होती तशी ती मिळवण्याचे कष्ट न घेता सगळी आखणी मनमानीपणाने केलेली आहे, हा मेधा आणि तिचे सहकारी यांनी घेतलेला मूलभूत आक्षेप.
परिसंवाद निसर्ग आणि मानव – २
साधनाच्या (१८ जुलै) अंकातील ‘निसर्ग आणि मानव या आपल्या लेखात श्री. नानासाहेब गोरे यांनी म्हटले आहे, आदिम क्षणापासून या चालू घटकेपर्यंत निसर्ग होता तसाच राहिला आहे : लहरी, निर्हेतुक.’ त्यांनी मानवाचे आणि निसर्गाचे स्वर पूर्वीच्या काळी कधी तरी खरोखर जुळले होते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. लेखाच्या अखेरीस ‘स्वस्थितिमग्न निसर्ग व विज्ञानधर पुरुषार्थी मानव यांच्या संयोगाची गोष्ट केली आहे.
निसर्ग कसा आहे याचे वर्णन करते वेळी विश्व, पृथ्वी व पृथ्वीवरील सजीव सृष्टी या व्यवस्था आहेत आणि त्यांना एक इतिहास आहे, या दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
परिसंवाद निसर्ग आणि मानव-३: श्री. वसंत पळशीकरांना उत्तर
(हा लेख आजचा सुधारक नोव्हेंबर-डिसेंबर – ९२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)
परिसंवाद निसर्ग आणि मानव: एक अनिवार्य समग्रता – ४ प्रा. दि.य. देशपांडे यांच्या लेखाच्या निमित्ताने
प्रा. दि. य. देशपांडे यांचा साधनेतील (१४ नोव्हें. १९९२) टिपणवजा लेख वाचून मनात आलेले काही विचार म्हणा, काही शंका आणि प्रश्न म्हणा मी येथे व्यक्त करू इच्छितो. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या लेखाला एक दुहेरी पाश्वभूमी आहे. एक म्हणजे मा. नानासाहेब गोरे यांचा साधनेतील (१८ जुलै ९२) लेख आणि दुसरी म्हणजे त्या लेखावरील मा. श्री. वसंत पळशीकर (साधना २९ ऑगस्ट ९२) यांची प्रतिक्रिया. माझ्या प्रस्तुत । लेखनालाही ही पाश्वभूमी अंशतः असणे स्वाभाविकच आहे. तथापि, श्री. गोरे काय किंवा श्री. पळशीकर काय, यांच्या विचारांचे खंडन अगर मंडन करावे या हेतूने मी हे लिहिलेले नाही.