विषय «इतर»

चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ५)

स्त्रियांची मागणी असो की नसो, त्यांची इच्छा असो की नसो, त्यांची मुक्ती झाली पाहिजे, इतकेच नव्हे तर त्या मुक्तीचा एक अविभाज्य वा अपरिहार्य अंश म्हणून म्हणा, त्याचे आवश्यक अंग म्हणून म्हणा किंवा त्याचा एक अनिवार्य पैलू म्हणून म्हणा, त्यांना लैंगिक स्वातंत्र्य दिले पाहिजे ह्या निष्कर्षावर मी येऊन ठेपलो असल्याचे मी पूर्वीच्या लेखांकांमधून सांगितलेले आहे.
स्त्रियांची मुक्ती ही न्यायोचित बाब आहे. त्यात कोणी मागणी करण्याची गरजच नाही. गुलामगिरीची प्रथा अन्याय्य आहे. ही गोष्ट विचारान्ती पटल्यावरसुद्धा एखाद्या गुलामांच्या मालकाने त्याचे गुलाम तशी मागणी करीत नाहीत तोवर- त्यासाठी उठाव करीत नाहीत तोवर – त्यांच्यावरचा हक्क कायम ठेवावयाची व त्यांची पिळवणूक, त्यांची खरेदीविक्री चालू ठेवावयाची हे जितके व जसे गर्हणीय आहे तितके व तसेच स्त्रियांच्या तश्या मागणीची, त्यांच्या त्यासाठी केलेल्या आंदोलनाची वाट पाहणे आमच्यासाठी लांच्छनास्पद, निंदास्पद आहे असे माझे मत आहे.

पुढे वाचा

उपयोगितावाद – काही स्पष्टीकरणे

ज्याल इंग्लिशमध्ये ‘Utilitarianism’ असे नाव आहे आणि ज्याला मराठीत ‘उपयुक्ततावाद’ म्हणतात, त्या मतासंबंधी खूपच पूर्वग्रह आणि गैरसमज आढळतात. हे पूर्वग्रह आणि गैरसमज केवळ सामान्य लोकांच्या मनांतच आहेत असे नसून ते विद्वानांच्या मनांतही मोठ्या प्रमाणात दिसतात. अनेक टीकाकार उपयुक्ततावाद ही उपपत्ती नीतिशास्त्रीय उपपत्ती आहे हे मानायलाही तयार नसतात, आणि काही तर उपयुक्ततावादी जीवन म्हणजे डुकरांना योग्य जीवन असेही म्हणतात. एखाद्या मताविषयी अशी उपेक्षेची भूमिका एवढ्या मोठ्या प्रमाणात का तयार व्हावी आणि ती दीर्घकाळ टिकून का राहावी हा एक कूट प्रश्नआहे. पूर्वग्रह नाहीसे करणे किती कठीण आहे याचेच हे द्योतक आहे.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय -भारतीय मुसलमान : शोध आणि बोध

सेतुमाधवराव पगडी थोड्या दिवसांपूर्वी वारले. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या एखाद्या ग्रंथाचा परिचय करून द्यावा असा विचार होता. पगडींची ग्रंथसंपदा मोठी. निवडीचाप्रश्न पडला. तो गेल्या निवडणूक निकालांनी सोडवला. आन्ध्र आणि कर्नाटकात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. विरोधकांच्या विजयामागे मुस्लिम मतांचा झुकाव किती महत्त्वाचा होता हे प्रणय रॉय आणि मित्रांनी केलेल्या विश्लेषणात टक्केवारीनिशी दाखवून दिले.
भारतीय मुसलमान हा भारतासमोरील अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी आधी नीट समजून घेणे जरूर आहे. आम्ही वेगळे आहोत, आमचे प्रश्न वेगळे आहेत, तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, अशी मुस्लिम नेतृत्वाची भूमिका दिसते.

पुढे वाचा

जडवाद, इहवाद, स्त्रीमुक्ती, वगैरे

आजचा सुधारकच्या डिसेंबर ९४ च्या अंकात श्री दि.मा. खैरकर यांचा ‘दिवाकर मोहनींच्या स्त्रीपुरुषसंबंधाच्या भ्रामक कल्पना’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या शेवटच्या छेदकात त्यांनी काही तात्त्वज्ञानिक सिद्धांतांचा आणि संकल्पनांचा उल्लेख केला आहे.जडवाद, चैतन्यवाद, अदृष्ट इत्यादि गोष्टींसंबंधी त्यांनी लिहिलेला मजकूर वाचल्यावर या सर्वच गोष्टींसंबंधीचे त्यांचे प्रतिपादन बरेचसे गैरसमजावर आधारलेले आहे असे लक्षात आले. त्यामुळे त्या कल्पनांचे वास्तव स्वरूप काय आहे हे सांगणे अवश्य वाटल्यामुळे पुढील चार शब्द लिहिले आहेत.
खैरकर म्हणतात की दिवाकर मोहनी जडवादी आहेत. पण मोहनींच्या लिखाणात मला जडवादाचे चिन्ह सापडले नाही.

पुढे वाचा

लोकशाही तत्त्वाचा उद्देश

लोकशाही तत्त्वाचा उद्देश जुलूमशाही टाळण्याकरिता राजकीय संस्थांची निर्मिती, विकास आणि रक्षण करणे हा आहे. याचा अर्थ असा नव्हे की आपण या प्रकारच्या निर्दोष किंवा अभ्रंश्य संस्था कधी काळी निर्मू शकू, किंवा त्या संस्था अशी शाश्वती देऊ शकतील की लोकशाही शासनाने घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर, चांगला किंवा शहाणपणाचाच असेल. पण त्या तत्त्वाच्या स्वीकारात असे नक्कीच व्यंजित आहे की लोकशाहीत स्वीकारलेली वाईट धोरणेही (जोपर्यंत शांततेच्या मार्गांनी ती बदलून घेण्याकरिता आपण प्रयत्न करू शकतो तोपर्यंत) शुभंकर आणि शहाण्या जुलूमशाहीपुढे मान तुकविण्यापेक्षा श्रेयस्कर असतात. या दृष्टीने पाहता बहुमताचे शासन असावे हे लोकशाहीचे तत्त्व नाही असे म्हणता येईल.

पुढे वाचा

भक्ती हे मूल्य आहे काय?

आपल्या तत्त्वज्ञांनी आणि संतांनी भक्तीला एक श्रेष्ठ स्थान दिले आहे. गीतेत मोक्षाच्या सर्व मार्गात भक्तिमार्ग श्रेष्ठ मानला आहे. एखादा मनुष्य भगवद्भक्त आहे असे म्हणणे म्हणजे त्याची अत्युच्च स्तुती करणे आहे असे आपण समजतो.
भक्तीला एवढे माहात्म्य कशामुळे प्राप्त झाले?भक्तीविषयीचे हे जे सार्वत्रिक मत आहे ते बरोबर आहे काय?असा प्रश्न कोणी विचारल्यास त्याला आपण काय उत्तर देऊ शकू?
भक्तीचा उचित विषय म्हणजे परमेश्वर. तसे इतरही अनेक विषय मानले गेले आहेत. पिता, माता, गुरू, पती आणि स्वामी यांचे माहात्म्य आपल्या धर्मग्रंथांतून केलेले आपण पाहतो.

पुढे वाचा

दिवाळीतील ओळखी

टिळकांनी लिहिलेः ग्रंथ हे आमचे गुरू होत, आणि पुढे बजावले, छापण्याची कला आल्यापासून ग्रंथनिर्मितीला सुमार राहिलेला नाही. त्यामुळे निवड करून चांगले तेवढेच वाचा. आयुष्य थोडे आहे.
महाराष्ट्रात मासिकांची – नियतकालिकांची दिवाळी येते तेव्हा तर हा उपदेश फारच आठवतो.
आणखी एक, फडक्यांनी (ना. सी.) एका सुंदर गुजगोष्टीत हितोपदेश केला, तो मार्मिक आहे. आयुष्य कसे घालवावे, आपले काय काय चुकले, ते कसे टाळता आले असते इत्यादी गोष्टींचे ज्ञान माणसाला होते त्यावेळी त्याच्या आयुष्याची संध्याकाळ झालेली असते. आता उमजले तसे जगायला आयुष्य फारसे उरलेले नसते.

पुढे वाचा

इंग्लंडमधील कौटुंबिक जीवन

इंग्लंडमधील कौटुंबिक जीवनाचा शोध घेणे परदेशी पर्यटकाला शक्य नाही. परंतु त्याचे पडसाद त्यांच्या वृत्तपत्रात सतत ठळकपणे उमटत असतात. आमच्या मराठी वृत्तपत्रातच काय, आमच्या इतर सर्व भाषांतील वृत्तपत्रांत राजकीय पुढारी, त्यांचे राजकारण यावर जास्त भर असतो. ‘बड्या लोकांची गुप्त कृत्ये छापण्यास आमचे पत्रकार धजत नाहीत. ही ‘गुप्त कृत्ये उजेडात आणण्यासाठी परदेशी वृत्तपत्रांचे बातमीदार आणि त्या पत्रांचे संपादक आणि मालक राजी नसतात. पण दी टाइम्स, दी इंडिपेंडन्ट, डेली मेल, डेली एक्सप्रेस, गार्डीयन आदी वृत्तपत्रात सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांना प्राधान्य दिले जाते.
मध्यमवर्गीय इंग्रज कुटुंब, तसेच आमचे भारतीय वृत्तपत्रे विकत घेत नाहीत.

पुढे वाचा

श्री दिवाकर मोहनींच्या स्त्री-पुरुष संबंधाच्या भ्रामक कल्पना

आजचा सुधारकच्या काही अंकातून दिवाकर मोहनी यांनी स्त्रीपुरुषांमधील स्वातंत्र्याचा विचार मांडताना स्त्रीपुरुषात स्वैर लैंगिक स्वातंत्र्य असावे असे म्हटले आहे. त्याना एकपतीपत्नीव्रताची कल्पना मान्य नाही. बहुपतिक किंवा बहुपत्नीक कुटुंब असल्यास हरकत नाही असे त्याना वाटते. त्यांच्या एकूण विचारावरच लैंगिक स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य असून इतर मूल्ये दुय्यम स्वरुपाची आहेत असे त्यांचे मत असावे असे वाटते. त्यांनीह्या प्रश्नाच्या सर्व अंगाचा विचार केला आहे असे दिसत नाही.
ह्या प्रश्नाचा विचार करताना प्राचीन भारतीयानी काम व अर्थ यांच्यापेक्षा धर्म आणि मोक्ष (स्वातंत्र्य) यांना अधिक महत्त्व दिले होते.

पुढे वाचा

लोकशाही आणि हुकूमशाही

शासनांचे दोन प्रकार करता येतील. पहिल्या प्रकारचे शासन म्हणजे ज्याचा अंत रक्तपातावाचून करता येतो ते, उदा. सार्वत्रिक निवडणुकांनी. अशा व्यवस्थेत ज्यांच्या साह्याने राज्यकर्त्यांना बडतर्फ करता येईल अशा संस्था असतात, आणि त्या संस्थांचा विध्वंस राज्यकर्ते करू शकणार नाहीत इतक्या मजबूत सामाजिक परंपरा असतात. दुसर्या् प्रकारात शासनाचा शेवट शासित केवळ यशस्वी क्रांतीनेच करू शकतात, म्हणजे अर्थात् बहुधा नाहीच. पहिल्या प्रकारच्या शासनाला ‘लोकशाही आणि दुसर्याक प्रकारच्या शासनाला ‘हुकूमशाही किंवा जुलूमशाही हे शब्द मी सुचवितो. त्या शब्दांच्या पारंपरिक अर्थाशी हा भेद स्थूलमानाने जुळणारा आहे असे मला वाटते.

पुढे वाचा