विषय «इतर»

गोर्बाचेव्ह

मिखाएल गोर्बाचेव्ह यांची सत्ता सोवियत संघाच्या जनतेने त्यांना पुनः बहाल केली. हजारो लोकांनी रणगाड्यांना तोंड देत, आपले प्राण पणाला लावून नवजात स्वातंत्र्याचे रक्षण केले. बंड करणाऱ्या पुराणपंथी लोकांचा पराभव झाला आणि जी क्रांती गोर्बाचेव्ह यांनी १९८५ साली सुरू केली होती. त्या क्रांतीतून निर्माण झालेल्या सामाजिक शाक्तींनी गोर्बाचेव्ह यांना पुनः परत सत्तेवर आणले. १० मे १९८९ पासून रुमानिया, पूर्व जर्मनी, झेकोस्लाव्हाकिया या देशातील जनतेने “जनतेच्या लोकशाह्या” उद्ध्वस्त केल्या. फक्त मे १९८९ मधील चीनच्या जनतेचे बंड अयशस्वी ठरले. कारण चीनच्या ‘जनमुक्तिसैन्याने कट्टरपंथी लोकांना साथ देऊन हजारो तरुण विद्यार्थ्यांचे शिरकाण केले.

पुढे वाचा

एकात्मतेमुळे मानवता की मानवतेमुळे एकात्मता

एकात्मतेमुळे मानवता की मानवतेमुळे एकात्मता
मुसलमानांची समता फक्त मुसलमानांपुरतीच होती. इस्लाम धर्म इतका एकतर्फी आहे व स्वतःच्या अटीशिवाय कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण न करता (वन्दे मातरम् म्हणण्याससुद्धा तो तयार होत नाही) मुस्लिमेतरांबरोबर संहअस्तित्वास इतका प्रतिबंध करणारा आहे की तो फक्त मुस्लिम देशांकरिताच योग्य आहे आणि असे असले तरी तेथेही विसाव्या शतकाने कायदेविषयक बदल आवश्यक झाले आहेत. भारतासारख्या मुस्लिम नसलेल्या देशात मुस्लिमेतर बहुसंख्याकांबरोबर मुस्लिम अल्पसंख्याकांना राहावयाचे झाले तर त्यांनी एकरूप व एकात्म होणे जरूरी आहे, हे ओघानेच येते. पण इस्लाम धर्म या गोष्टीस विरोध करतो.

पुढे वाचा

भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती

भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती
इतिहासाचार्य वि.का. राजवाडे
एणेप्रमाणे (१) ध्वनीपासून भाषा, (२) रंगीत किंवा साध्या रेखाचित्रांपासून अक्षरमालिका, (३) नैसर्गिक हावभावांपासून कृत्रिम अभिनय, व (४) पाहिलेल्या आकृतींपासून बनावट भांडी-अशा चार कृत्रिम व्यावहारिक कला मनुष्याने आपल्या अकलेने संपादन केल्या. शेकडो टक्के टोपणे खाऊन व हजारो प्रयोगांत फसून मनुष्याला या चार नित्योपयोगी कला परम कष्टाने व निढळाच्या घामाने साध्य झाल्या. कोण्या काल्पनिक स्वर्गात किंवा नरकात राहणाऱ्या देवासुरानी दिल्या अशातला बिलकूल भाग नाही. शंकराच्या डमरूतून ध्वनी निघाले, चित्रलेखानामक गंधर्वकन्येने चित्रे काढण्याचे कसब शिकविले, कोण्या किन्नराने अभिनय पढविला, किंवा विश्वकम्यनि भांडी बनविण्याचा धडा घालून दिला वगैरे बोलणी केवळ भाकडकथा होत.

पुढे वाचा

विज्ञान आणि वैज्ञानिकवृत्ती

विज्ञान आणि वैज्ञानिकवृत्ती
ज्या विज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले, त्या विज्ञानाच्या अभ्यासाला सध्या सर्व शिक्षणसंस्थात अतोनात महत्त्व आलेले आहे. विज्ञानाच्या लोकप्रियतेचे कारण मात्र निसर्गनियमांबद्दल मूलभूत जिज्ञासेपेक्षा, या अभ्यासक्रमातून पुढे तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांची दारे उघडतात आणि डॉक्टर व इंजिनियर यांसारख्या पदव्या मिळाल्याने तरुण व तरुणी प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवू शकतात वा चटकन श्रीमंत करणारे व्यवसाय करू शकतात, हे असते. विज्ञानाच्या अभ्यासाचा हा हेतू संकुचित असल्याने, विज्ञान हा अभ्यासक्रमामधला महत्त्वाचा पण अर्थशून्य विषय होतो. विज्ञानाची बुद्धिनिष्ठा विद्यार्थ्यांना सापडत नाही, व ते ती शोधीतही नाहीत.

पुढे वाचा

विवेकवाद -१५

विश्वरूपदर्शन आणि ईश्वराचा शोध या लेखमालेच्या दुसऱ्या लेखांकात ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करू पाहणाऱ्या बहुतेक सर्व प्रमुख युक्तिवादांचे परीक्षण केलेले वाचकांना आठवत असेल. आज त्याच विषयाचा पण वेगळ्या दृष्टिकोणातून विचार करण्याचा विचार आहे.
भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात भगवान कृष्णांनी अर्जुनाला विश्वरूपदर्शन घडविल्याची कथा आहे. आज एक वेगळ्या प्रकारचे विश्वरूपदर्शन वाचकांना घडविण्याचे ठरविले आहे. विज्ञानाने आतापर्यंत विश्वाचा जो अभ्यास केला त्यातून विश्वाच्या स्वरूपाचे एक चित्र निश्चित झाले आहे. त्याचे संक्षेपाने वर्णन येथे करावयाचे आहे. हेतू हा की विज्ञानाने घडविलेल्या विश्वरूपदर्शनात आपल्याला कुठे ईश्वर सापडतो का, आणि सापडल्यास त्याचे स्वरूप काय आहे ते आपल्याला सांगता यावे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १४)

कुटुंब आणि शासनसंस्था
जारी कुटुंबाची मुळे जीवशास्त्रीय असली तरी नागरित (civilised) समाजांमधील कुटुंब ही कायद्याने निर्मित अशी गोष्ट आहे. विवाहावर कायद्याचे नियंत्रण असते. आणि मातापित्यांचे अपत्यांवरील अधिकार अतिशय बारकाव्याने निश्चित केलेले असतात. विवाह झालेला नसेल तर पित्याला कुटुंबात कसलाही हक्क नसतो, आणि अपत्यावर एकट्या मातेचा अधिकार चालतो. परंतु जरी कायद्याचा उद्देश कुटुंबाचे रक्षण करणे हा असतो, तरी अलीकडच्या काळात कायदा मातापिता आणि अपत्ये यांच्यामध्ये अधिकाधिक प्रमाणात पडतो आहे, आणि कायदेकर्त्यांची इच्छा आणि उद्देश यांना न जुमानता तो (कायदा) कुटुंबसंस्था मोडणारी एक प्रमुख शक्ती होऊ पाहात आहे.

पुढे वाचा

भारतीय स्त्रीजीवन (भाग २)

गीता साने (मौज प्रकाशन, १९८६) कि. रु. २८/
गीता सान्यांच्या वरील पुस्तकाच्या परिचयलेखाचा पूर्वार्ध मे ११ च्या अंकात दिला आहे. प्रस्तुत लेख त्याच लेखाचा उत्तरार्ध आहे. पहिल्या लेखात प्रश्नाची पार्श्वभूमी आणि ‘ स्त्री आणि कुटुंबसंस्था’ या विषयांवरील लेखिकेचे प्रतिपादन आले आहे. आपल्या समाजाला समता व स्वतंत्रता ही मूल्ये पटत असतील तर आपली कुटुंबसंस्था बदलावी लागेल असा त्यांचा निष्कर्ष व त्याला पोषक त्यांचे युक्तिवाद आपण पाहिले. ह्या लेखात स्त्री आणि भारतीय न्यायव्यवस्था’, ‘स्त्री आणि भारतीय अर्थव्यवस्था’ आणि ‘ वेश्यासंस्थाः व्यवसाय आणि व्यापार’ या समस्यांवरील त्यांच्या अभ्यासाचा परिचय करून घ्यायचा आहे.

पुढे वाचा

चार्वाक

संपादक, आजचा सुधारक, यांस,
प्रा. बा. य. देशपांडे यांनी लिहिलेले माझ्या ‘चार्वक दर्शन’ या पुस्तकाचे परीक्षण आणि प्रा. बा. वा. कोल्हटकर यांचे त्यावरचे टिपण प्रसिद्ध केल्याबद्दल मी आपला आणि त्या दोघांचाही अत्यंत आभारी आहे. प्रा. कोल्हटकरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांविषयीची माझी भूमिका येथे मांडत आहे.
“शंका विचारतो, त्यांचे निरसन व्हावे ही विनंती” इत्यादी प्रकारच्या त्यांच्या भाषेतून एक प्रकारचा विनय सूचित होतो. त्यांच्या प्रत्यक्ष लेखनाचे स्वरूप पाहिले, तर मात्र त्यांनी शंका विचारलेल्या नसून आपल्या आक्षेपांचे खंडन करण्याचे आव्हान दिले आहे असे वाटते. शंका विचारत असल्याचा आभास निर्माण करण्याऐवजी त्यांनी थेट आक्षेपच घेतले असते तर ते प्रामाणिकपणाचे झाले असते.

पुढे वाचा

आम्ही स्वतंत्र आहों

आम्ही स्वतंत्र आहों
हल्ली स्त्रियांची स्थिती पाहिली तर त्यांच्यांत कित्येक दुर्गुण शिरले आहेत. त्या सासुरवासांत असल्यामुळे खोटे बोलण्याची त्यांस संवय लागते व मग ती संवय मुलांस लागते. अशा रीतीने देशांतील लोक सत्य, तेज व साहसहीन होतात. आपण सर्वांनी सत्याचे व्रत धरले पाहिजे व तें आमरण चालविले पाहिजे. कोणास वाटेल की, आम्ही स्त्रियांनी काय सुधारणा करावी. आम्ही पडलों परतंत्र. तर मी त्यांस असें सांगते की, आम्ही स्वतंत्र आहों, आम्ही आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण मात्र केले पाहिजे, आमच्यापेक्षा पुरुषर्षास जास्त हक्क अगर स्वातंत्र्य असण्याची काहीएक जरूरी नाही.

पुढे वाचा

भारताची सध्याची आर्थिक दुःस्थिती

भारताच्या पंतप्रधानांनी सत्ता ग्रहण केल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात आपले सरकार देशापुढील गंभीर आर्थिक प्रश्न सोडविण्याला अग्रक्रम देईल असे जाहीर केले होते. गेल्या जूनमध्ये झालेल्या निवडनुकीनंतर पक्षोपक्षांच्या जाहीर चर्चेत देशापुढील आर्थिक संकटातून बाहेर येण्याकरिता कोणते उपाय करावयास पाहिजेत यासंबंधीच्या मुद्द्यांवरच अधिक भर देण्यात आला होता. या संदर्भात आन्तरराष्ट्रीय मुद्रा निधीच्या कर्जाचा प्रश्न प्रामुख्याने चचिला गेला. तेव्हा या आर्थिक पेचप्रसंगाचे नेमके स्वरूप काय आहे आणि ह्याचे निराकरण करण्याकरिता कोणते उपाय योजणे आवश्यक आहे, इत्यादि प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

पुढे वाचा