विषय «इतर»

डॉ. के. रा. जोशी यांचे विवेकवादीनीति विचारावरील आक्षेप

डॉ. जोशांचा पहिला आक्षेप असा आहे की कांट काय किंवा उपयोगितावादी काय, त्यांचे विवेचन प्रमाणविरुद्ध आहे. कारण विवेकवाद्याला उपलब्ध असलेल्या दोन प्रमाणांनी त्यांचे समर्थन अशक्य आहे. उदा. साधु ईहेचे स्वरूप काय आहे?ती ‘साधु’ कशी ठरते?‘साधुत्व म्हणजे काय?या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे दुर्लभ आहेत असे ते म्हणतात. ते असे का म्हणतात कळत नाही, कारण या प्रश्नांची समर्पक उत्तरे कांटने दिली आहेत, आणि त्यांचा उल्लेख माझ्या लेखात मी केला होता. असे असले तरी ती उत्तरे मी पुन्हा देतो.
ईहा म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी असणारी अशी मानस शक्ती की जिच्यामुळे तो स्वतंत्रपणे कर्मे करतो.

पुढे वाचा

डॉ. के. रा. जोशी यांचे विवेकवादीनीतिविचारावरील आक्षेप

आजचा सुधारकच्या जुलै अंकात डॉ. के. रा. जोशी यांनी मी केलेल्या विवेकवादी नीतिविचाराच्या मांडणीवर ती भोंगळ असल्यास आरोप केला असून त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक युक्तिवादही सादर केले आहेत. त्यांना उत्तर देण्यापूर्वी प्रथम डॉ. जोशी यांचे आभार मानणे मी आपले कर्तव्य समजतो. त्यांनी माझ्या लिखाणावर आक्षेप घेतले याचा अर्थ ते त्यांनी वाचले, आणि नुसतेच वाचले नाहीत तर ते काळजीपूर्वक वाचले (कारण आक्षेप घेण्याकरिता ते अवश्यच असते), आणि त्यावर आक्षेप घेण्याच्या लायकीचे ते आहेत असे त्यांना वाटले. गंभीर लिखाण वाचणारे लोक अतिशय दुर्मिळ असलेल्या या काळात वरील गोष्ट मला फार स्वागतार्ह वाटते, आणि म्हणून मी त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

पुढे वाचा

कालचे सुधारक: नव्या मनूचे वात्स्यायन : रघुनाथ धोंडो कर्वे (भाग १)

कर्व्यांचे प्रेरणास्थान आगरकर होते. ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’ हा आगरकरी बाणा. तो कर्व्यांच्या अंगी इतका भिनला होता की त्यांचे जीवन ही एकझपाटलेल्या सुधारकाची जीवनकहाणी वाटावी. आगरकर १८९५ साली वारले. कर्वे १८९७ साली संपूर्ण मुंबई इलाख्यात मॅट्रिकला पहिले आले, कॉलेजात सतत गणितात पहिले येत गेले. फ्रान्समध्ये जाऊन त्यांनी गणिताचा आणखी विशेष अभ्यास केला. एल्फिन्स्टन, डेक्कन अशा सरकारी आणि विल्सन कॉलेजसारख्या नामांकित मिशनरी कॉलेजांत मिळत गेलेल्या नोकऱ्या त्यांनी सोडल्या. आणि स्वतःला प्राणप्रिय, पण समाजाला अत्यंत अभद्रआणि ओंगळ वाटणार्यान कार्यासाठी त्यांनी कायम अर्धबेकार आणि ओढघस्तीचे जिणे पत्करले.

पुढे वाचा

चर्चा-डॉ. प्रदीप पाटील यांना उत्तर

डॉ. प्रदीप पाटील यांनी (आजचा सुधारक मे-जून ९२) उपस्थित केलेल्या तेरा मुद्द्यांसंबंधी लिहिण्याची सुरुवात शेवटल्या वाक्यातील वैज्ञानिक’ या शब्दापासून करतो.
तंत्रवैज्ञानिक मार्ग वा उपाय म्हणजे काय हे चटकन कळते. वैज्ञानिक मार्ग म्हणजे काय?
आधुनिक पाश्चात्य विज्ञानाच्या मर्यादेत बोलावयाचे तर भौतिक जगाविषयीचे एका विशिष्ट प्रकारचे ज्ञान म्हणजे (आधुनिक पाश्चात्य) विज्ञान होय. हे ज्ञान पक्के असते व ते स्थलकालनिरपेक्ष (युनिव्हर्सल) असते. या ज्ञानाचा उपयोग करून एखादा प्रश्न सोडवला गेल्यास वैज्ञानिक मार्गाने प्रश्न सोडविला असे म्हणता येईल. मग वैज्ञानिक = तंत्रवैज्ञानिक असे समीकरण होईल.

पुढे वाचा

चर्चा -गीता, मनुस्मृति व प्राध्यापक देशपांडे

ऑगस्ट ९२ च्या आजच्या सुधारकमध्ये प्रा. देशपांडे यांनी त्यांच्या गीतेवरील लिखाणावर मी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर दिल्याचा दावा मांडला आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे गीतेने नीतीच्या मूलभूत प्रश्नांना बगल दिलेली नसून देशपांड्यांनी मात्र माझ्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल दिली आहे. दोन कर्तव्यांत संघर्ष कसा टाळावा या प्रश्नाचे उत्तर त्यांना गीतेत सापडत नाही, मी दाखवून दिल्यावरही सापडत नाही. दुष्टांना शासन करण्यासाठी युद्ध करणे व शासनयोग्य स्वजनांना शासन न करता, आपण स्वजनांवर हात उगारला नाही याचे समाधान मिळविणे या दोन कर्तव्यांत अर्जुनापुढे संघर्ष होता. या संघर्षाची सोडवणूक गीतेने ‘लोकसंग्रह व ‘सर्वभूतहित’ हे दोन नीतीचे उद्देश सांगून केली आहे.

पुढे वाचा

पुस्तक परिचय -सावरकर ते भाजपः हिन्दुत्वविचाराचा चिकित्सक आलेख

सावरकर ते भा. ज. प. हा ग्रंथ छोटेखानी दिसत असला तरी त्याचा आवाका मोठा आहे. किमान १९२० पासून १९९२ पर्यंत म्हणजे अंदाजे सत्तर-पंचाहत्तर वर्षांचा कालखंड त्यामध्ये प्रतिबिंबित झाला आहे. भारताला भेडसावणाच्या मुस्लिम प्रश्नाचे त्यामध्ये केलेले चित्रण बरेचसे यथातथ्य आहे. काही ठिकाणी मात्र थोडे जास्त अतिसामान्यीकरण (overgeneralization) झाल्यासारखे वाटते.
ग्रंथाची रचना बांधेसूद आहे. लेखकाने त्याचा आरंभ मुस्लिम प्रश्नापासून करून आपल्या प्रतिपाद्य विषयाचा भरभक्कम पाया रचला आहे. हिन्दुराष्ट्रवाद किंवा हिंदुत्व हा विचार मुख्यतः मुसलमानांकडून (आणि गौणतः ख्रिश्चनांकडून) होणार्यार आक्रमणाची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झाला आहे आणि आजही त्याचा मुख्य संदर्भ मुस्लिम प्रश्नाचाचआहे असे लेखकाचे मत आहे.

पुढे वाचा

ग्रामीण महिलांच्या गंभीर लैंगिक व मानसिक समस्या

आरोग्यसेवेचे फायदे घेण्यासाठी स्त्रिया पुढे येऊ शकत नाहीत यासाठी पुराव्याची आवश्यकता नाही. भारतीय आरोग्यसेवा पद्धतीत स्त्रीला फक्त माता किंवा भावी माता एवढ्याच स्वरूपात स्थान दिले जाते. ही या पद्धतीतील महत्त्वाची त्रुटी आहे. ही विचारसरणी जनारोग्य चळवळीतील पुरोगामी व्यक्तींनीसुद्धा कमी अधिक प्रमाणात स्वीकारलेली आढळून येते. माता-आरोग्य-संवर्धन या कार्यक्रमाचे फायदे गरीब, कामकरी महिलांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांप्रर्यंत परिणामकारक रीत्या पोहचू शकत नाहीत.
सार्वजनिक आरोग्य सेवेत, स्त्रीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने, महिला आरोग्याच्या दुरवस्थेत अधिकच भर पडली आहे. जननक्षमता, तसेच अपत्यजन्माशी थेट संबंध नसलेले प्रश्न, सोयिस्करपणे वळचणीला टाकले जातात.

पुढे वाचा

डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांच्या आक्षेपांविषयी

माझ्या ‘गीतेतील नीतिशास्त्र या लेखावर डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. (आजचा सुधारक, मे-जून ९२, पृ. ८५) त्यांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
१. त्यांचा पहिला मुद्दा असा आहे.‘गीतेचे विवेचन महाभारताच्या पाश्र्वभूमीचा विचार केल्याशिवाय योग्य रीतीने होऊ शकत नाही. गीतेत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर नाही असे प्रा. देशपांडे म्हणतात. या आरोपाची चिकित्सा करण्यासाठी अर्जुनाचा प्रश्न काय होता हे समजून घेतले पाहिजे. ‘कर्तव्य कोणते हे कसे ठरवावे?’ आणि ‘ युद्ध न्याय्य की अन्याय्य याचा निकष कोणता?’ या मूलभूत प्रश्नांची चर्चा महाभारतात इतरत्र आलेली आहे व गीतेच्या नीतिशास्त्रविषयक विचारात ती गृहीत धरलेली आहे.’

पुढे वाचा

उपेक्षा लोकहितवादींची

महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचा प्रारंभ बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ (इ.स. १८३२) या साप्ताहिकाच्या आरंभापासून झाला असे म्हणता येईल. परंतु सामाजिक सुधारणेला पोषक व प्रेरक असे साहित्य ‘प्रभाकर’ पत्रातून १८४६ सालापासून ‘शतपत्रां’च्या रूपाने महाराष्ट्राला दिले ते लोकहितवादी यांनीच. त्याच वर्षी पुण्यात पहिली मुलींची शाळाकाढून म. जोतिबा फुले यांनी प्रत्यक्षात सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला. पेशवाईच्या अस्तानंतर केवळ तीस वर्षांच्या कालावधीत हे सारे घडून आले. इंग्रजी राज्य हे शाप की वरदान याचा निर्णय होण्यापूर्वीच हे घडून गेले. या परिवर्तनाची कल्पना व योजना ज्या त्रिमूर्तीनी केली ते तिघेही तरुण होते.

पुढे वाचा

शेअर बाजारातील अभूतपूर्व घोटाळा

गेल्या काही महिन्यांत शेअरबाजारातील व बँकांसारख्या वित्तीय संस्थांमधील गैरव्यवहारांसंबंधीच्या बातम्यांनी खळबळ माजली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण म्हणून ह्याची नोंद केली जाईल असे म्हटले जाते. ‘शेअर बाजारातील महाबेलाचा धुमाकूळ’ इ. मथळ्यांखाली हर्षद मेहता, त्याचे साथीदार व काही अग्रगण्य देशी व विदेशी बँका यांच्या गैरव्यवहारासंबंधी वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून बरीच माहिती प्रसिद्ध झाली आहे. ह्या बातम्यांनी सर्वसामान्य माणूस संभ्रमित झालेला दिसतो. ह्या प्रकरणातील आर्थिक व्यवहार बरेच गुंतागुतीचे आहेत. तरी पण या घोटाळ्याची स्थूल मानाने कल्पना यावी या उद्देशाने केलेला हा लेखनप्रपंच.

पुढे वाचा