विषय «इतर»

डॉ. के. रा. जोशी यांचे विवेकवादीनीतिविचारावरील आक्षेप

आजचा सुधारकच्या जुलै अंकात डॉ. के. रा. जोशी यांनी मी केलेल्या विवेकवादी नीतिविचाराच्या मांडणीवर ती भोंगळ असल्यास आरोप केला असून त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक युक्तिवादही सादर केले आहेत. त्यांना उत्तर देण्यापूर्वी प्रथम डॉ. जोशी यांचे आभार मानणे मी आपले कर्तव्य समजतो. त्यांनी माझ्या लिखाणावर आक्षेप घेतले याचा अर्थ ते त्यांनी वाचले, आणि नुसतेच वाचले नाहीत तर ते काळजीपूर्वक वाचले (कारण आक्षेप घेण्याकरिता ते अवश्यच असते), आणि त्यावर आक्षेप घेण्याच्या लायकीचे ते आहेत असे त्यांना वाटले. गंभीर लिखाण वाचणारे लोक अतिशय दुर्मिळ असलेल्या या काळात वरील गोष्ट मला फार स्वागतार्ह वाटते, आणि म्हणून मी त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

पुढे वाचा

डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांच्या आक्षेपांविषयी

माझ्या ‘गीतेतील नीतिशास्त्र या लेखावर डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. (आजचा सुधारक, मे-जून ९२, पृ. ८५) त्यांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
१. त्यांचा पहिला मुद्दा असा आहे.‘गीतेचे विवेचन महाभारताच्या पाश्र्वभूमीचा विचार केल्याशिवाय योग्य रीतीने होऊ शकत नाही. गीतेत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर नाही असे प्रा. देशपांडे म्हणतात. या आरोपाची चिकित्सा करण्यासाठी अर्जुनाचा प्रश्न काय होता हे समजून घेतले पाहिजे. ‘कर्तव्य कोणते हे कसे ठरवावे?’ आणि ‘ युद्ध न्याय्य की अन्याय्य याचा निकष कोणता?’ या मूलभूत प्रश्नांची चर्चा महाभारतात इतरत्र आलेली आहे व गीतेच्या नीतिशास्त्रविषयक विचारात ती गृहीत धरलेली आहे.’

पुढे वाचा

उपेक्षा लोकहितवादींची

महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचा प्रारंभ बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ (इ.स. १८३२) या साप्ताहिकाच्या आरंभापासून झाला असे म्हणता येईल. परंतु सामाजिक सुधारणेला पोषक व प्रेरक असे साहित्य ‘प्रभाकर’ पत्रातून १८४६ सालापासून ‘शतपत्रां’च्या रूपाने महाराष्ट्राला दिले ते लोकहितवादी यांनीच. त्याच वर्षी पुण्यात पहिली मुलींची शाळाकाढून म. जोतिबा फुले यांनी प्रत्यक्षात सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला. पेशवाईच्या अस्तानंतर केवळ तीस वर्षांच्या कालावधीत हे सारे घडून आले. इंग्रजी राज्य हे शाप की वरदान याचा निर्णय होण्यापूर्वीच हे घडून गेले. या परिवर्तनाची कल्पना व योजना ज्या त्रिमूर्तीनी केली ते तिघेही तरुण होते.

पुढे वाचा

शेअर बाजारातील अभूतपूर्व घोटाळा

गेल्या काही महिन्यांत शेअरबाजारातील व बँकांसारख्या वित्तीय संस्थांमधील गैरव्यवहारांसंबंधीच्या बातम्यांनी खळबळ माजली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण म्हणून ह्याची नोंद केली जाईल असे म्हटले जाते. ‘शेअर बाजारातील महाबेलाचा धुमाकूळ’ इ. मथळ्यांखाली हर्षद मेहता, त्याचे साथीदार व काही अग्रगण्य देशी व विदेशी बँका यांच्या गैरव्यवहारासंबंधी वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून बरीच माहिती प्रसिद्ध झाली आहे. ह्या बातम्यांनी सर्वसामान्य माणूस संभ्रमित झालेला दिसतो. ह्या प्रकरणातील आर्थिक व्यवहार बरेच गुंतागुतीचे आहेत. तरी पण या घोटाळ्याची स्थूल मानाने कल्पना यावी या उद्देशाने केलेला हा लेखनप्रपंच.

पुढे वाचा

ग्रामीण महिलांच्या गंभीर लैंगिक व मानसिक समस्या

आरोग्यसेवेचे फायदे घेण्यासाठी स्त्रिया पुढे येऊ शकत नाहीत यासाठी पुराव्याची आवश्यकता नाही. भारतीय आरोग्यसेवा पद्धतीत स्त्रीला फक्त माता किंवा भावी माता एवढ्याच स्वरूपात स्थान दिले जाते. ही या पद्धतीतील महत्त्वाची त्रुटी आहे. ही विचारसरणी जनारोग्य चळवळीतील पुरोगामी व्यक्तींनीसुद्धा कमी अधिक प्रमाणात स्वीकारलेली आढळून येते. माता-आरोग्य-संवर्धन या कार्यक्रमाचे फायदे गरीब, कामकरी महिलांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांप्रर्यंत परिणामकारक रीत्या पोहचू शकत नाहीत.
सार्वजनिक आरोग्य सेवेत, स्त्रीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने, महिला आरोग्याच्या दुरवस्थेत अधिकच भर पडली आहे. जननक्षमता, तसेच अपत्यजन्माशी थेट संबंध नसलेले प्रश्न, सोयिस्करपणे वळचणीला टाकले जातात.

पुढे वाचा

धर्म वेगळा, रिलिजन वेगळा

भारतीय संविधानानुसार भारत हे जसे लोकशाहीप्रधान राज्य तसेच ‘सेक्युलर’ म्हणजे ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य आहे. इंग्रजी भाषेतील ‘रिलिजन’ला समानार्थी शब्द म्हणून ‘धर्म’चा वापर करण्यात येतो. ‘धर्म’ व ‘रिलिजन’ या संकल्पना एक नव्हेत. ‘सेक्युलर म्हणजे ‘रिलिजन’निष्ठ राज्य नाही; तर धर्मप्रधान राज्य होय. परंतु ‘धर्म व रिलिजन’ यांचा समानार्थी वापर केल्यामुळेच ‘सेक्युलर’चा देखील चुकीचा अर्थ लावण्यात आला हे यथामति सांगण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
जो राजकीय पक्ष संविधानाशी एकनिष्ठ नाही, त्यास निवडणुकांत भाग घेता येणार नाही. निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक भावनेस आवाहन करून प्रचार केल्याचे सिद्ध झाल्यास न्यायालय विजयी उमेदवाराची निवड रद्द करू शकते.

पुढे वाचा

परिणामशून्य होमिऑपथी

१८ व्या शतकाच्या शेवटी सॅम्युएल हानेमान या जर्मन डॉक्टरने होमिऑपथीचे मूळ तत्त्व सुलभ रूपात मांडण्यास सुरुवात केली. त्याच्या काळातील प्रचलित वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये जळवा लावणे, कोठा साफ करणे व इतर उपचार यांनी लाभ होण्याऐवजी हानीच जास्त व्हायची. हे पाहून खरे तर हानेमान व्यथित झाले होते. मयुरी क्लोराईडसारख्या औषधामुळे होणार्‍या विषबाधेची त्यांना चिंता वाटत असे. त्यांनी नंतर समानांचा नियम” (Law of Similars) विकसित केला – रुग्णाच्या लक्षणांसारखी लक्षणे उत्पन्न करणारे औषध अल्प प्रमाणात देऊन रोगाचे निर्मूलन करणे. Let likes be treated by likes.

पुढे वाचा

कालचे सुधारक : ताराबाई मोडक (उत्तरार्ध)

पंडिता रमाबाई आणि ताराबाई यांच्यात पुष्कळच साम्य आहेः दोघींनीही शिक्षण क्षेत्रात मूलगामी कार्य केले. खाजगी जीवनात पति-सुखाची तोंडओळख होते न होते तोच त्याने कायम पाठ फिरवली. एकुलती कन्या तरुण असतानाच मरण पावली. दोघींनीही प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत आपले काम उभे केले, इ.इ. पण एका बाबतीत यांच्यात फरक आहे.आणि तो फार मोठा आहे. पंडिता धर्मनिष्ठ होत्या. त्या ख्रिस्ती झाल्या. प्रेम, सेवा या ख्रिस्त शिकवणुकीने त्या भारल्या होत्या. Faith, Hope and Charity (श्रद्धा, आशा, नि परोपकार) ही त्रिसूत्री मिशनच्यांचे ब्रीद आहे. तीमुळे आपण ईश्वराचे काम करीत आहोत अशी दृढश्रद्धा पंडिताबाईंना सहजच बळ देत होती.

पुढे वाचा

चर्चा- विवेकवादातील भोंगळ नीतिविचार

‘विवेकवाद’ या शीर्षकाच्या अंतर्गत प्रा. दि. य. देशपांडे यांनी नीतिविचाराची स्वमते चिकित्सक मांडणी ‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या अनेक अंकातून लेखमाला लिहून चालविली आहे. त्याविषयी त्यांना विचारण्यात आलेल्या शंकांची उत्तरे त्यांनी विवेकवाद – २० (एप्रिल ९२) मधून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःला विवेकवादी म्हणवून घेणार्‍या मंडळींचे नीतिविषयक विचार यामुळे एकत्रित वाचावयाला मिळतात हा या लेखमालेचा अभिनंदनीय विशेष आहे. कांटवादी नीतिमीमांसेला उपयोगितावाद्यांच्या नीतिविचारांची जोड देऊन त्यांनी ही जी ‘अभिनव मांडणी केली ती शक्य तो त्यांचेच शब्द वापरून संकलित केल्यास पुढीलप्रमाणे दिसते. नीतिविचार हा मानवाशी संबंधित आहे.

पुढे वाचा

चर्चा- डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांच्या लेखाबद्दल

डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांचा मार्च ९२ च्या अंकातील ‘मरू घातलेली जात’ हा लेख, एप्रिल ९२ च्या अंकातील श्री. केशवराव जोशी यांचे पत्र वाचल्यावर पुन्हा एकदा वाचला. त्यावरील प्रतिक्रिया.
डॉ. वर्‍हाडपांडे यांच्या प्रतिपादनाप्रमाणे मार्क्सवाद संपला आहे. ठीक आहे. मग त्याबद्दल इतका त्रागा करून लेख लिहिण्याची गरज कशासाठी?
वस्तुस्थिति अशी आहे की सगळ्या जगालाच मार्क्सवादाचा स्वीकार करणे अनिवार्य होणार आहे. कारण मानवतावाद हा मार्क्सवादाचा केंद्रबिंदु आहे. मार्क्सवाद हा अर्थशास्त्रापुरताच मर्यादित आहे हा चुकीचा समज आहे. मानवाशी संबंध असलेला कोणताच विषय मार्क्सवादाला वर्ण्य नाही.

पुढे वाचा