[श्री सीताराम दातारांचे अन्धश्रद्धाविनाशाय हे विवेकवादी भूमिकेचे पद्यरूप आपण गेल्या अंकापासून क्रमशः देत आहोत. पहिल्या भागात 56 कडव्यांमधून (1) मानवाची वैशिष्ट्ये, (2) मानवांपुढील समस्या, (3) मानवाची उपाययोजना, (4) मानवाने कल्पिलेले ईश्वराचे स्वरूप, (5) ईश्वरविषयक सत्याची विस्मृती, (6) जनमानसावर ईश्वरकल्पनेचा प्रभाव, (7) सत्यवाद्यांचा पक्ष, (8) नास्तिकांच्या मतें सृष्टीतील विषमतेचे स्पष्टीकरण, (१) आस्तिकांचे कर्मसिद्धान्ताद्वारे स्पष्टीकरण, (10) नास्तिकांचा आक्षेप, (11) आस्तिकांचे उत्तर, (12) यावर नास्तिकांची प्रतिक्रिया. (अंक 21.9, डिसेंबर 2010.) हे विभाग दिले होते. दुसऱ्या भागात 54 कडव्यांमधून (13) प्रत्यक्षप्रमाण व अनुमानप्रमाण (14) प्रत्यक्षप्रमाणाविषयी शंका (15) शंकेचे निरसन (16) प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणांनी ईश्वरादि कल्पनाचे परीक्षण (17) शब्दप्रमाणपरीक्षा (18) श्रद्धा, अंधश्रद्धा व डोळस श्रद्धा (19) काही अंधश्रद्धा हे विभाग दिले होते.
विषय «इतर»
आपला देश, अन् आपलेच प्रशासन
[ राष्ट्रीय रोजगार हमी कायदा अंमलात आल्याला 2 फेब्रुवारी 2010 रोजी 5 वर्षे होतील, त्यानिमित्ताने त्या कायद्याच्या चांगल्या अंमलाचे एक उदाहरण खाली पुरवीत आहोत. प्रियदर्शन हा प्रगति अभियान, नाशिक या संस्थेचा तरुण, तंत्रसाक्षर कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या आंध्रप्रदेशातील वापराच्या प्रत्यक्ष अभ्यासाचा हा निष्कर्ष. ]
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सातत्याने टीका होताना आपल्याला दिसते. मीही अशी टीका करत आलो आहे. प्रशासनाकडून केलेल्या अपेक्षांची पूर्ती होत नाही आणि म्हणून शासनाचे वर्णन करताना बहुतेकदा ‘अनिच्छा’, ‘अकार्यक्षमता’, ‘उदासीनता’, ‘भ्रष्टाचार’ असे वाचायला मिळते. आपले प्रशासन ही अवाढव्य यंत्रणा आहे.
शेतीसाठी जमीन आणि माती
जमीन आणि माती या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. मराठीत बऱ्याच वेळा हे दोन शब्द आपण सहजपणे, फारसा विचार न करता एकाच अर्थाने वापरतो. आज आपण या दोन्हींचा स्वतंत्रपणे विचार करणार आहोत. उत्पादक, सुफला माती आणि जमीन ही सर्वकाळी, सर्व मानवजातीची गरज राहिलेली आहे. आपले अस्तित्वच त्यावर अवलंबून आहे आणि म्हणून त्यांची देखभाल करणे, योग्य निगा राखणे महत्त्वाचे आहे.
जमिनीची धूप हे सर्वांत मोठे अरिष्ट आहे. वारा, ऊन, पाऊस यांचे जमिनीवर सतत आक्रमण होत असते. इतके की काही ठिकाणी योग्य व वेळेवर काळजी न घेतल्याने प्रदेश उजाड झाले आहेत.
सँडेल व्याख्यानांची चिकित्सा – भाग एक
बाजार हाच आजार?
सँडेल यांची व्याख्याने आणि आसु ने ती मराठीत उपलब्ध करणे या दोन्ही घटनांचे प्रथम स्वागत करतो कारण त्यामुळे सध्या ऐरणीवर असलेल्या विषयांवर होणारी राजकीय चर्चा ही तत्त्वज्ञानात्मक व नीतिशास्त्रीय पातळीवर नेता येईल. सँडेल यांनी चर्चा अशा पातळीवर नेऊन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. प्रथम सँडेल यांच्याशी सहमती असणारे मुद्दे सांगून नंतर सँडेल यांच्याच रोचक उदाहरणांच्या आधारे त्यांच्या भूमिकेबाबतचे आक्षेप, शंका व सँडेलने दुर्लक्षित ठेवलेले मुद्दे उपस्थित करणे असा क्रम घेत आहे. सहमतीचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
1) जीवनाच्या सर्व अंगांमधील सर्वच समस्या, बाजार व्यवस्था या एकाच संस्थेमार्फत सुटू शकतील असे मानणे हे व्यर्थच नव्हे तर घातक आणि निषेधार्हही आहे.
गावची जत्रा
प्रत्येक गावाला यात्रा किंवा उरूस दरवर्षी असतो. आपल्याकडे मुसलमान राज्यकर्त्यांचा अंमल सुमारे 1000-1200 वर्षे तरी होता. तेव्हा बऱ्याच ठिकाणी राज्यकर्त्यांचा धर्म पाळण्याच्या इच्छेने तेथे देवळांच्या ऐवजी दर्गे वगैरे झाले असतील. अगदी देवळांचेच दगड वापरून दर्गे बांधले, अशा कडवेपणाने नसले तरी नवीन दर्गे झाले असतील. मुस्लिम राजवटीने त्यांना वतने दिली असतील, व मग देवाचा उरूस करणे ओघाने आलेच! नंतर जरी इतर धर्मांच्या राजवटी आल्या तरी सहिष्णुतेच्या मानसिकतेतून त्या राजांनी ती धर्मस्थळे व त्यांची वतने तशीच ठेवली असतील. नंतर ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या राजवटीत तर धर्मस्थळांचे नीट जतन करून, समाज एकसंध राहू नये या धोरणामुळे सर्व धर्मस्थळे सांभाळली गेली असतील.
मराठीच्या प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना विदर्भ साहित्य संघात ‘शुद्धलेखनाचे सुलभीकरण’ ह्या विषयावर घडलेल्या चर्चासत्रात वाचलेला निबंध
( या निबंधाचे लेखन शासनमान्य नियमांनुसार केले आहे. कारण शासनाचे नियम वापरणे बंधनकारक (mandatory) आहे.) मराठीची प्रमाणभाषा, बोलण्याची नव्हे तर लिहिण्याची, कशी असावी तर तीमध्ये कोणताही विषय मांडता यावा. शास्त्र किंवा विज्ञान यांची सतत वाढ होत असते. म्हणजे त्यांचा परिघ वाढत जातो; त्याचप्रमाणे त्या विषयांची खोली देखील वाढत जाते. असे सतत वाढत जाणारे विषय आमच्या भाषेला पेलता यावे आणि तीमध्ये केलेले लेखन निःसंदिग्ध आणि अल्पाक्षर असावे अशी गरज आहे. ही गरज असताना त्याचवेळी लेखननियमांच्या सुलभीकरणाची मागणी होत आहे. सुलभीकरणाची गरज आहे असे मानून मी लेखनाच्या विषयात प्रवेश केला.
अंधश्रद्धानिर्मूलनार्थ (भाग २)
[ श्री सीताराम दातारांचे अन्धश्रद्धाविनाशाय हे विवेकवादी भूमिकेचे पद्यरूप आपण गेल्या अंकापणून क्रमशः देत आहोत. पहिल्या भागात 56 कडव्यांमधून (1) मानवाची वैशिष्ट्ये, (2) मानवांपुढील समस्या, (3) मानवाची उपाययोजना, (4) मानवाने कल्पिलेले ईश्वराचे स्वरूप, (5) ईश्वरविषयक सत्याची विस्मृती, (6) जनमानसावर ईश्वरकल्पनेचा प्रभाव, (7) सत्यवाद्यांचा पक्ष, (8) नास्तिकांच्या मतें सृष्टीतील विषमतेचे स्पष्टीकरण, (१) आस्तिकांचे कर्मसिद्धान्ताद्वारे स्पष्टीकरण, (10) नास्तिकांचा आक्षेप, (11) आस्तिकांचे उत्तर, (12) यावर नास्तिकांची प्रतिक्रिया. (अंक 21.9, डिसेंबर 2010.) आता वेगवेगळी प्रमाणे तपासून दातार अंधश्रद्धा या मुख्य विषयाकडे वळत आहेत. – संपादक ]
13) प्रत्यक्षप्रमाण व अनुमानप्रमाण इंद्रियें वस्तुजाताचा बोध प्रत्यक्ष होत जो पुरावा अन्य ना लागे त्याते सिद्ध करावया ॥57 असे प्रमाण प्रत्यक्ष, सर्वां प्राप्य, अजोडही मुख्य साऱ्या प्रमाणांत मान्य सर्वांस सर्वथा ॥58 साऱ्या वस्तू न कळती इंद्रियांनीच सर्वदा अनुमानप्रमाणें त्यां जाणे मानव तेधवा ॥59 गोलाकार ग्रहांचा वा त्यांची सूर्यप्रदक्षिणा जाणिती अनुमानें त्यां ‘पर्वतीं अग्निला’ जसे ॥60
14) प्रत्यक्षप्रमाणाविषयी शंका ज्ञानेंद्रियेही सर्वांची कार्यक्षम न सारखी इंद्रियज्ञान कोणाचे समजावे प्रमाणवत् ?
पत्रसंवाद
राजीव साने, 2, स्नेह क्लासिक्स्, 7/1 एरंडवणे, पाडळे पॅलेससमोरील रस्ता, पुणे 411004 चौसाळकरांना उमजलेला मार्क्स : काही प्रश्न आजचा सुधारकच्या नोव्हेंबर 2010 च्या अंकात सुधीर बेडेकर यांनी लिहिलेले परीक्षण (मार्क्सवाद-उत्तरमार्क्सवाद ले. प्रा. अशोक चौसाळकर) वाचले. त्यातून बऱ्याच आशा पल्लवित झाल्या. परंतु पुस्तक वाचल्यावर मात्र निराशा झाली. पहिली दोन प्रकरणे खुद्द मार्क्सवर आहेत. या दोन प्रकरणात इतक्या घसरड्या जागा निघाल्या की त्यावर प्रश्न उपस्थित करण्यातच प्रस्तुत लेख खर्ची पाडावा लागला. पुस्तकाच्या पुढील भागातही आक्षेपार्ह असे बरेच काही आहे पण ते या लेखाच्या मर्यादेत घेणे शक्य नाही.
पुस्तक-परिचय : महागाईची जन्मकुंडली
आपल्याला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बाजारात पाय टाकल्याशिवाय पर्याय नसतो. आणि बाजारात पाय टाकला की आपण महागाईचे चटके अनुभवतो आणि मग स्वतःशीच पुटपुटतो. “काय ही महागाई’. महागाई वाढण्याचे कारण काय असेल तर बाजारात वस्तूंचा तुटवडा, असे ढोबळ उत्तर देत आपण सामान्य लोक बाजारातून काढता पाय घेतो.
आज महागाई हा शब्द आपण रोज ऐकतो. महागाई म्हणजे काय? महागाईस कोण जबाबदार? देशातल्या कोणत्या घटकाला या महागाईचा फटका बसतो? हा महागाईचा प्रश्न सुटायला हवा असे वाटत असेल तर यावरचा उपाय काय? महागाईचा शेतकऱ्यांशी काय संबंध?
पुस्तक-परिचय : प्रोमीथियन अग्नी
पुस्तकाचे नाव Promethean Fire : Reflections on the Origin of the Mind आहे. (लेखक – चार्ल्स जे लुम्स्डेन व इ.ओ. विल्सन, हार्वर्ड युनि. प्रेस, 1983) [ ग्रीक पुराणांमध्ये देवांकडून अग्नी चोरून आणणाऱ्या प्रोमीथियस नावाच्या योद्ध्याची कथा आहे. तिच्या आधाराने ‘देवत्व पावण्याचा हव्यास’ याचे रूपक म्हणून प्रोमीथियसचे मिथक वापरले जाते. – सं.]
जितके नाव जड, तितकेच पुस्तकही वाचायला जड आहे. बहुतांश संदर्भ जीवशास्त्र आणि जनुकशास्त्रामधले, ज्याचा आणि माझा दहावीनंतर कधीही संबंध आला नव्हता. बरे, जेवढे कळत होते तेवढेही कितपत कळलेले आहे याबद्दल शंकाच आहे!