सर्व संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो जगण्याचा. सर्व सामाजिक संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो इतर संरचनांशी जुळते घेण्याचा. आणि एका मर्यादेपर्यंत सर्व संरचना सामाजिकच असतात. आपण जिला नीतिमत्ता म्हणतो, जीनुसार आपण वागणुकीचे नियम ठरवतो, त्या कल्पनाव्यूहात वरील दोन्ही गोष्टी येतात. व्यक्ती म्हणून स्वतःसाठी जगणेही येते, आणि इतर व्यक्तींसाठी करण्याची कर्तव्येही येतात. या इतर व्यक्तींमध्ये आपला समाज, आपली जीवजात, इतर जीवजाती, हे सारेच येते. [ कॉलिन टज्च्या सो शल वुई रीप (अॅलन लेन, २००३) या पुस्तकातील बायॉलजी, मोरॅलिटी, एस्थेटिक्सः द मीनिंग ऑफ अॅग्रिकल्चर या प्रकरणातून.]
विषय «इतर»
बाजारपेठा आणि नीतितत्त्वे
मूळ लेखक : मायकेल सँडेल
इंग्लंडमध्ये बीबीसीतर्फे ‘रीथ लेक्चर्स’ची एक मालिका सादर केली जाते. एखादा प्रमुख विचारवंत महत्त्वाच्या विषयावर आपले विचार ह्या मालिकेतून लोकांसमोर मांडतो. २००९ साली ह्या व्याख्यानांकरिता प्रोफेसर मायकेल सँडल ह्या हार्वर्ड विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या व्याख्यात्याला निमंत्रित केले होते. प्रोफेसर सँडल हे एक मान्यवर तत्त्वज्ञ आणि राजकीय विचारवंत आहेत. ‘न्याय’ ह्या विषयावरील त्यांच्या व्याख्यानांना प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी गर्दी करतात. सगळ्यांचे हित (common good) जपणाऱ्या नव्या प्रकारच्या राजकारणाचे स्वरूप कसे असावे
ह्याचा विचार करणाऱ्या ह्या व्याख्यानमालिकेचे नाव नवे नागरिकत्व (A New Citizenship) असे आहे.
तुमच्याशिवाय नाही
तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कशी दिसतील? ती प्रतीकात्मकच असतील, की वास्तविक (realistic) असतील? बरे, तत्त्वचर्चा स्वभावानेच कोरड्या, नीरस. कला मात्र व्याख्येनेच रसाळ. मग तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कधी कलात्मक होतील का? चर्चा मुळात शब्द हे माध्यम ओलांडून बाहेर, दृश्य रूपांत जाऊ शकतील का? साधारणपणे आपल्याला हे प्रश्न पडतही नाहीत, मग अस्वस्थपणे त्यांची उत्तरे शोधणे तर दूरचेच. पण असे प्रश्न जागवणारा, ते सोडवायला चौकट पुरवणारा एक अनुभव नागपूरकरांना नुकताच आला. अमरावतीच्या संजय गणोरकरांचे मांडणी शिल्पांचे (installations) प्रदर्शन असा अनुभव देऊन गेले.
अमरावती जिल्ह्याची सुपीक जमीन, हा वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड या म्हणीचा आधार.
निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-३)
[End of Ideology (तत्त्वादर्शीचा अंत!), Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), ह्या कळीच्या संकल्पना गेल्या लेखांशांत आल्या होत्या. आता इतर काही कळीच्या संकल्पना पाहू
या लेखात आपण आतापर्यंत जे प्रतिपादन केले त्याचा सर्वसाधारण आशय असा की जे मतदार सरकार निवडून देतात त्यांचे त्या विशिष्ट मतदाराला निवडून देण्याचे निकष सर्वस्वी निराळे असतात. पक्ष व त्यांचे नेते यांची स्टेजवर बोलण्याची व प्रत्यक्षातली उद्दिष्टे यांच्यात फार अंतर असते. जेव्हा एखादा उमेदवार निवडून येतो तेव्हा अनेकांची अनेक उद्दिष्टे साध्य झालेली असतात. प्रसंगी ती एकमेकांच्या अगदी विरोधी असतात.
भाग्य आणि न्याय यांच्या सीमारेषेवरून एक फेरफटका
अनुभवाला येणाऱ्या घटनांमध्ये यादृच्छिकता (रॅडमनेस) हा घटक असतोच. घटनांना आपले अनुकूल प्रतिकूल प्रतिसाद असतातच. त्यामुळे आपल्यासाठी ही नुसती यादृच्छिकता न राहता ते भाग्य (फॉरच्युइटी) म्हणून सामोरे येतेच. निवड-स्वातंत्र्यांची जाणीव, भले ती आभासात्मक असो वा नसो आपल्याला आपल्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला लावतेच. ही मानवी स्थिती जमेस धरूनच राजकीय तत्त्वज्ञान उभे करावे लागते.
मग भौतिक जग नियत आहे की अनियत ? अनियतता मानवी ज्ञानाच्या सध्याच्या मर्यादांमुळे भासते की या मर्यादा नेहमीच राहणाऱ्या आहेत? की खरोखर अनियतता नसल्याचमुळे भावी काळात कधी तरी पूर्ण नियततेची जाणीव मानवांना होणार आहे ?
एक दिवाणी दावा
पुस्तक-परीक्षणः
एक दिवाणी दावा
जॉनथन हॅरा
अमेरिकन संघराज्याच्या ईशान्य कोपऱ्यातले बॉस्टनजवळचे वोबर्न नावाचे खेडे. एक उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी मध्यमशी नदी, ॲबरजोना नावाची. नदीच्या पश्चिमेला वोबर्न पसरलेले. नदीजवळच्या एका वस्तीत राहणाऱ्या अॅन अँडर्सनच्या जिमी नावाच्या मुलाच्या नाकातून अधूनमधून रक्त यायचे. सहज मुक्या माराने त्याचे शरीर काळेनिळे व्हायचे. बॉस्टनचे डॉक्टर सांगायला लागले की मुलाला ल्यूकेमिया आहे, रक्ताचा कॅन्सर. साडेतीन वर्षांच्या मुलाला किरणोत्सर्गांचा मारा करण्याच्या तंत्राने मदत मिळेना. केमोथेरपी, म्हणजे कॅन्सरच्या पेशींना मारणारी औषधे देण्याचा उपचार चालू केला. हे सुरू झाले १९६६ साली. नंतरची पंधरावीस वर्षे ही महागडी आणि (त्यावेळी तर जास्तच) क्लेशकारक उपचाराच्या पद्धतीने अधूनमधून जिमीला दुरुस्त केल्यासारखे वाटायचे.
नैतिकतेचे बदलते स्वरूप
मुळात नैतिकता कुठून येते, या प्रश्नाचे उत्तर शोधताना १८ व्या शतकातील डेव्हिड ह्यूम या स्कॉटिश तत्त्वज्ञापर्यंत आपल्याला जावे लागेल. त्याच्या मते नैतिकता वासनांची गुलामी करते (“the slave of the passions’). त्यांनी हे निष्कर्ष ‘चांगले काय व वाईट काय’ या अभ्यासाअंती काढले होते. आपण ज्याला चांगले वा वाईट असे म्हणत असतो त्याचे मूळ आपल्या मनात एखाद्या वस्तू वा व्यक्तीबद्दल वाटणारी सहानुभूती वा घृणा यात शोधता येईल. हे निष्कर्ष आपण आजकाल मान्य केलेल्या प्राथमिक स्वरूपातील वैश्विक नीतिमत्तेशी मिळते-जुळते आहेत, हे आपल्या लक्षात येईल.
अणुऊर्जा अपघात भरपाई बिल २०१०
भोपाळ दुर्घटनेबद्दलच्या न्यायालय-निर्णयानंतर विरोधी पक्षांनी सिव्हिल लाकॅबिलिटी फॉर न्यूक्लीयर डॅमेज बिल २०१० च्या विरुद्ध रान उठवायला सुरुवात केली आहे. हे अणुऊर्जा अपघात नुकसान-भरपाई बिल सध्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरील पार्लमेंटरी स्टैंडिंग कमिटीपुढे विचारात आहे.
या बिलाबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत, त्या अशा: १. रु.५०० कोटींची नुकसानभरपाईची मर्यादा फार तोकडी आहे. २. या बिलानुसार खराब सामुग्री देणाऱ्या परदेशी पुरवठादारांना पूर्णपणे जबाबदारीमुक्त-मोकळे सोडण्यात आले आहे. ३. भरपाई मागण्यासाठी १० वर्षांच्या आत क्लेम करावा लागतो. १. चीन (२०५ कोटी), कॅनडा (३३५ कोटी), फ्रान्स (५७५ कोटी) अशा महत्त्वाच्या देशांशी तुलना करता भारताची ५०० कोटींची मर्यादा काही कमी नाही.
प्रोमीथियन अग्नी
पुस्तकाचे नाव “Promethean Fire Reflections on the origin of the mind’ आहे. लेखक – Charles S. Lumsden & Edward O. Wilson. नाव तर जड आहे. [ ग्रीक पुराणांमध्ये देवांकडून अग्नी चोरून आणणाऱ्या प्रोमीथियस नावाच्या योद्ध्याची कथा आहे. तिच्या आधाराने ‘देवत्व पावण्याचा हव्यास’ याचे रूपक म्हणून प्रोमीथियसचे मिथक वापरले जाते. – सं.]
जितके नाव जड, तितकेच पुस्तकही वाजायला जड आहे. बहुतांश संदर्भ जीवशास्त्र आणि जनुकशास्त्रामधले, ज्याचा आणि मासा १० वी नंतर कधीही संबंध आला नव्हता. बरे, जेवढे कळत होते तेवढेही कितपत कळलेले आहे याबद्दल शंकाच आहे!
न्याय्य समाजाची अजब संकल्पना
आर्थिक यश हे भाग्य व कर्तृत्व यावर अवलंबून असते या माझ्या मुद्द्यातील ‘भाग्य’ हे मोजता येत नसल्यामुळे ते विचारातच न घेता फक्त कर्तृत्वक्षेत्रातील अन्यायाबद्दलच बोलले पाहिजे असा सानेंचा मुख्य मुद्दा आहे. पण जे अचूकपणे मोजता येत नाही ते वास्तवात असत नाही, हे खरे नाही व भाग्याचा मोठा भाग निश्चितपणे मोजता येतो. भारतासारख्या कमालीच्या विषम समाजात तर ते अतिशय उघड आहे. भारतातील संपत्तीचे वाटप इतके कमालीचे विषम आहे की कोण कोणाच्या पोटी जन्मतो याने त्याच्या आर्थिक यशाची मर्यादा निश्चित होते, अपवाद असतातच; पण अपवादाने नियम सिद्ध होतो.