1. प्रस्तावना:
पाणलोट क्षेत्र विकास व ग्रामीण विकास हे परस्पर पूरक शब्द आहेत असे मानला जाते. ज्या भागांत पाणलोट क्षेत्र विकास हा कार्यक्रम राबविला त्या भागातील खेड्यांचा विकास झाला असे मानले जाते. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्र विकास हा पाण्याशी संबंधित आहे असे समजले जाते. पाणलोट क्षेत्र विकासातून पाण्याची उपलब्धी वाढते व त्यातूनच आर्थिक विकास होतो असा पण समज आहे.
वरील विधानांची योग्यायोग्यता तपासून पहाणे आवश्यक आहे. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम कसाही राबविला तरी त्यातून ग्रामीण विकास साधला जातो हा निव्वळ गैरसमज आहे.
विषय «इतर»
जलसंधारणाचे शिरपूर मॉडेल : कोंडी फोडणारी अँजिओप्लास्टी
महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात पाण्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जलसंधारण हा परवलीचा शब्द बनला आहे. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, राजस्थानातील राजेंद्रसिंगांचे काम अशी मॉडेल्स चर्चेत आहेत. पण त्या मॉडेल्सचा शास्त्रशुद्ध अभ्यास, उदा. पडणारा पाऊस, पाणलोट क्षेत्र व अडवून मरवलेले पाणी यांचे परस्पर प्रमाण, आर्थिक गंतवणक व वाढीव सिंचनक्षेत्राचे गुणोत्तर – अशा प्रकारची आकडेवारी फारशी उपलब्ध नाही. ह्या प्रारूपांची पुनरावृत्ती झाली काय? असल्यास अशा प्रयत्नांचे यशापयश, त्यामागील कारणमीमांसा व प्रयोगांचे ठोस विश्लेषण, ह्यांविषयी अभ्यासक व कार्यकर्त्यांना फारशी माहिती मिळत नाही. ह्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आ.
पुस्तक-परिचय : लंडननामा शहरे कशी घडतात
अनेक जण असे मानतात, की भारत हा देश खेड्यांमध्येच वसलेला आहे. वास्तव मात्र असे नाही. आज देशातील चाळीसेक टक्के प्रजा नागर आहे. महाराष्ट्रात तर आज नागर प्रजा आणि ग्रामीण प्रजा यांच्या संख्या जवळपास सारख्याच आहेत. हा नुसता आकड्यांचा खेळ नाही. यामागे जीवनदृष्टी, विकासातले अग्रक्रम अशा अनेक मूलभूत बाबी आहेत.
जसे, गांधीवादी-सर्वोदयवादी “खेड्यात जा”, असा संदेश देतात, तर आंबेडकर “शहरांत जा”, असे म्हणतात. गांधीविचारांत पंचायत-राज, विकेंद्रीकरण महत्त्वाचे आहे. आंबेडकर असे मानतात की कृषिप्रधान, जातींच्या उतरंडीने निबद्ध अशा खेड्यांमध्ये संख्येने भरपूर असलेल्या दलितांना न्याय मिळणार नाही; त्यासाठी औद्योगिक, केंद्रीभूत परस्परावलंबनावर बेतलेली शहरेच उपयोगी ठरतील.
जपानचे धडे
विजय सिंह याने जपानमधील दहा अनुकरणीय गोष्टींची यादी दिली आहे. (तहलका, 26 मार्च 2011). ही यादी नुकत्याच झालेल्या भूकंप-त्सुनामी प्रकारानंतर व त्यामुळे उद्भवलेल्या अणुऊर्जाकेंद्रांतील स्थितीनंतर जपानी जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल आहे.
1) सारे काही शांत होते. उरबडवे दुःखप्रदर्शन कोठेही झाले नाही. दुःख आपोआपच उदात्त झाले.
2) पाणी व वाणसामानासाठी शिस्तशीर रांगा लावून लोक उभे राहत होते. कोठेही शिवीगाळ, हातवारे वगैरे झाले नाही.
3) इमारती हलल्या, डुगडुगल्या, पण पडल्या नाहीत. याचे श्रेय डिझायनर आर्किटेक्ट बिल्डरांना द्यायला हवे.
4) लोकांनी गरजेपुरतीच खरेदी केली, ज्यामुळे सर्वांना पुरेशा वस्तू मिळू शकल्या.
गावगाडा : सहकार (भाग-1)
महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झाली. त्यापूर्वी द्वैभाषिक राज्य होते. 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राचा ‘मंगलकलश’ तेव्हाचे द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आणला. मध्यंतरी एका प्रसिद्ध साहित्यिकाने त्याबाबत एक विधान करून वाद उत्पन्न केला होता. पण पुढे माफी वगैरे मागून त्यांनी वाद वाढू दिला नाही. यशवंतरावांना महाराष्ट्राचे शिल्पकार वगैरे म्हटले जाते. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. सर्व प्रकारचे लोक त्यात होते. ते जाणीवपूर्वक सांस्कृतिक क्षेत्रातील विचारवंतांशी संबंध ठेवीत. त्यांना मान देत. लेखक, कवी, विचारवंत, संपादक यांना त्यांच्या बैठकीत मानाचे स्थान असे.
डाळरोटी
एकूण घरखर्चापैकी किती प्रमाण अन्नावर खर्च होते, या अंगाने काही देशांची आकडेवारी यूनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरने तपासली. या प्रमाणानुसार चार वर्ग पाडले गेले.
ज्या देशांत अन्नखर्च एकूण घरखर्चाच्या 15% किंवा कमी असतो, ते सुस्थित देश. या वर्गात कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, इंग्लंड, स्पेन, आयर्लंड, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, दक्षिण कोरिया व थायलंड येतात. अमेरिका सर्वांत सुस्थित आहे. तेथील लोकांच्या घरखर्चात केवळ 7% खर्च अन्नावर होतो.
यांच्याखाली घरखर्चाच्या 16% ते 25% भाग अन्नावर खर्च करणारे देश येतात.
संस्कृतीची जादू
संस्कृतीची जादू
औद्योगिकीकरणाने जन्माला घातलेली स्थलांतराची प्रक्रियाही इंग्लंडमध्ये अनपेक्षित होती. त्याचे सामाजिक परिणाम तीव्र होते.
औद्योगिक नगरांनी औद्योगिक कामगार घडविले खरे, पण त्यांचे पालनपोषण, संगोपन करण्याची काहीच व्यवस्था तेथे निर्माण झाली नव्हती. अपत्यसंगोपनाचा काहीच अनुभव नसलेल्या बाईला ज्या गोंधळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्याचा अनुभव त्या गावातील प्रशासकांना येत असावा. त्या काळातील नागरी परिस्थितीचे वर्णन अॅलेक्सी डी तॉकव्हिल या फ्रेंच प्रवाशाने अतिशय भेदकपणे केले आहे. तो म्हणतो:
“माणसाच्या कर्तृत्वामुळे जग सुपीक होते आहे. येथे घाणीने भरलेल्या गटारातून सोने वाहते आहे. येथे मानवाने विकासाचे परमोच्च शिखर गाठले आहे.
संपादकीय खरे वृत्त शोधपत्रकारिता?
गेले काही महिने प्रसारमाध्यमांतून वेगवेगळे घोटाळे गाजत आहेत. यांपैकी 2 जी घोटाळा या नावाने ओळखला जाणारा, तो सगळ्यांत थोर. पावणेदोन लाख कोटी रूपये महसूल या घोटाळ्यामुळे बुडला, असे सांगितले जाते. हे नुकसान किती काळात झाले, हे मात्र कुठेही नोंदले गेलेले नाही. महसूल नेहेमी विशिष्ट काळात कमावला जात असतो. जर असा काळ नोंदला गेला नसेल, तर तो आकडा निरर्थक ठरतो. पण पावणेदोन लाख कोटी हा आकडा मोठा तर खराच; आजच्या भारतातील प्रत्येक माणसामागे सुमारे दीड हजार रुपये येवढा तो आकडा आहे. किती काळात हे पैसे बुडले, हे मात्र स्पष्ट नाही.
एका विचारवंताची रोजनिशी
स्वतःचे विचार, भावना, येणारे अनुभव आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबतच्या प्रतिक्रिया, अशा अनेक गोष्टी माणसं नोंदत असतात. मित्रांना, सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांमधून विचारांची देवाण-घेवाण करत असतात. अनेक पाश्चात्त्य लेखकांच्या, विचारवंतांच्या अश्या डायऱ्या, जर्नल्स, पत्रसंग्रह नंतर प्रकाशित झाले आहेत. अमेरिकन कादंबरीकार जॉन स्टाइनबेक तर त्याची ग्रेप्स ऑफ राथ ही कादंबरी लिहीत असताना बरोबरच एक डायरीदेखील लिहीत असे. गाणारा गायक जसा बैठकीच्या आधी गळा मोकळा करतो तसा स्टाइनबेक आधी डायरी लिहून हात मोकळा करत असे.
व्हर्जिनिया वूल्फ, कॅथरीन मॅन्सफील्ड ह्या लेखिकांच्या डायऱ्या, पत्रे वाचताना फार मजा वाटली होती.
पुस्तक-परिचय : द प्रेग्नंट किंग
डॉ. देवदत्त पट्टनाईक यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे (पेंग्विन, 2008).
पुस्तकाच्या नावात जितका सरळपणा आहे तितक्याच सरळ भाषेत लिहिलेली, महाभारताच्या काळातली आणि महाभारताला समांतर जाणारी ही कथा आहे. कथेत काही महाभारतातली पात्रे गोवलेली आहेत.
कथा दोन पातळ्यांवर लिहिली आहे. एक म्हणजे मुख्य कथेचा धागा जो पुढे सरकतो आणि दुसरी म्हणजे, मुख्य कथेच्या अंगाने येणाऱ्या अनेक उपकथा, दंतकथा आणि त्या काळातल्या संस्कृतीतल्या संकल्पनांची लेखकाची स्पष्टीकरणे.
थोडे कथेबद्दल
इलवृत्त नावाच्या राज्याच्या युवनाश्व नावाच्या राजाची ही गोष्ट आहे. युवनाश्वाचे वडील प्रसेनजित त्याच्या जन्माच्या आधीच मरतात.