विषय «इतर»

राजकारणातील नैतिकता

मूळ लेखक : मायकेल सँडेल

रीथ व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यान राजकारणातील नैतिकता (Morality in Politics) ह्या विषयावर होते. व्याख्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्रसारित करण्यात आले; जिथे मायकेल सँडल होड्स् स्कॉलर म्हणून काही काळ राहिले होते. सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असलेले सत्य आणि धैर्य (Truth and Courage) हे गुण असलेल्या विद्यार्थ्यांना होड्स् स्कॉलरशिप दिली जाते. समाजाबाबत नागरिकांची कर्तव्ये कोणती हाच सँडल ह्यांच्या व्याख्यानमालेचा गाभा असल्याने ऑक्सफर्डच्या ‘होड्स् हाऊस’मधून त्यातील एक व्याख्यान प्रसारित होणे उचित होते.

सुरुवातीच्या प्रास्ताविकात स्यू लॉली ह्या संयोजिकेने सँडल लॉस एंजलीसमध्ये शाळेत शिकत असताना घडलेली एक घटना सांगितली.

पुढे वाचा

एक साक्षात्कारी अनुभवकथन

साहित्यिक असो वा कलावंत असो, त्यांच्या प्रतिभेची किंवा सृजनाची निर्मिती कुठून होते ? ज्या मेंदूमुळे आपल्याला खरेखुरे माणूसपण लाभलेले असते त्या मेंदूतच जर काही बिघाड झाला तर कसली कला आणि कसले साहित्य! हा विचार मनात येताक्षणीच मी अलीकडे वाचलेले एक पुस्तक नजरेसमोर आले.
स्वतः ‘न्यूरोसायंटिस्ट’ असणाऱ्या सदतीस वर्षांच्या एका स्त्रीच्या मेंदूत अचानक रक्तस्राव होऊन अवघ्या चार तासांत तिची दारुण अवस्था होते. त्या अवस्थेत तिने जे चित्रविचित्र अनुभव घेतले, स्वतःला निकामी होण्यापासून वाचवण्याची जी धडपड केली ती इतरांनी समजून घेतली तर ते वेगळीच सावधगिरी बाळगून स्वतःला वाचवू शकतील, या तळमळीतून साकारली गेलेली एक विलक्षण साहित्यकृती म्हणजे डॉ.

पुढे वाचा

मनोगतः ‘मेंदूतला माणूस’ विषयीचे

‘मेंदूतला माणूस’ हे डॉ. जोशी आणि श्री जावडेकर ह्यांचे पुस्तक वैद्यकीय, वैज्ञानिक तसेच मानवीय अभ्यासशाखांमध्ये क्रांती घडवून आणणारे आहे. अगदी सुरुवातीच्या काळात, मानसशास्त्र आत्मा, मन आणि त्यानंतर जाणीव (Consciousness) इ.चा अभ्यास करीत असे. नैसर्गिक विज्ञानांच्या प्रसारानंतर, शास्त्राचा अभ्यासविषय निरीक्षणक्षम असला पाहिजे, हे लक्षात घेऊन मानसशास्त्रात मानवी वर्तनाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तेव्हापासून आजवर मानसशास्त्राने बरीच प्रगती केली आहे. तथापि स्मृती, अवधान, कल्पन, भावना, विचार इ. मानवी प्रक्रिया निरीक्षणक्षम नसल्याने त्यांच्या वस्तुनिष्ठ अभ्यासात अडचणी जाणवू लागल्या. ते मनाचे व्यापार समजले जात.

पुढे वाचा

अणुकचरा

[ अणुऊर्जा नेहेमीच वादग्रस्त राहिली आहे. ती तयार करायला लागणारे पदार्थ आणि तंत्रज्ञानच अणुबॉम्ब तयार करायलाही लागतात. त्यामुळे जबाबदार देशांना आपले अणुऊर्जा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय तपासण्यांसाठी खुले करावे लागतात. यामुळे होणारा सार्वभौमत्वाचा संकोच, यावर मोठाले वाद झडतात. अणुऊर्जा बनवण्याशी संबंधित तंत्रज्ञान नवे व्यामिश्र आणि उच्च प्रतीचे विज्ञान वापरणारे असते. त्यामुळे ती बनवायला तज्ज्ञ तंत्रज्ञ घडवण्यापासून सुरुवात करावी लागते. त्या ऊर्जाउत्पादनात काटकसर, तंत्रज्ञानाबाहेरचे घटक, घाईगर्दी, यांना थारा नसतो. जर अशा गोष्टींना वजन देत स्थळकाळ वा खर्चाचा अयोग्य संकोच केला गेला, तर अपघात होऊ शकतात, व ते भीषण असू शकतात.

पुढे वाचा

अणुकचरा आणि जैतापूर प्रकल्पः वास्तव व त्यासंदर्भातील एकवीस वैज्ञानिक प्रश्न

दै. लोकसत्ता दि.२१ जुलै २०१० मध्ये माजी शास्त्रज्ञ रवींद्र काळे यांनी ‘अणुकचरा : भीती व वास्तव’ हा लेख लिहिला आहे. या विषयावर वैज्ञानिक चर्चा होणे, विशेषतः जैतापूरच्या संदर्भाने, हे खरोखरच अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वीच्या काळात भारताच्या अणुकार्यक्रमाबाबत काटेकोर व परिपूर्ण वैज्ञानिक चर्चा गुप्ततेच्या कारणांमुळे कधीच होऊ शकली नाही हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. जैतापूर हा नागरी ऊर्जाप्रकल्प आहे आणि त्यामुळे त्यात गुप्ततेची आवश्यकता नाही. अशा प्रकल्पांबाबत गुप्तता राखणे हे लोकहिताचेही नाही. अशा कोणत्याही प्रकल्पाच्या सर्व अंगांबाबत परिपूर्ण वैज्ञानिक चर्चा झाल्याशिवाय असा प्रकल्प पुढे जाणे देशहिताचेही नाही.

पुढे वाचा

हिमालय वितळतो आहे

डेव्हिड ब्रीशीअर्स (D. Breashears) पाचदा एव्हरेस्ट चढून गेला आहे. १९८३च्या पहिल्या चढाईनंतर प्रत्येक फेरीत त्याला भूचित्रबदल आणि हिमनदांचे आकुंचन जाणवू लागले. जुनी छायाचित्रे आणि ताजी छायाचित्रे यांची तुलना करताना हिमनदांची प्रचंड पीछेहाट दिसू लागली. १९२१ साली जॉर्ज मॅलरीने घेतलेल्या एका छायाचित्राची (मॅलरीने छायाचित्र घेतले तिथूनच) नवी आवृत्ती हिमनद शंभर मीटर मागे गेल्याचे दाखवते. ब्रीशीअर्स आता यावर लक्ष ठेवण्यासाठी खास उपकरणे बसवत आहे.
जागतिक तापमान मोजायला १८८० पासून सुरुवात झाली. नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते जानेवारी-जून २०१० हा १८७० पासूनचा सर्वांत गरम काळ होता.

पुढे वाचा

दोन्ही गोष्टी

सर्व संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो जगण्याचा. सर्व सामाजिक संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो इतर संरचनांशी जुळते घेण्याचा. आणि एका मर्यादेपर्यंत सर्व संरचना सामाजिकच असतात. आपण जिला नीतिमत्ता म्हणतो, जीनुसार आपण वागणुकीचे नियम ठरवतो, त्या कल्पनाव्यूहात वरील दोन्ही गोष्टी येतात. व्यक्ती म्हणून स्वतःसाठी जगणेही येते, आणि इतर व्यक्तींसाठी करण्याची कर्तव्येही येतात. या इतर व्यक्तींमध्ये आपला समाज, आपली जीवजात, इतर जीवजाती, हे सारेच येते. [ कॉलिन टज्च्या सो शल वुई रीप (अॅलन लेन, २००३) या पुस्तकातील बायॉलजी, मोरॅलिटी, एस्थेटिक्सः द मीनिंग ऑफ अॅग्रिकल्चर या प्रकरणातून.]

पुढे वाचा

बाजारपेठा आणि नीतितत्त्वे

मूळ लेखक : मायकेल सँडेल

इंग्लंडमध्ये बीबीसीतर्फे ‘रीथ लेक्चर्स’ची एक मालिका सादर केली जाते. एखादा प्रमुख विचारवंत महत्त्वाच्या विषयावर आपले विचार ह्या मालिकेतून लोकांसमोर मांडतो. २००९ साली ह्या व्याख्यानांकरिता प्रोफेसर मायकेल सँडल ह्या हार्वर्ड विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या व्याख्यात्याला निमंत्रित केले होते. प्रोफेसर सँडल हे एक मान्यवर तत्त्वज्ञ आणि राजकीय विचारवंत आहेत. ‘न्याय’ ह्या विषयावरील त्यांच्या व्याख्यानांना प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी गर्दी करतात. सगळ्यांचे हित (common good) जपणाऱ्या नव्या प्रकारच्या राजकारणाचे स्वरूप कसे असावे
ह्याचा विचार करणाऱ्या ह्या व्याख्यानमालिकेचे नाव नवे नागरिकत्व (A New Citizenship) असे आहे.

पुढे वाचा

तुमच्याशिवाय नाही

तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कशी दिसतील? ती प्रतीकात्मकच असतील, की वास्तविक (realistic) असतील? बरे, तत्त्वचर्चा स्वभावानेच कोरड्या, नीरस. कला मात्र व्याख्येनेच रसाळ. मग तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कधी कलात्मक होतील का? चर्चा मुळात शब्द हे माध्यम ओलांडून बाहेर, दृश्य रूपांत जाऊ शकतील का? साधारणपणे आपल्याला हे प्रश्न पडतही नाहीत, मग अस्वस्थपणे त्यांची उत्तरे शोधणे तर दूरचेच. पण असे प्रश्न जागवणारा, ते सोडवायला चौकट पुरवणारा एक अनुभव नागपूरकरांना नुकताच आला. अमरावतीच्या संजय गणोरकरांचे मांडणी शिल्पांचे (installations) प्रदर्शन असा अनुभव देऊन गेले.
अमरावती जिल्ह्याची सुपीक जमीन, हा वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड या म्हणीचा आधार.

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-३)

[End of Ideology (तत्त्वादर्शीचा अंत!), Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), ह्या कळीच्या संकल्पना गेल्या लेखांशांत आल्या होत्या. आता इतर काही कळीच्या संकल्पना पाहू
या लेखात आपण आतापर्यंत जे प्रतिपादन केले त्याचा सर्वसाधारण आशय असा की जे मतदार सरकार निवडून देतात त्यांचे त्या विशिष्ट मतदाराला निवडून देण्याचे निकष सर्वस्वी निराळे असतात. पक्ष व त्यांचे नेते यांची स्टेजवर बोलण्याची व प्रत्यक्षातली उद्दिष्टे यांच्यात फार अंतर असते. जेव्हा एखादा उमेदवार निवडून येतो तेव्हा अनेकांची अनेक उद्दिष्टे साध्य झालेली असतात. प्रसंगी ती एकमेकांच्या अगदी विरोधी असतात.

पुढे वाचा