विषय «इतर»

चिडीचूप

वाद हा प्रगल्भ समाजाचा अविभाज्य भाग. विचारपूर्वक केलेल्या संवादाचाच एक हिस्सा. पण वादाकडे भांडण म्हणून पाहणारा स्तर वेगळा असतो. वाद म्हणजे भांडण हे समीकरण पुरोगामी, प्रगल्भ आणि सशक्त समाजरचनेत स्वीकारार्ह ठरू शकत नाही. बुद्धिजीवी वर्गाची गळचेपी सुरू झाली की ही अशी अस्वीकारार्ह समीकरणे सहजपणे स्वीकारली जाऊ लागतात.
अनेक समाजधुरीणांचे तात्त्विक वाद महाराष्ट्राने अनुभवले आहेत. ‘आधी स्वराज्य की आधी सुराज्य’ यासारख्या टिळक-आगरकर वादातून सामाजिक-राजकीय सुधारणांची जाहीर चर्चा मराठी समाजमनाने ऐकली. तिचा वैचारिक पोत संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. साहित्याच्या प्रांतातील ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ यापासून श्लील-अश्लीलतेच्या मापदंडांपर्यंतचे अनेक वाद महाराष्टात सारस्वताच्या इतिहासात नोंदले गेले.

पुढे वाचा

“अन्नाचा अधिकार”

भारतातील गोरगरीब लोकांची उपासमार सुरू आहे. ही समस्या किती गंभीर आहे याचा दोन पद्धतीने मागोवा घेता येतो. त्यातील पहिला प्रकार म्हणजे भारतातील किती लोकांना निरोगी जीवनासाठी आवश्यक एवढी पोषणमूल्ये देणारा आहार मिळत नाही याचा अंदाज घेणे. दुसऱ्या प्रकारामध्ये जागतिक पातळीवर ‘भुकेच्या समस्ये’च्या संदर्भात भारताचे स्थान इतर देशांच्या तुलनेत कोठे आहे ते तपासणे. आपल्या पंतप्रधानांनी ‘देशातील एकाही नागरिकाला एक दिवसही अनैच्छिक उपास करण्याची वेळ येऊ देणार नाही’ अशी जाहीर ग्वाही दिली असली तरी वास्तवात देशातील बहुसंख्य जनता अर्धपोटी जीवन कंठित आहे वा कुपोषणग्रस्त आहे.

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-२)

[End of Ideology (तत्त्वादर्शाचा अंत!) ही कळीची संकल्पना गेल्या लेखांशात आली. Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), मध्यमवर्गाचा संभ्रम, या काही कळीच्या राजकीय संकल्पना प्रत्यक्षदर्शी व सोप्या पद्धतीने स्पष्ट करणारा हा लेखांश आहे, मूलभूत महत्त्वाचा.]
या लोकशाहीच्या नमुन्याची रचना करताना, देशी विदेशी घटनेच्या रचनाकारांचा विचार करताना त्यांच्याकडून कदाचित काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असावे. घटना बनविताना मानवी स्वभाव, मानवी समूहांचे समूह म्हणून वागण्यामागचे विचार किंवा वागणूक याचा पूर्ण विचार केला आहे किंवा कसे, याचा अंदाज येत नाही. कारण जेव्हा आपण लोकशाहीतल्या नेत्याचे मूळ विचार व नंतर वागणूक पाहतो तेव्हा आपल्याला खटकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात.

पुढे वाचा

मेकॉलेचे चारित्र्यहननः एक लाजिरवाणा अध्याय

ऐतिहासिक घटना किंवा व्यक्ती यांचे विश्लेषण करताना आपण बरीच माहिती गोळा करतो. ते करताना एक महत्त्वाचा दंडक पाळावा लागतो, तो म्हणजे माहिती तत्कालीन संबद्ध व्यक्तींनी लिहिलेली असावी व ती व्यक्तीही विश्वासार्ह असावी. माहितीवर आधारलेल्या व्यक्तिगत मतापेक्षा त्या व्यक्तीने घटनेचे केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन महत्त्वाचे असते. घटना घडून काही वर्षे गेल्यावर आठवणीप्रमाणे लिहिलेले वर्णन कमी विश्वासार्ह असते. आज प्रत्यक्षात अनेक लेखक ही पथ्ये पाळत नाहीत त्यामुळे हास्यास्पद निष्कर्ष काढतात. काही वेळा असा प्रकार अज्ञानातून होतो व ते क्षम्यही आहे. पण बऱ्याच वेळा तद्दन खोटा प्रचार जाणूनबुजून केला जातो व ते अश्लाघ्य आहे.

पुढे वाचा

पुन्हा ‘सुप्रजनन’!

[हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ ? हे एडवर्ड ॲल्बीचे बहुचर्चित नाटक (थहे ळी अषीरळवष तळीसळपळर थेश्रष?, Edward Albee, Pocket Books, १९६२) व नंतर अनेक आवृत्त्या). त्यावर १९६५ च्या सुमाराला एक चित्रपटही निघाला (रिचर्ड बर्टन, एलिझाबेथ टेलर).
एक विनापत्य, पराभूत वयस्क जोडपे : जॉर्ज हा इतिहासाचा प्राध्यापक, वय ४६ वर्षे आणि मार्था, विद्यापीठाच्या अध्यक्षाची मुलगी, वय ५२ वर्षे. एका रात्री या जोडप्याकडे दोन पाहुणे येतात : निक् हा जीवशास्त्राचा प्राध्यापक, वय २८ वर्षे; आणि त्याची पत्नी हनी, वय २७ वर्षे. मार्था निक्कडे आकर्षित झालेली असते.

पुढे वाचा

‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’

कार्ल मार्क्सने सुमारे दीडशे वर्षांपूर्वी म्हटले होते की, बाजारपेठ ही विनिमय व नियमनाची बाब आहे, पण जेव्हा बाजारपेठ हे जीवनाचे तत्त्वज्ञान होते आणि ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’, म्हणजे खासगी संपत्ती हेच सर्व मानवी व्यवहाराचे ‘चलन’ होते, तेव्हा समाजच रानटी स्थितीत जातो. त्या रानटी स्थितीतून समाज बाहेर पडत गेला तेव्हा नैतिकता आणि सांस्कृतिकता जन्माला आली. त्या प्रवासातच साहित्य-संगीत-कला निर्माण झाले. ‘कल्चर’ आणि ‘सिव्हिलायझेशन’ निर्माण झाले. कारण जीवनाचे तत्त्वज्ञान बाजारशक्तींपासून मुक्त झाले. विक्रेय वस्तू आणि अमूल्य वस्तू हा भेद आवश्यक होता. ‘ज्ञान’ ही संकल्पना उदात्त मानली गेली ती त्यामुळेच.

पुढे वाचा

‘व्हॉटेव्हर’

मध्ययुग – अंधकारयुगानंतर आपण विवेकाचे युग (The Age of Reason) घडवून आपले जग बदलून टाकले. अधूनमधून आपण रक्तलांच्छित युद्धेही लढलो, पण सोबतच साहित्य, कला, विज्ञान, वैद्यक यांत उत्तम कामेही केली. कायद्याचे राज्य बऱ्याच पृथ्वीतलावर प्रस्थापित झाले. बऱ्याच जागी लोकशाही व्यवस्थाही घडल्या. आपल्या एका पिढीत ऐहिक दारिद्र्याचे परिणाम ज्या प्रमाणात कमी झाले, तेवढे आधीच्या संपूर्ण मानवी इतिहासात झाले नव्हते. राजकीय व आर्थिक व्यवस्थांच्या वापराने आपण नात्झी व सोविएत हुकुमशाह्यांवर मात केली. हे सारे असूनही आज आत्मविश्वासाचा अभाव, आपल्या कृतींच्या परिणामकारकतेवरचा विश्वास क्षीण होणे, निराशावाद, अशाने आपला समाज ग्रस्त आहे.

पुढे वाचा

‘माझा पैसा’ आणि डावा आदर्शवाद

न्याय्य समाज म्हणजे काय ?
[६ फेब्रुवारी २०१० ला मिलिंद मुरुगकरांनी लोकसत्तात ‘माझा पैसा आणि डावा आदर्शवाद’ नावाने काही मांडणी केली. १६ फेब्रुवारीला लोकसत्तातच राजीव सान्यांनी करदात्यांचा पैसा आणि भाग्याचे फेरवाटप या नावाने मुरुगकरांच्या मांडणीवर आक्षेप घेतले. त्यासोबत या आक्षेपांना उत्तर देताना मुरुगकरांचा न्याय्य समाजाची अढळ संकल्पना हा लेखही प्रकाशित झाला. या तिन्ही लेखांचा संपादित अंश खाली देत आहो.]
निवडणुकांच्या काळात राजकीय पक्ष देत असलेल्या सवंग आश्वासनांसंदर्भात बोलताना, माझा मित्र चिडून म्हणाला, ‘माझा पैसा (करांच्या स्वरूपातील) लोकांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी वापरला जात असेल तर माझी हरकत नाही.

पुढे वाचा

इतिहासजमा ?

(नुकतेच मरण पावलेले विंदा करंदीकर यांच्या १९९७ च्या महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवन-गौरव पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणातला हा अंश, आपले वायय वृत्त (एप्रिल २०१०) मधून, साभार) सामान्यतः सुशिक्षित, यशस्वी व सुखवस्तू समाजात वावरत असताना त्यातील माझे काही मित्र मला म्हणतात, “करंदीकर, तुमचे ते मार्क्स व गांधी हे आता इतिहासजमा झाले हे मान्य करा.” हे बोलत असताना ‘शेवटी इष्ट ते घडले’ याचा त्यांना होणारा सात्त्विक आनंदही मला दिसत असतो. पण ते मान्य करण्याच्या अवस्थेत मी अजूनही नाही; अजूनही मी मुख्यतः मार्क्सवादी व थोडासा गांधीवादी आहे.

पुढे वाचा

करदात्यांचा पैसा आणि भाग्यांचे फेरवाटप

युक्तिवादात, बेमालूमपणे ‘ट्रॅक’ बदलणे व अर्धे सत्य अधोरेखित करून अर्धे अनुल्लेखित ठेवणे हे लेखातील दोष आहेत. समता म्हणजेच न्याय हे गृहीतकही विवाद्य आहे. ‘माझा पैसा’ म्हणणारे नवश्रीमंत हे यशात भाग्याचाही वाटा असतो याकडे दुर्लक्ष करणारे असतीलही परंतु या योगायोगाचा फायदा घेत मुरुगकरांनी ‘करदात्यांचा पैसा’ हा कळीचा मुद्दा ‘माझा पैसा’ या संकुचित मुद्द्यात रूपांतरित केला. विशेषतः अनुरंजनवादी राजकारण्यांनी सार्वजनिक वित्तव्यवस्थेत आज जो टोकाचा बेजबाबदारपणा (व त्यातून अंतिमतः गरिबांचाच घात) चालविला आहे त्याला आवर घालण्यासाठी ‘करदाता’ या समूहाची (ज्यात भारतात गरीबही मोडतात) एक राजकीय ओळख उभी करण्याची गरज आहे.

पुढे वाचा