विषय «इतर»

तुमच्याशिवाय नाही

तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कशी दिसतील? ती प्रतीकात्मकच असतील, की वास्तविक (realistic) असतील? बरे, तत्त्वचर्चा स्वभावानेच कोरड्या, नीरस. कला मात्र व्याख्येनेच रसाळ. मग तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कधी कलात्मक होतील का? चर्चा मुळात शब्द हे माध्यम ओलांडून बाहेर, दृश्य रूपांत जाऊ शकतील का? साधारणपणे आपल्याला हे प्रश्न पडतही नाहीत, मग अस्वस्थपणे त्यांची उत्तरे शोधणे तर दूरचेच. पण असे प्रश्न जागवणारा, ते सोडवायला चौकट पुरवणारा एक अनुभव नागपूरकरांना नुकताच आला. अमरावतीच्या संजय गणोरकरांचे मांडणी शिल्पांचे (installations) प्रदर्शन असा अनुभव देऊन गेले.
अमरावती जिल्ह्याची सुपीक जमीन, हा वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड या म्हणीचा आधार.

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-३)

[End of Ideology (तत्त्वादर्शीचा अंत!), Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), ह्या कळीच्या संकल्पना गेल्या लेखांशांत आल्या होत्या. आता इतर काही कळीच्या संकल्पना पाहू
या लेखात आपण आतापर्यंत जे प्रतिपादन केले त्याचा सर्वसाधारण आशय असा की जे मतदार सरकार निवडून देतात त्यांचे त्या विशिष्ट मतदाराला निवडून देण्याचे निकष सर्वस्वी निराळे असतात. पक्ष व त्यांचे नेते यांची स्टेजवर बोलण्याची व प्रत्यक्षातली उद्दिष्टे यांच्यात फार अंतर असते. जेव्हा एखादा उमेदवार निवडून येतो तेव्हा अनेकांची अनेक उद्दिष्टे साध्य झालेली असतात. प्रसंगी ती एकमेकांच्या अगदी विरोधी असतात.

पुढे वाचा

भाग्य आणि न्याय यांच्या सीमारेषेवरून एक फेरफटका

अनुभवाला येणाऱ्या घटनांमध्ये यादृच्छिकता (रॅडमनेस) हा घटक असतोच. घटनांना आपले अनुकूल प्रतिकूल प्रतिसाद असतातच. त्यामुळे आपल्यासाठी ही नुसती यादृच्छिकता न राहता ते भाग्य (फॉरच्युइटी) म्हणून सामोरे येतेच. निवड-स्वातंत्र्यांची जाणीव, भले ती आभासात्मक असो वा नसो आपल्याला आपल्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला लावतेच. ही मानवी स्थिती जमेस धरूनच राजकीय तत्त्वज्ञान उभे करावे लागते.
मग भौतिक जग नियत आहे की अनियत ? अनियतता मानवी ज्ञानाच्या सध्याच्या मर्यादांमुळे भासते की या मर्यादा नेहमीच राहणाऱ्या आहेत? की खरोखर अनियतता नसल्याचमुळे भावी काळात कधी तरी पूर्ण नियततेची जाणीव मानवांना होणार आहे ?

पुढे वाचा

एक दिवाणी दावा

पुस्तक-परीक्षणः
एक दिवाणी दावा
जॉनथन हॅरा
अमेरिकन संघराज्याच्या ईशान्य कोपऱ्यातले बॉस्टनजवळचे वोबर्न नावाचे खेडे. एक उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी मध्यमशी नदी, ॲबरजोना नावाची. नदीच्या पश्चिमेला वोबर्न पसरलेले. नदीजवळच्या एका वस्तीत राहणाऱ्या अॅन अँडर्सनच्या जिमी नावाच्या मुलाच्या नाकातून अधूनमधून रक्त यायचे. सहज मुक्या माराने त्याचे शरीर काळेनिळे व्हायचे. बॉस्टनचे डॉक्टर सांगायला लागले की मुलाला ल्यूकेमिया आहे, रक्ताचा कॅन्सर. साडेतीन वर्षांच्या मुलाला किरणोत्सर्गांचा मारा करण्याच्या तंत्राने मदत मिळेना. केमोथेरपी, म्हणजे कॅन्सरच्या पेशींना मारणारी औषधे देण्याचा उपचार चालू केला. हे सुरू झाले १९६६ साली. नंतरची पंधरावीस वर्षे ही महागडी आणि (त्यावेळी तर जास्तच) क्लेशकारक उपचाराच्या पद्धतीने अधूनमधून जिमीला दुरुस्त केल्यासारखे वाटायचे.

पुढे वाचा

नैतिकतेचे बदलते स्वरूप

मुळात नैतिकता कुठून येते, या प्रश्नाचे उत्तर शोधताना १८ व्या शतकातील डेव्हिड ह्यूम या स्कॉटिश तत्त्वज्ञापर्यंत आपल्याला जावे लागेल. त्याच्या मते नैतिकता वासनांची गुलामी करते (“the slave of the passions’). त्यांनी हे निष्कर्ष ‘चांगले काय व वाईट काय’ या अभ्यासाअंती काढले होते. आपण ज्याला चांगले वा वाईट असे म्हणत असतो त्याचे मूळ आपल्या मनात एखाद्या वस्तू वा व्यक्तीबद्दल वाटणारी सहानुभूती वा घृणा यात शोधता येईल. हे निष्कर्ष आपण आजकाल मान्य केलेल्या प्राथमिक स्वरूपातील वैश्विक नीतिमत्तेशी मिळते-जुळते आहेत, हे आपल्या लक्षात येईल.

पुढे वाचा

अणुऊर्जा अपघात भरपाई बिल २०१०

भोपाळ दुर्घटनेबद्दलच्या न्यायालय-निर्णयानंतर विरोधी पक्षांनी सिव्हिल लाकॅबिलिटी फॉर न्यूक्लीयर डॅमेज बिल २०१० च्या विरुद्ध रान उठवायला सुरुवात केली आहे. हे अणुऊर्जा अपघात नुकसान-भरपाई बिल सध्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरील पार्लमेंटरी स्टैंडिंग कमिटीपुढे विचारात आहे.
या बिलाबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत, त्या अशा: १. रु.५०० कोटींची नुकसानभरपाईची मर्यादा फार तोकडी आहे. २. या बिलानुसार खराब सामुग्री देणाऱ्या परदेशी पुरवठादारांना पूर्णपणे जबाबदारीमुक्त-मोकळे सोडण्यात आले आहे. ३. भरपाई मागण्यासाठी १० वर्षांच्या आत क्लेम करावा लागतो. १. चीन (२०५ कोटी), कॅनडा (३३५ कोटी), फ्रान्स (५७५ कोटी) अशा महत्त्वाच्या देशांशी तुलना करता भारताची ५०० कोटींची मर्यादा काही कमी नाही.

पुढे वाचा

दोन्ही गोष्टी

सर्व संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो जगण्याचा. सर्व सामाजिक संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो इतर संरचनांशी जुळते घेण्याचा. आणि एका मर्यादेपर्यंत सर्व संरचना सामाजिकच असतात. आपण जिला नीतिमत्ता म्हणतो, जीनुसार आपण वागणुकीचे नियम ठरवतो, त्या कल्पनाव्यूहात वरील दोन्ही गोष्टी येतात. व्यक्ती म्हणून स्वतःसाठी जगणेही येते, आणि इतर व्यक्तींसाठी करण्याची कर्तव्येही येतात. या इतर व्यक्तींमध्ये आपला समाज, आपली जीवजात, इतर जीवजाती, हे सारेच येते. [ कॉलिन टज्च्या सो शल वुई रीप (अॅलन लेन, २००३) या पुस्तकातील बायॉलजी, मोरॅलिटी, एस्थेटिक्सः द मीनिंग ऑफ अॅग्रिकल्चर या प्रकरणातून.]

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-१)

[आपल्या देशाचे क्षेत्रफळ जगात पाचव्या क्रमांकाचे क्षेत्रफळ आहे, लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे आणि राज्यपद्धती ‘लोकशाही’ ही जगात प्रथम क्रमांकाची आहे. आपल्या देशात सुमारे ७० कोटी नोंदविलेले मतदार आहेत. आपला कार्यक्षम ‘निवडणूक आयोग’ या सर्व मतदारांचे मतदान एका कार्यकाळात घेऊ शकतो, मतदानातले सर्व संभाव्य गैरप्रकार न होतील, अशी काळजी घेऊन! जगातल्या प्रगत देशांतल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटते, कारण त्यांनी आपल्या देशाविषयी बरेच गैरसमजूतीमधूनचे बोलणे ऐकलेले असते. मुळातच हा अवाढव्य व पराकोटीचा विविधता – सांस्कृतिक, भाषांची उद्योगांची, जमिनीच्या सुपीकतेची, त्यामुळे पिकांची, पर्यावरणाची, हवामानाची विविधता; असे असलेला देश कसा चालतो याचेच त्यांना आश्चर्य वाटत असते.

पुढे वाचा

जमिनीचे धूप-नियंत्रण आणि माती-संवर्धन, व्यवस्थापन

गेल्या काही वर्षांत दीड पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना अनुदानाचा दिलासा देऊनही त्यात काही फरक पडल्याचे जाणवत नाही. दुसरीकडे शेतीचे एकरी उत्पादन घटतच आहे. इतर काही पर्याय मिळाल्यास जवळपास ४०% शेतकरी शेती व्यवसाय सोडून देण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा की कुठेतरी मूलभूत काहीतरी बिनसले आहे. ते शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
कोठच्याही उत्पादक उपक्रमाची (productive activity) सहा प्रमुख अंगे आहेत
१. भांडवली गुंतवणूक – इमारती, यंत्रे इ. २. कच्चा माल ३. कुशल, अकुशल कामगार ४. ऊर्जेचा बंदोबस्त ५. प्रत्यक्ष उत्पादन-क्रिया ६.

पुढे वाचा

मृद संधारण पंधरवडा -गुढीपाडवा विशेष! माती अडवा ! – पाणी जिरवा !!

[चिं.मो.पंडितांच्या लेखासोबत विदर्भात काय चालले आहे तेही पाहा ; प्रा. अविनाश शिर्के (यवतमाळ, भ्रमणध्वनी ९८५०३-४३५२०) यांनी पाठवलेले एक पत्रक —] कास्तकार बंधूंनो…..
सगया शेतकऱ्यायचे गेल्या दहाएक सालात लयच हाल होवून रायलेत. भोगात भोग म्हनून कोरडवाहू वाल्यायचे त लयच म्हंजी लय बेहाल हायेत. कवा बी पुसा, कसा रायला यंदाचा हंगाम ? त एक जबाब हमखास येते… ‘भाऊ एक पानी पायजेल व्हता.. शेवटच्या पान्यानं का चाट देल्ली नसती ना तं… राजेहो!’
असे कित्येक पावसाळे झाल्ले…. हंगाम काय मनाजोगता येत नाय. राजेहो कोरडवाहू कास्तकारी करता करता आपून सोताच कोड्डे होत चाल्लो!

पुढे वाचा