विषय «इतर»

सत्य

सत्याचे आह्वान, बुद्धीचे विधान
सत्याचे स्वरूप, दमणूक.
सत्य काडीमोड, सत्यप्रतिशोध
सत्य तो आनंद, परावलंबी.
सत्य प्राणिमात्र, सत्य सर्व गात्र
गात्रांचे नवल, सत्यशोध.
आभास सत्य, विश्वास सत्य,
अश्रद्ध सत्य, ऐहिकाचे.
सत्य पंचतत्त्व, सत्य गुणसूत्र
सत्य अणुस्फोट, पृथ्वीवरी.
सत्य गरजवंत, सत्य प्रज्ञावंत
सत्य अदलाबदल, दोघांचीही.
सत्य जीवशास्त्र, सत्य गर्भज्ञान
सत्य संगतीच्या, निर्जीवाचे.
सत्य आसवांत, सत्य विचारात
सत्याची कायम, हालचाल.
सत्यविलासात, सत्य संन्यासात
सत्याचे पाय, फरपटते.
सत्य लिंग फक्त, सत्य योनीमात्र
सत्याचा ओरखडा, एकमेकां.
सत्य भूक जोर, सत्य पचन थोर
सत्याचे आतडे, लांबवर.
कातडे सत्य, बचाव सत्य,
सत्य मांसगोळा, भौतिकाचा.

पुढे वाचा

हम

हल की तरह
कुदाल की तरह
या खुरपी की तरह
पकड भी लूँ कलम को
तो भी फसल काटने को
मिलेगी नहीं हमको।
हम तो जमीन ही तैयार कर पायेंगे
क्रान्तिबीज बोने कुछ बिरले ही आयेंगे।
हरा-भरा वही करेंगे मेरे श्रम को
सिलसिला मिलेगा आगे मेरे क्रम को।
कल जब फसल उगेगी लहलहायेगी
मेरे न रहने पर भी हवा से इठलायेगी
तब मेरी आत्मा सुनहरी धूप बन बरसेगी
जिन्होंने बीज बोया था उन्हीं के चरन परसेगी।
काटेंगे उसे जो, फिर वही उसे बोयेंगे
हम तो धरती के नीचे दबे सोयेंगे
(क्रांती, प्रगती, उन्नती, प्रबोधन ह्या सर्वांमधील कवीची भूमिका काय असते वा असावी ते फार स्पष्ट शब्दांत सांगणारी सर्वेश्वरदयाल सक्सेना ह्यांची ही कविता त्यांच्या प्रतिनिधि कविताएँ ह्या संग्रहालून घेतली आहे.)

पुढे वाचा

एक डॉक्टर असलेला इंजिनीअर!

डॉक्टर चिंतामणी मोरेश्वर पंडित किंवा सी.एम. पंडित यांच्याशी झालेली माझी पहिली ओळख लोकविज्ञान संघटनेच्या माध्यमातून, लोकविज्ञानच्या सुरुवातीच्या काळात सर्व बैठका श्री.म.ना.गोगटे यांच्या ‘ताडदेव एअर-कंडीशन्ड मार्केट’मधील कार्यालयात व्हायच्या. मी अधून मधून त्यात सहभागी व्हायचो. पंडितांचे कार्यालयही तिथेच होते. गोगटे आणि पंडित दोघेही स्थापत्यतज्ज्ञ आणि दोघेही मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक सदस्य त्यामुळे लोकविज्ञानच्या काही बैठकांत दोघांचाही सहभाग असायचा. मला वाटते 1976-77 चा सुमार होता तो. मी वास्तुरचनेचा व्यवसाय नुकताच सुरू केला होता. त्यामुळे या दोघांच्याही कार्यालयात थोडाफार वेळ घालवायला मला आवडायचे. पंडितांच्या कार्यालयाबाहेरील ‘डॉ.सी.एम.पंडित,

पुढे वाचा

चंपारणचा नीळविरोधी सत्याग्रह: स्वातंत्र्यलढ्याचा अहिंसात्मक शुभारंभ

चंपारणचा नीळविरोधी सत्याग्रह इ.स.1917 चा आहे. दक्षिण आफ्रिकेतन गांधीजी 1915 साली भारतात परतले. त्यावेळी ते महात्मा झाले नव्हते. दक्षिण आफ्रिकेतील बावीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी बौद्धिक आदांना व्यावहारिक रूप दिले होते. रस्किनची Unto this Last पुस्तिका वाचून स्वतःची जीवनशैली बदलली होती. फिनिक येथे आश्रम स्थापून त्यांनी शेतकऱ्याची जीवनशैली अंगीकारली होती. द. आफ्रिकेतील लढ्यांमुळे कच्चे लोखंड पोलादात बदलले होते. व्यक्तिगत जीवन व मानवसंबंध यांबाबतचे व्यापक जीवनदर्शन त्यांच्यात विकसित झाले होते. तसेच समाजाची अर्थव्यवस्था व सरकारचे कर्तव्य यांबाबतही त्यांचे विचार स्पष्ट झाले होते.
गांधीजी भारतात परतले तेव्हा गुरुवर्य गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवात भाग न घेता केवळ भारत पाहण्याचे ठरविले होते.

पुढे वाचा

भगवद्गीतेचे भारतात पुनरुज्जीवन

भगवद्गीता शाळेमध्ये मुलांना शिकवली जावी ह्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राज्य असलेल्या कर्नाटक व मध्य प्रदेश ह्या राज्यांनी तशी विधेयके आणून ती सम्मत करून घेतली आहेत. कर्नाटकचे मंत्री कागेरी ह्यांनी तर अल्पसंख्यक धर्मांना – बुद्ध, ख्रिश्चन, मुसलमान यांना अशी समज दिली की गीता शाळेत शिकवणे मान्य करा अथवा भारतातून निघून जा(1) मध्यप्रदेशातील कथोलिक बिशप कौंसिल यांनी नुसतीच गीता न शिकवता साऱ्या धर्मांचा सारांश शिकवावा असा अर्ज केला. पण त्यावर म. प्र. उच्च न्यायालयाने, गीता हा काही धार्मिक ग्रंथ नाही, त्यामुळे गीता शिकवण्यास आपत्ती नसावी असा निकाल दिला.

पुढे वाचा

आत्मा आणि पुनर्जन्म : सत्य की कपोलकल्पित? (भाग-२)

बहिर्गमन ही काय भानगड आहे?
गर्भनलिकेमध्ये जेव्हा वडिलांकडून आलेले पुंबीज आणि आईकडून आलेले स्त्रीबीज (Ovum) यांचा संयोग होतो तेव्हा आत्मा त्यात प्रवेश करतो आणि माणसाच्या मृत्यूच्या वेळी तो बाहेर पडतो अशी कल्पना आहे. ही कल्पना शास्त्राद्वारे चुकीची सिद्ध करण्याचा हा प्रयत्न:
1) एका वीर्यामध्ये (साधारण पाव चमचा) सहा ते बारा दशलक्ष शुक्राणू असतात. वीर्यपतनाच्या वेळी साधारण 3-4 घनसेंमी वीर्य पडते म्हणजे एका समागमाच्या वेळी दोन ते तीन कोटी इतके शुक्राणू मातेच्या योनिमार्गात सोडले जातात. त्यांतील फक्त एक शुक्राणू स्त्रीबीज फलित करतो.

पुढे वाचा

नास्तिकाची जडणघडण

कोवळे, शेंदरी कवडसे आधी आले. त्या लोभस उन्हात कवडेही ‘जगायला’ उतरले. त्यांना दाणे हवे होते आणि पाणी तर लागणारच होते. आम्ही त्यांच्या दाण्यापाण्याची सोय करू, करतोच, पण आम्हाला महागाई कणाकणाने फस्त करते आहे. त्याचे काय? येस्-फेस् करत, फेसबुकवर खिदळत, गुण उधळत जवान लोक सोन्यासारखा दिवस वाया घालवतानाही दिसतात. त्यांचे कुठे वनराईकडे लक्ष आहे? राईत देव नसेल, तर तिचे रक्षण कोण करेल? देव आहे असे मानावे तर अनाचाराचे अनार थुई थुई करतानाच दिसतात. आसपास त्या चटकचांदण्याच चमकते तुषार उडवत असतात. सणाचा धूरही विषारीच आहे.

पुढे वाचा

हतबलतेची जागतिक व्यापकता

सध्या सर्वत्र चीनचा बोलबाला आहे. संशोधने, आर्थिक क्षमता, नागरी व्यवस्था अशा अनेक संदर्भातून पाहता चीन आघाडीवर आहे. अमेरिकेच्या तर नाकी दम चीनने आणलेला आहे. चीनमध्ये बंडखोरी स्वागतार्ह तर मानली जात नाही, उलट बेमालूमपणे कापून काढली जाते. ऑलिंपिकमध्ये चीनला मिळणाऱ्या यशामागे खेळाडूंकडून उत्कृष्ट उतारा पदरात पडावा यासाठी त्यांचा लहानपणापासून अक्षरशः छळ केला जातो. याबद्दलच्या बातम्या आपण वाचलेल्या असतील.
शिक्षणव्यवस्थेतल्या भ्रष्टाचारातही चीन आपल्याप्रमाणेच आघाडीवर आहे. चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तिथे स्वयंस्फूर्त देणग्या घ्याव्याच लागतात. या देणग्या फक्त प्रवेशासाठीच नाही तर हुशार मुलांच्या तुकडीत जाण्यासाठी इतकेच नाही तर वर्गात फळ्यासमोरच्या पहिल्या-दुसऱ्या रांगेतल्या बाकावर जागा मिळण्यासाठीही असतात.

पुढे वाचा

पत्रसंवाद

विनायक श्रीकृष्ण महाजन, अर्थ, मु.पो.कुडावळे, ता. दापोली, जि.रत्नागिरी-415712
आजचा सुधारकच्या ऑक्टो. 2012 च्या अंकामधील ‘कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आजच हलाखीच्या स्थितीवर उपाय’ हा दिवाकर मोहनी यांचा लेख वाचला. या विषयावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यानी सुरुवातीसच व्यक्त केली आहे. चर्चेमध्ये सहभाग म्हणून काही गोष्टी लिहीत आहे. सर्वसमावेशक विकास असा धोशा लावणाऱ्या अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांच्या काळात काय घडते आहे हे आपण सर्वजण पहात आहोत. अनुभवत आहोत.
आपला देश हा कृषिप्रधान आहे. इंग्रजांच्या राजवटीत देशाचे काय झाले यापेक्षा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काय घडत आहे हे पहाणे औचित्याचे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा देशाच्या एकूण उत्पन्नात 50% वाटा शेतीचा होता.

पुढे वाचा

हिंदूच्या देवळांची उत्पत्ती

हिंदूच्या देवळांची उत्पत्ती
इसवी सनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकापर्यंत हिंदुजनांत व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्धधर्माचा पाडाव करून भटी वर्चस्वस्थापनेसाठी महाभारताच्या व रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. मात्र त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला, बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध भिक्षूच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ, मंदिरे ही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संघमंदिरांत महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजाअर्चा बौद्धाच्या हीनयान पंथाने सुरू केल्या.

पुढे वाचा