डॉ. जॉन स्नो हा लंडनमध्ये काम करणारा वैद्य आणि पॅथॉलजिस्ट (विकारवैज्ञानिक) होता. कॉलरा (पटकी, हैजा) हा रोग पिण्याच्या पाण्यातील जंतुदोषातून पसरतो, हे त्याने दाखवून दिले. मध्य लंडनच्या नकाशावर त्याने रोगाचे प्रभाग व मारकता जास्त असलेली क्षेत्रे रेखली, आणि त्यातून निष्कर्ष निघाला की ब्रॉड स्ट्रीट पंप हा भूमिगत पाणी उपसणारा पंप रोगाचे मूळ होता. आपण सुचवत असलेले पाणी व रोग यांच्या संबंधाबाबतचे तत्त्व सुस्थापित करण्यासाठी स्नोने प्रत्येक आणि प्रत्येक विसंगत उदाहरण तपासून त्याचे स्पष्टीकरण शोधले. दूरवरचे रोगी, रोगाच्या प्रसारातले चढउतार, सारे मूळ तत्त्वाच्या मदतीने स्पष्ट करत आकडेवारीच्या गोंधळातून व्यवस्थित चित्र रेखले.
विषय «इतर»
सेक्युलॅरिझमचा भारतीय तोंडवळा: भाग-३
उद्देशपत्रिकेतील एक अंश पश्चात्बुद्धी
युरोपातील सामाजिक आणि सांस्कृतिक संचित आणि ऐतिहासिक घडामोडी ह्यांच्यामधून सेक्युलॅरिझम ह्या संज्ञेने तेथे जसा आपला अर्थ उचलला तसाच भारतातही, त्याच कारणांनी ह्या संज्ञेला स्वतःचा एक खास स्वदेशी स्वाद लाभला आहे. असा की जो कोणत्याही व्याख्येत मावूच नये. घटनेच्या शब्दसंहितेच्या चौकटीत बंदिस्त होताना ती कल्पना आपले चापल्य गमावून बसली असती. कधी कधी शब्द असे नेमकेपणा नसलेले, निराकार असल्यागत मोकळे सोडणे बरे असते. त्यांच्यातला लवचीकपणा अनुभवांनी, स्थळा-काळाच्या संदर्भांनी आपोआप आकार घेऊ लागते. ‘सेक्युलर’ हा शब्द बेचाळिसाव्या दुरुस्तीद्वारा घटनेच्या उद्देशपत्रिकेत प्रविष्ट होऊन ना तिची संकल्पनात्मक अस्मिता (Conceptual Concept) वाढली, की कमी झाली!
सॉलिप्सिझममधले धोके
[आधुनिकोत्तरवादी विचारांचे दुष्परिणाम कधीकधी आत्यंतिक व्यक्तिनिष्ठेच्या रूपात असतात. त्यामुळे आत्यंतिक व्यक्तिनिष्ठा धोकादायक का, हे दाखवायचा हा प्रयत्न तुला भीती ही कसली वाटते रे?: (चित्रपट: नई देहली)
“तुला जर भविष्याचं चित्र हवं असेल, तर एका मानवी चेहेऱ्याला चिरडणारा बटाचा पाय नजरेपढे आण नेहेमीसाठी.”
ओब्रायन विन्स्टन काहीतरी बोलेल अशा अपेक्षेने थांबला. विन्स्टन स्ट्रेचरमध्ये शिरायचा प्रयत्न करत असल्यासारखा आक्रसला. काही बोलू शकला नाही. हृदय थिजल्यासारखे झाले होते, त्याचे. ओब्रायन पुढे बोलायला लागला. “आणि लक्षात ठेव नेहेमीसाठी. बुटाला चिरडायला नेहेमीच चेहेरा असेल. पाखंडी, समाजाचा शत्रू नेहेमीच असेल आणि त्याला वारंवार लाचार करून हरवलं जाईल.”
‘मर्द’, अमानुष हिंसेचे पोषण
माझ्या येऊ घातलेल्या पुस्तकाचा गाभा असा संस्कृतींमधला खरा संघर्ष आजच्या सर्व लोकशाह्यांमधला अंतर्गत संघर्ष आहे. आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांचा आदर करत त्यांच्यासोबत राहायला तयार असलेले लोक आणि झडझडून वेगळ्या लोकांवर प्रभुत्व गाजवू इच्छिणारे लोक, यांच्यातला संघर्ष. किंवा गांधींच्या भाषेत मी असे म्हणेन की इतरांबाबतची आस्था आणि सहानुभूतीची भावना, आणि इतरांवर सत्ता गाजवायची इच्छा, यांच्यातला हा व्यक्तींच्या आत्म्यातला संघर्ष आहे. मी २००२ साली पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हा मला वाटत होते की भारतातली लोकशाही कोलमडण्याची ही कटुकठोर कहाणी असेल. पण ती लवचीकपणाची कहाणी झाली.
विश्वरूपदर्शन आणि ईश्वराचा शोध
तुमचा सगळा कटाक्ष आमच्यावरच का?
आज गीतेतील नीतिमीमांसेची मीमांसा करण्याचा विचार आहे. पण त्याला आरंभ करण्यापूर्वी एका अक्षेपाला उत्तर द्यायला हवे. हा आक्षेप आमच्या वाचकांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष बोलून दाखविला आहे, आणि त्याहून कितीतरी अधिक वाचकांच्या मनात तो वारंवार उद्भवत असावा यात संशय नाही. हा आक्षेप असा आहे : ‘तुमचा सारा रोख आम्हा हिंदूंवरच का? आमच्यापेक्षा अधिक, निदान आमच्याइतकेच अंधश्रद्ध, शब्दप्रामाण्यवादी, आणि तुम्ही दाखविता त्या सर्व दोषांनी युक्त असे अनेक धर्म किंबहुना सगळेच धर्म आहेत. असे असताना तुम्ही इतर कोणत्याही धर्माचे नावही उच्चारीत नाही, आणि आमच्या धर्माला मात्र तुम्ही निर्दयपणे झोडपत सुटला आहात याला काय म्हणावे ?’
अस्थिर, अस्वस्थ पाकिस्तान
प्रपाठक, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई. (सध्या व्हिजिटिंग फेलो, सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज, जकार्ता, इंडोनेशिया.)
बेनझीर भुत्तो यांची हत्या ही राजकीय हत्यांमध्ये निश्चितच सर्वाधिक सनसनाटी गणली जाईल. पाकिस्तान, आणि दक्षिण आशियाच नव्हे तर सगळ्या जगात या घटनेचे पडसाद उमटले. पाकिस्तानातील सध्याच्या नाट्यपूर्ण घटनांना त्यामुळे एक वेगळेच वळण लागले आहे. सीमेवरील दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया, जनतेत पसरत चाललेला असंतोष, मुशर्रफ आणि न्यायसंस्था यांच्यातील संघर्ष, या पार्श्वभूमीवर जानेवारीत होऊ घातलेल्या निवडणुकांना महत्त्व प्राप्त झाले होते. नवाझ शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) (पीएमएल-एन) या निवडणुकीविषयी द्विधा मनःस्थितीत असताना, बेनझीर यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) मात्र निवडणुका लढवण्याचे ठरवले होते.
एड्सची जाणीव शालेय वयात
हल्ली कौमार्यावस्था ही पूर्वीपेक्षा कमी वयात मुलामुलींना प्राप्त होत आहे. प्रसारमाध्यमांशी जवळीक व अवती-भवतीच्या घटनांचे आकलन हे शालेय वयातील वैशिष्ट्य होय. एड्सबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत आहे. परंतु योग्य पद्धत व संदेशाविना त्याविषयीची माहिती मिळतेच असे नाही. एड्सच्या टी.व्ही.वरील प्रबोधनपर जाहिराती व माहितीचे कार्यक्रम हे तज्ज्ञमंडळीच्या सल्ल्याने व सहाय्याने आयोजित करण्यात येतात परंतु ते लागले की पालक मुलांना ती माहिती कळू नये, त्यांनी पाहू नये आणि ऐकू नये याची सर्वतोपरी दक्षता घेतात. परिणामी त्यांचे औत्सुक्य वाढते नव्हे तर कुतूहलापोटी समवयस्कांकडून चुकीचे ज्ञान मिळण्याची शक्यता असते.
पुस्तक-परिचय
डोकं कसं चालतं? (मेंदू आणि मन याबद्दल)
प्रकाशक आकार फाऊंडेशन, सांगली. प्रथमावृत्ती मे २००७. पृष्ठे १०४. किं.१०० रु.) डॉ. उल्हास लुकतुके
लेखक डॉ. प्रदीप पाटील स्वतः वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी एम.ए. (क्लिनिकल सायकॉलॉजी) ही पदवी घेतली आहे. मानसिक आरोग्याची सामाजिक जाण वाढावी यासाठी काम करणाऱ्या आकार फाऊंडेशनचे ते संस्थापक आहेत. वैद्यकीय सेवा, शिक्षकी कार्य, सामाजिक उद्बोधन, लेखन, व्याख्याने यामध्ये ते कार्यमग्न असतात. त्यांचा मुक्काम सांगली येथे असतो.
माणसे जशी वागतात तशी का वागतात हे एक कोडे आहे. शायर अकबर इलाहाबादी म्हणतात ख्याल दौडा निगाह उठी क़लम ने लिखा ज़बान बोली मगर वही दिल की उलझनें किसी ने इसकी गिरह न खोली । विचार धावला, नजर उठली (नजरानजर झाली), लेखणीने लिहिले, जीभ बोलली, पण मनाची (हृदयाची) तीच कोडी, त्यांची गाठ कोणी सोडवली नाही.]
पत्रलेखन
सरस्वती के. देव, १६८ एफ वैद्यवाडी, ठाकुरद्वार, मुंबई ४०० ००२. दूरध्वनी : २३८५१३३१
नोव्हेंबरचा आजचा सुधारक वाचला. नेहमीप्रमाणे चांगला आहे. त्यातील शारदा यांची सुहासिनीची सत्त्वपरीक्षा हा लेख वाचला. त्यात सुहासिनीची करुण कहाणी फारच हृदयद्रावक आहे.
अजूनही पालक म्हणजे मुलाचे वा मुलींचे आई-वडील. ते शिक्षित आहेत, सुधारक आहेत पण बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आहेत. केवळ पैसा हे माध्यम आजकाल फार महत्त्वाचे आहे. मुलगी एवढी शिकलेली आहे. पण व्यावहारिक दृष्टिकोण नाही. मागणी आली म्हणून हुरुळून जाऊन आईवडिलांनी लग्न उरकले. एरवी एवढ्या-तेवढ्यावरून वाद करणारी मुलगी विचार न करता आंधळेपणाने त्या मुलाशी लग्न करते.
आंबटशौकिनांसाठी ?
ही एक सत्यघटना आहे. स्थळ: पुण्यातल्या एका स्त्री-रोगतज्ज्ञाचा दवाखाना. वेळ: संध्याकाळची
… तो (आणि ती) दोघंही कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती… ओळखीतून सहवास.. प्रेम या पायऱ्या त्यांनी ओलांडल्या होत्या…. दरम्यान एक भलताच पेच उभा राहिला. आपल्याला दिवस गेले आहेत अशी या मुलीची समजूत झाली… आपला हा जीव संपवणं हाच एकमेव मार्ग असं मानण्यापर्यंत तिची मजल गेली. … डॉ. नी तिला एकच प्रश्न विचारला, “तुझा आणि त्याचा संबंध कधी आला होता?” तिला तो प्रश्न समजला नाही. अधिक फोड करून सांगताच ती तिरीमिरीनं म्हणाली, “हे काय भलतंच विचारणं डॉक्टर ?