विषय «इतर»

द्राक्षबागायत, निमित्त, लागवड व विक्रीव्यवस्था

मी साधारण १९७३-७४ सालात द्राक्षबाग लावण्याचे ठरविले कारण माझे काही मित्र (ज्यांच्या व माझ्या परिस्थितीत बरेच साम्य होते) ते बऱ्याच अंशी यशस्वी द्राक्षबागायतदार होते. मला खरे म्हणजे ‘द्राक्षउद्योजक’ हा शब्द अधिक समर्पक वाटतो. कारण सध्याच्या द्राक्षांचे उत्पादन, विक्री इत्यादींचे स्वरूप पाहता द्राक्ष पिकवणारा शेतकरी उद्योजकच असला पाहिजे असे वाटते.
सध्या महाराष्ट्र आपल्या देशात जी खाण्याची द्राक्षे (ढरलश्रश सीरशिी, ही दारूच्या द्राक्षांपेक्षा, winegrapes पेक्षा वेगळी असतात.) पिकविली जातात त्यात अग्रेसर आहे, सर्वच दृष्टीने, एकरी उत्पादन, गुणवत्ता एकूण क्षेत्र वगैरे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या व गुणवत्ता हीपण आपल्या देशात अव्वल असली पाहिजे!

पुढे वाचा

मानवी स्वभाव व डार्विनवाद (४)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.]
मुक्त इच्छा (ईहा) व अंतिम जबाबदारी
स्टीव्हन रोज या वैज्ञानिकाच्या मते जनुकयंत्रसिद्धान्तातील गर्भितार्थ माणसावरील जबाबदारी व त्याच्यातील गुणदोष यांच्याकडे बोट दाखवतो. आनुवंशिकतेतून गुणदोष आलेले असल्यास त्यांसाठी व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये, कारण कृतीची जबाबदारी त्याच्यावर ढकलता येत नाही.

पुढे वाचा

फेल्युअर टु कनेक्टः पुस्तकपरिचय

(‘Failure to Connect: How Computers Affect Our Children’s Minds – for Better and Worse’ – Dr. Jane M. Healy, 350 pp. Simon and Schuster, 1998.)
गेल्या काही वर्षांत संगणकाचा दैनंदिन वापर शहरी मध्यमवर्गात झपाट्याने वाढलेला दिसतो. व्यवसायामुळे ज्यांचा संगणकाशी संबंध येत नाही, असेही अनेक लोक आता संगणक वापरू लागले आहेत. संगणकांच्या घटलेल्या किमती आणि इंटरनेटची सहज उपलब्धता, अशांसारखी काही कारणेही यामागे आहेत. शिवाय, मराठी मध्यमवर्गाच्या भविष्यात कशाला किती स्कोप आहे याचा वेध घेऊन त्याप्रमाणे बदलण्याच्या प्रवृत्तीचा जसा मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याच्या निर्णयात हात होता, तसेच काहीसे लहान मुलांच्या संगणक वापराच्याही बाबतीत होताना दिसते.

पुढे वाचा

बेरोजगारीची हमी देता येणार आहे!

आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (खङज) सांगते की २००३ साली २.८ अब्ज माणसांना औपचारिक रोजगार मिळाला, एकूण लोकसंख्येच्या सुमारे चाळीस टक्के लोकांना. पण हा अंदाज कामगार व त्यांची कुटुंबे यांच्यापुढील अनेक गंभीर आह्वाने दडवतो. सुमारे १.४ अब्ज लोक (औपचारिक रोजंदारांपैकी अर्धे) सरासरीने रोजी दोन डॉलर (रु.८९/-) पेक्षा कमी पगारात खर्च भागवायला धडपडतात. सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकेतील नव्वद टक्के लोक या ‘गरीब रोजगारप्राप्त’ वर्गीकरणातले आहेत. त्यांना सुरक्षित जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न उपलब्ध नाही. याच काळात १८.६ कोटी लोक बेकार होते. एकूण बेकारांचे प्रमाण ६.२ टक्के आहे.

पुढे वाचा

विषमता की विविधता?

ऑलिव्हर जेम्स हा ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ माणसांच्या मूलभूत भावनिक गरजांवर विचार करत होता. शरीरांसाठी अन्न, वस्त्र, निवारा या जशा मूलभूत गरजा, तशा मनांसाठी कोणत्या ? जेम्सची यादी चार एकमेकांशी निगडित भावनांची आहे. पहिली गरज आहे स्वतःला सुखवस्तू मानता येण्याची. आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आपल्याला उपलब्ध आहेत, असे वाटणे गरजेचे असते. इथे प्रत्यक्षात गरजेच्या वस्तू आहेत की नाहीत हे महत्त्वाचे नाही, तर त्या आहेत अशी भावना महत्त्वाची आहे. दुसरी गरज आहे, ती स्वतःला आजूबाजूच्या समूहाचे आपण एक अंग आहोत असे वाटण्याची. आपण जगण्याची क्रिया सक्षमपणे, स्वायत्तपणे आणि सच्चेपणाने पुरी करतो आहोत असे वाटणे, ही तिसरी गरज.

पुढे वाचा

गोष्ट माणसाची, सांस्कृतिक उत्क्रांतीची

जीवन म्हणजे ‘एकमेकां साह्य करूं अवघे धरू सुपंथ’ असा सहयोगाचा प्रवास आहे ? का जीवन म्हणजे एक संघर्ष आहे ? एकमेकांचे गळे कापत ही यात्रा सुरू आहे ? जीवसृष्टीच्या इतिहासाच्या, उत्क्रांतीच्या अभ्यासकांपुढे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जीवनात नक्कीच सहकारही आहे. संघर्षही आहे. नेहमी संघर्षाबद्दल खूप बोलले जाते; पण जीवशास्त्राचे ज्ञान जसजसे सखोल होत चालले आहे, तसे उघड होत आहे, की मोठ्या प्रमाणात जीवन हा एक सहकारी उपक्रम आहे. उत्क्रांतीच्या वाटेवर जीवन सतत विस्तारत जाते, नवी नवी संसाधने वापरू लागते, वैचित्र्याने नटत राहते.

पुढे वाचा

पॉपरचे विश्व

प्रत्येक घटनेमागे काही कारण असते, ही समजूत अनेकांची असते. सोबतच माणसे काही वेळा तरी आपल्या कृती स्वेच्छेने निवडतात, ही आपली खात्री असते. वरकरणी पाहता या दोन धारणांमध्ये एक विरोधाभास जाणवतो. हा विरोधाभास शमवण्याचा प्रयत्न, हा कार्ल पॉपरच्या द ओपन युनिव्हर्स : अॅन आर्म्युमेंट फॉर इंडिटर्मिनिझम या ग्रंथाचा गाभा आहे. पॉपर सांगतो की हा ग्रंथ म्हणजे “मानवी स्वातंत्र्याच्या व सर्जनशीलतेच्या प्रश्नाचा तत्त्वविवेचक उपोद्घात आहे.” (a prolegomenon to the question of human freedom and creativity).
नियतवादाचे टोकाचे रूप लाप्सास मांडले. त्याचे खंडन पॉपरने कितपत यशस्वीपणे केले, ते आपण पाहू.

पुढे वाचा

सामाजिक सुरक्षा: अमेरिकन अनुभव (भाग ३)

“सव्वीस वर्षांपूर्वी या देशाने सर्व श्रमिक आणि त्यांची कुटुंबे यांना निवृत्ती, मृत्यू, बेरोजगारीमुळे बुडणाऱ्या निर्वाहवेतनाच्या भीतीपासून मुक्त करण्याचे तत्त्व मान्य केले. पण आजही वार्धक्यातल्या आजारपणाच्या खर्चापासूनचे संरक्षण फार थोड्या श्रीमंतांनाच उपलब्ध आहे. ही मोठीच त्रुटी आहे.” हा आहे जॉन केनेडी,१९६१ साली काँग्रेसपुढे अध्यक्षीय भाषण करताना. अमेरिकन मेडिकल असोसिएशन (अचअ), चेंबर ऑफ कॉमर्स, नॅशनल असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरर्स, साऱ्यांनी केनेडीविरुद्ध दंड थोपटले. जनमतचाचण्या सांगत होत्या की दोन-तृतीयांश लोक वृद्धांच्या आरोग्यविम्यासाठी कर द्यायला तयार होते, पण हे लोकसभेतल्या विधेयकावरच्या मतदानात दिसायला हवे होते.
“नवरा आयुष्यभर कठोर मेहनत करून निवृत्त झाला आहे.

पुढे वाचा

मानवी स्वभाव व डार्विनवाद (३)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. सं.]
वादविवादाच्या भोवऱ्यात डार्विनवाद व मानवी स्वभाव
डार्विनच्या सिद्धान्ताचा नैसर्गिक निवडीचा भाग हा त्या सिद्धान्ताचा मूळ गाभा आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. तरीसुद्धा एकूणच या सिद्धान्ताबद्दलचे वाद अजून संपलेले नाहीत, डार्विनचा सिद्धान्त ख्रिश्चनांच्या सर्व पारंपरिक श्रद्धांना धक्का देत होता, हे मात्र निर्विवाद आहे.

पुढे वाचा

आपुलकीने वागणाऱ्या माणसांची अखेर

विसाव्या शतकाची ती सुरुवात होती. लाल-बाल-पाल व नंतर गांधी-नेहरू इत्यादींनी राष्ट्रीय चळवळीत दिलेल्या योगदानामुळे जनसामान्यांना स्वातंत्र्याची चाहूल लागली होती. स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांना हुसकावून लावणे नव्हे तर त्याचे उद्दिष्ट होते स्वयंशासनाचे, सुशासनाचे, राष्ट्रीय पुनर्बाधणीचे, विकासाचे, प्रगतीचे. यासाठी केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नव्हते तर समाजजीवनाच्या प्रत्येक दालनात स्वदेशीचा पुरस्कार आवश्यक ठरवला जात होता. आर्थिक जगतात हॉटेल ‘ताज’ घ्या की जमशेदपूर येथील टाटांचा पोलादाचा कारखाना घ्या, अनेक आर्थिक उपक्रम हाती घेतले जात होते. ज्यांमध्ये स्रोत एकच होता तो म्हणजे ‘स्वदेशीचा’. हेच ध्येय उराशी बाळगून पश्चिम भारतातील सातारा जिल्ह्यातील विमा महर्षी म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब चिरमुले यांनी १९३६ साली युनायटेड वेस्टर्न बँकेची स्थापना केली.

पुढे वाचा