[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. सं.]
वादविवादाच्या भोवऱ्यात डार्विनवाद व मानवी स्वभाव
डार्विनच्या सिद्धान्ताचा नैसर्गिक निवडीचा भाग हा त्या सिद्धान्ताचा मूळ गाभा आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. तरीसुद्धा एकूणच या सिद्धान्ताबद्दलचे वाद अजून संपलेले नाहीत, डार्विनचा सिद्धान्त ख्रिश्चनांच्या सर्व पारंपरिक श्रद्धांना धक्का देत होता, हे मात्र निर्विवाद आहे.
विषय «इतर»
आपुलकीने वागणाऱ्या माणसांची अखेर
विसाव्या शतकाची ती सुरुवात होती. लाल-बाल-पाल व नंतर गांधी-नेहरू इत्यादींनी राष्ट्रीय चळवळीत दिलेल्या योगदानामुळे जनसामान्यांना स्वातंत्र्याची चाहूल लागली होती. स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांना हुसकावून लावणे नव्हे तर त्याचे उद्दिष्ट होते स्वयंशासनाचे, सुशासनाचे, राष्ट्रीय पुनर्बाधणीचे, विकासाचे, प्रगतीचे. यासाठी केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नव्हते तर समाजजीवनाच्या प्रत्येक दालनात स्वदेशीचा पुरस्कार आवश्यक ठरवला जात होता. आर्थिक जगतात हॉटेल ‘ताज’ घ्या की जमशेदपूर येथील टाटांचा पोलादाचा कारखाना घ्या, अनेक आर्थिक उपक्रम हाती घेतले जात होते. ज्यांमध्ये स्रोत एकच होता तो म्हणजे ‘स्वदेशीचा’. हेच ध्येय उराशी बाळगून पश्चिम भारतातील सातारा जिल्ह्यातील विमा महर्षी म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब चिरमुले यांनी १९३६ साली युनायटेड वेस्टर्न बँकेची स्थापना केली.
विज्ञान म्हणजे काय?
विज्ञान म्हणजे अत्यंत वेगळे, बंदिस्त, एकाकी, आपल्या जीवनव्यवहाराशी संबंध नसलेले असे काही तरी आहे असे अनेकांना वाटत आले आहे. यालाच मी आह्वान देत आहे. आपण विज्ञानयुगात राहत आहोत. तरीसुद्धा ज्ञान हे काही मूठभर लोकांच्या हातांतील व त्यांच्या मालकीची मालमत्ता असे वाटत असल्यास ते अत्यंत चुकीचे आहे. विज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचे, व्यवहाराचे एक अविभाज्य अंग आहे. त्याला आपण वेगळे ठेवू शकत नाही, तोडू शकत नाही. आपल्या अनुभवविश्वातील प्रत्येक अनुभवाला का, कसे व केव्हा असे विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरच विज्ञान आहे.”
[Uncertain Science….
आरक्षणाऐवजी आपणांस दुसरे काय करता येईल ?
आरक्षणाचे तत्त्व संविधानात अन्तर्भूत झाले, त्याला पन्नास वर्षे होऊन गेली असावीत म्हणून त्याविषयीचे सिंहावलोकन करणे आवश्यक वाटते. आरक्षणाच्या हेतूविषयी काहीच शंका नाही कारण आरक्षणामुळे एकूण समाजात आर्थिक समता आणि सामाजिक बंधुभाव निर्माण होईल अशी संविधानकारांची अपेक्षा होती. आरक्षणाचे तत्त्व संविधानात अन्तर्भूत करण्यामागे काही समाजघटकांच्या सामाजिक वागणुकीची पार्श्वभूमी कारणीभूत होती हे जितके खरे तितकेच आरक्षणाचा काळ मर्यादित असावा अशी तरतूदही घटनाकारांनी केली होती. पण एकूणच आरक्षणाच्या तत्त्वाकडे राखीव मतपेटीच्या दृष्टिकोणातून पाहिल्यामुळे आज कोणताही पक्ष या समस्येकडे स्वच्छ नजरेने पाहण्यास तयार नाही.
आज जगामध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहत आहे.
सामाजिक सुरक्षा: अमेरिकन अनुभव (भाग २)
शेतीकडून माणसे उद्योगांकडे वळली, की बहुतांश लोकांचे आणि सर्वच श्रमिकांचे आयुष्य अनिश्चित होते. कधी जिथे काम करायचे तिथली परिस्थिती धोके उत्पन्न करते, अपंगत्व उत्पन्न करते, तर वयोमानाने किंवा इतर स्वस्त कामगार उपलब्ध झाल्याने नोकरी जाऊन उत्पन्नच थांबते. कधी याहीपुढचा प्रकार होऊन कारखाने बंद पडतात म्हणून श्रमिक बेकार होतात. या सर्व बेकारीच्या कारणांमध्ये कामगाराचा दोष नगण्य असतो. सध्या आपण अशा बेकारांना समाजाने आर्थिक मदतीच्या रूपात सुरक्षा पुरवावी हे टाळत आहोत. अशा सामाजिक मदतीच्या दोन प्रमुख पद्धती दिसतात. एक म्हणजे सामाजिक व धार्मिक संस्था धनवानांकडून काही पैसे गोळा करून त्यांतून गरजू लोकांना मदत देतात.
मानवी स्वभाव व डार्विनवाद (२)
[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.]
डार्विनच्या सिद्धान्ताची सत्यासत्यता
डार्विनने मांडलेला सिद्धान्त खरोखरच धोकादायक आहे का, याचीही शहानिशा करावी लागेल. सैद्धान्तिक स्वरूपात धोका असल्यास घाबरण्याचे कारण नाही. मुळातच सिद्धान्त खरा आहे की नाही यावरून धोका आहे की नाही हे ठरवता येते.
स्त्री-भ्रूणहत्याः कोल्हापुरातले वास्तव (भाग २)
[अमृता वाळिंबे यांनी मालतीबाई बेडेकर अभ्यासवृत्ती २००५-२००६ वापरून केलेले संशोधन आम्हाला प्राप्त झाले. त्याचा जुजबी संक्षेप करून आम्ही काही भागांमध्ये ते संशोधन प्रकाशित करीत आहोत. या प्रकारचे संशोधन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकरिता व्हायला हवे. सं.]
पूर्वी म्हणजे ५-७ वर्षांआधी कोल्हापुराजवळच्या निमशहरी भागातले वा खेड्यापाड्यातले पेशन्ट सोनोग्राफी वा गर्भलिंगनिदानासाठी कोल्हापूर शहरात यायचे. पण आता तशी गरज पडत नाही. अनेक डॉक्टरांनी आता ‘मोबाईल युनिट्स’ सुरू केली आहेत. विशिष्ट दिवशी ही युनिट्स गावोगावी पोहोचतात. सोनोग्राफी होते. काहीवेळा तर दुसऱ्या किंवा अडीच महिन्यांतच गर्भ ‘मुलीचा’ आहे असे निदान केले जाते.
खैरलांजीः मला जे आढळले
खैरलांजी येथे २९ सप्टेंबर रोजी झालेले भीषण हत्याकांड व त्यानंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनाबाबत जनतेसमोर खरी माहिती आली नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. पोलिसांनी वेळीच प्रतिबंधक कारवाई केली असती तर कदाचित ती मानवतेला काळिमा फासणारी घटना टळली असती. स्वार्थी राजकारण करणाऱ्यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडली असती तर हिंसक आंदोलने झाली नसती. हिंसक आंदोलनांत भरकटलेल्या युवकांचे होणारे नुकसान बघून राहवले नाही म्हणून मी स्वतः वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी खैरलांजीला भेट दिली, माहिती घेतली, विचारपूस केली. सामाजिक हिताच्या दृष्टीने जनतेसमोर सत्य मांडणे माझे कर्तव्य समजतो.
खैरलांजी हत्याकांड घडण्याचे प्रमुख कारण जातीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्था व कायद्याची मुळीच भीती नसणे हे आहे.
Uncertain Science…. Uncertain World
विज्ञान म्हणजे अत्यंत वेगळे, बंदिस्त, एकाकी आप्लया जीवनव्यवहाराशी संबंध नसलेले असे काही तरी आहे असे अनेकांना वाटत आले आहे. यालाच मी आह्वान देत आहे. आपण विज्ञानयुगात राहत आहोत. तरीसुद्धा ज्ञान हे काही मूठभर लोकांच्या हातातील व त्यांच्या मालकीची मालमत्ता असे वाटत असल्यास ते अत्यंत चुकीचे आहे. विज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचा, व्यवहाराचा एक अविभाज्य अंग आहे. त्याला आपण वेगळे ठेऊ शकत नाही, तोडू शकत नाही. आपल्या अनुभवविश्वातील प्रत्येक अनभवाला का. कसे व केव्हा असे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरच विज्ञान आहे.’
रॅचेल कार्सन
(Uncertain Science….
ठिकऱ्याः बदलती जातिव्यवस्था
प्रस्तावना
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर भारत अस्वस्थ आहे. राजकारण्यांचा वर्ग छिन्नभिन्न झालेला आहे. गेल्या तीन लोकसभांमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहमत नव्हते, आणि तेरावी लोकसभाही तशीच असेल. पन्नास वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर जगातील सर्वांत जास्त गरीब लोक भारतात आहेत. मध्यमवर्ग अशाश्वतीने व इतर अडचणींनी ग्रस्त आहे. समाजवस्त्र फाटते आहे. कुटुंबसंस्था विरते आहे. गुंडगिरी, टोळीयुद्धे, देहविक्रय, एड्स, बकाली, सारे वाढते आहे. सर्व वैचारिका (ideologies) निस्तेज होऊन आपली सम्यकदृष्टी गमावत आहेत. प्रागतिक अवसरवाद; तात्कालिक, लहान गटांपुरत्याच कृती, या दूरदृष्टीवर मात करत आहेत. लोक तुच्छतावादाच्या (cynicism) आहारी जाऊन कोणताच पर्याय विश्वसनीय नाही, असे मानू लागले आहेत.