विषय «इतर»

भीती आणि विचार

लेखिकेच्या शब्दचित्रातून तिचा अनुभव माझ्यातही साकारला. माझ्या मनावरूनही भीतीची लाट गेली. अशा अनुभवांकडे कसे बघावे, ते कसे घ्यावेत, या पृच्छेवरून तिची या अनुभवामागची प्रक्रिया जाणून घेऊन तो संगणकीय भाषेत भीतीच्या फाईलमधून विचाराच्या ‘फाईल’ मध्ये सामील करण्याचा प्रयत्नही समजला.
मानसशास्त्रीय संस्कारांमुळे माझ्या मनात ‘अतींद्रिय’ असे काही आलेच नाही. मनात आले ते असे : मूल बौद्धिक क्षमता असलेल्या मेंदूसकट जन्मते. त्यावर मुळाक्षरे उमटवतात पालक, शिक्षक, मित्रमंडळ, पुस्तके, प्रसारमाध्यमे आणि एकूण वातावरण ! त्यातून बऱ्या-वाईटाचे भान येते. धोक्यांची जाणीव होते. बचाव कसा करावा, समजू लागते.

पुढे वाचा

विवेकवाद – भाग ३

(प्रथम प्रकाशन जून १९९० अंक १.३)

कर्मसिद्धान्त, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म
या लेखमालेच्या दुसऱ्या लेखांकाच्या शेवटी आपण ‘कर्मसिद्धान्त’ नावाच्या एका प्रसिद्ध उपपत्तीचा उल्लेख केला. तेथे आपण ईश्वराच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या स्वरूपाचा विचार करीत होतो, आणि आपण असा युक्तिवाद केला होता की जगात जे प्रचंड अशिव आढळते म्हणजे भयानक दुःख, क्रौर्य, अज्ञान, दुष्टाचार, रोगराई इत्यादि जे आढळते ते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु अशा ईश्वराच्या अस्तित्वाला बाधक आहे. या युक्तिवादाला दिल्या गेलेल्या अनेक उत्तरांचे आपण परीक्षण केले आणि शेवटी कर्मसिद्धान्तापाशी येऊन ठेपलो. कर्मसिद्धान्तानुसार जगातील अशिवाचे कारण आपण मानवच आहोत आणि त्याकरिता ईश्वराला जबाबदार धरणे चूक आहे.

पुढे वाचा

भ्रष्टाचार : कारणे व उपाय (भाग १)

प्रास्ताविक
आजच्या समाजव्यवस्थेला लागलेला सर्वांत भयंकर रोग म्हणजे ‘भ्रष्टाचार’ होय. भ्रष्टाचारावर सर्वचजण बोलत-लिहीत असतात. परंतु भ्रष्टाचाराची मूळ कारणे कोणती आहेत व त्यांचा बीमोड करता येईल काय, त्यासाठी कोणता ठोस कार्यक्रम हाती घेता येईल, याचे फारसे विश्लेषण सामान्य माणूसही करीत नाही. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाविषयी स्वप्नाळू व आदर्शवादी कल्पनांना कठोर वास्तवाचा आधार नसल्याने त्यांचा भ्रष्टाचार-निर्मूलनाच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नाही. मी भ्रष्टाचाराचे स्वरूप, कारणे, परिणाम व त्याच्या निर्मूलनाचे उपाय यावर चर्चा करणार आहे. या चर्चेत वाचकांनीही सहभागी व्हावे, अशी माझी इच्छा व अपेक्षा आहे.

पुढे वाचा

महाराष्ट्रातील ग्रामीण-नागरी लोकसंख्या आणि महत्त्वाची निरीक्षणे

१) नागरी विभागांची व्याख्या:
अ) ज्या ज्या वस्तींसाठी नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टॉनमेंट बोर्डस् असतील अशा वस्त्या, याचप्रमाणे राज्यसरकारने ‘नगर’ म्हणून मान्यता दिलेल्या सर्व लोकवस्त्या.
ब) याशिवाय खालील चारही निकष पुरे करणाऱ्या लोकवस्त्या या नगर म्हणून मानल्या जातात. i) किमान लोकवस्ती ५००० i) वस्तीमधील किमान ७५% पुरुष बिगर-शेती व्यवसायामध्ये गुंतलेल्या वस्त्या. iii) ४०० लोक/प्रति चौ. मैल यापेक्षाही जास्त घनता असलेल्या वस्त्या.
वरील प्रकारच्या वस्त्या सोडून उरलेल्या सर्व लोकवस्त्यांची गणना ग्रामीण विभागात केली जाते.
२) नागरी विभागात बिगरशेती तर ग्रामीण विभागात शेती हे लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असते.

पुढे वाचा

कृषि व ग्रामीण विकास (भाग-२)

महबूब उल् हक् ह्यांनी १९९० पासून मानव विकास अहवाल प्रकाशित करताना पारंपरिक अर्थशास्त्रीय विचाराला हादरे दिले व आव्हाने दिली. ती अशी:

(१)विकसनशील देशांनी काहीच प्रगती केली नाही असे समजणे/सुचविणे चूक आहे. त्यांची प्रगती देशोदेशांत कमीअधिक झाली असेल परंतु मानव विकासाचे निकष लावले तर त्यांनी बरीच प्रगती केली आहे.

(२)मानवविकासाकरता आर्थिक वृद्धी अनावश्यक आहे असे समजणे चूक आहे. आर्थिक वृद्धीशिवाय मानवी कल्याणात सातत्याची प्रगती होऊ शकत नाही. पण हेही समजणे चूक आहे. की आर्थिक वृद्धीने आपोआपच मानव विकास उच्च पातळीवर जाईल.

(३) दारिद्र्यनिर्मूलन हे उद्दिष्ट मानव विकासाच्या उद्दिष्टापेक्षा वेगळे आहे असे समजणे चूक आहे.

पुढे वाचा

दुर्बोध!

तसेंच लोकस्थिति सुधारावयाची असेल तर ती आंतून सुधारली पाहिजे. लोकांमधील परस्पर-संबंध काय आहेत, त्यांनी स्थापिलेल्या संस्थांचे हेतु काय असतात, राजाचा अधिकार किती असावा आणि प्रजेचे हक्क कोणते आहेत, ते इतकेच कां असावेत आणि जास्त का नाहीत; धर्म, नीती, जाती इत्यादि बंधनें अस्तित्वांत कां आलीं व कशी आली हे व असलेच आणिक प्रश्न जे लाखों आहेत, त्यांवर समाजाची इमारत रचलेली आहे. तेव्हां या विषयांचे विवेचन ज्या ग्रंथांत येणार त्यांचे परिशीलनाने लोकस्थितींत अंतर पडेल यांत नवल ते कोणते ? उदात्त विचार, दूरदृष्टि, बुद्धीची कुशाग्रता, स्वातंत्र्याची प्रीति, आणि गुलामगिरीचा तिरस्कार, डामडौलाचा आळस, आणि साधेपणाची आवड, आपल्या देशाचा, भाषेचा आणि लोकांचा अभिमान, सत्याची चाड आणि सत्तेविषयी निर्भयपणा, मानसिक धैर्य, आणि सांग्रामिक शौर्य, निःस्पृहपणा आणि लांगूलचालनाचा द्वेष इत्यादि असंख्य सद्गुणांची स्फूर्ति अंतःकरणांत उत्पन्न होण्याला उत्तम ग्रंथाचे अध्ययनासारखा दुसरा मार्ग नाहीं.

पुढे वाचा

विसर्जित गणपती दान करा!

लोकांनी नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात गणेशविसर्जन न करता त्या मूर्ती लाक्षणिक विसर्जन करून दान द्याव्यात हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. या दान दिलेल्या मूर्तीचे निर्गत मग अन्य ठिकाणी पर्यावरणाला विशेष हानी न पोचविता केले जाते. पूर्णतः धार्मिक अंगाने विचार केला तर गणपतिविसर्जन हा भाग परंपरेचा अधिक आहे. प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी व सांगता पूजा केल्यानंतर गणपतीच्या मूर्तीत देवत्व नसते. त्यामुळे या आंदोलनाने धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ होत नाही. याउलट लोकसंख्यावाढीमुळे, मूर्तीचे आकारमान वाढल्याने, त्यांच्या बनविण्याच्या पद्धतीत व साधनात बदल झाल्याने आणि नैसर्गिक जलस्रोतांची हानी झाल्याने पारंपारिक गणेशविसर्जन बदलले आहे.

पुढे वाचा

आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (२)

एकोणिसाव्या शतकातील नव-हिंदुराष्ट्रवाद्यांनी अध्यात्मकेंद्री हिंदुत्वाच्या आधिभौतिक रूपावर आधुनिक विज्ञानाचा साज चढवायला सुरुवात केली. कर्मकांडे, निसर्गव्यवहार आणि मानवाची नियती यांच्यात साम्ये शोधण्याच्या प्राचीन पंडिती परंपरेचाच तो एक नवा अविष्कार होता. आजचे हिंदुत्वप्रचारक या लोकांचेच वारस आहेत.

आधुनिकोत्तरांचे मत असे विश्वाचे वास्तव रूप अनाकलनीय आहे. सर्वच समाज आपापल्या रचनेप्रमाणे विश्वाबाबतच्या ज्ञानाची पद्धतशीर ‘दर्शने’ उभारतात. सर्वच समाजांची दर्शने स्वेच्छ, रीलळीीरी असतात. त्यांच्यात सत्यासत्यतेवरून डावे उजवे करता येत नाही. त्यांची हवी तशी मिश्र रूपे घडवून वेगवेगळ्या समाजांना वेगवेगळी सांस्कृतिक विश्वे घडवता येतात. विश्वाबाबतच्या वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये सारखेपणा शोधणे आधुनिकोत्तरांच्या ज्ञानशास्त्राला मान्य आहे.

पुढे वाचा

शुद्धलेखनांतील अराजक परिणाम आणि उपाय (उत्तरार्ध)

मागच्या लेखांकांत अराजकाचे परिणाम काय झाले आहेत, ते स्पष्ट केले आहेत. ह्या अंकांत आपण उपायांकडे लक्ष देणार आहोत.

पहिला उपाय मला सुचतो तो असा की प्रमाणभाषेला प्रत्येकाने परकी भाषा मानून आपले दैनंदिन व्यवहार स्थानिक बोली भाषेत करावे. प्रमाणभाषेचे शिक्षण मातृभाषेचे शिक्षण म्हणून न देतां एक वेगळी, परकी भाषा म्हणून द्यावे. ही संपर्कभाषा आहे हा संपर्क, भूतकाळांत लिहिल्या गेलेल्या वाययाशी आणि निरनिराळ्या बोली जेथें बोलल्या जातात त्या त्या प्रदेशांशी आम्हांला साधावयाचा आहे असा विचार आपण सर्वांनी करावा. प्रमाण लिखित भाषेला मातृभाषा (घरगुती, दैनंदिन व्यवहाराची बोली) करण्याचा प्रमाद गेल्या शतकामध्ये मुख्यतः ब्राह्मणांनी केला ती त्यांची फार मोठी चूक झालेली आहे.

पुढे वाचा

विवेकवाद – भाग २

(प्रथम प्रकाशन मे १९९० अंक १.२, लेखक – दि. य. देशपांडे) या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण ज्ञानक्षेत्रातील विवेकित्वाचा एक नियम पाहिला. तो नियम असा होता की ज्या विधानाच्या सत्यत्वाचा पुरेसा पुरावा उपलब्ध असेल अशाच विधानावर आपण विश्वास ठेवावा, आणि तो विश्वास पुराव्याच्या प्रमाणात असावा. तसेच विधानाचा पुरावा तपासण्याची शक्ती आपल्याजवळ नसेल तर त्या त्या ज्ञानक्षेत्रातील तज्ज्ञाला किंवा वैज्ञानिकाला प्रमाण मानावे.

नंतर आपण कर्मक्षेत्रातील विवेकाकडे वळलो, आणि आपली कर्मे विवेकी केव्हा होतील याचा विचार करण्यास आरंभ केला. आपल्या असे लक्षात आले की कर्माचा विचार आपण जसा साध्य म्हणून करू शकतो तसाच एखाद्या साध्याचे साधन म्हणूनही करू शकतो.

पुढे वाचा