“पाणी नसेल तर आपले जीवन अशक्य होईल एवढी महती असूनही मुबलक उपलब्ध पाण्याला बाजारात किंमत नाही आणि यत्किंचित उपयोगी नसलेल्या हिऱ्याला अतोनात किंमत आहे.”
—- अॅडम स्मिथ
मराठवाड्यातील 43 तालुके (एकंदर 76 पैकी) टंचाईग्रस्त घोषित झाले आहेत. सध्या 1200 गावांना पाण्याची टंचाई असून पावसापूर्वी या यादीत आणखी 600 गावांची भर पडण्याची शक्यता आहे. लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांची अवस्था भीषण आहे. नमुन्यादाखल लातूर जिल्ह्याची स्थिती पाहता येईल. एकूण 943 गावांपैकी प्रत्येक वर्षी 450 ते 580 गावांना पाण्याची टंचाई असतेच. यंदा सगळीच गावे ग्रासलेली आहेत.
विषय «इतर»
सतीची चाल, पुनर्विवाह बंदी, बालविवाह आणि . . . जातिभेद??
एकोणिसाव्या व विसाव्या शतकात जातिभेदावर बऱ्याच चर्चा झाल्या आणि त्याची जरूरही होती, कारण अस्पृश्यतेने त्यापूर्वी धुमाकूळ घातला होता. ब्रिटिश राज्यात जगभर त्याला कुप्रसिद्धी मिळून एकूण हिंदू धर्मीयांची निंदा झाली. हिंदू म्हटले की ‘काहीतरी किळसवाणे’ असा सर्वत्र समज झाला. तसे पाहता सर्वच समाजात class consciousness किंवा काही त-हेची गुलामी होती. परंतु जन्मतःच जातिभेदाने फुटीर होणारा समाज भारताशिवाय जगाच्या पाठीवर कोठेच नव्हता. येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की 1945 सालच्या सुमारास प्रसिद्ध विदुषी कै. इरावतीबाई कर्वे यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जातीतील लोकांच्या चेहऱ्यावर 19 मोजमापे घेऊन जातीनुसार त्यात काही फरक आढळतो का ते पाहिले होते व संख्याशास्त्रानुसार असा निष्कर्ष काढला की त्यात फरक नव्हता.
विरोधकांबाबतचा अभिमान (राजर्षि शाहू गौरव ग्रंथातून)
छत्रपतींनी “आमच्या स्वराज्यातील कोणत्याही धर्मपीठावरील अधिपती नेमण्याचे अधिकार छत्रपतींचे आहेत. त्याचप्रमाणे चालावे,’ असा लेखी हुकूम जारी केला. “काय जाधवराव, तुम्ही तर कानांवर हात ठेवले होतेत, पण कोदंडाने दिलाच ना पुरावा काढून!” महाराजांच्या या टोमण्यावर जाधवरावादी आम्ही सगळेच हसलो. संध्याकाळी पन्हाळा लॉजवर पुराव्याचे पुस्तक पाठवून दिले.
या घटनेपूर्वी करवीर शंकराचार्यांच्या पीठावर महाराजांनी डॉ. कुर्तकोटींची स्थापना केली होती आणि त्याबद्दल केवळ भारतातूनच नव्हे, तर इंग्लंड अमेरिकेतून शाहूमहाराजांवर अभिनंदनाचा वृत्तपत्री वर्षाव झाला होता. पण वरील प्रश्न नेमका काय हेतूने त्यांनी विचारला, त्याचे इंगित मात्र माझ्या, जाधवरावांच्या किंवा दिवाणसाहेबांच्या अटकळीत त्या वेळी मुळीच आले नाही.
‘बुश-बटन’ साम्राज्यवाद
इराकी मोहिमेचे वैशिष्ट्य दोन प्रतिमांच्या रूपांत नजरेसमोर येते. बगदादच्या फिरदौस चौकातील सद्दाम हुसेनचा पुतळा उखडून टाकणे ही पहिली प्रतिमा. एका जुलमी राजवटीचा होत असलेला अंत आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जगात प्रस्थापित होत असलेली एक नवी व्यवस्था (World Order) ह्यांचे प्रतीक म्हणजे जणू ही प्रतिमा. दुसरी प्रतिमा आहे इराकी वस्तुसंग्रहालयाची आणि अमेरिकन तैनाती फौजांच्या नजरेसमोर गुंड तिथे करीत असलेल्या लुटीची. “अमेरिकाप्रणीत शांती’ (Pax Americana) ह्याच्या यश-अपयशावर ह्या दोन प्रतिमा फार अचूक टिप्पणी करतात : जबाबदारीशिवाय सत्ता! बुशचे पाठिराखे ह्या ‘बुश तत्त्वज्ञानाचे’ वर्णन साम्राज्यवादाचे पुनरागमन म्हणून करत नाहीत.
समाजरचना–विचार
समाजरचनेचा विचार करताना तळागाळातील व्यक्तीपासून ‘उच्च’ वर्गातील व्यक्तींसकट सर्वांच्या हितासाठी नेमके काय हवे याचे भान हवे. जोडणारे बंध व्यक्ती-व्यक्तीमध्ये वा एकूण समाजामध्ये वितुष्ट आणणारे असल्यास त्यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. सामान्यपणे कुठलाही वाद व विशेषकरून टोकाचा राष्ट्रवाद व अशा राष्ट्रवादांच्या संकेत-संज्ञा वापरण्यावर दुराग्रह या कुठल्याही सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजाला हितावह ठरणाऱ्या नाहीत. भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घेणारी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे. समाजातील अभिजन वर्गाकडे role-model म्हणून इतर बघतात. त्यांचे सही सही अनुकरण करतात. म्हणून या अभिजनवर्गाने आपले आचार-विचार, वर्तणूक, सोई-सुविधा, छंद-सवयी इत्यादींबद्दल जास्त जागरूक व संयमित असणे गरजेचे आहे.
काहीतरी ओळखीचे वाटते आहे का?
सामाजिक सेवा आणि (पहिल्या महा-)युद्धासाठी (शत्रुराष्ट्रांना) द्यावा लागणाऱ्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ‘पोकळ पैसा’ छापल्यामुळे प्रचंड भाववाढ झाली. पश्चिमी राष्ट्रांनी भाववाढ रोखण्यासाठी लादलेल्या उपयांमुळे अनेक जण बेकार झाले. लोकांच्या भ्रमनिरासातून मतदारांचे उजव्या व समाजवादी पक्षांमध्ये ध्रुवीकरण झाले. दोन्ही पक्ष पहिल्या युद्धातून वाचलेल्या युद्ध साहित्याने सज्ज अशा मोठाल्या खाजगी सेना बाळगू लागले. यांच्यातील झटापटींपासून दूर राहणे (टागीसारख्या) तरुण प्राध्यापकाला काही काळ शक्य होते.
दुभंगलेल्या लोकशाही ऐवजी टोटॅलिटेरियन हुकूमशाही ऑस्ट्रियात प्रस्थापित होणे हे नोकरशाही, सेना, कॅथलिक चर्च आणि उजव्या राजकीय पक्ष-यंत्रणांना
आ चर्यकारकपणे ‘रुचकर’ वाटले.
सर्व प्राणी समान आहेत
[1974 मध्ये प्रकाशित झालेल्या प्राध्यापक पीटर सिंगर यांच्या ‘All Animals are Equal’ या लेखाचा स्वैर अनुवाद व संक्षेप. सिंगर हे ऑस्ट्रेलिया-तील मेलबोर्न येथे मोनॅश युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत.]
अलीकडच्या काळात पीडित वर्गांनी विषमतेविरुद्ध जोराचे लढे दिले आहेत. त्यांचे एक अभिजात (classic) उदाहरण म्हणून अमेरिकी संस्थानांतील कृष्णवर्णीयांनी केलेल्या चळवळींचे देता येईल. काळ्या लोकांना दुय्यम नागरिक ठरविणाऱ्या पूर्वग्रह आणि पशुतुल्यव्यवहार या प्रवृत्तींचा उच्छेद झाला पाहिजे अशी या चळवळीची मागणी होती. तिच्या पाठोपाठ आपण अनेक अन्यही लढे पाहिले आहेत.
मोचक चळवळींची मागणी आपल्या नैतिक क्षितिजाच्या विस्तारांची आणि समानतेच्या मूलभूत तत्त्वाच्या पुनर्विवरणाची असते.
मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-१)
२२ फेब्रुवारी २००२ ला करसेवकांचा एक जथा साबरमती एक्स्प्रेसने अमदावादहून अयोध्येला गेला व २६-२७ फेब्रुवारीला परतला. दोन्ही प्रवास होत असताना जागोजागी करसेवकांनी इतर प्रवासी, स्थानकांवरील विक्रेते वगैरेंशी गैरवर्तन केले. विशेषतः मुस्लिमांशी हे वर्तन नारेबाजी व अरेरावीच्या बरेच पलिकडचे होते. फैजाबादच्या २५ फेब्रुवारीच्या वृत्तपत्रात अयोध्येकडील प्रवासातील गैरव्यवहाराची नोंदही झाली.
२७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ला गोध्रा स्थानकावर मुस्लिम स्त्रिया व विक्रेत्यांशी करसेवकांच्या दुर्वर्तनाच्या अनेक घटना घडल्या. गाडी सुटली व एखादा किलोमीटर जाऊन थांबली—-का थांबली हे कळलेले नाही. चालकाने बाहेरून एक जमाव गाडीवर गोटमार करताना पाहिला, पण ही गोटमार एस-६ डब्यावर होत नव्हती.
राष्ट्राचे आरोग्य मुलाखत
1986 मध्ये डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्याची पदवी संपादन करून भारतात परतले. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील गडचिरोलीसारख्या अति मागास भागात त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. ग्रामीण आणि आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याचा स्त्री-रोग-विज्ञानाच्या (gynaecological) दृष्टिकोनातून अभ्यास करायला डॉ. राणी बंग ह्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारची चिकित्सा ही त्या क्षेत्रातील नवी पायवाट तर ठरलीच पण जागतिक पातळीवरही त्यांनी केलेले काम अनन्य स्वरूपाचे मानले गेले. ह्या अभ्यासाचा आधार घेऊनच भारत सरकारने आपले जननारोग्य आणि बालकांचे आरोग्य (Reproductive and Child Health – RCH) विषयी धोरण आखले.
शतखंडित शहरे
[शहरे टिकवावयाची असतील तर त्यासाठी शहरी प्रक्रियांकडे सर्वाधिक लक्ष द्यावे लागेल. कारण या प्रक्रियांचे प्रवाही स्रोतच शहराचे स्वरूप आणि भवितव्य ठरवितात.]
स्पिरो कोस्तोफ –1992
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत विकसित पश्चिमी जगांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. त्यामागे लपलेल्या आर्थिक कारणांचा शोध पा चात्त्य अभ्यासक नानाविध प्रकारांनी घेत असतात. अमेरिकेतील रीगनचा अध्यक्षीय काळ आणि इंग्लंडमधील मार्गारेट थैचर यांची राजवट एकाच वेळी तेथील आर्थिक धोरणांना मोठेच क्रांतिकारी वळण देणारी होती. सर्वप्रथम खाजगीकरणाची हाक त्यांनी दिली आणि बघता बघता जगातील बहुसंख्य देशांत ती लाट पसरली.