विषय «इतर»

मन, मेंदू आणि सर्ल

‘न्यूरोसायन्स’ किंवा ‘मेंदू-विज्ञान’ ह्या क्षेत्रात झपाट्याने जे नवे शोध लागत आहेत, त्यांची दखल तत्त्वज्ञान घेते का, असा प्रश्न जेव्हा ऐकला, तेव्हा नजरेसमोर नाव आलेते सर्ल यांचे. अर्थात जे. जे. सी. स्मार्ट, डेनेट, चर्चलन्ड, डेव्हिडसन, नागेल ही नावेही नजरेआड करता येणारी नाहीत; पण ‘चायनीज रूम आर्युमेंट’ मांडणाऱ्या सर्ल यांचे नाव ठळकपणे नजरेत भरते. वैज्ञानिक दृष्टी ढळू न देता त्यांनी मनाविषयी ज्या सर्वसाधारण समजुती आहेत, त्यांचीही दखल घेतल्याने सर्ल यांचा दृष्टिकोण मोलाचा ठरतो.
वैज्ञानिक दृष्टिकोणाचा वारसा सर्लना मिळाला, तो आई-वडिलांकडून. वडील इंजीनिअर तर आई डॉक्टर.

पुढे वाचा

शोध जाणिवेचा : मानसप्रत्ययशास्त्र आणि मेंदू

मानसप्रत्ययशास्त्राची उभारणी त्याचा प्रणेता जर्मन तत्त्वज्ञ एडमंड हुसर्ल (1859 ते 1938) यांच्या तात्त्विक भूमिकेमधून आणि विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून झालेली आहे.
ज्ञानाच्या शक्यतेबद्दलच शंका बाळगणारा संशयवाद, ज्ञान स्थलकालानुरूप बदलते असे मानणारा सापेक्षतावाद यांना हुसर्लचा तीव्र विरोध होता. ज्ञान वस्तुनिष्ठ (objective), निश्चित (certain) आणि शंका घेणे शक्यच होणार नाही (indubitible) असेच असले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. आधुनिक विज्ञानच काय, पण गणित आणि भूमिती या अत्यंत प्रतिष्ठा असलेल्या ज्ञानशाखाही ज्ञानाच्या या कसोटीला उतरत नाहीत कारण या प्रत्येक ज्ञानशाखेची आपापली गृहीते असतात, आणि त्या गृहीतांना त्या-त्या ज्ञानशाखेत आह्वान दिले जात नाही.

पुढे वाचा

मनाची संकल्पना आणि गिल्बर्ट राईल

गिल्बर्ट राईल (1900-76) हे एक ब्रिटिश विश्लेषणवादी तत्त्वचिंतक. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञानाच्या अध्यापनाचे कार्य केले. ‘Mind’ या जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानाशी निगडित जर्नलचे संपादक जी.ई.मूर या विश्लेषणवादी तत्त्वचिंतकानंतर त्यांनी भूषविले. तत्त्वज्ञानावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. विशेषतः 1949 साली त्यांनी लिहिलेल्या ‘Concept of Mind’ या पुस्तकामुळे त्यांचे नाव आणि विचार चर्चेत आले. साधारणपणे 1950-60 या दशकात ब्रिटिश तत्त्वज्ञानावर त्यांचा प्रभाव राहिला. विश्लेषणवादी तत्त्वज्ञान हे 20 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात रसेल आणि मूर या दोन तत्त्वचिंतकांच्या प्रभावातून चळवळीच्या स्वरूपात उदयास आले. या तत्त्वचिंतकांवर मुख्यतः वैज्ञानिक ज्ञान व पद्धती याचे स्वरूप आणि त्यामुळे वैज्ञानिक ज्ञानाला प्राप्त होणारी नि:संदिग्धता, ही अचूकता, नेमकेपणा या गुणांचा प्रभाव होता आणि तत्त्वज्ञानालाही असे स्वरूप प्राप्त कसे करता येईल या दृष्टीने हा विचारप्रवाह प्रयत्नशील होता.

पुढे वाचा

आरामखुर्ची आणि प्रयोगशाळा

श्रद्धा, मूल्ये, कर्मकांडे, परंपरा यांचे मूळ व कूळ शोधणे त्यातून ज्ञानाची निर्मिती करणे ही विश्लेषणात्मक फिलॉसॉफीची पद्धती आहे. (पाश्चात्त्य तत्त्वज्ञान या अर्थाने फिलॉसॉफी हाच शब्द सोयीसाठी लेखभर वापरला आहे). फिलॉसॉफीच्या विश्लेषणाच्या पद्धती विकसित होऊ लागल्यामुळे फिलॉसॉफी मानव्यविद्यांपासून दूर जाऊ लागली. संस्कृती व इतिहास यांतून फिलॉसॉफीचा उगम झालेला आहे. या उगमाचा फिलॉसॉफीला विसर पडला की काय असे बऱ्याच जणांना वाटते. फिलॉसॉफीने विज्ञानाच्या पद्धतीला पसंती दर्शविली आहे. वस्तुनिष्ठ सत्याच्या शोधात विज्ञानाकडे जो आत्मविश्वारस आहे त्यात फिलॉसॉफी सहभागी होऊ इच्छिते. खरे पाहता विज्ञान व फिलॉसॉफी यांचे संबंध काही नवीन नाहीत.

पुढे वाचा

मेंदू-विज्ञान लिहीत आहे उद्याचे नीतिशतक

मेंदूनीतिशास्त्र (Neuroethics) ही अगदी अलिकडे, म्हणजे एकविसाव्या शतकात उदयाला आलेली नवीन ज्ञानशाखा. ही इतकी नवीन आहे की ‘मेंदूनीतिशास्त्र’ या शब्दाची सर्वमान्य अशी औपचारिक व्याख्यासुद्धा अजून तयार झालेली नाही. नीतीनियमांशी निगडित असलेले मेंदू-विज्ञानातले प्रश्न, मेंदूवरील संशोधनातून उद्भवणाऱ्या समस्यांची कायदेशीर अंगे आणि त्यांचा समाजावर होऊ शकणारा परिणाम या सर्वांचा विचार मेंदूनीतिशास्त्रात केला जातो. मेंदूच्या रोगांवर उपचार करताना आणि मेंदूसंबंधात संशोधन करत असताना काय पथ्ये पाळायची, कुठल्या थराला जायचे, भलेबुरे कसे ठरवायचे, काय उचित आणि काय अनुचित याचा निवाडा कसा करायचा, या सगळ्याचा उहापोह या शास्त्रशाखेत केला जातो.

पुढे वाचा

मध्यमवर्ग : स्वप्न आणि काळजी

आपल्या देशातील मध्यमवर्गाने गेल्या शतकात सर्व क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली. शास्त्रीय शोधांपासून तर स्वातंत्र्य चळवळीपर्यंत सर्व क्षेत्रांत नेतृत्व पुरवले. वैचारिक क्रांतीच्या उंबरठ्यावर समाजाला ह्या मध्यमवर्गानेच नेऊन ठेवले. मात्र पुढे अचानक काय झाले… मध्यमवर्गीय सुखवस्तू झाले, केवळ व्यावहारिक यशाच्या मागे लागले आणि ते मिळताच आपली जबाबदारी पार पाडेनासे झाले. सामाजिक नीतिमत्तेच्या कालातीत मूल्यांना ते विसरले की काय? उच्चशिक्षणाचे भाग्य लाभलेल्या ह्या वर्गाने मिळकतीचे सोपे पण लबाडीवर आधारलेले मार्ग शोधून काढले, आणि त्यातच त्यांच्या अस्मितेची आहुती पडली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी राजकारणाचे अध्यात्मीकरण होण्याची गरज प्रतिपादन केली होती.

पुढे वाचा

पाणी मागतात… च्यायला

लोकं उद्धट व्हायला लागली आहेत
पाणी मागतात – पिण्याकरता शेतीकरता
ठोकून काढलं पाहिजे साल्यांना
साहेबांनी म्हटलं – अहो जलनीती घ्या
कायदे करू, नियम करू
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात… च्यायला
सायबांनी असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पूर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अनं ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात… च्यायला
कान इकडं करा. तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले-इनटरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टँकरवर काम भागणार नाही.

पुढे वाचा

पैशाचे मला दिसणारे स्वरूप (२)

औद्योगिक क्रान्तीमुळे पडलेला फरक —
अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रान्ती झाली. तिची बीजे मात्र त्यापूर्वी अंदाजे 500 वर्षे आधी पडली. गतानुगतिक विचारांतून इंग्लंडचे लोक बाहेर पडू लागले. ह्याचा पहिला पुरावा मॅग्ना कार्टा च्या स्वरूपात दिसतो. इंग्लंडच्या सरदारांनी मिळून राजाचे अधिकार सीमित केले, ह्याचा तो दस्तावेज आहे. आणखी काही वर्षांनी इंग्लंडने पोपचे वर्चस्व झुगारून दिले. ह्या दोन्ही घटना आपल्या इतिहासात महत्त्वाच्या मानल्या जातात. चाकोरीबाहेरचा विचार करण्याचे आणि तो अंमलात आणण्याचे सामर्थ्य एका समाजाने समूहशः दाखविले. बहुतेक सारा यूरोपच सरंजामशाहीतून मुक्त होण्याची धडपड करू लागला.

पुढे वाचा

नैतिक वास्तववाद्यांच्या शोधात

[डेव्हिड ब्रूक्सच्या सीकिंग मॉरल रिअॅलिस्ट्स (इंडियन एक्सप्रेस (14 एप्रिल 2012)/द न्यूयॉर्क टाइम्स ) या लेखाचा हा मथितार्थ.]
आजकाल बरेचदा चांगली सामाजिक कामे करत असलेले तरुण भेटतात जगातल्या गरीब देशांमधल्या प्रवासांतून त्यांना केवळ स्वतःत न गुंतता काही सामाजिक उद्योग करायचे सुचलेले असते. त्यांच्यात एरवी भेटणारा तुच्छतावाद नसतो, तर या युगाला नैतिक विचार देण्याची इच्छा असते. हे पाहून आपणही ताजेतवाने होतो. पण त्यांच्या या सेवाव्रतांत, सेवाधर्मांत काही त्रुटीही असतात.
एक म्हणजे त्यांना वाटत असते, की राजकारण टाळता येईल. त्यांना पायाभूत कामांमधूनच समाजात बदल होतात, राजकीय प्रक्रियेतून नाही, असे वाटते.

पुढे वाचा

साहित्यातून विवेकवाद (३) – होम्स ते हॅनिबल : इंग्रजी डिटेक्टिव्ह कथा

नववी ते अकरावी या वर्गात शिकत असताना मी एक सुयोग भोगला. आमच्या वर्गशिक्षिकाच ग्रंथालयप्रमुख होत्या. त्यावेळी एका विद्यार्थ्याला एका आठवड्यात एकच पुस्तक वाचायला घरी नेता येत असे. आम्हा काही जणांना मात्र तीनचार दिवसांनीच पुस्तक बदलायची मुभा मिळाली! बरीच पुस्तके आम्ही कर्तव्य म्हणून वाचत असू (उदा. शेक्सपिअरची हिंदी भाषांतरे); पण काहींची मात्र प्रेमाने पारायणे होत. यांत प्रमुख होती ती आर्थर कॉनन डॉइलची शेरलॉक होम्स ह्या नायकाभोवती रचलेली पुस्तके.

सर आर्थर कॉनन डॉइल (१८५९-१९३०) पेशाने डॉक्टर होते, आणि त्यांना वैद्यकाच्या वेगवेगळ्या शाखा शिकायला आवडत असे.

पुढे वाचा