विषय «पुस्तक/व्यक्ती परिचय»

पुस्तक परिचय – सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी

लेखक: माधव गाडगीळ
प्रकाशक: राजहंस प्रकाशन

परवाच ‘सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी’ हे माधव गाडगीळ यांचे पुस्तक हातात पडले; आणि मी ते आधाशासारखे वाचून काढले. एक निसर्गप्रेमी, पद्मभूषण, पर्यावरणवादी चळवळीतला एक आधारस्तंभ आणि भटनागर प्रशस्ती पुरस्कार मिळालेला एक विद्वान म्हणून मी त्यांना ओळखून होतोच. तशा आमच्या गाठीभेटीही झाल्या होत्या. माझ्या ‘अनर्थ’ पुस्तकासाठी त्यांनी ब्लर्बही दिला होता. पण तरीही त्यांचे हे पुस्तक वाचल्यावर मला माधव गाडगीळ ही काय असामी आहे हे खऱ्या अर्थाने कळले. 

या माणसाने निसर्गावर प्रेम केले. सर्व प्राणी, वनस्पती, किडे, भुंगे – सर्व कीटक, दगड, धोंडे, पर्वत, नद्या, समुद्र, त्यातले मासे, हत्ती, वाघ, सिंह, एवढेच काय इथल्या शेवाळ्यावरही याने प्रेम केले!

पुढे वाचा

परीक्षण – पेशींचे गाणे

Book: The Song of The Cells: An Exploration of Medicine and the New Human
Siddhartha Mukherjee, Imprint: India Allen Lane, October 2022

‘पेशींचे गाणे’ ह्या आपल्या नव्या पुस्तकात प्रसिद्ध लेखक आणि कर्करोगतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ मुखर्जी म्हणतात, “आपण म्हणजे आपल्या शरीरात नांदणारी पेशींची संस्कृती!” पुस्तकाचे शीर्षक आणि पुस्तकाबद्दल लेखकाच्या दिल्लीत झालेल्या वार्तालापाचे वृत्त वाचले, तेव्हा पुस्तक वाचलेच पाहिजे असे वाटले. गंमत म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला माझ्याच शरीरातले पेशींचे गाणे ऐकू यायला लागले, थोडेसे समजायला लागले. आपले शहर जसे बहुविध नागरिकांमुळे तयार होते, तसेच आपले शरीर म्हणजे आपली बहुविध पेशींनी तयार होणार संस्कृती हे लेखकाने वापरलेले रूपक मला एक आर्किटेक्ट आणि नगरविज्ञान विषयाची अभ्यासक म्हणून विशेष भावले.

पुढे वाचा

परीक्षण – निर्वासित

मूळ पुस्तक : निर्वासित (आत्मकथन), लेखक : उषा रामवाणी,  
उषःकाल पब्लिकेशन, मुंबई १ जून २०२३

निर्वासित म्हणून ओळखले जाणारे सिंधी लोक महाराष्ट्रातील गावागावातून व्यापारी म्हणून स्थिरावले. पण त्या समाजातील मान्यतांपेक्षा निराळ्या आकांक्षा बाळगणाऱ्या मुलीला आईवडिलांच्याच घरात निर्वासित असल्यासारखे वाटले. अशा उपेक्षित मुलीचा संघर्ष किती तीव्र असेल? उषा रामवाणी यांच्या ‘निर्वासित’ या आत्मकथनातून त्यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड, मायेचा ओलावा मिळण्यासाठी आसुसलेले हळवे मन दिसते. अर्थार्जनासाठी खडतर वाटचाल त्यांनी केली. अथक प्रयत्न केले. मराठी भाषेवर केवळ प्रभुत्व नव्हे तर प्रेम असणाऱ्या या तडफदार स्त्रीची संघर्षगाथा वाचनीय तर आहेच पण डोळ्यात अंजन घालणारीही आहे. 

पुढे वाचा

द मॅजिशियन – पुस्तक परिचय

कॉम टॉईबिन या आयरिश लेखकाची थॉमस मान याच्या चरित्राचा व वाङ्मयाचा वेध घेणारी ‘द मॅजिशियन’ ही कादंबरी नुकतीच वाचली. नोबेल पारितोषिक विजेत्या थॉमस मान या जर्मन लेखकाने लिहिलेले काहीही मी वाचलेले नाही तरीही ही कादंबरी मला अतिशय आवडली हे विशेष. मला ते ललित-चरित्र आहे असे म्हणावेसे वाटते. एका बहुप्रसवू लेखकाने कल्पनेच्या, अभ्यासाच्या आणि उपलब्ध सर्व साहित्याच्या साहाय्याने दुसऱ्या लेखकाच्या अंतरंगात शिरून ते वाचकांना उलगडून दाखवावे असा अनुभव देणारे हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे.

मान जर्मनीमध्ये जन्मला. वडील श्रीमंत व्यापारी आणि सिनेटर.

पुढे वाचा

हमरस्ता नाकारताना : पारदर्शी जगण्याचे धैर्य

अलीकडेच सरिता आवाड यांचं ‘हमरस्ता नाकारताना’ (राजहंस प्रकाशन) हे आत्मकथन वाचलं. २८६ पानांचं हे पुस्तक अगदी प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे, हे पानोपानी जाणवत राहतं. कसलीही भीती न बाळगता, काहीही न लपवता यात आयुष्यातील अनेक घटना लेखिकेने तंतोतंत, मोकळ्या मनाने सांगितलेल्या आहेत. चरित्रलेखिका सुमती देवस्थळे यांची सरिता ही मुलगी. लहानपणापासूनच संवेदनशील, बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारांची. चाकोरी सोडून वेगळ्या वाटा चोखाळण्याची आकांक्षा असलेली. चळवळींमध्ये भाग घेणारी, त्यांत रमणारी आणि त्यामुळेच पुरोगामी विचार अंगिकारून स्वतःचे आंतरजातीय लग्न ठरवल्यामुळे वेळोवेळी घरच्यांकडून दुखावली जाणारी, विचारी व समंजस वागूनही जवळच्यांकडून वागणुकीतले परकेपण मिळणारी.

पुढे वाचा

श्रद्धांजली : अनिल पाटील सुर्डीकर

गावगाडा- शतकानंतर – अनिल पाटील सुर्डीकर

दशावतारांच्या गोष्टींपैकी वामनाची गोष्ट मला नेहेमीच अस्वस्थ करत आली आहे. एरवी देव पाप्यांना शिक्षा देतो, तर बळीचं पापच मला दिसत नाही. एरवी देव दुर्बलांचा घात करतो. हो;
घोडा नको, हत्ती नको, वाघ तर नको रे बाबा
बकरीच्या पोराचा बळी दे,
असा देव दुर्बलांचा घात करतो!
वामन मात्र बळीचा दडपून वर टर्रेबाजी करतो! आणि बळीही हसतखेळत वामनाला झेलून आपले महत्त्व अबाधित ठेवतो. एक वर्षारंभ आपल्या नावाशी जोडून घेतो. इडा-पिडा टळून आपले राज्य येवो, अशी प्रार्थना लोकांना करायला लावतो.

पुढे वाचा

ओळख अर्थशास्त्रज्ञांची (३) – डेविड रिकार्डो (१८ एप्रिल १७७२ – ११ सप्टेंबर १८२३)

अॅडम स्मिथ ने मांडलेल्या आशावादाला जेव्हा माल्थसने सुरुंग लावले तेव्हा बहुतांश लोकांना डेविड रिकार्डो च्या आशावादाने तारले. घरातून व समाजातून बहिष्कृत केलेल्या त्याच्या आयुष्यात त्याने एक अत्यंत यशस्वी उद्योजक, उत्तम गुंतवणूकदार व नंतर मोठा जमीनदार, ख्यातनाम अर्थशास्त्र- पंडित होण्याचा व आयुष्याच्या शेवटी शेवटी तर ब्रिटिश संसदेमध्ये जागा मिळवण्याचा मान मिळवला होता. अर्थशास्त्राचा प्रकांड पंडित म्हणून त्याचा इतका मान होता की इंग्लंडच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला अर्थशास्त्रावरील त्याचे विचार मांडण्यासाठी बोलाविले होते. त्याकाळी व आजसुद्धा अॅडम स्मिथनंतर सर्वात प्रभावशाली अर्थशास्त्री म्हणून त्याचे नाव घेतले जाते..

पुढे वाचा

ओळख अर्थशास्त्रज्ञांची (१) – अॅडम स्मिथ

मनुष्यप्राणी जंगलातील झाडावरून खाली उतरला तेव्हापासून त्याला प्रत्येक पावलागणिक जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्या सर्व अडचणींवर मात करीत करीत तो आजच्या स्थितीपर्यंत पोहोचला. हे साध्य करण्यासाठी त्याला बऱ्याच उपाययोजना कराव्या लागल्या. परंतु आजही जगातल्या सर्वांत श्रीमंत राष्ट्रात पसरलेल्या गरिबी, भेदाभेद, उच्चनीचता यावरून असे अनुमान काढावे लागते की हे उपाय अनेकदा तोकडे पडले.
अनेक संकटातून माणूस सुखरूप बाहेर पडू शकला कारण तो कायम समूहामध्ये सुरक्षित राहिला. परंतु इतर प्राणी उदा. मुंगी, मधमाशी यांसारखा तो समूहातील अनेकविध कामांपैकी विशिष्ट काम करण्याची नैसर्गिक प्रेरणा घेऊन काही जन्माला नव्हता आला.

पुढे वाचा

विकासाने केला घात (एका खेड्याची विनाशाकडे वाटचाल अ विलेज अवेट्स् अ डूम्स डे ह्या जयदीप हर्डीकर लिखित पुस्तकाचा परिचय )

नर्मदाखोऱ्यातील लोकांच्या नर्मदा सरोवर प्रकल्पाविरोधातील लढ्यातील शक्तिशाली एक अर्थपूर्ण घोषणा आहे, ‘विकास चाहिये, विनाश नहीं’. मोठी धरणे म्हणजे विकास असे मानणाऱ्या अनेक शहरी भारतीयांना ही घोषणा चुकीची वाटेल. पण ‘सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीचा तुकडा किंवा जगण्याचे साधन गमावलेल्या आदिवासीचे किंवा शेतकऱ्याचे दुःख, हे शब्द नीटच मांडतात.
मोठी धरणे, वेगवान आंतर-राज्य रस्ते, अभयारण्ये, विशेष आर्थिक क्षेत्रे अशा मोठ्या विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या मानवी समुदायांची वंचितता आणि पर्यावरणाचा विनाश यांची कथा आपल्याला परिचित अशीच आहे. तरीही ती संवेदनशीलतेने अन् सहानुभूतिपूर्वक पुनः पुन्हा सांगावी लागते म्हणजे तरी अशा विकासाची किंमत काय असते आणि ती कोण मोजते याचे भान आपल्याला येईल.

पुढे वाचा

कसोटीचा दगड…… पाठराखा

“आपले मतभेद आहेतच, कधी तपशिलाचे, कधी तात्त्विक. तसे मतभेद तर असणारच, कारण दोघेही आपापल्या अनुभवांच्या, आकलनाच्या आधाराने मते घडवत आहोत. पण हे मतभेद संवादाला बाधा आणत नाहीत. उलट तपशीलवार संवादातून मतैक्य कुठेकुठे आहे, एकमेकांना पूरक भूमिका आहेत का, हे सारे प्रश्न सोडवता येतील. कृतीच्या पातळीवर ज्यात (भाषणे, लेखन हेही आलेच) तर नक्कीच मतैक्य भेटेल. तर तेवढी कृती एकत्र करू या; आणि ती करत असताना संवादही करत राहू या.”

भोळेसर आणि आजचा सुधारक चा छोटेखानी परिवार, यांच्या संबंधांचा पाया वरील परिच्छेदात आहे.

पुढे वाचा