आपण गोष्टी ऐकत लहानाचे मोठे होतो. इसापनीती, रामायण, महाभारत, टारझन ह्यांसारख्या कथांमधून आपले बालपण फुलत जाते. लहानपणीच्या संस्कारामुळे पुढील आयुष्यात आपण गोष्टवेडे (Gossip Lover) होतो. कोणत्याही वयात रहस्यकथा, भयकथा, प्रेमकथा व विज्ञानकथा वाचाव्याश्या वाटतात. टीव्हीवर कौटुंबिक मालिकांमध्ये सासू-सून भांडणे, प्रेम-द्वेष चक्र, हास्यविनोद ह्यांचा मसाला वापरून मालिकांचे भाग वाढवले जातात. ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका ३१४७ भागांपर्यंत चालली. रामायण चालू असताना रस्ते ओस पडत. आयपीएल ही क्रिकेटमालिका कथांसारखीच लोकप्रिय झाली आहे. हे सर्व कथाप्रकाराच्या यशाचे नमुने आहेत.
आपल्या जगण्याचा मोठा काळ कल्पित कथांमध्ये रमण्यात जातो.