विषय «विवेकी विचार»

श्रद्धेची बेडी तोडावी

माणसाने बुद्धिप्रामाण्यवादी असावे. सत्य काय, असत्य काय ते स्वबुद्धीने विचार करून जाणावे. सत्याचा स्वीकार करावा. असत्याचा त्याग करावा. हे कोणत्याही बुद्धिप्रामाण्यवादी संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असते.

जगन्निर्माता, जगन्नियंता, पूजा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धावून येणारा देव आहे असे बहुसंख्य आस्तिक माणसे मानतात. खरेतर असा देव अस्तित्वात नाही हे सहज समजते. कारण वर वर्णन केलेल्या दैवी गुणांचा कोणालाही, कधीही प्रत्यय आलेला नाही, येत नाही. तसेच अमर आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, मोक्ष अश्या संकल्पना सत्य आहेत असेही अनेक जण मानतात. वस्तुत: या सर्व गोष्टी खोट्या, काल्पनिक आहेत.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य काय असू शकते याचा विचार करताना आपल्याला चार गोष्टींचा विचार करावा लागतो: बुद्धी, प्रामाण्य, आस्तिक्य; आणि या तीनही गोष्टींना पायाभूत असणारी चौथी संकल्पना, म्हणजे ज्ञान.

यांपैकी आस्तिक्य आपण तात्पुरते बाजूला ठेवू आणि उरलेल्या तीन गोष्टींचा प्रथमतः अगदी थोडक्यात परामर्श घेऊ. या तीन संकल्पनांचा परामर्श घेणारे शास्त्र म्हणजे ज्ञानशास्त्र किंवा प्रमाणशास्त्र. याचा भारतीय दर्शनांच्या चौकटीत विचार करायचा झाल्यास इंद्रियांद्वारे आणि मानसप्रक्रियेने आपल्याला जे काही ‘समजते’ ते सर्व ज्ञान. आता यात ‘इंद्रिये’ आणि ‘समजणे’ हासुद्धा मानसप्रक्रियेचाच भाग झाला.

*१. दृष्टी, ध्वनी, स्पर्श, स्वाद, गंध यांचा अनुभव देणारी पाच ज्ञानेंद्रिये.

पुढे वाचा

भावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज

‘भारतीय दंड विधाना’च्या (Indian Penal Code) कलम 295A नुसार, ‘मुद्दामहून धार्मिक भावना दुखविण्यासाठी कोणत्याही गटाच्या धर्मश्रद्धेचा अपमान करणे’ हा गुन्हा आहे. तसेच, कलम 298 नुसार, ‘मुद्दामहून कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी अभिव्यक्त होणे’ हा गुन्हा आहे. देवाचा अपमान करणार्‍या कृतीमुळे/वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखाविल्या जाऊ शकतात, त्यामुळे ह्या कलमांना ईशनिंदा-बंदी (anti-blasphemy laws) असेही म्हणतात. ही कलमे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेच्या विरुद्ध कशी आहेत ते पाहू.

कोणताही (एक किंवा अधिक) धर्म स्वीकारण्याचा, आचरण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा किंवा सदसद्विवेकबुद्धीनुसार वागण्याचा मूलभूत हक्क सर्वांना भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 25 अन्वये मिळाला आहे.

पुढे वाचा

रॅशनल जावेद अख्तर

जावेद अख्तर यांना ‘रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड’ देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच जून महिन्यात ‘सेंटर फॉर एन्क्वायरी’ या संस्थेने केली. विज्ञान, धर्मनिरपेक्षता आणि बुद्धिप्रामाण्यवाद या मूल्यांसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे.

एक गीतकार, पटकथाकार म्हणून जावेद अख्तर यांची ओळख प्रत्येक भारतीयाला आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या तार्किक अंगाची ओळख या ठिकाणी करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.

जावेद अख्तर यांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला ज्या घराला साहित्य, कला यांची परंपरा तर होतीच पण शिवाय देशप्रेमाचीही मोठी परंपरा होती. त्यांचे आजोबा फ़जल-हक़-खैरबादी यांनी १८५७च्या उठावात मुस्लिमांनी सहभाग घ्यावा म्हणून फतवा काढला होता.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता

‘ब्राईट’ (ठाणे)चे श्री. कुमार नागे यांचेकडून मला मोबाईलवर आलेल्या एका मेजेसमध्ये, ‘आजचा सुधारक’ला  बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य (नास्तिकता) ह्या विषयावर एक विषेशांक काढण्याचा मानस आहे असे व त्या अंकाची मध्यवर्ती कल्पना ‘बुद्धिप्रामाण्यवाद हा मानवास हितकारक आहे’ ही असेल असे लिहिले होते. त्यासाठी लिहिलेल्या या लेखात आधी आपण ‘बुद्धी’ व ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ म्हणजे काय ते पाहू. नंतर तो बुद्धिप्रामाण्यवाद मानवाला कसा हितकारक आहे ते समजून घेऊ व त्यानंतर अखेरीस त्याचा नास्तिकतेशी काय संबंध आहे ते पाहू.

बुद्धीचा अर्थ ‘ज्ञानशक्ति’ म्हणजे ‘मानवी मेंदूची योग्य तर्क करण्याची क्षमता किंवा विवेकी विचार करण्याची क्षमता’ होय.

पुढे वाचा

राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता

निरपेक्ष म्हणजे जे सापेक्ष नाही ते. धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘धर्माला सापेक्ष नाही ते’, म्हणजेच धर्मनिरपेक्षता हा प्रतिक्रियावादी शब्द आहे, क्रियावादी नाही. पहिल्यांदाच हे अशासाठी सांगायचं की कोणतीही निरपेक्षता ही सापेक्ष नसण्यात असते, अन्यथा निरपेक्षतेला स्वतंत्र अस्तित्व नाही. अर्थात निरपेक्षता ही वस्तूनिष्ठ नसून व्यक्तीनिष्ठ आहे. अजून थोडं स्पष्ट करायचं झालं तर एक लोकप्रिय उदाहरण घेऊ. ‘अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव’ असं जेस बोवेन म्हणतो. या विधानाचा अर्थ असा की अंधाराला स्वतंत्र अर्थ नसून प्रकाशाचा अभाव असलेल्या स्थितीला आपण अंधार म्हणतो. थोडक्यात काय तर अंधार तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रकाश नसेल.

पुढे वाचा

मन केले ग्वाही

‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ या विषयावर ऑक्टोबरचा विशेषांक काढायचा संपादकांचा मानस आहे. नास्तिक्य हे केवळ देवाला नाकारण्यातून आलेले नसून अफाट वाचन, अभ्यास, विज्ञानाशी त्याची सांगड, चिकित्सा असे सारेच त्यामागे असते, असे त्यांचे म्हणणे आहे. “बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे” अशी ह्या अंकाची मध्यवर्ती कल्पना असावी असे त्यांनी ठरवले आहे. समस्त सृष्टीपेक्षा मनुष्यसमाज असे संपादकांना म्हणायचे आहे असे मानते. माणसे बुद्धिप्रामाण्यवादी वागू लागल्याने सृष्टीचे म्हणजे समग्र जीवसृष्टीचे काही वेगळे भले होईल की नाही असा विचार मी केलेला नाही. आपण मनुष्यवस्तीच्या परिप्रेक्ष्यातूनच विचार करत असतो.

पुढे वाचा

धर्म आणि हिंसा

आज ‘धर्म’ ह्या शब्दानं अत्यंत शक्तिशाली अशा स्फोटकाची जागा घेतली आहे. हिंदू, मुसलमान, ज्यू, ख्रिश्चन…. हे शब्दोच्चारही मनात दहशत निर्माण करताहेत. धर्माच्या नावाखाली जगभर चाललेला उच्छाद केवळ उद्विग्न करणारा आहे. 

घरापासून रस्त्यापर्यंत चाललेल्या हिंसेला धर्मच जबाबदार ठरावा…. धर्माचं आपलं आकलन इतकं तोकडं असावं……. बिनदिक्कतपणे गलिच्छ राजकारणासाठी….. सत्ताप्राप्तीसाठी…. स्त्रीच्या उपभोगासाठी…. दलितांच्या खच्चीकरणासाठी तो वापरला जावा…. आणि आपण फक्त हतबलतेनं बघत राहावं! धर्म अशी राखरांगोळी करून टाकतो का माणसाची? की धर्माची ढाल करत वेगळंच काही राजकारण जगभरात चालू आहे? ह्या सगळ्या विध्वंसामागे सत्तालालसेची प्रेरणा कार्यरत आहे का?

पुढे वाचा

कोरोनानंतरचे जग – स्वैर अनुवाद – यशवंत मराठे

Original Article Link
https://amp.ft.com/content/19d90308-6858-11ea-a3c9-1fe6fedcca75
Yuvan Harari is the author of ‘Sapiens’, ‘Homo Deus’ and ‘21 Lessons for the 21st Century’

मानवजात एका जागतिक संकटाला सामोरी जात आहे. कदाचित आपल्या हयातीतील हे सर्वात मोठे संकट असेल. येत्या काही आठवड्यांत लोकांनी आणि सरकारांनी घेतलेले निर्णय, पुढील काळात जगाला कलाटणी देणारे किंवा बदल घडवून आणणारे ठरतील. त्याचा प्रभाव केवळ आरोग्यव्यवस्थेवरच नव्हे तर आपली अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृती यांवरदेखील पडेल. त्यामुळे आपल्याला त्वरेने आणि निर्णायकरित्या पावले उचलली पाहिजेत. मात्र त्याचवेळी, आपल्या कृतींचा होऊ शकणारा दीर्घकालीन परिणामदेखील विचारांत घेणे आवश्यक आहे.

पुढे वाचा

परमेश्वरश्रद्धेचे मानसशास्त्र – योगेश बादाड

कोरोना नावाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणूनं जगातल्या बलाढ्य परमेश्वरांना सळो की पळो करून सोडलेलं आहे. या जागतिक महामारीत जगातले सगळे देव लॉकडाऊन झाले. मुसक्या बांधून मंदिरात बसले. परमेश्वराच्या या  नाकर्तेपणावर सडेतोड हल्ले झाले. होत आहेत. शिवसेनेचे खासदार तथा ‘सामना’चे संपादक मा.संजय राऊत यांचा ‘देव मैदान सोडून पळाले’ या शीर्षकाचा संपादकीय लेख नुकताच ‘सामना’मधून प्रकाशित झाला. तो बराच गाजला. त्या प्रखर बुद्धिवादी लेखानं प्रबोधनकार ठाकरेंच्या सडेतोड लेखनशैलीची आठवण महाराष्ट्राला करून दिलेली आहे. मा.संजय राऊतांनी सदर लेखात आजच्या जैविक महायुद्धाच्या आणि वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर परमेश्वराच्या कर्तृत्वशून्यतेवर घणाघाती प्रहार करून त्याचं अस्तित्वच पार खिळखिळं करून टाकलेलं आहे.

पुढे वाचा