भारताची संस्कृती फार उच्च दर्जाची आहे, पाश्चात्त्य देशांमध्ये नीती खालच्या दर्जाची आहे, अशी एक समजूत आपल्यात आहे. आजची नाही तर गेल्या शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. आपली संस्कृती वरच्या दर्जाची असण्याची जी अनेक कारणे मानली जातात, त्यांत लवकर लग्न करणे हे एक, आणि स्त्रियांच्या बाबत ९९ टक्के स्त्रिया व पुरुष दोघांचीही दुराचाराची शक्यता कमी होते अशी एक भ्रामक कल्पनाही आहे.
नव्याण्णव टक्के लवकर लग्न करण्याला संस्कृती व दारिद्र्य दोन्हीही गोष्टी कारणीभूत आहेत. स्त्रीला रोजगार मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहता येत नसल्याने लग्न करणे प्राप्तच होते.