दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ

प्रा. दि. य. देशपांडे यांनी घातलेला प्रचंड वैचारिक गोंधळ व अध्यात्माला ‘गोंधळ’ ठरविण्याच्या अट्टाहासापायी केलेले स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन
प्रा. दि. य. देशपांडे यांनी आ. सु. च्या मे ९९ च्या अंकात लिहिलेला अध्यात्म : एक प्रचंड गोंधळ” हा लेख म्हणजे वैचारिक गोंधळाचा उत्कृष्ट नमुना आहे. हा संपूर्ण लेख अत्यंत तर्कदुष्ट पद्धतीने लिहिलेला असून इतकी तर्कदुष्ट विधाने देशपांड्यांसारखे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक कशी काय लिहू शकतात ही खरोखरच । आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. या लेखात अनेक चुकीच्या विधानांचीही रेलचेल आहे. काही उदाहरणे खाली देत आहे.

पुढे वाचा

विद्रोही विवेकवाद

दोन ईश्वरांतील विद्रोह हा माझा लेख एप्रिल ९९ च्या अंकात प्रकाशित करून त्यावर संपादकीय स्पष्टीकरणही दिल्यामुळे आजचा सुधारक विषयीचा माझ्यातील आदर दुणावला. परंतु आपले (व वाचकांचेही) गैरसमज झालेले दिसतात. माझे स्पष्टीकरण प्रकाशित करावे ही नम्र प्रार्थना.
जगात दोन प्रकारचे ईश्वर अजून जिवंत आहेत (१) मानवहित केंद्री (२) पुरोहित-ब्राह्मण-हित केंद्री ह्या माझ्या वाक्यातील लाक्षणिक अर्थ लक्षात घ्यावा. (१) मानवहित केंद्री : साधुसंतांनी मानलेला ईश्वर. मध्यस्थ-पुरोहित-ब्राह्मणांना डावलून संतांनी सरळ आपापल्या ईश्वराशी (विठ्ठल, राम, कृष्ण) संवाद साधण्याचा सत्याग्रह, विद्रोह मांडला होता. त्यांचा ईश्वरसुद्धा भक्तांना अभिप्रेत असलेल्या रूपात येऊन चंदन घासणे, दळण दळणे, ढोरे ओढणे, वगैरे अति सामान्यांची कामे करीत होता.

पुढे वाचा

सामाजिक कार्यकर्ता-परस्पर-संवाद

[आमचे मित्र श्री. तारक ,काटे ह्यांनी चार महिन्यांपूर्वी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीचा अहवाल आमच्याकडे पाठविला. अहवाल वाचल्यानंतर अशी कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची प्रेरणा त्यांना कशी काय झाली असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्याला त्यांनी जे उत्तर दिले ते, आणि त्यांच्या बैठकीचा निष्कर्ष आजचा सुधारक च्या वाचकांसाठी पुढे देत आहोत. त्यांच्या निवेदनात काही व्यक्तिगत तपशील आलेला आहे पण त्यामुळे त्यांच्या कार्यकलापाचे यथायोग्य आकलन होण्यास साह्य होईल, त्याचप्रमाणे त्यांनी काढलेले निष्कर्प योग्य आहेत वा नाहीत याची चर्चा करण्यास मदत होऊ शकेल असे वाटल्यामुळे तो समग्र वृत्तान्त येथे प्रकाशित करीत आहोत.]

पुढे वाचा

सर्वच त्या वातावरणाचे कैदी

… अॅबे दुब्वाने* म्हैसूर व दक्षिण भारत यांवरील आपली नजर काढून जवळच उत्तरेकडे जर ती लावली असती तर त्याच्या ज्ञानात जास्त भर पडली असती. व्यक्तीप्रमाणे एखादा समाजदेखील आपल्या जीवनप्रवासात पुष्कळ वेळा आगंतुक कारणाने देखील वाट चुकून आडमार्गास लागतो. एकदा आडमार्गास लागला म्हणजे कालांतराने त्या समाजाभोवती त्या परिस्थितीस अनुरूप असे पारंपरिक मानसिक वातावरण अस्तित्वात येते. मग वैयक्तिक व सामाजिक जवाबदारी यांचा भेद लयास जाऊन सर्वच त्या वातावरणाचे कैदी होऊन वसतात याचा पुरावा महाराष्ट्राच्या इतिहासात चांगलाच प्रत्ययास येतो. एका युगपुरुषाच्या नेतृत्वामुळे मराठी समाजात एकोपा व स्वातंत्र्य यांचे अननुभूत वारे खेळू लागले.

पुढे वाचा

संपादकीय

विवेकाचे उग्र व्रत
सोनिया गांधी यांची उमेदवारी ही आपल्या देशातली एक फारच मोठी घटना झाली आहे. सगळ्या देशाचे लक्ष सध्या त्यांच्याकडे लागले आहे. आपल्या देशातली लोकशाही ही किती अपरिपक्व आहे त्याचे हे लक्षण आहे. भाजपासारख्या सत्तारूढ पक्षाला विदेशात जन्मलेल्या, जिने आजवर राजकीय आकांक्षा दाखविली नव्हती अशा एका साधारण बुद्धीच्या महिलेने आपली उमेदवारी जाहीर केल्याबरोबर भीतीने कापरे भरावे ही घटना अत्यंत दुःखद आहे. आमच्या देशाच्या दृष्टीने नामुष्कीची आहे. काँग्रेस पक्षाजवळ सोनिया गांधींच्यापेक्षा अधिक मातब्बर व्यक्ती नाही. आपण सारेच किती व्यक्तिपूजक आहेत हेच ही घटना स्पष्ट करते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

मनुष्याचा आत्मा अन् विज्ञान
संपादक, आजचा सुधारक यांस,
प्रस्तावना : मनुष्याचा आत्मा व विज्ञान. यांमधील परस्पर संबंधावर इंग्लंडमधील फिजिक्स वर्ल्ड (मे १९९२) या नियतकलिकात काही वेधक विचार वाचावयास मिळाले. त्यांचा स्वैर व संक्षिप्त अनुवाद येथे दिला आहे. मनुष्य जी बुद्धिमत्तेची कामे करू शकतो, त्यांचा कर्ता असतो त्याचा आत्मा. ही संकल्पना होती देकार्त यांची! याच अर्थाने (फंक्शनल) येथे आत्मा ही संज्ञा वापरली आहे. इंग्लंडमध्ये वैज्ञानिक विचाराची एक दीर्घ परंपरा आढळते. आधुनिक विज्ञानाचा आद्यप्रणेता न्यूटन याचा जन्म इंग्लंडमध्येच झाला होता. त्यानंतरच्या सुमारे दोनशे वर्षांच्या कालखंडात ज्या युरोपिअन देशांनी विज्ञानाचा विकास करण्यास साहाय्य केले त्यांमध्ये इंग्लंडचा सहभाग महत्त्वाचा होता.

पुढे वाचा

सत्यदर्शनातील अडथळा

आजचा सुधारक च्या जानेवारी ९९ च्या अंकात सत्यदर्शनातील खरा अडथळा कोणता? ह्या शीर्पकाखाली मी एक जिज्ञासा व्यक्त केली होती. त्या संदर्भात दोन पत्रे आली. पैकी पहिले पत्र श्री. अनन्त महाजन यांचे एप्रिल ९९ च्या अंकात प्रकाशित झाले आहे. त्याचा प्रथम विचार करू . ते म्हणतातः “लेखिकेने आपल्या निवेदनात वापरलेला conditioning हा शब्द जे. कृष्णमूर्ती यांच्या लिखाणात सर्वत्र दिसतो; त्याचा अर्थ मला समजला नाही.” असे म्हणून त्यांनी त्यासंबंधी काही प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरे मानसशास्त्राच्या जाणकारांनीच द्यावयाला हवीत. याशिवाय “विश्वरूपाचे निरनिराळे आविष्कार म्हणजेच सुवर्णपात्र आहे” असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे वाचा

स्फुट लेख

भांडवलाचे वास्तव स्वरूप
एप्रिल ९१ च्या अंकात महागाई नाही – स्वस्ताई! या नावाचा स्फुट लेख लिहिलेला आहे. त्यानंतर आज भांडवलाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. विवेकी नजरेने जगाकडे पाहण्याची ही एक खटपट आहे.
कोणतेही उत्पादन करावयाचे असेल तर त्यासाठी भांडवल, श्रम आणि भूमि आणि कच्चा माल या चार वस्तूंची गरज असते हे आपण सगळेच जाणतो, मात्र भांडवलाच्या विपयीची आपली अगोदरची कल्पना ही शोपणाधिष्ठित असल्या मुळे एका वाजूला उत्पादन वाढत राहिले तरी दुस-या वाजूला विपमता कायम राहते. शोषणाचे पूर्वीचे स्वरूप आता थोडे फार वदलले असले, जो शोषित आहे तो अगदी सर्वहारा, सर्वस्व गमावलेला नसला तरी विषमता आणि शोपण हे शब्द पर्यायवाची वनले आहेत, आजवरच्या भांडवलाच्या व्याख्या खाजगी मालकी गृहीत धरून केलेल्या आहेत असे जाणवते.

पुढे वाचा

स्वदेशी चळवळ : एक मुक्त चिंतन

मे १९९९ च्या अंकात श्री. र. वि. पांढरे यांचा स्वदेशीची चळवळ हा लेख वाचण्यात आला. स्वदेशीच्या चळवळी बद्दल मतभेद असू शकतात. पण श्री. पांढरे या चळवळीचा विचार ज्या पद्धतीने मांडतात ती पद्धत वैचारिक लेखाला अंशोभनीय आहे. लेखकाचा रोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर असल्याचे दिसून येते. वास्तविक संघाचा हिंदुत्ववाद कधीच आक्रमक नव्हता. त्याला एवढेच अभिप्रेत होते आणि आहे की, संपूर्ण हिंदू समाज संघटित झाल्याशिवाय आक्रमक शक्तींचा प्रतिकार करणे शक्य नाही. पूर्वीच अस्तित्वात आलेली हिंदु-महासभा ही हिंदुत्ववादी राजकीय संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांत हेतुतः साम्य असल्याने राजकारणाचे आकर्षण व अगत्य असणारी संघाची काही माणसे हिंदु-महासभेत गेली.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ : गर्वाच्या खुट्या

राजाच्या खांद्यावरून वेताळ बोलू लागला. त्याचा स्वर नेहमीपेक्षा खिन्न होता. “राजा, आज अकरा में एकोणीसशे नव्याण्णऊ”. आपण गेल्या वर्षी याच दिवशी पोखरण – २ अणुचाचण्या केल्या, हे तुला आठवतच असेल.” राजाने मान डोलावून होकार भरला.
“काही लोकांना ह्या चाचण्यांमुळे बुद्ध हसला असे वाटले, आणि एकूणच या घटनेमुळे जगातील इतर देशांमध्ये आपली पत वाढली असे वाटले”. हा हर्षोन्मादाचा काळ तुला आठवत असेल, होय ना?” राजाच्याने राहवेना, तो भडाभडा बोलू लागला. “लोक फार विघ्नसंतोषी असतात, वेताळा. आपण आपल्या तंत्रशक्तीचे प्रदर्शन केले रे केले, आणि त्या बाकी लोकांनीही दोनचार बाँवस्फोट करून सारा मजा किरकिरा केला.

पुढे वाचा