आजच्या सुधारकच्या मे १९९५ च्या अंकात, डॉ. र. वि. पंडित यांचा, “अमेरिकेतील लोकांची लैंगिकता” हा लेख आहे. त्या लेखात वेगवेगळ्या जमाती आणि संस्कृतीतील लोकांच्या लैंगिक आचरणासंबंधी डॉ. पंडित यांनी विवेचन केले आहे; मुसलमान आणि इस्लामसंबंधाने त्यांनी काही विधाने केलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “इस्लाम लैंगिक आचरणासंबंधी बराच कठोर असला तरी, त्यातील बहुपत्नीकत्वाची, तसेच तात्पुरत्या पत्नीची प्रथा, पुरुषांच्या लैंगिक आचरणाला भरपूर सूट देते”. येथे डॉ. पंडितांनी धर्मशास्त्रांनी घालून दिलेले नियम आणि संबंधित धर्माचे अनुयायी पाळत असलेल्या प्रथा, या दोन गोष्टींची गल्लत करून, इस्लामी धर्मशास्त्राच्या नियमामुळे मुसलमानांतील लैगिक आचरण मोकळे असल्याचे सूचित केले आहे.
अन्तर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही
टॉप क्वार्कचा शोध लागल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या ९ एप्रिल ९५च्या अंकात आणि त्याच्या आधारे प्रा. काशीकरांचा लेख आजच्या सुधारकच्या प्रस्तुत अंकात प्रसिद्ध झाला आहे. अॅनी बेझंट आणि लेडबीटर यांनी भौतिक आणि रसायनशास्त्रातील विशेषेकरून अणुसंरचनेविषयी काही संकल्पना अंतर्दृष्टीने प्राप्त करून पूर्वीच प्रतिपादन केल्या होत्या. यावरून अंतर्दृष्टीने ज्ञान मिळू शकते असे मत ध्वनित करण्यात येत आहे. परंतु हा समज नवा नाही. विश्लेषण, संश्लेषण, विवेक, तर्क आणि प्रत्यक्ष पुरावा याभक्कम पायावर आधारलेल्या विज्ञानाने दिलेली आव्हाने पारंपारिक धर्मकल्पनांना पेलताआली नाहीत. याची प्रतिक्रिया म्हणून विज्ञान धोकादायी आहे अशी कल्पना गेल्या शतकात : रूढ झाली.
चर्चा- ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?
सामान्यतः विवेकवादी विचारवंत विश्वाच्या ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय नाही असे आग्रहाने प्रतिपादन करतात. परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ९ एप्रिल १९९५ च्या रविवार-पुरवणीत ‘सूक्ष्मवैश्विक क्रान्तदर्शने (Microcosmic visions) ह्या शीर्षकाखाली अनुराधा मुरलीधर यांनी जी माहिती दिली आहे ती त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावील अशी आहे.
मुरलीधर म्हणतात डॉ. अॅनी बीझंट व त्यांचे सहकारी सी. डब्ल्यू. लेडबीटर यांना क्रान्तदर्शनाची दिव्य अंतर्दृष्टी (clairvoyance) त्यांच्या पौर्वात्य गुरूंकडून प्राप्त झाली होती. ह्या दिव्य अंतर्दृष्टीमुळे सूक्ष्मात सूक्ष्म अणूदेखील मोठ्या आकारात ते आपल्या अंतर्मनात पाहू शकत असत. पातंजल योगसूत्रांत ‘अणिमा’ नामक ह्या सिद्धीची प्रक्रिया सांगितली आहे.
खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ७)
उद्याचे जग आजच्यापेक्षा जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे अधिक सुखी असावे असे विधान मी केले तर माझ्याशी कोणी विवाद करणार नाही. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांवर आज अधिक बन्धने आहेत. आणि त्यांची स्वायत्तता आज कमी आहे हे माझे विधानही बहुधा विरोधाशिवाय स्वीकारले जाईल. इतकेच नाही तर पूर्वीच्या मानाने ती बंधने आता कमी होत चालली असून स्त्रीची शारीरिक आणि आर्थिक शक्ती वाढावी ह्यासाठी समाजामध्ये ज्यूडोकराटेचे वर्ग कसे सुरू केले गेले आहेत आणि तिला नोकर्यांवमध्ये कसे सामावून घेतले जात आहे, अनुकंपेच्या आधारावर विधवांना आज नोकर्याक कश्या मिळत आहेत ते मला सविस्तरपणे समजावून दिले जाईल.
खरं, पुनर्जन्म आहे?
आपण नसावं असं कोणालाच वाटत नाही. पण वाटून काय उपयोग? जन्माला आला तो जाणार हे ध्रुवसत्य आहे. तसे मृताला पुन्हा जन्म आहे का? तेही ध्रुवसत्य आहे काय? । सश्रद्ध भावनावादी म्हणतो, ‘हो, आहे. कारण पुनर्जन्म पूर्वजन्म मानला नाही तर कशाची संगती लागत नाही. जीवनाला आधार मिळत नाही. ‘मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले, तयासारिखें भोगणें प्राप्त झालें.’ या विचाराने दुःख सहन करायला धीर मिळतो. ‘सदाचार तो थोर सांडूं नये तो का बरे,तर त्यामुळे मनाचे समाधान करता येते, या जन्मी फळ न का मिळेना’.
इतर
आम्ही आग्न्याचा किल्ला बघायला गेलो, वाटाड्याने आम्हाला सुंदर बागबगीचे, महाल, कलाकुसर दाखविली. पण ह्या बाह्य देखाव्याने माझे समाधान झाले नाही. मला तिथली तळघरे पाहायची होती. पण तिथला रक्षक ते दाखवेना. तेव्हा मी त्याला पैसे देऊन तळघरांत प्रवेश मिळविला. राजाच्या मर्जीतून उतरलेल्या स्त्रियांना तेथे कोंडून ठेवून त्यांचा छळ केला जात असे. आम्ही त्या अंधाच्या कोठड्या पाहिल्या. माझ्या मनात आले, ह्या तुरुंगाच्या भिंती बोलू लागल्या तर किती क्रौर्याच्या करुण कहाण्या कानावर येतील! लोक इथल्या कलाकुसरीच्या, सौंदर्याच्या आठवणी घेऊन जातात. मला त्यापेक्षा तिथल्याअंधारकोठड्याच आठवत राहिल्या!
संपादकीय
आगरकरांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा जून-जुलै अंक आगरकरविशेषांक म्हणून वाचकांच्या हातांत देताना आम्हाला स्वाभाविकच आनंद होत आहे. ह्या अंकाचे संपादन डॉ. भा. ल. भोळे ह्यांनी केले असून त्यांचे संपादकीय निवेदन पुढे दिलेआहे. डॉ. भोळे ह्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल आम्ही त्यांचे अत्यन्त आभारी आहोत. ते आमच्यापैकीच असले व त्यांचे औपचारिक आभार मानण्याची तशी गरज नसली तरी ते मानल्याशिवाय आम्हाला राहवत नाही.
हा आगरकर विशेषांक प्रसिद्ध करीत असताना गेल्या वर्षी वर्षारंभी दिलेले एक आश्वासन मात्र आम्ही पाळू शकलो नाही ह्याबद्दल वाचकांची क्षमा मागणे आम्ही आपले कर्तव्य समजतो.
आगरकरांचा जातिविचार भास्कर
आगरकरांनी आपल्या लिखाणातून कौटुंबिक सुधारणांवर अधिक भर दिला असला तरी काही राजकीय-सामाजिक-आर्थिक प्रश्नही हाताळले आहेत. एवढेच नव्हे तर ब्राह्मणी परंपरेतील अन्य सुधारकांपेक्षा अधिक साक्षेपाने त्यांनी त्यांचा ऊहापोह केला आहे. हिंदु समाजातील जातिभेद, उच्चनीचता, अस्पृश्यता यावर आगरकरांनी टीका केली आहे. जातिभेदांची उपयोगिता संपली असून ते सामाजिक प्रगतीच्या आड येत असल्यामुळे क्रमशः ते नष्ट व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जन्माधिष्ठित जातिव्यवस्था व्यक्तिविकासाला कशी मारक ठरते हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. त्यांच्या मते, जन्मतः सारखेच हक्क व योग्यता घेऊनआलेल्या व्यक्तींचे ते हक्क व योग्यता पुढे त्याच्या जातिधर्मावर नव्हे तर कमीअधिक बुद्धिविकासावर व उद्यमशीलतेवर अवलंबून असावी.
आगरकर आणि हिंदू-मुस्लिम प्रश्न
महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत विवेकवादाचे अध्वर्यु गोपाळराव आगरकर यांचे स्थान हे अग्रमानाचे आहे. गोपाळराव आगरकरांनी विवेकाधिष्ठित सर्वांगीण सुधारणेच्या विचाराला राजकीय स्वातंत्र्यापेक्षाही जास्त महत्त्व दिलेले होते. अर्थात सामाजिक प्रश्नांवर लढत असतानाच आगरकरांनी राजकीय प्रश्नांना चाच्यावर सोडलेले नव्हते. नातू देशपांडे संपादित “आगरकर-वाङ्मयाच्या दुसर्या खंडात आगरकरांचे राजकीय विषयावरील लेख आहेत. त्यांमध्ये त्यांनी मुंबईत आणि इतर ठिकाणी झालेल्या हिंदू-मुसलमान दंग्यांच्या संबंधाने लिहिलेले सहा लेख आहेत. त्यातून हिंदूमुसलमान प्रश्नासंबंधीची त्यांची संतुलित दृष्टी दिसते. या लेखांच्या अनुषंगानेच या प्रश्नावरील आगरकरांच्या विचारांचे हे विश्लेषण असल्याने माझ्या विश्लेषणाचे मर्यादित स्वरूप कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.
आगरकरांचे समाजशास्त्र
महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात सामाजिक परिस्थितीचा व समाजरचनेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यास सुरुवात झाली. त्याबाबतचे आपले परखड विचार प्रथम लोकहितवादी यांनी मांडले आणि म. ज्योतीराव फुले यांनी ह्या विचारांना एक नवे वळण दिले. त्यांच्या मांडणीत जातिव्यवस्थेस विरोध आणि समतेच्या आधारावर नव्या विवेकनिष्ठ समाजाची स्थापना या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. सुधारकार गोपाळ गणेश । आगरकर हे सामाजिक शास्त्रांचे गाढे अभ्यासक होते आणि समाजाच्या स्थितिगतीबाबतचे त्यांचे विचार आधुनिक आणि परंपराविरोधी होते. त्यांच्या सामाजिक शास्त्रविषयक विचारांवर स्पेन्सरच्या व मिल्लच्या विचारांचा प्रभाव पडला होता. म्हणून निसर्ग व मानवयांच्या विकासाची ते सातत्याने तुलना करताना दिसतात.