आगरकर आणि स्त्री

गोपाळ गणेश आगरकरांचे निधन झाले त्याला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.या विलक्षण ताकदीच्या माणसाला अवघे एकोणचाळीस वर्षांचे आयुष्य मिळाले आणि त्यातही जेमतेम पंधरा वर्षांचा काळाचा तुकडा आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्या हाती लागला. या अवधीमध्ये त्यांनी कितीतरी विषयांची, सखोल विचार आणि अभ्यास करून, मांडणी केली. त्यापैकी स्त्रियांच्या संदर्भात किंवा स्त्रीपुरुप-समतेच्या संदर्भात त्यांनी मांडलेल्या काही विचारांपुरताच माझा लेख मी मर्यादित करून घेतला आहे.
१ ऑगस्ट १८८८ या दिवशी सुधारक या त्यांच्या साप्ताहिकांसंबंधीचे एक जाहीर पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सुधारक सुरू करण्याचा उद्देश काय आणि त्यामध्ये प्रसिद्ध होणार्‍या साहित्याचे स्वरूप कसे असेल यासंबंधीची माहिती या पत्रकात आहे.

पुढे वाचा

आगरकरप्रणीत धर्मचिकित्सेचा आशय

गोपाळ गणेश आगरकर (१८५६ ते १८९५) हे धर्मवेत्ते नव्हते. डॉ. भांडारकर किंवा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याप्रमाणे ते तुलनात्मक धर्मशास्त्राचे अभ्यासकही नव्हते. रूढ अर्थाने ज्याला आपण धार्मिक वृत्ती म्हणतो तिचा त्यांच्या ठायी अभावच होता. अशी व्यक्ती जेव्हा धर्मविषयक प्रश्नांसंबंधी बोलू लागते तेव्हा आपल्या मनात दोन प्रतिक्रिया निर्माण होतात. एक, अशा अधार्मिक व्यक्तीला धर्मसंबंधाने बोलायचा खराच काहीअधिकार आहे काय, आणि दोन, अशी अधार्मिक व्यक्ती जेव्हा धर्माबाबत बोलेल तेव्हा ते धर्मविरोधीच असणार. आगरकरांना त्यांच्या हयातीतच या दोन्ही प्रतिक्रियांना तोंड द्यावे लागले होते आणि त्यांनी ते समर्थपणे दिलेही!

पुढे वाचा

विवेकवाद आणि आगरकर

आगरकरांच्या संपूर्ण विचाराचे सूत्र सांगायचे झाले तर ते विवेकवाद (rationalism) होय असे आपण निभ्रांतपणे म्हणू शकतो. या विवेकवादाचे स्वरूप त्यांनी कोठे तपशीलवार सविस्तर सांगितले आहे असे म्हणता येत नाही. त्यांनी आपल्या सुधारणावादाचा पुरस्कार करण्याकरिता साप्ताहिक वृत्तपत्र हे माध्यम स्वीकारल्यामुळे त्यांच्या विवेचनाला मर्यादा पडल्या होत्या. राज्यशास्त्रीय, समाजशास्त्रीय, तत्त्वज्ञानात्मक, धार्मिक इत्यादि विषयांची साधकबाधक, सविस्तर आणि मूलगामी चर्चा त्या माध्यमात करणे अशक्यप्राय होते. त्यांना लाभलेल्या अत्यल्प आयुष्यामुळे त्यांना ग्रंथरचना करण्यासही सवड झाली नाही. शिक्षण संपल्याबरोबर ते वृत्तपत्रीय व्यवसायात पडले, आणि प्रथम सात वर्षे केसरीचे संपादन करून पुढील सात वर्षे सुधारकचे संपादन करीत असतानाच त्यांचे वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी अकाली निधन झाले.

पुढे वाचा

शारदासदनासंबंधीचा वाद

(पं. रमाबाईंनी शारदासदनाची स्थापना करून त्यामध्ये अनाथ स्त्रियांना आश्रय दिला. तेथील वातावरणामुळे त्या स्त्रियांना ख्रिस्ती धर्माबद्दल आपुलकी वाटू लागली व त्यांपैकी काहींनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्याबरोबर शारदासदनाची लोकप्रियता घटू लागली व पालकांनी भराभर आपल्या मुली तेथून काढून घेतल्या. य. दि. फडके लिखित आगरकरचरित्रामधल्या त्या कालखंडाविषयी ..- सं.)
टिळकांनी संमतिवयाच्या विधेयकाविरुद्ध रान उठवण्यास सुरुवात केली तेव्हा नोव्हेंबर १८९० च्या नॅशनल रिव्ह्यू या नियतकालिकाच्या अंकात लायनेल अॅशबर्नर या साहेबाने हिंदु विधवा या ‘सनदी स्वेच्छाचारिणी’ असतात असा निर्गल आरोप करताच गोपाळराव आगरकर संतापले.

पुढे वाचा

आगरकर व रानडे यांच्यातील वैचारिक द्वंद्व

दहा मे १८५८ रोजी पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ‘धर्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर एक ऐतिहासिक चर्चा घडून आली. ही चर्चा पूर्वनियोजित नव्हती. सुप्रसिद्ध प्राच्यविद्याविशारद रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात भांडारकरांनी मांडलेल्या एका मुक्ष्याच्या निमित्ताने ही चर्चा उत्स्फूर्तपणे सुरू झाली. इच्छित सामाजिक बदलासाठी धर्मसुधारणा आधी घडून येणे अत्यंत आवश्यक आहे, असा भांडारकरांचा मुद्दा होता. माधवराव रानडे, विष्णु मोरेश्वर महाजनी, लोकमान्य टिळक आणि गोपाळराव आगरकर इ.विख्यात व्यक्ती त्या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. ‘अज्ञेयवादी तत्त्वज्ञानाचे प्राथमिक धडे देऊ पाहणारे अनिष्ट पुस्तक’ अशी ज्याची रानड्यांनी संभावना केली होती त्या ‘बटलर्स मेथडऑफ एथिक्स’ या पुस्तिकेचे लेखक व डेक्कन कॉलेजचे प्राचार्य फ्रांसिस सेल्बी आणि विश्वविख्यात कवी वर्डस्वर्थचे नातू व एलफिन्स्टन कॉलेजचे प्राचार्य विल्यम वर्डस्वर्थ हेही त्यावेळी उपस्थित होते.

पुढे वाचा

आगरकर विशेषांक – सुधारणांचा शोचनीय व्युत्क्रम

… सामाजिक सुधारणांपेक्षांहि राजकीय सुधारणा विशेष आवश्यक आहेत, आणि म्हणून राजकीय सुधारणा अगोदर झाल्या पाहिजेत. सुधारणांचा वास्तविक पाहतां असा क्रम असून आमचे सरकार त्याचा व्युत्क्रम करूं पाहाते, हे आश्चर्य नव्हे काय!.
….. जातिभेद, बालविवाह, असंमत वैधव्य, केशवपन वगैरे दुष्ट चालींपासूनआम्हांस पुष्कळ त्रास होत आहे; पणमिठावरील जबरदस्त कर, दर तीस वर्षांनी आमच्या जमिनीच्या बोकांडीस बसणारा रेव्हेन्यू सर्वेचा फेरा, व यमोदराप्रमाणे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये भक्ष्यस्थानी पडले तरी फिरून आपलें हपापल्यासारखे करणारे लष्करी खाते इत्यादिकांपासून आम्हांस जो त्रास होत आहे, त्यापुढे सामाजिक शोचनीय दुराचारापासून होणारा त्रास कांहींच नाही, असे म्हटले तरी चालेल.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक,
स. न. वि. वि.
आपण आपल्या एका टिपणात (फेब्रु. ९५) इंग्रजीतील व्हस्व दीर्घ उच्चार मराठीत दर्शविण्याकरिता काही खुणा सुचवल्या होत्या त्यावरील माझी प्रतिक्रिया मी आपल्याकडे पाठवली होती. परंतु जागेअभावी ती आपण प्रसिद्ध केली नसावी. आपल्याच विचारांचे सूत्र धरून श्री. दिवाकर मोहनी यांनी लिहिलेले ‘पाठ्यपुस्तक-मंडळाची चमत्कारिक लेखनपद्धती’ हे टिपण मे ९५ च्या अंकात आपण प्रसिद्ध केले त्याबद्दल अभिनंदन. बर्यााच वर्षापूर्वी श्री मोहनी यांचे देवनागरीतील जोडाक्षर-लेखनपद्धती यावरील एक व्याख्यान मी नागपुरातच ऐकले होते. त्याचेही या निमित्ताने मला स्मरण झाले.
श्री मोहनी यांनी हे सर्व या अगोदरच लिहावयास हवे होते.

पुढे वाचा

संपादकीय

महाराष्ट्र फाउंडेशन ह्या अमेरिकेमधल्या अनिवासी महाराष्ट्रीय श्री.सुनील देशमुख यांनी स्थापलेल्या संघटनेने आपल्या ह्या मासिकाला, आजचा सुधारक ला, उत्तम वैचारिक मासिकाला द्यावयाचा रु. ५०,००० चा पुरस्कार दिला आहे हे सांगण्यालाआम्हाला आनंद होत आहे.
आम्ही महाराष्ट्र फाउंडेशनचे त्यासाठी अत्यन्त आभारी आहोत. मासिकाच्या ह्या यशाचे श्रेय कोणा एकट्याचे नसून लेखकांसह सगळ्या परिवाराचे आहे ह्याची कृतज्ञ जाणीव संपादकाला आहे.
ह्या पुरस्कारामुळे आमची विचारप्रवर्तक उत्कृष्ट साहित्य सतत देण्याची व समाजपरिवर्तनासाठी निष्ठेने आंदोलने चालविण्याची जबाबदारी वाढली आहे. ती पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करूच आणि त्याहीकरिता आपणा सर्वांचे साह्य आम्हाला लागेल.

पुढे वाचा

चर्चा : खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ६)

स्त्रियांवर अन्याय करणारी, मुख्यतः त्यांनाच दुःखात लोटणारी विवाहसंस्था व तिच्यासोबत उदय पावलेले अनेक समज- उदा. पातिव्रत्य, प्रत्यक्ष परमेश्वरानेच घालून दिलेल्या पतिपत्नींच्या गाठी, जन्मोजन्मी एकच पती असावा असा फक्त स्त्रियांवर केला जाणारा संस्कार, (जन्मोजन्मी एकच पत्नी असावी असा पुरुषाने विचार करून त्यासाठी काम्य व्रतांचे पालन केल्याचे कोठे ऐकिवात नाही. उलट त्याने आपल्या धर्मपत्नीला टाकून देऊन तिची परोपरीने कुचंबणा केल्याची उदाहरणे अनंत आहेत!) त्याच अनुषंगाने विवाहविधीचेआणि स्त्रीयोनीचे पावित्र्य – हे सारे मानवनिर्मित आहेत; त्यांविषयीच्या कल्पना भिन्नभिन्न काळांत व प्रदेशांत बदललेल्या आहेत; त्यांमध्ये सनातन किंवा शाश्वत असे काही नाही हे एकदा मनामध्ये स्पष्ट झाले की स्त्रियांचे दुःख कमी करण्यासाठी सध्याच्या एतद्विषयक परिस्थितीमध्ये परिवर्तनीय काय आहे हे ठरविण्याची आपल्यावर जबाबदारी येते.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याला आता अनेक शतके वेताळाला खांद्यावर घेऊनच हिंडायची सवय झाली होती. त्याचे उत्तर तयार होते. ‘वेताळा, मला संभ्रमात पाडण्याचे तुझे नियत कार्य तू आपल्यापरीने केलेस. तसे करताना तू मूळ प्रश्नावर अनेक रंगांचे थरही दिलेस. तणाव असह्य होऊन कोवळ्या वयात आत्महत्या करणे भाग पडावे ही घटना निःसंशय दुष्ट.’
‘जगातले सर्व विचारवंत एखादी कृती करणे असेल तेव्हा प्रश्न व्यक्तिगत, फार तर कौटुंबिक पातळीवर सोडवतात. तुझ्या तिरस्काराला पात्र असलेल्या इंग्रजीत याला micro-level असे म्हणतात. जेव्हा क्रिया करणे नसेल तेव्हा तोच प्रश्न व्यापक पातळीवर macro-level वर नेऊन सर्वव्यापी उत्तर शोधतात.

पुढे वाचा